सिनेअभिनेत्री माधुरी पवार हिच्या नृत्याने वणीकरांना पडली भुरळ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मनसे दहीहंडी उत्सव आधुनिक जल्लोषात आणि उत्साहाने भरभराटीला येत असून, वणीमध्ये नव्याने समृद्ध परंपरा आणि प्रथा दर्शवत असल्याचा प्रत्यय काल शुक्रवारी (ता. 30) ला आला. अभूतपूर्व प्रतिसाद बघता नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव शासकीय मैदान येथे उत्सहात पार पडला आहे. 
शहराची आधुनिक प्रगती असूनही, परंपरा आणि उत्सव यांचे हे मिश्रण वणीचा चैतन्यशील सांस्कृतिक वारसा अधोरेखित करते. गोपाळकाला पर्वावर वणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडीची विशेष उपस्थिती मराठी सिनेअभिनेत्री हे एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामुळे उत्सवाला चार चांद लागतात. यावेळी सिनेअभिनेत्री माधुरी पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. माधुरी पवार यांच्या हस्ते, राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत बक्षीस गोविंदा पथकांना देण्यात आले. दरम्यान सिनेअभिनेत्री माधुरी पवार हिच्या नृत्याने वणीकरांना भुरळ पडली. 
मागील वर्षां देखील या दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळला होता. यावर्षीही मनसे दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शवून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मनसे नेते राजु उंबरकर यांनी ह्या दहीहंडी उत्सवाची संकल्पना वणी शहरात रुजवून उत्साही गोविंदासाठी आपली प्रतिष्ठा कायम राखत, मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अल्पभुदारक शेतकऱ्यांसाठी मोफत बि -बियाणे वितरण करण्याची घोषणा केली. या लक्षणीय उत्सवात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व उत्साहीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

रामगिरी महाराजांवर अखेर उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

उमरखेड : रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांनी १५ ऑगस्ट रोजी सिन्नर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यामुळे भारताचे नव्हे तर जगा भरातील मुस्लिम समाजाचे भावना दुखाविल्या गेल्याने राज्यभर आंदोलन व निषेध करत रामगीरी महाराजाला अटक करण्याची मागणी केली होती.  

या वादग्रस्त वक्तव्यामुळे उमरखेड शहरातील मुस्लिम समाजाने सुध्दा दिनांक १७ ऑगस्ट रोजी उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे पोलीस स्टेशन झालेल्या शांतता कमिटी बैठकीत मुस्लिम समाजाने बहिष्कार घातला होता. तसेच असहकार आंदोलनचा पवित्रा घेतल्याने यवतमाळजिल्हाचे पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी दखल घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक जगताप साहेबांना उमरखेड येथे पाठविले मुस्लिम अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि मुस्लिम समाज बांधवामध्ये चर्चा झाली चर्चेअंती समज गैरसमज दूर करून गुन्हा दाखल करून एफ. आय. आर. दिले यानुसार काल दिनांक ३० ऑगस्ट रोजी राम गिरी महाराजांवर गुन्हा दाखल केला. 

अश्लील भाषेत अवमान केल्याप्रकरणी, दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ (१), १९७, २९९, ३०२, ३५३(१) ब, ३५३(२) आदि कलमान्वेय उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

झरी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्य सरकारचे आभार!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : राज्यातील पोलीस पाटीलांचे साडे सहा हजार रुपये मानधन अपेक्षेप्रमाणे १५ हजार रूपये करण्यात आले. त्याची घोषणाही राज्य सरकारकडून करण्यात आली. मानधनात भरीव वाढ केल्याबद्दल मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मा. अजीत पवार उपमुख्यमंत्री यांच्या आभार व सत्कार प्रदर्शन कार्यक्रम दिनांक ३१/८/२०२४ ला नागपूर येथील ८ वे राज्यस्तरीय पोलीस पाटील अधिवेशनासाठी पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील संघटना अध्यक्ष विनोद पेरकावार यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गेडाम उपाध्यक्ष, सचिन कुळसगे सचिव, प्रभाकर पवार, माणिक शेंद्रे, चरणदास गडतवार, प्रकाश मेश्राम, ज्ञानेश्वर कोरांगे, गजानन सिग गहरवार, दिनेश सिडाम, नरसिग चंदावार, नंदु कुटावार, विजय भोयर, उत्तम भोयर, नागना मलेलवार, पुरुषोत्तम गोडे, गजानन मासटवार, गोपाल आत्राम, विकास येडमे, नारायण रेड्डी यालावार, बजरंग मडावी, शिवराम उरवते, सदाशिव आत्राम, दौलत टेकाम, बापुजी पेंदोर, मारोती कुमरे, अनिल धुर्वे, पैकु आत्राम, किरण कोडापे, यमुताई आत्राम, शालु पेंदोर, ज्योती आत्राम, प्रेमीला सुरपाम, गोपाल आत्राम, आदी उपस्थित होते.

वणी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष धनराज येसेकर यांनी शिवसेना नेते संजय देरकर यांच्या उपस्थितीत आज शनिवारी ३१ ऑगस्ट ला शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्तासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी संदेश टिकत, हर्षल गूहे, भोला पानघाटे, निकेश कडूकर, कार्तिक चांदेकर, चिंतन लोडे, निरक लोणारे, आर्या राऊत, प्रेम भटगरे, आशिष पिदुरकार, बादल येसेकर, धनराज मडावी, जावेद पठाण, सुजल जुमडे, कुणाल आगुलवर, हर्षल मडावी, संकेत विधाते, तेजस बागडे, आदित्य पाटिल, शेजल जुमडे,यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. 
मागील कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहणारे राष्ट्रवादी पक्षाचे धनराज येसेकर यांच्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. युवासेना उप जिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सर्व शिवसैनिक भगवान मोहिते, विनोद दुमने, चेतन उलमाले, मनिष बत्रा, साकेत भुजबळराव, उपस्थितीत होते. 

"गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" हे अभियान वणी विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी सुरू केले आहे. यावेळी शेकडो तरुणांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना-युवासेनेत प्रवेश केल्याने पक्षाला नवसंजिवनी मिळाली आहे.

जगन्नाथ महाराज विद्यालय खोखो चमू अजिंक्य

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नुकत्याच माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मारेगाव तालुका स्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धा पंचशिल विद्यालय नवरगाव येथे घेण्यात आल्या.त्यामध्ये मारेगाव तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला.

यामध्ये श्री.जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव च्या सतरा वर्षाखालील वयोगटाच्या मुलींच्या खो खो संघाने मारेगाव तालुक्यात अजिंक्यपद पटकावले.या मुलींच्या संघाला शिक्षिका कु.वैशाली मोवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

अजिंक्य चमुचे मुख्याध्यापक नरेश वाघमारे,संस्थेचे सचिव श्री.संजय देरकर तथा विद्यालयाच्या सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी अभिनंदन केले.

वंचित बहुजन महिला आघाडीचे मनपा प्रशासनाला निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटली नसुन नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: महिला वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. स्थानिक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने याबाबत निवेदन चंद्रपूर मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे. 

एका आठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. या शिवाय सुगत नगर नगिनाबाग येथील नाल्यांची अवस्था बिकट झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. या नाल्या रोगराईला आमंत्रण देत असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी ही बाब प्रामुख्याने नमुद केली आहे. 

यावेळी मनपाला निवेदन देतांना तनुजा रायपुरे, मोनाली पाटील, चंद्रप्रभा रामटेके, सुलभा चांदेकर या शिवाय वंचित बहुजन महिला आघाडीच्या विजया भगत, कल्पना शेंडे, रेखा उमरे, चंदा सहारे, सुनंदा भगत, नंदा बावणे, सुनंदा फुलमाळी, पुष्पा ठमके, प्रियंका चहांदे, सविता जिवणे, शरयू रोडके, आशा भसारकर, पुष्पा गाणार, रेखा उमरे, तृप्ती उराडे, शोभा नरवाडे, अश्विनी नरवाडे, आशा उराडे, ज्योती उंदीरवाडे, शोभा वाघमारे, इंदुताई डोंगरे आदिं पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



पटवारी संतोष पवार यांच्या हत्येचा बिगर सात बारा शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : हिंगोली जिल्ह्यात पटवारी संतोष पवार यांची खुलेआम भर दिवसा हत्त्या झाली त्याची पुनरावृत्ती पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी पटवारी संवरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी पांढरकवडा तहसीलदार मार्फत उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.

पुढें निवेदनात नमूद आहे की,सदर घटना माणुसकीला च नव्हे तर लोकशाहीला काळीमा फासणारी आहे कारण कोणत्याही सरकार मध्ये महासुल विभाग हा अतिशय महत्वाचा भाग असुन त्याच्या कणा म्हणजे पटवारी आहे त्याचीच भरदिवसा हात्त्या होत असेल तर या पेक्षा आपल्या सरकारचे दुर्दैव कोणतेही दुसरे नाही म्हणून पटवारी संतोष पवार यांच्या हत्येची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी पटवारी संवरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी करुन लवकरच बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पटवारी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे सहीत दिलीप मडावी, पुरुषोत्तम कोदापे, नीलखंड मडावी, नागोराव मडावी, शंकर मरस्कोल्हे, रामचंद्र सिदम, रामकिसन कुमरे यासह बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे महिला अध्यक्षा श्रीमती रेश्मा अगिलवार उपस्थित होत्या.

गोरज येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोरज येथे वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहेत. 

निर्मला किसन आत्राम (अंदाजे वय 38) असे वीज पडून मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुपारी गोरज शेतशिवारात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करित असताना मृतक महिला गावाच्या दिशेने निघाली असता दुपारी 3.15 वाजता च्या दरम्यान घराच्या दारात ती पोहचण्याच्या अगोदरच गावाच्या जवळच वीज पडल्याने निर्मला आत्राम ही विवाहित महिला जागीच मृत पावल्याचे माहिती आहे. 

आज दि. 30/8/2024 रोज शुक्रवारला दुपारी दोन अडीज वाजता च्या दरम्यान गोरज परिसरात ढगाळ वातावरण होऊन जोरदार पाऊस पडायला सुरूवात झाली होती, पावसामुळे ती घराकडे निघाली असता अगदी गावाच्या लगत असलेल्या एका बंड्या जवळच अचानक वीज पडून निर्मला आत्राम या महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

तीच्या पश्चात पती, दोन मुलं असा बराच आप्त परिवार आहे. 

हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ वणीत काम बंद आंदोलन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : हिंगोली जिल्ह्यातील आडगावमध्ये सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आली. तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून त्यांना जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा विदर्भ पटवारी संघ, नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ, उपविभागीय शाखा वणी तलाठी संघाने निषेध व्यक्त केला असून काल वणीत काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

मौजे आडगांवं रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भरदिवसा निघृण हत्या झालेली असून या भ्याड हल्याचा विदर्भ पटवारी संघ तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून ही हत्या एका तलाठ्याची नसून ही समग्र महसूली व्यवस्थेची हत्या आहे. अशी विदर्भ पटवारी संचाची धारणा झाली आहे.

सदर घटनेतील दोषीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्यांचे कुटुंबियांस न्याय मिळवून द्यावा तसेच तलाठी/मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासन प्रशासनाने ठोस पावले उचलावी यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी/पटवारी/मंडळाधिकारी समन्वय महासंघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काल विदर्भ पटवारी संघ नागपूरचे वतीने गुरुवार दि.29/08/2024 रोजी उपविभाग वणीतील सर्व तलाठी एक दिवशीय कामबंद आंदोलन पुकारत कडकडीत निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान,वणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वणी उपविभागीय शाखेचे सर्व पदाधिकारी व तलाठी कर्मचारी उपस्थित होते. 

तिकडे रोगराईने डोकं वर काढले इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडावाने वंचित बहुजन आघाडी आक्रमक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात उप विभागीय अभियंता, वणी यांना निवेदन देण्यात आले. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे.

शहरात विविध रोगराई ने डोकं वर काढले असता शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने उष्णतेच्या उकाड्याने वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून वणीकरवाशी व परिसरातील नागरिक घेत आहेत. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत विचारणा करतोय म्हटलं तर कोणीही बोलायला तयार नसल्याने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी सार्वजनिक करावे अशी, मागणी निवेदनातून करण्यात आली. विजेची तक्रार केल्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते असा आरोप देखील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला आहे. वरील नमूद सर्व बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही व्हावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरिष पाते, सह मिलिंद पाटील, प्रदीप मडावी, शारदा मेश्राम, उत्तम मडावी, संतोष पेंदोर, शिवेंद्र ब्राह्मणकर, गजानन दामोदर, विलास दुर्गे, कपिल मेश्राम, मारोतराव कोठेकर, सिद्धार्थ गोमासे, अर्चना नगराळे, प्रशांत गाऊत्रे, विशाल देठे, वैशाली गायकवाड, बुद्धघोष लोणारे,प्रणिता ठमके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वणीत दहीहंडी चा थरार: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : दहीहंडीचा उत्सव म्हटलं की मुंबई आणि ठाण्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे आपण ऐकलंच आहे. पणमात्र, विदर्भात तरी प्रत्यक्षात खूप कमी बघितलं जात म्हणायला हरकत नाही. मात्र, तेच आता प्रत्यक्ष बघण्यासाठी तयार रहा, कारण मनसे घेऊन येत आहे, सर्वात उंच अशी दहीहंडी उत्सव. उद्या शुक्रवारी 30 ऑगस्ट ला सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

वणी शहरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. हे मागील वर्षीपासून आपण कुतूहलाने पाहत आहोत. यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वावर मनसे नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव साजरी करण्यात येत आहे. या मनसे दहीहंडी उत्सवाची जय्यत झाली असून उद्या (ता.30) रोजी या उंच अशी दहीहंडी चा थरार वणीकरांना थेट अनुभवायला मिळणार आहे. या उत्सवात मराठी सिनेअभिनेत्री माधुरी पवार ही देखील उपस्थित असणार आहे. त्यामुळे ही 'दहीहंडी' आणखीनच शिगेला पोहचली आहे. 

शासकीय मैदान येथील भव्य पटांगणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हा उत्सव साजरा होणार आहे. विशेष म्हणजे माधुरी पवार या सिनेअभिनेत्रीला दहीहंडी उत्सवाकरिता मनसे कडून खास आमंत्रित करण्यात आले आहे. दिलखेचक दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोविंदा पथकं वणीत दाखल होणार आहेत. 

मुंबई, ठाण्याप्रमाणे विदर्भातील वणी येथे उद्या होणाऱ्या सर्वात उंच अशी दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवण्याकरिता व हर्षउल्हासाच्या वातावरणात सहभागी होण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.

वणी येथील विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेत 'हे' ठरलेत प्रथम पुरस्काराचे मानकरी!

सह्याद्री चौफे | वृत्तसंस्था 

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेला विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पंधरा वर्षांवरील खुल्या गटातून पुरुष विभागात सौरव तिवारी (नागपूर) याने प्रथम क्रमांक तर, महिला गटातून सलोनी लव्हाळे (भातकुली, अमरावती) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दहा वर्षांवरील व पंधरा वर्षांआतील मुलांच्या गटात प्रणय उपासे (ब्रह्मपुरी) याने प्रथम क्रमांक तर मुलींच्या गटात लावण्या नागरकर (चंद्रपूर) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.या चारही धावपटूंना पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि सोनेरी पदक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

पंधरा वर्षांवरील खुल्या गटातून साईनाथ पुंगाटी (भामरागड) द्वितीय तर महिला गटातून अंजली मडावी (नागपूर) हिचा द्वितीय क्रमांक आला. दहा वर्षांवरील व पंधरा वर्षांआतील मुलांच्या गटात पियुष गायधनी (चिमूर, चंद्रपूर) यांचा द्वितीय तर मुलींच्या गटात रुचिका नागरकर (चंद्रपूर) हिचा द्वितीय क्रमांक आला. या चारही धावपटूंना तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रुपेरी सन्मानपदक प्रदान करण्यात आले.

पंधरा वर्षांवरील खुल्या गटातून पुरुष विभागात सनी फुसाटे (वर्धा) याने तृतीय तर महिला गटातून अभिलाषा भगत (राजुरा ,चंद्रपूर) हिने तृतीय क्रमांक पटकावला.दहा वर्षांवरील व पंधरा वर्षांआतील मुलांच्या गटात अभय मस्की (नागपूर) याने तृतीय क्रमांक तर मुलींच्या गटात सेजल चौधरी (वर्धा) हिने तृतीय क्रमांक पटकावला. या चारही धावपटूंना दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, सन्मानपदक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत यवतमाळ, चंद्रपूर,नागपूर,अमरावती, गोंदिया भंडारा, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांतील ९७४ धावपटू सहभागी झाले. सकाळी सात वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे अध्यक्षतेखाली वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते आझादी की दौड स्पर्धेचे उद्घाटन झाले.स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ झाला.

यावेळी वणीचे ठाणेदार अनिलकुमार बेहराणी, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख सहसचिव अशोक सोनटक्के, कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे, अनिल जयस्वाल, नरेश मुनोत, सुरेश शुक्ल, माजी आमदार विश्वास नांदेकर, लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर,वणी लाॅयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक महेंद्र कुमार श्रीवास्तव, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.उमेश व्यास, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा.पुरुषोत्तम गोहोकार वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य चित्रा देशपांडे, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर, वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक सीता वाघमारे,हे विचारपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. मनोज जंत्रे यांनी केले तर प्रशांत गोडे यांनी आभार मानले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक प्रा उमेश व्यास, क्रीडा शिक्षक प्रा.कमलेश बावणे, किरण बुजोणे ,रूपेश पिंपळकर, इंदु सिंग, यांचेसह लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय,वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संस्थांमधील सुमारे दोनशे पन्नास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , वाहतूक पोलीस, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.


जेष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना मातृशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांच्या मातोश्री अनुसया नानाजी तांबे (वय ८६) यांचे आज दि. २९ ऑगस्ट ला दुपारी ३.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. उद्या शुक्रवारी ११ वाजता त्यांची महात्मा ज्योतिबा फुले चौक परिसर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

धार्मिक वातावरणाने गजबजली वणी नगरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने शहरात सात दिवस विविध धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक कौटुंबिक कार्यक्रम आयोजन केले होते. या विविध कार्यक्रमाचा लाभ वणीकरांनी मोठ्या आनंदाने घेत जन्माष्टमी सोहळा उत्सहात साजरा केला.

सात दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.त्यात शेवटच्या दिवशी 27 ऑगस्ट ला वणी शहरात भव्य शोभ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी भजन, नयन रम्य देखावे, आकर्षक रोशनाई, आदिवासी संस्कृती जपणारे गोंडी ढेमसा नृत्य, शिव तांडव नृत्य, मनमोहक गरबा, छत्रपती ढोल ताशा पथक, कोलकत्ता येथील महाकाली, भव्य बजरंग बली, यासह अनेक भव्य मनमोहक देखावे या शोभा यात्रेत सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. 

शहरातून सायंकाळी सहा वाजता अमृत भवन मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान बगीमध्ये श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शिवपार्वती, विष्णू लक्ष्मी यासह विविध वेशभूषा परिधान करून या शोभा यात्रेत बालगोपाल सहभागी झाले होते. ही यात्रा अमृत भवन ते इंदिरा गांधी चौक, खाती चौक, गांधी चौक, कमान चौक, टागोर चौक, महाराष्ट्र बँक चौक, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशी मार्गक्रमण करत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. 

विशेष उल्लेखनीय की,या शोभा यात्रेत यावर्षी मनमोहक विविध देखाव्यांनी वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शोभा यात्रेत माजी खासदार ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, संजय देरकर, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, पवन एकरे, सत्यजित ठाकूरवार यासह शहरातील इतर मान्यवर या सह नागरिक हजारो महिला पुरुष भाविक भक्तगण हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की चा जयघोष करीत शोभायात्रेत सहभागी झाले होते. 

श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सल्लागार विजय चोरडिया, सौ. सीमा विजय चोरडिया, समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. कुणाल चोरडिया, सौ. ख्याती कुणाल चोरडिया यांनी शोभायात्रेत सहभागी झालेल्या बालगोपाल व भक्तांची काळजी घेतली. दरम्यान संपूर्ण वणी शहरात शोभायात्रा निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या बंदोबस्तासाठी वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी यांनी स्वतः हजर राहून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अशा तर्हेने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या हर्षऊल्हासात पार पडला.  

युवासेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील नायगाव (वरोरा रोड), घोंसा व भालर या गावातील असंख्य युवकांनी पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे याच्या उपस्थितीत युवासेनेचे वणी शहराध्यक्ष साकेत भुजबळराव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत 24 ऑगस्ट रोजी युवासेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यामध्ये विशेषतः नवंतरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सध्या राजकारणात साकेत भुजबळराव हे खूप ऍक्टिव्ह असून समाजकारणात व राजकारणात आपले फार योगदान देत आहेत. सोबतच सध्याचे युवा पिढीत ते लोकांना मार्गदर्शन व प्रोत्साहीत करून युवासेनेत पक्ष प्रवेश घेत आहे.  
 
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ कोकास, राज्यकार्याध्यक्ष अविनाश भाऊ भुजबळराव, माजी उपशहर प्रमुख अजय भाऊ चन्ने यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.  वैभव पिंपळशेंडे व सुनील खडतकर व त्यांच्या मित्रपरिवाराने युवा सेनेमध्ये प्रवेश घेतला.

 याप्रसंगी राज्य संघटक सतीश भाऊ जोगी, कुंभाचे शाखा प्रमुख अंकुश जोगी, सामित भुजबळराव, अनिकेत टिकले, लखन व विपुल व समस्त युवासेना व शिवसेनेचे आजी व माजी पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

वणी : विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेची जय्यत तयारी!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विदर्भस्तरीय 'आझादी की दौड ' स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण विदर्भातून धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

साडे चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होईल.'अ' गटात १० वर्षावरील ते १५ वर्षांआतील वयोगटातील मुले व मुली असे दोन विभाग आहेत.'ब' गट १५ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून या गटात स्त्री व पुरुष असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांस अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजारांची रोख पारितोषिके, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. एकूण चाळीस हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांतून सर्व गटातील सुमारे सतराशे धावपटूंनी नोंदणी केली आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयात या स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार यांच्या अध्यक्षतेत वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते होईल. स्पर्धा आटोपल्यानंतर ताबडतोब पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी, वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक सीता वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेन्द्र सुलभेवार, गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी ही स्पर्धा उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांचा व एकूणच व्यवस्थापनाचा आढावा घेतला आहे.स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.उमेश व्यास यांच्या नेतृत्वात विविध समित्या तयार केल्या असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे.

या स्पर्धेच्या तयारीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया सचिव सुभाष देशमुख सहसचिव अशोक सोनटक्के,सर्व कार्यकारिणी सदस्य, लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, राजाभाऊ पाथ्रडकर व सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य सुधाकर रेड्डी, स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.उमेश व्यास, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर, मुख्याध्यापक प्रशांत गोडे , प्राचार्य वर्षा देशपांडे, , क्रीडा शिक्षक प्रा.कमलेश बावणे, किरण बुजोणे ,रूपेश पिंपळकर, इंदु सिंग, अनिल निमकर, दत्तात्रय मालगडे, अरविंद गारघाटे यांचेसह लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय,वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संस्थांमधील सुमारे दोनशे पन्नास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम करीत आहेत.
  
“स्पर्धकांचा सहभाग लक्षणीय असा आहे. विदर्भस्तरीय 'आझादी की दौड’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.” असे आवाहन या स्पर्धेच्या तयारीसाठी लोकमान्य टिळक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय,वणी लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सभेत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया,सहसचिव अशोक सोनटक्के, कार्यकारिणी सदस्य नरेश मुणोत हे मान्यवर उपस्थित होते.

मार्डी ते हिवरा रस्त्याची दयनीय अवस्था

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी ते हिवरा ह्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रस्त्यावर यामुळे अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. कोणतेही वाहन चालवताना रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे या मार्गांवरील प्रवाशी संताप व्यक्त करू लागले आहेत. 

मार्डी वरून हिवरा कडे येजा करण्यासाठी असलेला हा मुख्य रस्ता धोबे व बोढाले यांच्या बंडया जवळ रस्त्याची चाळण होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याचे शिवसेना माजी उप तालुका पुरुषोत्तम बुट्टे यांनी सांगितले तर, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागात मोडत असल्याने ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद याद्वारे या रस्त्याचे काम करता येत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे.

तत्काळ मार्डी ते हिवरा रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. अन्यथा गावाकऱ्यांना घेऊन भजन आंदोलन करण्यात येइल व संबंधित्यांचा भोंगळ कारभार रस्त्यावर आणू, तसेच हा रस्ता कधी मार्गी लागणार याबाबत त्यांनी संबंधितांना विचारणा केली असल्याचेही पुरुषोत्तम बुट्टे यांनी 'सह्याद्री चौफेर'ला बोलताना सांगितले आहे. 

त्यामुळे मार्डी ते हिवरा या दुरावस्था झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागतोय का? याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

नांदेपेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणाऱ्या शिवसेना पक्षांकडून 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या तत्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्या न्याय व हक्का साठी सुरू ठेवलेला लढा आजही कायम आहे. या लढ्यात तालुक्यातील नांदेपेरा येथे शेकडो नागरिकांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना व युवासेनेची शाखा गठीत करण्यात आली. 

वणी विधानसभा क्षेत्रात "गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक" हे अभियान शिवसेना अंतर्गत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु झालेला आहे. शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या जात आहेत. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून पक्ष संघटन बळकट करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाचं प्राबल्य वाढविण्याकरिता त्यांनी "कार्यकर्ता जोडो" हे मिशन हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तळागाळातील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेची ढगधगती मशाल हाती घेत असल्याचे चित्र दिसत आहेत. नागरिकांचा शिवसेनेकडे कल वाढू लागला आहे. 24 ऑगस्ट 2024 ला नांदेपेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेची व युवासेनेची शाखा गठीत करण्यात आली. त्यांच्या हस्ते शाखा फलकाचेही अनावरण करण्यात आले. यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, उपजिल्हा संघटीका डिमन टोंगे, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, नेताजी पारखी, दिपांकर वनकर, डॉ. आस्कर, बंडू टोंगे, संजय देठे, विनोद ढुमणे, जगन जुनगरी, प्रेमा धानोरकर, मनोज वाकटी, चेतन उलमाले आदींची उपस्थिती होती.

नांदेपेरा येथे घेण्यात आलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात नानाजी डोंगे, वासुदेव बोढेकार, रामअवतार कनाके, शुभम खोंडे, रामकृष्ण खामनकर, पांडुरंग येवले, दिवाकर डोंगे, रविंद्र येवले, रामकृष्ण दुमोरे, राजू चिडे, संजय चिकटे, किशोर चिकटे, अनिकेत चिकटे, विनोद गेडाम, चंद्रज्योती शेंडे, अश्विनी डोंगे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बंधन बांधले. तसेच नांदेपेरा येथे शिवसेना व युवासेनेची शाखाही गठीत करण्यात आली. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन शाखा:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदेपेरा शाखा प्रमुख म्हणून सुरेश शेंडे, सचिव संदीप ठेंगणे, सहसचिव सुभाष झाडे, कोषाध्यक्ष प्रकाश चिडे, शाखा उपप्रमुख, राजू ठमके, पांडुरंग हेपट, सल्लागार निळकंठ डोंगे, यांची तर सदस्य म्हणून अविनाश चिकटे, मोहन डोंगे, प्रविण खामनकर, प्रमोद कोल्हे, बंडू तोडसाम, पुंडलिक उईके, गजानन उईके, कार्तिक उईके, महेंद्र निखाडे, विनोद डोंगे, गणपत खोंडे, गणराज किनाके, पांडुरंग खोके, राजकुमार उपखट, संतोष दुमोरे, राजू लांडगे, विठ्ठल विरूरकर, महेंद्र बोधे, कवडूजी डोंगे, राजू डोंगे यांची निवड करण्यात आली आहे. 

युवासेना नवीन शाखा: 

युवासेना शाखा प्रमुख म्हणून गोपाळ डोंगे, सचिव संजोग झाडे, उपशाखा प्रमुख विवेक चरडे, रोशन गोबाळे, सहसचिव जगदीश देऊळकर, कोषाध्यक्ष गौरव कोल्हे यांचा तर सदस्यांमध्ये प्रवीण खामनकर, निखिल डोंगे, अमित डोंगे, शुभम खोंडे, विक्की चहानकर, प्रज्वल कोल्हे, नयन चिकटे, क्रिष्णा घोडमारे, प्रशांत मिलमिले, निखिल तोडसाम, साहिल ठमके, गणेश खामनकर, राहुल केमेकर, स्वप्नील केमेकर, अमोल चहानकर, संदीप चहानकर, राहुल ठमके, हनुमान उईके, प्रमोद नवले, अभय दुमोरे, हर्षल घोडमारे, वैभव निखाडे, सुनिल गोबाडे, बंटी पाटील, मंगेश ठेंगणे, सोहेल मसाळे, आदिक चहानकर, पवन पिपराळे, सौरभ खोंडे, कार्तिक अंड्रस्कर यांचा समावेश आहे. 

शिवसेनेच्या या पक्ष प्रवेश व शाखा फलक अनावरण सोहळ्याला शिवसैनिक व गावातील नागरिक महिला, आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नोंदणी शिबिराचे अयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र शासनाने युवकांकरिता सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच मोफत नोंदणी शिबिर युवाशक्ती क्रांतिकारी संघटना तर्फे दि. 19/08/2024 सोमवार पासून सुरू करण्यात आला आहे.
                         
महाराष्ट्रातील युवक कार्य कुशल व्हावेत करिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत  बारावी ,आयटीआय, पदविका ,पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण युवकांना शासन मानधन तत्वावर सहा महिन्याकरिता लघु आणि मध्यम एस एम इ एस व मोठे उद्योग, सहकारी संस्था, शासकीय,निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था वेगवेगळ्या आस्थापनामध्ये नोकरीची संधी दिली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 12वी, आयटीआय/पदविका, पदवी/पदव्युत्तरांना मानधन दिले जाणार आहेत. यासाठी युवकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. 

ही योजना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचून त्यांना रोजगाराच्या संधीची माहिती व्हावी व युवकांना ती संधी मिळवता यावी या कल्याणकारी हेतूने युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेतर्फे नोंदणी व मार्गदर्शन शिबिर राबवण्यात येत आहे. 

खालील ठिकाणी योजनेची माहिती व नोंदणी करता येइल :
1) आदर्श नागरी सहकारी पतसंस्था,वणी घरसंसार महासेल च्या बाजुला खराटे सर कॅप्लेक्स, ता वणी
2) आदित्य बिर्ला लाईफ इन्शुरन्स ऑफिस
नगर परिषद कॉम्प्लेक्स वरोरा रोड, रजिस्टर ऑफिस जवळ वणी, ता. वणी
3) माई विल अलाइनमेंट अँड कार वॉशिंग सेंटर नांदपेरा चौक, महावीर चौक ,वणी - वरोरा बायपास ता वणी
संघटनेचे उद्दिष्ट युवकांपर्यंत योजना पोहोचवने व युवकांना नोकरीची संधी मिळविता यावी आहे. उमेदवाराच्या निवडी मध्ये संघटनेचा संबंध नाही. पुढील एका महिन्यापर्यंत नोंदणी शिबिर सुरू राहील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली. 

वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी रोड स्थित किन्ही परिसरातील मैदानावर हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला भर पावसात हजेरी लावली होती. बंजारा व आदिवासी समाजाच्या भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी आदिवासी व बंजारा समाजबांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत केले. मान्यवरांनीही गुलाब पुष्प उधळून लाडक्या बहीणींचे स्वागत केले. काही भगिणींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त केला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना त्यात होती. त्यातून आलेला आनंद त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. यावेळी महिला भगिनी हात उंचावून मोबाईल टार्च लावून त्यांची आत्मनिर्भरता दर्शवित होत्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.


भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – सुनीता रामटेके

 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली आर्णी तालुक्यातील लोणी येथील सुनीता रामटेके यांनी. अशीच प्रतिक्रीया लोणी येथील रहिवासी मिना शिंदे यांनी देऊन मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानले.

संसाराला हातभार लाभला – संगीता चव्हाण

मी शेत मजुरीचे काम करते. घरात नेहमी पैश्याची चणचण भासत होती. आता माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील. या पैश्यातून मी माझ्या चारही मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपडे खरेदी करणार आहे. योजनेतून पैसे मिळाल्या निमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची खूप खूप आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी भावना व्यक्त केली दिग्रस तालुक्यातील वडगाव तांड्याच्या संगीता भाऊराव चव्हाण यांनी.  
 
             

ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट झाल्यावर रिसबमिट करण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सॲप करा; लगेच अर्ज मंजूर होणार..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

लाडकी बहिण योजनेचे 31 जुलै नंतर केलेल्या अर्जाची छाननीची सुरुवात झाली असून या अर्जात देखील अनेक महिलांना रिसबमिट करण्याचे पर्याय दिले आहेत. या रिसबमिट प्रोसेसमध्ये काय काय करायचं? त्याचसोबत अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचं? 

यासाठी 'महाराष्ट्रवादी' व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत.

व्हॉट्सॲपवर समस्या कशा सांगायच्या?

• सर्वप्रथम 9861717171 नंबरवर Hi मॅसेज व्हॉट्सअप करा.
• त्यांनतर आलेल्या पर्यायामधून तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा.
• ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा.
• योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा.
• समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा.
• यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.
• यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल.

महिलांना तक्रार करता येणार?
माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारी वाढविण्यासोबत त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी ७ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून ५० हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॉ.अशोक उईके, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे. या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही, त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिण्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना ३ सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिण्याला ६ ते १० हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे.

राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. ७.५ एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून स्त्री शक्तीचा जागर - देवेंद्र फडणवीस
राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने स्त्री शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या १८ व्या वर्षापर्यंत १ लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. ८ हजार ५०० कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपुस केली जात आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला १२ तास वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुस, सोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाही, यासाठी प्रयत्न करतो आहे. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही - अजित पवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खुष आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. योजनेतून महिलांना ४५ हजार कोटी रुपये आपण देतोय. ही रक्कम महिलांच्या हक्काची, अधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल.  

राज्यातील ५२ हजार कुटुंबाना वर्षाला ३ सिलेंडर आपण मोफत देतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आल्या. मुलींशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण केला. राष्ट्रपतींची मंजूरी झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. असे गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची देखील भावना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु - संजय राठोड
शेतकरी, महिला, गरीब, कामगार, युवक यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी त्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून १ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ६० हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेमुळे बहिणींना आता हात पसरायची गरज राहिलेली नाही. मुख्यमंत्री भावाने दिलेल्या ओवाळणीतून बहिणींनी खरेदी करून आपल्या भावाला राखी बांधली. राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना आणल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

यवतमाळ येथे आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. अशातही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ५० हजारांपेक्षा अधिक महिलांनी आपल्या मुख्यमंत्री भावाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. असंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावांना राख्या बांधल्या. भावाने केलेल्या घोषणेची वचनपूर्ती केली. काहीच दिवसात अपेक्षा नसतांना ओवाळणी देखील जमा झाल्याने आनंदाचे भाव महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

लाडकी बहीण व भावाला लाभाचे वितरण
यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिण व भावाला लाभाचे वितरण केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रुती विलास भगत, नंदा सुतारकर, बेबी माणिक चव्हाण, नलिनी राम राठोड, चंदा सचिन शेंडे, शुभांगी शिंदे, प्रतिभा कोरडे, सुमन रमेश गेजीक, जया हरीदास विरदंडे, इंदिरा लक्ष्मण मांगरे, शुभांगी रविंद्र ढोरे, टिंकल आकाश उरगुंडे, संगिता शेषराव राठोड, रेश्मा शेख जावेद, नाझीया अमजतखा पठाण यांना लाभाचे धनादेश दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शितल घाडगे व वैष्णवी पैदपवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

महाराष्ट्रात महिलांचे व बालिकांचे संरक्षण न करणारे महाराष्ट्रातील युती सरकार बरखास्त करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराचे विरोधात दिनांक २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांना निवेदन पक्षाचे सचिव ॲड. कॉ. कुमार मोहरमपुरी व ॲड. कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वात देण्यात आले.

महाराष्ट्रातील महिला आणि बालिकांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीने शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती.

बदलापूर, पुणे, अकोला आदी ठिकाणी शाळांमधील लहानग्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. बदलापूर येथील घटना घडलेल्या शाळेचे संचालक भाजपाचे असल्याने महायुतीच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास अक्षम्य टाळाटाळ केली. याविरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्या जनतेवर अमानुष लाठीमार केला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष, एकनाथ शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली.

महायुतीने मुळातच गुन्हेगारीतून राज्याची सत्ता ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र ही सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची राजधानी बनवत या महायुतीने आजवर सुसंस्कृत, महिला आणि सर्वसामान्यांचा आदर करणारे राज्य ही महाराष्ट्राची प्रतिमा मातीत घातली आहे.

बेटी बचाव, लाडकी बहीण या घोषणांमागील हे वास्तव आहे. राज्यातील महिलांना खरी गरज महायुती पोसत असलेल्या गुंडांपासून संरक्षणाची आहे. 

यापूर्वी ठाणे जिल्ह्यातीलच कल्याण येथील गणेश घोळ मंदिरात सासरच्या छळाला कंटाळून थोडा मानसिक आधार घेण्यासाठी आलेल्या अंकिता म्हात्रेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिचा खून केला होता. रायगडची यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर......यादी न संपणारी आहे.

महायुती सरकारच्या महिला विरोधी कारभाराचा निषेध करून ही अनैतिक व अवैध महायुती सरकार बरखास्त करण्यात यावे यासाठी शनिवार २४ ऑगस्ट राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत वणी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन देताना ॲड. कॉ. कुमार मोहरमपुरी, ॲड. कॉ. दिलीप परचाके, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. शंकर गाऊत्रे, कॉ. नंदू बोबडे, कॉ. अशोक गेडाम, कॉ. विलास कुमरे, कॉ. सुभाष नांदेकर, कॉ. सुनील गेडाम, कॉ. हरीश वासेकर, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. अमोल चटप, कॉ. हुसेन आत्राम, कॉ. नेताजी गेडाम, कॉ. अर्जुन शेडमाके आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्र्यांच्या कार्यक्रसाठी बस येऊ शकते तर, विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याकरीता एस.टी. गावात का येत नाही?

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : यवतमाळ येथे मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परीवहन मंडाळाची एस.टी.बस जागजई गावात येऊ शकते,तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करीता बस का येत नाही? असा सवाल जागजई येथील विद्यार्थ्यांनी आज गावात आलेल्या एस.टी बस समोर उभे राहुन सरकारवर संताप व्यक्त केला. 

आज शनिवारी २४/८/२४ रोजी यवतमाळ येथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते,त्यांच्या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी परीवहन मंडाळाची एस.टी.बस जागजई गावात येऊ शकते,तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी बस का येत नाही? असा संताप तालुक्यातील जागजई येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच जागजई, चंदेरी, अंतरंगाव, शेळी, वनोजा, धानोरा रोहनी, परीसरात मागील काही दिवसांपासून वाघाच्या वावर असल्याने परीसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अंतरंगाव येथे सात किलोमीटर पायपीट करीत जाणे येणे करावे लागते. त्यामुळे सरकारने जशी लाडक्या बहीणीची काळजी घेतली, तशीच शाळेत जाणाऱ्या लाडक्या भाच्याची काळजी का घेत नाही. त्यांचा जिव प्रिय नाही का?,आम्हाला बस सेवा कधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना येथील चिमुकल्या शालेय विद्यार्थी तसेच पालकांकडून केली जात आहे.

वणीत 'मविआ' चा काळी पट्टी लावून निषेध आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज महाराष्ट्र बंद ची कडक हाक महाविकास आघाडी ने पुकाली होती. मात्र, कोर्टाने परवानगी नाकारल्याने या सरकार च्या दडपशाही च्या विरोधात व बदलापूर घटनेचा निषेध म्हणून वणी येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या पट्टी लावून मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी संजय खाडे, आशिष खुलसंगे, संजय निखाडे, डॉ. लोढा, दीपक कोकास, अजिंक्य शेंडे, संध्या बोबडे, सुधीर थेरे, राजीव कासावार, शालिनी रासेकर, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, यासह असंख्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मविआ च्या वतीने आज शनिवारी भर पावसात तोंडाला काळी पट्टी लावून आंदोलन केले आहे.

सज्जा आपटी येथे ई-पिक बाबत शेतकऱ्यांना देण्यात आली माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सन 2024 मधील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी शेतात पिकांची पेरणी केलेली आहे. त्या पिकांची ई-पीक पाहणीचा सध्या कार्यक्रम चालू आहे.आज दि. 24/8/2024 शनिवार रोजी मारेगाव तालुक्यातील त्या त्या गावातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल, ग्राम पंचायत, मंदिरात, चौकात आणि गावातील जास्तीत जास्त शेतकरी एकत्रित येतात अशा ठिकाणी सभा घेऊन ई-पिक पाहणीचे महत्व सांगितले जात आहेत. आज सज्जा आपटी येथे ई-पिक बाबत माहिती देण्यात आली. 

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर जाऊन ई- पिक पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. सध्या शासन स्तरावर ई-पिक पाहणी अतिशय महत्त्वाची बाब झाली आहे. एका मोबाईल वरून 100 शेतकऱ्यांचे/खातेदारचे ई-पिक पाहणी करता येते. सर्व शेतकऱ्यांनी 100 टक्के ई-पिक पाहणी करून भविष्यात मिळणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान तहसीलदार उत्तम निलावाड, मारेगांव यांनी केलेले आहे. 

मारेगांव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी अडचणी येत आहेत, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, कोतवाल, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे.तसेच वर्धा नदीला पाणी सोडल्याने नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला भर चौकात फाशी द्या-संध्या बोबडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ येथील संविधान चौकात यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेस कमिटी,यवतमाळ च्या जिल्हाध्यक्षा संध्या बोबडे यांच्या नेतृत्त्वात नवीन बसस्थानक परिसरात मेणबत्ती पेटवून आंदोलन केले. 

अत्याचार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मिनाक्षी सावळकर,उषा दिवटे,विद्या परचाके,प्रियंका बिडकर,गायत्री नवाडे,लियाकत शेख,सविता चौधरी,पल्लवी रामटेके,रेखा जगताप,लीना बोरकर,जयश्री मडावी, सरस्वती ठाकूर, रजनी वाघाडे,योगिता खडसे,वर्षा मासिकर,मंजुशा हजारे,वर्षा अहरे,सविता चौधरी,कांता कन्नाके,मीना नागदेव,चंदू चौधरी,कौस्तुभ शिर्के,आशिष महल्ले,दत्ता हाडके,संदीप आडे,कृष्णा पुसनाके,प्रा.पंढरी पाठे,सचिन मनवर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ह्या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जागा, येणारी विधानसभा आहे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षा मध्ये आहे, तेच समजत नाही. मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो, की नाही येतो. ह्या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जागा, येणारी विधानसभा आहे. विधानसभेची निवडणूक आहे ती, असे रोखठोक मत आजच्या वणी स्वागत सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते मराठवाडा नंतर विदर्भ दौऱ्यावर आलेले आहेत. उमेदवाराची चाचपणी म्हणून दौरा सुरू असल्याचे यावेळी सांगितले. 

यावेळी वणी विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी, महिला पदाधिकारी,शहरी-ग्रामीण शाखेचे प्रमुख, उपप्रमुख, बुथ प्रमुख व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 

पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही अशीच राहलात तर,तुमच्या नशिबी अशीच माणसं येणार, अशीच सरकार येणार.कधीही प्रश्न सुटणार नाहीत. मी सहजच बोलत नाही राज ठाकरे असा सहज बोलत नाही,अत्यंत गांभीर्यपूर्वक सांगतो. एकदा या महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरे च्या हातात द्या तुम्ही. राज्य कसं हाकलायचं न, कायद्याची भीती काय असते न हे तुम्हाला मी दाखवून देईल. परत या महाराष्ट्रामध्ये बाई कडे, मुलीकडे कोणाची वाकडया नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही, असेही ते म्हणाले. 

वणी विधानसभेकरिता राजु उंबरकर यांची उमेदवारी आपल्या समोर आज जाहीर करतोय. सर्वांनी पुर्ण ताकदीने राजु उंबरकरांच्या मागे उभं राहावं.त्याला आमदार म्हणून विधानसभेत पाठवावं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता तुमचे आशिर्वाद आमच्या मागे कायम राहो,एवढीच अपेक्षा, आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

गायक लखबीर सिंह लख्खानी केले वणीकरांना मंत्रमुग्ध; भर पावसात गायली एक ना अनेक सरश भक्तीगीते

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 वणी : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती च्या वतीने शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे. 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट यादरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक,सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहेत. 

काल 22 ऑगस्ट, या आयोजित सोहळ्याचा दुसरा दिवस होता. सायंकाळी सुप्रसिद्ध भजन गायक लखबीर सिंह लक्खा यांच्या भक्ती संगीतांचा बहारदार कार्यक्रम येथील शासकीय मैदान येथे हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. 

पावसाला न जुमानता भर पावसात छत्रीचा आसरा, रेनकोट चा वापर करित वणीकरांनी लखबीर सिंह लक्खा यांच्या भक्तीमय वातावरणात मग्न झाले होते. सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. मात्र, अचानक सात वाजताच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरू झाली. त्यामुळे हा कार्यक्रम होईल की, नाही अशी शंका वाटत होती. मात्र,काही वेळातच पावसाची रिपरिप मंदावल्याने अखेर भजन गायक लख्खा यांच्या बहारदार कार्यक्रमाला सुरुवात झाली. लखबीर सिंह लक्खा यांनी भक्तीमय वातावरणात एक ना अनेक सरश अशी भजने गायन केली. त्यामध्ये खाटू श्याम, श्रीकृष्ण जन्मोत्सव, माता राणी, शंकर भगवान,या सह श्रीराम,हनुमान यावर आपल्या गायकीची छाप सोडत भक्ती गीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भर पावसात वणीकरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले. 

यावेळी विजय चोरडिया, अ‍ॅड. कुणाल चोरडिया यांनीही त्यांच्या सुमधुर भजनाच्या तालावर ठेका धरला होता. हजारों प्रेक्षकांच्या टाळ्याच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली, त्याच वेळी सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी खाटू श्याम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 4 लाख 11 हजार रुपये देणगी स्वरूपात दिली. 

नेत येथील 42 वर्षीय रोजनदांराचे निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या नेत गावातीलच 42 वर्षीय विलास मणिराम उईके नामक इसमाचा मृतदेह काल (ता 22) रोजी गुरुवारी दुपारी आढळून आला. आढळून आलेल्या मृतकाने विषारी द्रव प्राशन केल्याची गावात चर्चा असून, तो रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. 

सदर इसम काहीवेळा नेत गावात आढळून आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मारेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबातील सदस्यांना स्वाधीन करून त्याच्या पार्थिवावर रात्री दहा वाजता नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा आप्त परिवार आहे. 

भर रस्त्यात अडवून लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना केली मारेगाव,वर्ध्यातून अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या एका मोबाईल शॉप व्यावसायिकाला चाकूच्या धाकावर लुटण्यात आले होते, त्यांचा पोलिसांनी शिग्रगतीने तपास करून सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पो.स्टे.वणी येथे दिनांक २०/०८/२०२४ रोजी फिर्यादी नामे श्री. अंकुश चिंतामणी बोढे (वय ३६) वर्षे व्यवसाय मोबाईल शॉपी चालक रा. वसंत गंगा विहार बालाजी अपार्टमेंट चे समोर वणी (ता.वणी) यांनी तक्रार दिली की, त्यांचे ठाकुरवार कॉम्प्लेक्स मध्ये अंकुश मोबाईल शॉपी या नावाचे दुकान आहेत, दिनांक १९/०८/२०२४ रोजी रात्री २१/०० वा.चे सुमारास आपली आस्थापना बंद करून तसेच आस्थापना मधील शनिवार दिनांक १७/०८/२०२४ रोजी पासुन गोळा झालेली रक्कम एकुण ६,००,०००/रुपये अशी निळ्या रंगाचे रेक्झीन Air Case बॅगमध्ये ठेवुन त्यांची टु व्हीलर वाहनाने फिर्यादी यांचे भावाचा मेहुणा नामे कुणाल अरविंद पोकळे याचे सोबत मिळुन घरी जाणे करीता रात्री ९.१५ वा.चे सुमारास निघाले त्यावेळी कुणाल पोकळे हा वाहन चालवित होता, व फिर्यादी हे पैशांची बॅग घेवुन मागे बसले होते, ९.२२ वा. चे सुमारास नमुद फिर्यादी हे वसंत गंगा विहार परिसराचे गेट जवळ पोहोचले असता त्यांचे मागाहुन एक निळ्या रंगाची चारचाकी गाडी आली व फिर्यादीचे वाहना समोर येवुन त्यांचे वाहन थांबविले त्या वाहनामधुन एक टि शर्ट व जिन्स परिधान करून असलेला व्यक्ती यांचे जवळ आला तेव्हा फिर्यादी हे घाबरले व कॉलनी कडे पळत सुटले तेव्हा सदर इसमाने त्यांचा पाठलाग करून पकडले त्यावेळी वाहनातील इतर दोघे इसम सुद्धा त्यांचे जवळ आले, त्यापैकी एका इसमाने "इसकी गलेकी चैन खिच, इसको चाकु मार" असे म्हणत होता. तेव्हा त्यापैकी एका इसमाने त्याचे जवळ असलेला चाकु काढला व चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी कडे असलेली पैशांची बॅग हिसकावली व फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची चैन वजन अडीज तोळे असलेली ज्याला त्रिशुल आकाराचा लॉकेट असलेली जबरीने गळ्यातुन ओढत असतांना तुटुन खाली पडली.त्यावेळी नमुद तिन्ही इसम हे पैशांची बॅग व तुटलेली सोन्याची चैन घेवुन पळुन त्यांचे वाहनात बसले व सदर वाहनातील वाहन चालकाने त्यांचे वाहन घेवुन चौघेही मिळुन आंबेडकर चौकाचे दिशेने निघुन गेले तरी नमुद अज्ञात आरोपीत इसमांनी फिर्यादी यांचे जवळील पैशांची बॅग ज्यामध्ये विविध किंमतीचे भारतीय चलनाचे दराचे एकुण ६,००,०००/रुपये असलेली तसेच फिर्यादी यांचे गळ्यात असलेली व ओढताण मध्ये तुटलेली अर्धी सोन्याची चैन अंदाजे वजन १० ग्रॅम किंमत ५०,०००/रु. असा एकूण ६,५०,०००/रु किंमतीचा मुद्देमाल चाकुचा धाक दाखवुन जबरीने हिसकावुन वाहनात बसुन निघुन गेले अशी तकार दिल्यावरून पो.स्टे. वणी येथे अपराध कमांक ७७०/२०२४ कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहीता अन्वये नोंद करण्यात आला असुन तपासावर आहे.

गुन्हा घडताच केलेली कार्यवाही :
सदर प्रकरणातील अज्ञात आरोपीत इसमांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याकरीता तत्काळ पो.स्टे. वणी येथील दुय्यम पोलीस अधिकारी यांचे अधिनस्थ ३ वेगवेगळे पथक त्याच बरोबर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आले, रवाना झाले. तद्नंतर सदर प्रकरणी प्राप्त करण्यात आलेले सि.सि.टी.व्ही फुटेज व फोटो असे पोलीस स्टेशन लगतचे संपुर्ण पोलीस ठाण्यात वितरीत करण्यात आले असता पो.स्टे. मारेगाव जि. यवतमाळ येथुन माहीती प्राप्त झाली की, सदर प्रकरणातील संशयीत इसम हे मारेगाव येथील रहीवासी आहेत. १) गणेश दत्ता चौगुले वय २४ वर्षे, २) शेख सलीम शेख हुसेन वय २६ वर्षे दोन्ही रा. वार्ड क. ०७ मारेगाव येथील असल्याचे सांगीतले. त्यांना ताब्यात घेवुन पो.स्टे. वणी येथे घेवुन येवुन सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी कबुली दिली की, त्यांनीच त्यांचे वर्धा येथील इतर ४ साथीदारांसह मिळुन सदरचा गुन्हा केलेला आहे. गुन्हा कबूल केल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याकरीता स्थागुशा चे दोन पथके तसेच पोस्टे वणी चे एक पथक चिखलदरा, अमरावती येथे रवाना झाले. तर दोन पथके वर्धा येथे रवाना झाली. जिल्हा वर्धा येथे जावुन सदर पथकाने वर्धा पोलीस पथकाच्या मदतीने आरोपी इसम नामे १) रितीक गणेश तोडसाम वय २४ वर्षे, २) पियुष अरून नारनवरे वय १९ वर्षे दोन्ही रा. इतवारा बाजार पोलीस चौकी जवळ वर्धा जि. वर्धा, ३) तौसीफ रज्जाक कुरेशी वय २५ वर्षे रा. आनंद नगर, रेल्वे पटरीचे बाजुला वर्षा जि. वर्धा ४) सुजल सुरेश पाटील वय १९ वर्षे रा. इतवारा बाजार पोलीस चौकी जवळ वर्धा जि. वर्धा नमुद आरोपीत इसमांचे घरातुन सदर प्रकरणातील ३,१३,५००/रु.असे हस्तगत करण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज गुल्हाणे पो.स्टे. वणी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. कुमार चिंता सो.पोलीस अधिक्षक यवतमाळ. मा. पियुष जगताप सो.अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यवतमाळ, अनिल बेहेराणी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी, यांचे मार्गदर्शनात पोउपनि/धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, पो.हे.कॉ विकास धडसे, गजानन डोंगरे, पोना/पंकज उंबरकर, पोकों/विशाल गेडाम, शाम राठोड, मो. वसिम, गजानन कुडमेथे, शंकर चौधरी पो.स्टे वणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील पो.हे.कॉ इकबाल शेख, विजय वानखडे, पो.कॉ संतोष कालवेलवार, अमोल नुनेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकार तसेच पोस्टे मारेगाव येथील श्री शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक पोस्टे मारेगाव, श्रेणी पोउपनि प्रमोद जिडडेवार, पोहेकों/ आनंद अलचेवार, पोहेकों / अफशाल पठाण, नापोकों/ अजय वाभीटकर, पोलीस स्टेशन शिरपुर माधव शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पोस्टे शिरपुर तसेच स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ चे स.पो.नि अजयकुमार वाढवे, पो.उप.नि धनंजय हाके, पो.हे.कॉ उल्हास कुरकुटे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे ना.पो.कॉ निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा येथील पोउपनि/अमोल लगड, सलाम कुरेशी, पोकों/सचिन इंगोले, हमीद शेख, प्रमोद पिसे, राजेश दिवसकर, श्रीकांत खडसे, रामकिसन इप्पर, आशिष मयुरी, उदय सोळंकी यांनी पार पाडली आहे.

विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मोफत गणवेश योजनेबाबत संभाजी ब्रिगेड चे वतीने जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना उपविभागीय अधिकारी,वणी यांचे मार्फत निवेदन दिले.  

या निवेदनात म्हटलं आहे की, शैक्षणिक सत्र 2024-25 सुरु होऊन दोन महिने उलटून गेले आहे आणि देशाचा स्वातंत्र्यदिन सोहळा सुद्धा पार पडला. मात्र, आपल्या जाहिरातबाज, गतिमान सरकारने अद्यापपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे मिळणारे मोफत गणवेश दिलेले नाहीत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील हीच स्थिती असून ज्या ठिकाणी गणवेश प्राप्त झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यांची मापे सुद्धा अयोग्य आहेत. 

ग्रामीण व शहरी भागातील सरकारी शाळांतून गोरगरीब विद्यार्थी शिकत असतात. त्यांच्यासाठी नवीन कपडे घालण्याची हीच एकमेव संधी असते. मात्र, आपल्या असंवेदनशील सरकारने त्या विद्यार्थ्यांची ही संधी हिरावून घेत त्यांचा अपमान सुद्धा केलेला आहे. स्वातंत्र्यदिनासारखा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण त्या विद्यार्थ्यांना जुन्या फाटक्या कपड्यामध्ये साजरा करावा लागला. फक्त लाडक्या बहिणीकडे लक्ष देणाऱ्या सरकारने भाच्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित दर्जेदार गणवेश उपलब्ध करून द्यावे,अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देताना अजय धोबे यांचेसह मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, अ‍ॅड. अमोल टोंगे, भाऊसाहेब आसुटकार, दत्ता डोहे, दिनेश बलकी आदी उपस्थित होते.

शेकडो युवक व ग्रामस्थांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 22 ऑगस्ट 2024 रोजी वणी तालुक्यातील दहेगाव, मुरधोनी व डोंगरगाव येथील शेकडो युवक व ग्रामस्थांनी पक्ष प्रमुख श्रद्धेय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विचार व वणी तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला.
यामध्ये विशेषतः आदिवासी तरुणांचा अधिक प्रमाणात समावेश होता. गोरगरिबांना मदत व त्यांच्या मुलभूत अडीअडचणीची जाणीव असणारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश पाते अशी ग्रामीण भागात पाते यांची ओळख आहे. तूर्तास वणी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी मध्ये "इन्कमिंग" मोठ्या झपाट्याने होताना दिसत आहे.        
यावेळी तालुका अध्यक्ष हरीश पाते, पुखराज खैरे, संतोष पेंदोर, युवराज चांदेकर यासह आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायला हव्यात, सत्कार समारंभातून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवारांचं आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : या देशात स्त्रिचा जन्म होणे ही भाग्याची गोष्ट आहे. ती शक्ती आणि देवीचे स्वरूप आहे. आपल्या सण उत्सवाला फारच महत्व दिले आहे,त्यात रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे. हे रेशीम बंध खूप बळकट असतात. असे प्रतिपादन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केल, ते शेतकरी भवन येथील लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी ललिता बोदकुरवार, बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर, नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शिरभाते, मा. जि. प. स. मंगला पावडे, संध्या अवताडे, लिशा विधाते, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, अशोक सुर, श्रीकांत पोटदुखे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम माथनकर, बंडु भाऊ चांदेकर, राकेश बुग्गेवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार बोदकुरवार पुढे म्हणाले की, सर्वांनी या कार्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजूनही करीत आहेत. हा महिलांना आधार देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना याचा लाभ झाला. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हव्यात. असे आवाहन देखील त्यांनी केले. हे सेवेचे व्रत अंगीकारून आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. सदैव लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहोत.असेही ते म्हणाले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी याप्रसंगी सरकारचं विशेष अभिनंदन केलं. ते म्हणाले,अशा चांगल्या कार्यात दिशाभूल करणारे दिशाहीन लोकं असतात. बहिणींनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. हे बहिणींसाठी राखीचं गिफ्ट आहे. बहिणींना अर्ज भरण्याकरता जी मदत अनेकांनी केली, त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. हा एक कृतज्ञता सोहळा आहे, अशा अनेक योजना भविष्यातही येतील. बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर यांनी या योजनेचा थोडक्यात आढावा मांडला. गेल्या एक-दीड महिन्यांपासून कार्य अविरत सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. 30,000 हजार महिलांच्या खात्यात प्रत्यक्षात पैसे जमा झाले. उर्वरित बहिणींनी लवकरात लवकर अर्ज भरावे असे आवाहन त्यांनी मंचकावरून केले. 

नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शिरभाते यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत 9138 अर्ज वणी नगरपालिका क्षेत्रात प्राप्त झाले असून काम अजूनही सुरू आहे. या योजनेबद्दल सगळ्या बहिणी समाधानी आहेत, असेही त्या म्हणाल्या.

माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे यांनी ही योजना लोकप्रिय असल्याचे सांगितले. अनेकांच्या खात्यात पैसेही जमा झालेत. खेळीमेळीच्या वातावरणात प्रामाणिकपणे सर्वांनी काम केलं. पैसे असले की आधार वाटतो. गेल्या दहा वर्षापासून आमदारांची जनतेशी नाळ जुळली आहे, ती अशीच कायम असावी, असे त्या कार्यक्रमाला संबोधिताना म्हणाल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिंपळेशेंडे यांनी तर सूत्रसंचालन स्मिता नांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आय सी आर पी, बचत महिला गट, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यासह मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होती.

स्व. राजीव गांधी जयंती निमित्त काँग्रेस च्या वतीने छत्र्या वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : स्व.माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्ताने वणी शहरात वसंत जिनीग अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटी,झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या सौजन्याने रस्त्यावरील लघु उद्योग करणाऱ्यांना कडक उन्ह आणि पाऊसापासून बचाव व्हावा या उद्दात उद्देशाने छत्री वाटप करण्यात आल्या.

माजी आमदार वामनराव कासावार, अ‍ॅड. देविदास काळे, राजू एलटीवार, ओम ठाकूर, सौ. संध्या बोबडे, विवेक मांडवकर यांच्या उपस्थितीत छत्री वाटपाचा लोकहितार्थ उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शहरातील उदरनिर्वाहासाठी फळे, भाजीपाला, कपडा व्यवसायिक, मोची व इतरही लहान व्यवसायधारक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना पावसापासून व उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या छत्री पासून रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! एक महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा शाळेची मान्यता होणार रद्द

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी सर्वच शाळा व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून शाळांनी मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे ताबडतोब बसविणे बंधनकारक केले असून या तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित शाळेचे अनुदान रोखणे किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी प्राधान्याने सीसीटीव्ही बसवावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी घ्यावा व त्या निधीची पुनर्रचना करून त्यातील पाच टक्के निधी यासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे..

शासन निर्णयातील ठळक बाबी...
• शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्याचे फुटेज दररोज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर
• आठवड्यातून किमान तीनवेळा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते सीसीटीव्ही फुटेज पहावे
• शाळांमधील नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, बसचालक यांची चारित्र्य पडताळणी करावी
• शाळांमध्ये बाह्यस्त्रोद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा
• शाळांमध्ये तक्रारपेटी ठेवावी, आदेशानुसार कार्यवाही न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल

 शाळांमध्ये आता विद्यार्थी सुरक्षा समिती
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैगिंक छळाच्या घटना होवू नयेत, यासाठी आता शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समित्यांचे गठन केले जाणार आहे. एका आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी या समित्या स्थापन कराव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत. तर राज्य स्तरावर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्याचाही निर्णय झाला असून ही समिती तीन महिन्यातून एकदा आढावा घेईल.