Showing posts with label पांढरकवडा. Show all posts
Showing posts with label पांढरकवडा. Show all posts

25 लाखांच्या औषधी चोरी प्रकरणात पांढरकवडा पोलिसांना मोठे यश


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
    
केळापूर : हैद्राबादकडून नागपूरच्या दिशेने औषधी घेऊन जाणार्‍या ट्रकच्या चालकास बांधून तब्बल 25 लाखांची औषधीचे डबे लंपास केल्यामुळे प्रकरणी मोठी खळबळ माजल्याने पांढरकवडा पोलिसांनी ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात विविध पथके गठीत करून या धाडसी दरोड्याचा शोध लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यास मोठे यश प्राप्त झाले असून चोरीचा माल पळवून नेणारा ट्रक जप्त करण्यात आला.

हैद्राबाद येथील रेड्डी फार्मा कंपनीतून कंटेनर क्रंमांक एचआर47 9218 ने लाखो रुपयांची औषधी नेल्या जात होती. त्या ट्रकला राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर पांढरकवडा तालुक्यातील मराठवाकडी येथे वाहकाचे हातपाय बांधून ट्रक पळविण्यात आला. त्यानंतर तो ट्रक पोलिसांना त्याच महामार्गावर 15 किमी दूर कोंघारा या गावी आढळून आला. परंतु त्यातील 494 औषधी भरलेले खोके दुसर्‍या वाहनांतून चोरी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. पांढरकवडा पोलिस उपनिरीक्षक संदीप बारिंगे यांना हैदराबाद, तर सहायक निरीक्षक विजय महाले आणि उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे, राजू मोहुर्ले, राजू बेलयवार, सचिन काकडे, सूरज चिव्हाणे यांना मध्यप्रदेशच्या दिशने आरोपींचा मागोवा घेण्यासाठी पाठवले होते.

मध्यप्रदेशकडे गेलेल्या पथकाने देवास आणि इंदूर परिसरात आठवडाभर आपले कौशल्य पणास लावून गुन्ह्यातील संशयित आरोपी विक‘मसिंह उजालदे यास ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवीत विचारपूस केली. तेव्हा त्याने लुटलेला माल ट्रक क्र. एमएच 19 झेड 5030 ने आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी या ट्रकसह चालक अजय उजालदे यास ताब्यात घेईल. पोलिसांनी हैदराबाद ते नागपूरपर्यंत सर्व टोलनाक्यांवरील कॅमेरे आणि फास्टटॅगच्या नोंदी तपासून संशयित गाड्यांची यादी तयार केली. त्यात दोन ट्रक आणि दोन महागड्या मोटारी औषधी ट्रकच्या मागेमागे येत असल्याने त्यावर लक्ष केंद्रित केले होते. या चार गाड्या घटनास्थळापासून प्रचंड वेगाने इंदूरपर्यंत गेल्याचे तपासणीत आढळून आल्याने पोलिसांनी इंदूरवर आपले लक्ष केंद्रित केले होते आणि देवासमध्ये याचा उलगडा करण्यात यश आले.

देवास जवळील लहानशा खेड्यात धावत्या ट्रकला लुटणारी मोठी टोळी असून अनेक राज्यात या टोळीने ट्रकवर अनेक धाडसी दरोडे घातले आहेत. हा ट्रक आरोपींनी भाड्याने केल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याने दरोड्यातील मु‘य सूत्रधार आणि त्यांना मदत करणारे आठ ते दहाजण यांना लवकरच अटक करणार असल्याचे पांढरकवडा पोलिसांनी सांगितले. हा यशस्वी तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. काही वर्षांत पांढरकवडा शहरातील घरफोड्या, महामार्गावर झालेल्या चोर्‍यांचा उलगडा झालाच नव्हता. त्यामुळे या धाडसी दरोड्याचा उलगडा करून पांढरकवडा पोलिसांनी कौतुकाची थाप मिळवली आहे.

नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे अपहरण,पोलिसात तक्रार दाखल


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

पांढरकवडा : तालुक्यातील मजुरी करणाऱ्या इसमाच्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. ती आश्रम शाळेतील 9 व्या वर्गात शिकत होती. शाळा बंद असल्यामुळे ती घरीच होती. 27 नोव्हेंबर रोजी घरासमोर एका स्पर्धेचा कार्यक्रम असल्याने तिचे वडील कार्यक्रम बघण्यासाठी गेले. रात्री 10 च्या नंतर घरी ते परत आल्या नंतर मुलगी दिसली काय म्हणून विचारण्यात आले. ती शौचास जाते म्हणून सांगून गेली, तिचा शोध घेतला असता ती कुठे आढळून आली नाही. नातेवाईक व मैत्रिणीकडे फोन करून विचारपूस केली. परंतु तिचा शोध लागला नाही. काल मुलीच्या वडीलाने पोलिसात या बाबत तक्रार दाखल दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला. 

अनुसूचित जमातीच्या युवकांना भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आयोजित करा - आदिम शामादादा कोलाम संघटनेची मागणी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

पांढरकवडा : राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक आदिवासी युवकांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना सन 2021-22 या सत्रासाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राळेगाव शामादादा कोलाम संघटनेच्या वतीने दिनांक 24 नोव्हेंबर ला पांढरकवडा एकात्मिक प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.

महाराष्ट्र सरकार कडून मेगा पोलीस भरती होणार असून, त्या भरतीचा लाभ अनुसूचित जमातीच्या युवकांना व्हावा, सरकारी सेवेत जमातीच्या युवकांची संख्या वाढावी यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

स्पर्धा परीक्षेच्या काळात स्पर्धा अधिक वेगवान होत आहे. या स्पर्धेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण असल्यास त्याचा लाभ या मेगा भरतीमध्ये होऊ शकतो. खाजगी प्रशिक्षण वर्गाचा खर्च आर्थिक बाजू कमकुवत असलेले अनुसूचित जमातींचे युवक करू शकत नाही. त्यामुळे लवकर भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करून जमातींच्या युवकांना न्याय द्यावा यासाठी एकात्मिक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना मागणी करण्यात आली.

यावेळी आदिम जमात शामादादा कोलाम संघटनेचे निलेश पिपरे, निलेश रोठे, अमित ढोबळे, समीर कोंडेकर, आकाश टेकाम, ज्ञानेश्वर मेश्राम, पिंटू जांभुळकर, स्वप्नील आत्राम, आकाश भि.टेकाम, सपना मेश्राम, आदींची उपस्थिती होती.

एसटी कामगारांचा संप चिघळला: सेवासमाप्तीचे सूचनापत्र; पांढरकवडा आगारा समोर उपोषण, प्रवाशांची गैरसोय


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
पांढरकवडा :  रा.प. कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक रा प शासनाकडून होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिल्या जात नाही कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाही शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ पासून २८ टक्के महागाई भक्ता दिला जात असून, रा.प. कर्मचाऱ्यांना फक्त ९२ टक्के महागाई भक्ता दिल्या जात आहे. ३०/०६/२०१८ चे पत्रानुसार प्रशासनाने मान्य करूनही वार्षिक वेतन दर महा भाडे भक्ता शासनाप्रमाणे दिला गेला नाही २०१८ पासून महागाई भक्तांमध्ये वाढ होऊनही दिली नाही तसेच त्यांची थकबाकी दिल्या गेली नाही शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम 12500/ रुपये दिल्या जातो दोन वर्षापासून मागणी करूनही त्यामध्ये आर्थिक अडचण दाखवून ती वाढ दिल्या गेली नाही ही बाबी रा.प. कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी आहे त्यामध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या २६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचललेली आहे कोरणा काळात रा.प. कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्रवाशांची सेवा केली त्यामध्ये करुणा संसर्ग होऊन ३०६ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला अशा कठीण परिस्थितीतही रा.प. कामगार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहे एवढ्या कठीण परिस्थितीत काम करूनही हक्काचे देयके वेळीच मिळत नसल्याने कामगारांमध्ये फार मोठा असंतोष असल्याने दिवाळीसारखा सण समोर असतांना हक्काचे देयके कामगारांना मिळत नसल्याने कुपोषण सारखा निर्णय संयुक्त कृती समितीला द्यावा लागला.

मा.श्री. अनिल परब परिवहन मंत्री यांनी रा.प.कर्मचाऱ्यांना सन 2019 चा महागाई भत्ता देण्याचा व दिवाळी करिता दिवाळी भेट म्हणून 2500 देण्याची घोषणा करून रा प कर्मचाऱ्यांना पाने सुचली आहे. रा प कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 15000/- मान्य असताना तुटपुंजी भेट जाहीर करून कामगारांची बोळवन केली आहे रा प कर्मचाऱ्यांना कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता वार्षिक वेतन वाढीचा १ टक्का वाढ घरभाडे भत्ता ८/१६/२४ टक्के उत्सव अग्रिम 12500 दिवाळी भेट 15000/- रुपये दिवाळीपूर्वी ही थकबाकी कामगारांना द्यावी. या मागणीकरिता रा फ कर्मचाऱ्यांनी संयुक्त कृती समितीच्या निर्णय यानुसार आज पासून राज्यभर आंदोलन उपोषण होत आहे. या उपोषणाची दखल शासन व प्रशासनाने न घेतल्यास 28/10/2021 पासून आगार पातळीवर बेमुदत उपोषण सुरू आहे.

या उपोषण आंदोलनामध्ये संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी सर्वश्री रवी कनाके, निरंजन खडकीकर, विठ्ठल गेडाम, मंगेश बावनकुळे, संजय राठोड, विनोद मार्कंड, संजय हंमद, कृष्णा कनाके, रमेश आत्राम, मोहन कोरेवार, अतुल खांडरे, गुरुप्रसाद जुमनाके, जय मेश्राम, शेख चांद, नागोराव ईचोडकर, विशाल कल्यमवार, शरद राठोड, चंद्रभान मेश्राम, रमेश कोडापे, अमोल सायकवाड, किसन मडावी, मधुकर नगराळे, लक्ष्मण आत्राम, उद्धव डंभारे, येसनसुरे, गजानन चांदेकर, विनोद पवार, आकाश बेतवार, महेश सिडाम, हिरालाल चिंतामण टेकाम, सुनील मोहुर्ले, सौ लक्ष्मी ताई निमसरकार, प्रतिभा गेडाम, जोशना करलुके, जयश्री मोहुर्ले, रेखा चव्हाण, सौ सरदार अर्चना नेहारे, वनिता उईके, इत्यादी असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

वांजरी येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोसत्व साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
केळापूर, (३१ ऑक्टो.) : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ५३ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, वांजरी यांच्या वतीने सामुदायिक ध्यान आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. या महोत्सवीप्रसंगी गावात रामधून फेरी काढण्यात आली व राष्ट्रसंत तुकडोजी मंदिरात भजनाचा कार्यक्रमही पार पडला.

यावेळी किसन शेडमाके, सुभाष कुमरे, राजू गुडेवार, ह.भ.प. ईश्वर महाराज मासटवार, चंद्रशेखरजी बुर्रेवार, मोहनजी राखुंडे, अर्जुनजी सोयाम, विश्वनाथजी पडलवार, नरेंद्र कावडे, अशोक कुमरे (पोलीस पाटील), महादेव गुडेवार व बालगोपाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

राशी सीड्स प्रा.लिमिटेडचा कार्यक्रम आणि वाटर फिल्टर प्लांट चे उद्घाटन


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२६ ऑक्टो.) : कपाशी उत्पादनातील ४८ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत असणारी अग्रगण्य राशी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपल्या केळापूर तालुक्यातील पहापळ गावामध्ये "वाटर फिल्टर प्लांट" उद्घाटन सोहळा दिनांक २३-१०-२०२१ शनिवार रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला. सदर कार्यक्रमास उपस्थित पाहुणे मा.श्री.अण्णासाहेब पारवेकर यांच्या हस्ते सोहळा पार पडला. या कार्यक्रमास राशी सीड्स तर्फे झोनल मॅनेजर श्री.सुनील महाजन साहेब रिजनल मॅनेजर श्री.शंतनु देशकर साहेब व जिल्हा विक्री प्रतिनिधी श्री. महेश ठाकरे साहेब उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे श्री राजुभाऊ पसलावार (प.स.सभापती) श्री. गजानन भाऊ बेजंकीवार जि.प.सदस्य) कृ.उ.बा.स. अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ मानकर य.जि.मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. संतोष भाऊ बोडेवार (पं.स.सदस्य) सौ. सुषमा रवी कुडमेथे (सरपंच) सौ.अनुराधा कैलास वेट्टी पं.स. सदस्य) श्री.रमेश नारायण भुरे (उपसरपंच) श्री राकेश नेमनवार मा.जि.प.सदस्य) श्री जान मोहम्मद काकाजी मा.कृ.उ.बा.स.सभापती) श्री अभयभाऊ डोंगरे (मा. उपसभापती) सौ संगीता बंडू खांडरे (पोलीस पाटील) श्री चव्हाण साहेब (बी.डि.ओ.पं. स. पां.कवडा) श्री.मा.दासरवार साहेब (तालुका कृषी अधिकारी पांढरकवडा.) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

पांढरकवडा बस डेपोचा तुगलकी प्रकार: बसचालकाचे नातेवाईक मरण पावल्यामुळे बस टाईमिंग रद्द


                       (फाईल फोटो)

केळापूर, (२५ ऑक्टो.) : पांढरकवडा ते वणी बस टाईमिंग सकाळा ९-१५ असुन या बसगाडीने वणी मारेगाव येथे कोर्ट, पंचायतसमिती, आश्रम शाळा, बांधकाम विभाग इतर विभागातील अनेक कर्मचारी व विद्यार्थी जात असतात. नियमित चालणारी बस व्यवस्था केवळ चालकाच्या नातेवाईकाच्या मृत्युमुळे बस टाईमिंगच रद्द करण्याचा तुगलकी प्रकार दि.२५/१०/२१ ला घडले. या बाबत चौकशी विभागाशी संपर्क केले असता उडवाउडविचे उत्तर देण्यात आले.

नियमित कार्यालयात जाणार्‍या कर्मचारी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्यात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद गांगुलवार यांनी केली आहे. असा प्रकार बंद करुन नियमित सेवा द्यावी अशी विनंती वरिष्ठाकडे केली आहे.

जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी समाधान जीवन जगावे : केअर इंडिया

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२४ ऑक्टो.) :
गॅप इन्क यांच्या अर्थसहाय्य व्दारे केअर इंडिया संचालित वुमन+वाटर प्रकल्पाअंतर्गत महिलांची व्यक्तिगत प्रगती व कारकीर्द विकास व्हावा त्यासाठी जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी समाधान जीवन जगावे. याकरिता केअर इंडिया संस्थेद्वारे गावातील महिला यांना व्यक्तिमहत्त्व विकास होण्यासाठी संवाद, स्वच्छता, समस्या चे निराकरण करणे, ताण आणि वेळ व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, स्वच्छता करिता पतपुरवठा, या विषयी मोफत प्रशिक्षण दिले जात आहेत. महाराष्ट्रातील चालू असलेल्या प्रकल्पाचे ऑपरेशन मॅनेजर रविकांत घाटोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा व यवतमाळ जिल्हा या दोन जिल्ह्यात कार्य सुरू आहेत. केअर इंडिया ही एक जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था असून जी शिक्षण, आरोग्य, उपजिवीका व आपत्ती व्यवस्थापन या चार प्रमुख्य घटकावर कार्य करत आहेत.    
        
सध्या कोरोना महामारी सुरू आहेत, पण ज्या व्यक्तींनी केयर इंडिया संस्थेचे प्रशिक्षण घेतले आहेत ते सर्व आपल्या जीवनातील योग्य दृष्टीकोन, विचार व आवश्यक ज्ञानाचा उपयोग करतच आहेत. परंतु लोकांमधील जे लसीकरण बाबत वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज हे कोरोना महामारीमध्ये पसरलेले होते पण ते सुद्धा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जनजागृती व क्रियाकलाप च्या माध्यमातून आमचे प्रशिक्षक टीम कार्य करीत आहेत.
     
आज 22 ऑक्टोबर 2021 ला केळापूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी व पेस तसेच मेल चॅम्पियन साठी इंटरफेस मीटिंग चे आयोजन राम मंदिर येथे करण्यात आले होते. ज्याचा उद्देश चॅम्पियन व सरकारी यंत्रणा सोबत चर्चा व्हावी व त्यांचे प्रश्न सोडविण्यास त्यांना मदत व्हावी.

या मिटींगला अध्यक्ष प्रतिभा दुर्गे मॅडम महिला समुपदेशन अधिकारी तसेच महिला व पाणी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे ओपेशनल मॅनेजर रविकांत घाटोळ सर, MEO सुनील मानकर सर, रेजिवार सर गटविकास अधिकारी, PSI कानबाले मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी सर, पाणी व स्वच्छता अधिकारी शेंडे सर, पेसा समन्वयक विणकरे सर, आदर्श ग्रामसेवक प्रकाश काकडे सर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारक सूरज चौधरी सर, केळापूर तालुक्याचे क्षेत्र समनव्यक अमोल बोरकर सर व खडसे सर सदर मान्यवर उपस्थित होते. तसेच मारोती वेलादे सर, ज्ञानदेव शेंडे सर, मारोती वाढई सर, विजय कोडापे सर, संदीप मेश्राम सर, उमेश कुडमथे सर, रोहित मरसकोल्हे सर, अर्पणा मालिकर ताई, वर्षा कैटिकवार ताई, सुनीता ताई गेडाम, लक्ष्मी ताई आत्राम उपस्थित होते केअर चे सर्व प्रशिक्षणार्थी व कम्युनिटी मोबिलायझर इत्यादी व्यक्ती उपस्थित होते, हे करत असताना कोरोना महामारी संबंधित सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

महामानव क्रांतिवीर बिरसामुंडा स्मारकाचे लोकार्पण सोहळा व खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयचा उद्घाटन सोहळा


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२४ ऑक्टो.) : पांढरकवडा नगर परिषदे तर्फे क्रांतिवीर महामानव बिरसामुंडा चौक येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर महामानव बिरसामुंडा स्मारकाचा लोकार्पण सोहळा सम्पन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर, अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा वैशालीताई नहाते, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनरावं कासावार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, कृषीभूषण चालबर्डीकर पाटील, चंद्रपूर जिला परिषदेचे विरोधी पक्षनेते राजुरकर, जितेंद्र मोघे, प्रकाश कासावार, माजी नगराध्यक्ष संतोष बोरले, युवक काँग्रेस महासचिव शिनुअन्ना नालमवार,जि.प सदस्या सुचरीता पाटील, जि.प सदस्या वैशाली राठोड, पं.स सदस्य उज्ज्वला बोंडे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार,नगरसेवक साजिद शरीफ, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे,आदिवासी समाजसेवक वामनरावं सिडाम, अंकित नैताम,संभा मडावी, डॉ.तोडासे, वैद्यकीय अधिकारी मडावी यांच्या उपस्थिती सम्पन्न झाला. यावेळी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक शहिद नागेश्वर जिड्डेवार भवन येथे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेल्या सामान्य माणसाला आपल्या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयचा उद्घाटन करण्यात आले, असे धानोरकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सध्याचे मोदी सरकार हे सामान्य माणसाला महागाई मध्ये ढकलून दिलं आहे, सामान्य लोकांना आपलं बजेट कोलमडले आहे. शेतक-यांना आत्ता झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्याचा लाभ साठी ते सरकारला मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला कॉंग्रेस पक्षा शिवाय दुसरा पर्याय नाही असे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

सर्व प्रथम भाषणाची सुरवात बाळासाहेब उर्फ जितेंद्र मोघे यांनी सुरवात केली. व त्यानंतर नुकतेच काँग्रेस मध्ये प्रवेश घेतलेले पांढरकवडा येथील माजी नगराध्यक्ष संतोष बोरले यांनी सुरवात केली काँग्रेस पक्षात घरवापसी झाली असून काँग्रेस पक्ष तालुक्यात प्रत्येक घरा घरात पोहचवण्याचा काम करु व ते समोर म्हणाले की येथील भाजपच्या राजकीय लोकप्रतिनिधीनी रोजगार हमी योजनेत ५४ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असुन त्याची तक्रार करणारा हाच संतोष बोरले आहे असे, बोरले यांनी यावेळी ठणकावून सांगितले व त्या प्रकरणातील दोषींना कारावास भोगावा लागेल असे आपल्या भाषणातून सांगायला विसरले नाही या कार्यक्रमाला सर्व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिलासा;अतिवृष्टी क्षेत्रात नुकसान भरपाई देण्यास सरकार सज्ज


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२३ ऑक्टो.) : पावसाच्या अती लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अथोनाथ नुकसान झाले. मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या कष्टाला अपयश पदरी आलेलं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर २०२१ मध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच राज्यात विविध जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीपिकांची मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
                
शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाल्यामुळे शासन निर्णयानुसार नुकसान बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचे आव्हान शासनाने केले आहे. दि.१३/१०/२०२१ ला रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आणि दि.२१ ऑक्टोबर २०२१ ला नुकसान बाधित क्षेत्रात वाढीव दराने मदत करण्याचे आव्हान केले आहे.
                  
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार (SDRF)च्या प्रचलित दरानुसार ₹ ६८००/- प्रति हेक्टर,२ हेक्टरच्या मर्यादेत, याऐवजी सरकारने मदतीचे वाढीव दर, ₹१०,०००/- प्रति हेक्टर,२ हेक्टर हेक्टरच्या मर्यादेत. आणि बागायत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार (SDRF) च्या प्रचलित दरानुसार, ₹ १३,५००/- प्रति हेक्टर,२ हेक्टरच्या मर्यादेत. याऐवजी शासनाने मदतीचे वाढीव दर, ₹१५,०००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादेत. शेतकऱ्यांना बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार (SDRF) प्रचलित दर, ₹१८,०००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादित. याऐवजी शासन निर्णयानुसार मदतीचे वाढीव दर ₹२५,०००/- प्रति हेक्टर,२ हेक्टरच्या मर्यादित देण्याचे निर्णय घेण्यात आले.
                 
अतिवृष्टी नुकसानबाधित क्षेत्रात पंचनामे करण्यात आल्यावर लाभार्थी निश्चित करण्यात यावे.आणि लाभार्थ्यांच्या थेट रक्कम बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात यावे. अशी माहिती महसूल विभागाकडून मिळत आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.

केळापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने मागितली जिल्हाधिकारी कडे आत्महतेची परवानगी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२३ ऑक्टो.) : यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्येच्या घटना त्याज्या असतानाच केळापूर तालुक्यातील मौजा भाडउमरी येथील आकाश शंकर हामंद युवा शेतक-याने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे "बँक ऑफ महाराष्ट्र" पहापळ शाखा व्यवस्थापक यांचे विरोधात पात्र असताना कर्ज नाकारल्याने कार्यवाही करून कर्ज पुरवठा करून देणे अथवा आत्महतेची परवानगी दया असा 6 ऑक्टोबरला तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु जिल्हा प्रशासनाकडून बँकेवर कार्यवाही करण्यास विलंब होत असुन प्रशासन नुसते कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे.

यंदाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यात मुजोर बँक शाखा वेवस्थापक शेतक-यांच्या जीवावर उठल्या असून त्यांची आर्थिक कोंडी करून अडचणीत आणून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम करीत आहे. यंदा पिकांची अवस्था चांगली नसल्याने गावठी सावकार शेतक-याला आपल्या दारात उभे करायला तयार नाही.

पिडीत शेतक-याला जिल्हाधिकारी यांचेकडून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा होती परंतु प्रशासन कागदी अहवाल नाचवण्यात धन्यता मानत असल्याने सदर शेतक-याच्या पदरी निराशाच आली आहे. पिडीत शेतक-याकडे ओलीताची शेती असुनही तो पैसा अपुरा असल्यामुळे काही करु शकत नाही बैंक कर्ज देत नाही.

प्रशासन न्याय मिळवून देवू शकत नाही अखेर पिडीत शेतक-याकडे आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय प्रशासनाने ठेवलेला नसल्याने पिडीत शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर आहे.

मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडुंची विदर्भ महा - लीग कबड्डी स्पर्धेकरीता निवड

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२३ ऑक्टो.) : येत्या नोव्हेंबर महिण्यामध्ये होणाऱ्या विदर्भ महा - लीग कबड्डी स्पर्धेकरीता पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पार पडलेल्या विदर्भ महा- लीग निवड चाचणीमध्ये सदर निवड करण्यात आली आहे. कु. अश्लेशा रत्नाकर वसाके, कु. वर्षा सुरेश तलमले, कु. दामिनी मोरेश्वर महाजन या तिन महिला खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.

पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळामध्ये दैनदिन कबड्डी, खो खो,  कुस्ती व लाठीकाठीचे प्रशिक्षण व सराव सुरु असते. या मंडळाच्या अनेक खेळाडुंनी आज पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहे. यातील कु अश्लेशा वसाके व कु वर्षा तलमले यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसह अमरावती विद्यापीठ संघाचे सुध्दा प्रतिनिधीत्व याआधी केले आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय विदर्भ अॅम्युचुयर कबड्डी असोसिएशनचे सचिव जितेन्द्र ठाकुर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, स विश्वनाथ झिंगे, अभय राउत, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक मदन जिडेवार, मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार, संचालक गणपत डोंगरे यांना दिले आहे. वरील तिनही खेळाडुस सुनिल कोपुलवार, अशोक कुमरे, रवि दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील खेळाडुंचे मंडळाचे सदस्य राम कुमरे, ओमेश दर्शनवार, नितेश अक्केवार, अजय कुमरे, रितेश मुप्पीडवार, पंकज भेंडाळे, अभिजीत जाधव, धिरज रेड्डीवार, शुभम हामंद, सुकेश बत्तलवार, पवन मेश्राम, हर्षद शेख, अनिकेत दुधबडे, जॉली जाधव, साक्षी बेतवार, भुमी जेंगटे, पायल गाउत्रे, पलक वसाके, खुशी ठाकुर, वेदीका व्यास, किरण चव्हाण, दिया कुमरे, समिक्षा मडावी, चैताली कनाके, अनु वाढई आदिंनी अभिनंदन केले आहे.

वांजरी शिवारात वाघाच्या हल्यात गुराखी ठार


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२२ ऑक्टो.) : पांढरकवडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत वांजरी शिवारात वाघाच्या हल्यात गुलाब कवडू कुंचलवार वय ४५ वर्ष या गुरख्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रात्री दोन वाजता शव सापडले. 
     
बुधवार दिनांक २० ऑक्टोबर बुधवार रोजी पांढरकवडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत सुन्ना बिटातील वांजरी शिवारात गुरांच्या शोधात जंगलात एकटा गेलेल्या गुराखी गुलाब कवडू कुंचलवार याच्यावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यु झाला. बुधवारी गुलाब राखत असलेले गुरे एका शेतकऱ्याच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले यावरून दोघांत वाद झाला व त्या शेतकऱ्याने गुरांना कोंडवाड्यात टाकण्यासाठी नेले. यात गावकऱ्यांनी मध्यस्थी करून गुरांना कोंडवाड्यात टाकण्यापासून थांबविले. यात काही गुरे भरकटली. त्यांना शोधण्यासाठी गुलाब जांगलात एकटाच गेला परंतु उशिरापर्यंत तो घरी न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले असता वनकर्मचारी तात्काळ गावात पोहचले. वनकर्मचारी, पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर जंगल पिंजुन काढले व रात्री दोन वा च्या सुमारास गुलाब चे शर्ट दिसून आले तर काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळाची पाहणी वरून व शरीरा वरील खुणा वरुन गुलाब चा वाघाच्या हल्यात मृत्यु झाला असल्याचे निदर्शनास आले.

गुरुवारी सकाळी उपवनसंरक्षण किरण जगताप यांनी गुलाब कुंचलवार च्या परिवाराची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले व त्यांना शासन निर्णयानुसार मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती दिली. त्यानंतर मृत्यूदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. उपवनसंरक्षक यांच्या आश्वासन व शासनाच्या नियमावर विश्वास ठेवत उत्तरीय तपासणी नंतर मृत्यूदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यात आला



"वांजरी गावात डॉ शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत समिती गठीत करण्यात आली असुन, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आराखडा तयार करण्यात येणार असून त्याकरिता २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नागरिकांनी जंगलात जाऊ नये, शेतात काम करीत असताना मोठ्याने आवाज करीत किंवा गाणे वाजवीत कामे करावी अशा प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे."

~ एम डी सुरवसे
वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा

केयर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांना मार्गदर्शन व मोफत प्रशिक्षण


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२१ ऑक्टो.) : आज दिनांक 21/10/021 रोजी श्री राम मंदिर पांढरकवडा येथे गैप इन्क अर्थसहाय्य केयर इंडिया संचालित वुमन+वाटर प्रकल्पाअंतर्गत महिलांची व्यक्तिगत प्रगती व्हावी व त्याच्या जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी न्यायिक जीवन जगावे त्यासाठी केयर इंडिया संस्थेद्वारे गावातील व्यक्तिगत प्रगतीनुरूप वेगवेगळ्या विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणारा प्रकल्प महाराष्ट्रातील ऑपरेशनला मॅनेजर रविकांत घाटोळ सर यांच्या मार्गदर्शनात वर्धा जिल्हा व यवतमाळ जिल्हा या दोन जिल्ह्यात सुरू आहेत. केयर इंडिया ही एक जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था असून जी शिक्षण, आरोग्य, उपजीविका व आपत्ती व्यवस्थापन या 4 मुख्य घटकावर कार्य करते.

सध्या कोरोना महामारी सुरू आहेत, ज्या ज्या व्यक्तींनी केयर इंडिया संस्थेचे प्रशिक्षण घेतले आहेत. ते सर्व आपल्या जीवनात या प्रशिक्षणाचा उपयोग करतच आहेत परंतु लोकांमधील जे नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज या कोरोना महामारीत पसरलेले आहेत ते सुद्धा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जनजागृती च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी करीत आहेत.

आज 21 ऑक्टोबर 2021 ला प्रशिक्षणार्थी पेस व मेल चॅम्पियन साठी इंटरफेस मीटिंग चे आयोजन राम मंदिर येथे करण्यात आले. ज्याचा उद्देश चॅम्पियन व येणाऱ्या लोकांसोबत चर्चा व्हावी व त्यांचे प्रश्न सोडविण्यास त्यांना मदत व्हावी. या मिटींगला नगराध्यक्षा वैशाली नहाते मॅडम, महिला व पाणी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे ओपेशनल मॅनेजर रविकांत घाटोळ सर, MEO सुनील मानकर सर, केळापूर तालुक्याचे क्षेत्र समनव्यक अमोल बोरकर व भूषण खडसे, प्रतिभा दुर्गे तक्रार निवारण केन्द्र समुपदेशक, अॅड किनाके, आयसीआय फाउंन्डर, सैनिक हिम्मत घोडाम, दैनिक लोकशाही वार्ता तथा सह्याद्री न्यूज (ई-पेपर) तालुका प्रतिनिधी रवि वल्लमवार, दैनिक लोकसूत्र चे सुरज बंडीवार, आशुतोष चौधरी, किरण बाराहाते, कविता जुमनाके, आशिया शब्बीर, महेंद्र कोडापे व केअर चे सर्व प्रशिक्षणार्थी इत्यादी व्यक्ती उपस्थित होते. हे करत असताना सोसिएल डिस्टनसिंग चे सुद्धा पालन केले गेले आहेत.

पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे महिलांचे कायदे विषयक शिबिर

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२० ऑक्टो.) : आज पांढरकवडा पोलिस स्टेशन येथे तालुका विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि पोलिस स्टेशन कार्यालयांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे कायदे विषयक जनजागृती करण्यात आले. प्रमुख पाहुणे जगदिश मंडलवार (पो. नि.) यांनी मनोधैर्य योजना बाबतीत पिडीतांना अनेक लाभ मिळत असल्याने सांगितले. ॲड शितल गुंडावार यांनी ऍसिडचा हल्ला व त्या पासुन संरक्षण विषयक माहिती दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवाणी न्यायालय केळापूर), यांनी ३७६ व एफआयआर मध्ये प्रथम पुरावा नोंद महत्वाची असुन त्यावरच केस अवलंबून असते असे सांगितले. तसेच महिलांचे संरक्षण विषयक माहिती दिली.

या कार्यक्रमात उपस्थित ॲड गजानन खैरकर, विजय महाले, निलेश गायकवाड, अंजली कानबले मॅडम, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेटेवार यांनी केले तर आभार निलेश गायकवाड यांनी केले.

मुन्नुरकापु व बेलदार समाजाच्या वतीने जगदिश मंडलवार पोलीस निरीक्षक पांढरकवडा यांचे स्वागत


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२० ऑक्टो.) : पांढरकवडा येथे नव्यानेच पोलीस निरीक्षक म्हणून रुजु झालेले जगदिश मंडलवार साहेब यांचे मुन्नुरकापु/ बेलदार समाजाच्या वतीने (ता.१८) रोजी स्वागत करण्यात आले.

स्वागताच्या वेळी श्री. हनमंतु रजनलवार (सेनि तहसिलदार), श्री अरविंद गांगुलवार (राज्य उपाध्यक्ष), श्री.कृष्णराव आदेवार(सेनि पोलीस उपअधिक्षक), श्री.त्र्यंबकराव तोटावार (सेनि उपअधिक्षक), श्री. विनायकराव वद्देवार (राज्य सदस्य), श्री.राजेंद्र भंडारवार (राज्य सदस्य), किशोर देशट्टीवार (राज्य सदस्य), रामकृष्ण पार्लावार साहेब, गजानन मादस्तवार, जयवंत वल्लमवार, विकास देशट्टीवार, नितेश आकुलवार, विशाल कोपुलवार, डॉ.प्रिती तोटावार उपस्थित होते. हनमंतु रजनलवार (सेनि तहसीलदार) यांनी सर्वांचे परिचय करून दिले.

यंदाही, केळापूर तालुक्यात नवरात्री उत्सव व देवी विसर्जन शांततेत


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१९ ऑक्टो.) : मागील दीड ते दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळात नवरात्री उत्सव अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. यंदा सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.

मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात यंदा कोरोना काळात अगदी साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव व देवी विसर्जन करण्याचे ठरवण्यात आले. शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशा सूचना होत्या.
                       
याच अनुषंगाने पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तालुक्यात यंदा कोरोना काळात नवरात्रोत्सव हा शांतता व सुव्यवस्था कायम ठेऊन प्रत्येक गावात ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कोन्स्टेबल बिट जमादार राजू मोहूर्ले यांनी गोपालपूर बिट परिसरातील वांजरी, महांडोळी, चालबर्डी, बेलोरी, आकोली (बग्गी) कुंडी. बोरगाव (कडु) ताडउमरी तसेच वाय बीट या गावात विसर्जनाची उत्तम व महत्वाची कामगिरी बजावली. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण नियोजन करून धुरा सांभाळत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या अथक प्रयत्ननाने यंदाचा नवरात्री उत्सव व विसर्जन सोहळा अगदी शांततेत पार पडले. 

पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१८ ऑक्टो.) : आज रोजी 
पांढरकवडा बस स्थानक येथे नगर परिषद पांढरकवडा,बस आगार व्यवस्थापक,तहसील कार्यालय पांढरकवडा,विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि सर्व शासकीय कार्यालयांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे कायदे विषयक जनजागृती करण्यात आले. त्यानंतर माणुसकीच्या भिंतींचे अनावरण करण्यात आले.या माध्यमातून गरजु व गोरगरीब लोकांना जुने कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवाणी न्यायालय केळापूर), प्रमुख उपस्थिती श्री सुरेश कव्हळे (तहसीलदार केळापूर) श्री. अनंत ताकर (आगार व्यवस्थापक) पांढरकवडा, नगर परिषद मुख्याधिकारी श्री राजू मोट्टेमवार, आरोग्य निरीक्षक संतोष व्यास, अधीक्षक विनोद अंबाडकर.विधी सेवा समिती तथा वकील संघ तर्फे श्री ॲड गजानन खैरकार, ॲड बिजेवार,ॲड पेटेवार आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी श्री बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवानी न्यायालय केळापूर) यांनी कायदे विषयक माहिती दिली तर तहसीलदार सुरेश कव्हळे साहेब यांनी विविध शासकीय योजना याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पेटेवार यांनी केले तर आभार कनाके यांनी केले.

आदर्शगांव कोठोडा येथे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ(भा.पो.से.) यांची विशेष भेट


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१८ ऑक्टो.) : केळापुर तालुक्यातील कोठोडा येथे यवतमाळ जिल्ह्याचे
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी (ता.१३) ला भेट दिली, भेटी दरम्यान गावकऱ्यांसोबत गावफेरी करुन आदर्शगांव योजनेअंतर्गत व इतर योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली.
आदर्शगांव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष मा.पोपटराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शन व
प्रेरणेतुन आत्महत्या मुक्त झालेल्या कोठोडा या गावाला राज्यस्तराचे प्रथम उत्कृष्ट आदर्शगांव
पुरस्काराने सन्मानित झालेल्या गावामध्ये मा.अधिक्षक साहेबांनी एक तास गावकऱ्यांसोबत चर्चा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकमध्ये स्व.सौ. शांताबाई भोयर ग्रामिण विकास बहु.संस्था बोथ या
संस्थेचे फिरोज खान इसाक खान पठाण (क्षेत्रीय तंत्रज्ञ, आदर्शगांव कोठोडा) यांनी आदर्शगांव
योजनेअंतर्गत शेतामध्ये झालेल्या बांध-बंधिस्त कामामुळे बारा माही सिंचनाची व्यवस्था उपलब्ध
झाल्यामुळे पिक उत्पादन व उत्पन्नात वाढ झाली तसेच गावातील सिमेंट काँक्रेट रस्ते, भुमिगत
नाली, डिजीटल अंगणवाडी, अद्यावत अभ्यासिका, व्यायाम साहित्य, प्राथमिक शाळेला साहित्य
तसेच फिरता निधीतुन गावातील एकुण १६ महिला बचतगटांना रु. ४,४२,०००/- देण्यात आले.
बिछायत साहित्य, दाळ मिल, शेवई मशिन व मालवाहतुक वाहन बचत गटांच्या स्वयंरोजगार
उभारण्यासाठी योजनेतुन देण्यात आले, नसबंदी, नशाबंदी, बोअरवेल बंदी, चराई बंदी, कुन्हाड
बंदी, लोटा बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे १००% पालन गावातील ग्रामस्थ करीत असल्याची
माहिती दिली.

शासनाच्या इतर योजनेतुन झालेली कामे व ग्रामस्थांनी लोकसहभागातुन केलेल्या कामाची
सविस्तर माहिती सभेमध्ये श्री.फिरोज खान इसाक खान पठाण व श्री.सुनिल दत्तात्रय पावडे (ग्राम
कार्यकर्ता) यांनी मांडली. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी
मार्गदर्शन करतांना सप्तसुत्री पालन तसेच योजनेतुन झालेल्या गाव विकास कामाची प्रशंसा केली.

जिल्ह्यातील एकमेव गाव ज्या गावामध्ये मला आज भेटी दरम्यान खुप काही शिकायला मिळाले
हे माझे भाग्यच, तसेच गावाने केलेले कार्य यामुळे मला खुप काही माहिती आत्मसात करावयास
मिळाली, डिजीटल ग्रंथालय, डिजीटल ग्रामपंचायत, आर.ओ. फिल्टर अशा सर्व परिपूर्ण सुविधा
एका छोट्याशा गावामध्ये आहे ही प्रशंसेची बाब असुन आदर्शगांव योजनेचे श्री.भालेराव (कृषि
उपसंचालक) व श्री.गणेश तांबे साहेब (तंत्र अधिकारी) यांनी वेळोवेळी गावाला दिलेल्या भेटी व
सहकार्याबद्दल त्यांचे उत्कृष्ट कार्याचे मा.दिलीप पाटील साहेबांनी प्रशंसा केली. गावामध्ये अशाच
प्रकारचा एकोपा राहावा व पवार साहेबांनी कोठोडा गावाला आत्महत्यामुक्त करुन दिले त्याबद्दल
त्यांचे आभार मानुन त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला विराम दिला.

या कार्यक्रमाला डॉ. अनिल कोंडबाजी भोयर (संस्था अध्यक्ष), सुनिल पावडे (ग्राम
कार्यकता), फिरोज खान इसाक खान पठाण (क्षेत्रीय तंत्रज्ञ, आदर्शगांव कोठोडा), प्रकाश
काकडे (ग्रामसेवक), किशोर धगडी (पोलीस पाटील), प्रदिप पाटील (उ.वि.पो.अधिकारी), रामकृष्ण महल्ले (जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी), जगदिश मंडलवार (पोलीस निरीक्षक पांढरकवडा), संदिप बारींगे (पोलीस उपनिरीक्षक),
संकल्प वाचनालयाचे चमु व प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्री.पवन जुमळे, आभार श्री. देवतळे (माजी कॅप्टन) यांनी मानले.

केळापूर तालुक्यात अती पावसामुळे पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१७ ऑक्टो.) : निसर्गाच्या प्रकोपामुळे अति पावसामुळे शेतकऱ्यांचे अथोनाथ नुकसान झाले. वर्षभर शेतात राबून ऐन पीक काढणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या हाती अजून पीक आले नाही. अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोयाबीन,कापूस,अशा नगदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेल दिसून येत आहे. ऐन दिवाळी तोंडावर येत आहे अजून शेतकऱ्यांच्या हाती अजून काही लागले नाही. यंदा दिवाळी ही अंधारातच करावी लागणार आहे अशी स्थिती दिसून येत आहे. अतीपावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत घट झालेल दिसून देत आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे अतिवृष्टी जाहीर करावी जेनेकरून बळीराज्याला दिलासा मिळेल.
                     
हंगामात सोयाबीन व कापूस काढणीसाठी मजुरांचा तुटवडा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना मजुरांसाठी जिकडेतिकडे धावपड करावी लागत आहे. शेतात काम करण्यासाठी बाहेरगावचे लेबर आणावे लागत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खर्च वाढलेलं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे जेणेकरून लावलेला खर्च निघाला पाहिजे. अतिपावसामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.
                  
प्रशासनच मायबाप समजून शेतकऱ्यांना तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहे. दिवाळी सन आला प्रशासन लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी.