राज्यपालांच्या "वादग्रस्त" वक्तव्याचा युवासेनेकडून निषेध

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मधल्या काळात तर ते आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारीदेखील त्यांनी अशाच प्रकारचं अडचणीत आणणारं वक्तव्य करुन स्वतःची सोबतच भाजपची देखील चांगलीच गोची केल्याचं पाहिला मिळालं.
गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी, विरोधकांसह राज्यातील सर्वसामान्यांनी खडे बोल सुनावले. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर वणी विधानसभा मध्ये त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आज (ता.31 जुलै ) ला जोरदार निषेध करण्यात आला.
हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला, केंद्राने त्यांना परत बोलवून घ्यावे याकरिता आज रविवार रोजी वणी विधानसभा युवासेने तर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना विस्तारक दिलीप घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान आंदोलन कर्त्यांनी शिवतीर्थावर जोरदार घोषणा देत कोश्यारी यांचा निषेध केला.
यावेळी सतिश वारटे युवासेना जिल्हा समन्वयक, चंद्रकांत गुगुल, निलेश बेलेकर, दिपानकर वनकर, विक्रम कुलकर्णी, राकेश माकडे, महेश चौधरी, मंगल भोंगरे, मोंटू वाधवानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल बोरडे, अमृत फुलझले, सचिन पाटील, माकबूल शेख, शकील सिद्दीकी, रिंकू पठाण, शिवा शर्मा, पवन खुळसंगे, प्रवीण वरारकर, युवासेना पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी महाराष्ट्रा, मराठी माणसाची ची माफी मागावी अशी मागणी वणीत युवासेनेकडून स्वाक्षरी मोहीम राबवून करण्यात आली आहे.

वृद्ध महिलांनी साजरा केला माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा दिनांक 30 जुलै रोजी जुनी पडोली येथील वृद्ध महिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने माननीय आमदार श्री.सुधीरभाऊ मनमंदिर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी या महिलांना श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या कडून मा.सुधीरभाऊ यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना साडी चोडी देण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री विजय माशिरकर, श्री. विकी लाडसे सरपंच पडोली,श्री निशिकांत पिसे ग्राम पंचायत सदस्य, श्री.विनोद खडसे तालुका सचिव भाजपा, सौ. छायाताई उईके ग्रामपंचायत सदस्य, श्री बंडू जोगी, श्री मंगेश चौधरी हे उपस्थित होते.

अग्निपथ योजने वर चर्चा सत्र; जनता विद्यालय वणी येथे संपन्न

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : एस.पी.एम राष्ट्रीय छात्र सेना व जनता विद्यालय च्या संयुक्त विद्यमाने अग्नीपथ योजनेवर चर्चासत्र चे आयोजन जनता विद्यालय वणी येथे दि.28 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय छात्र सेना एस. पी. एम आणि जनता विद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने तसेच 20 बटालियन महाराष्ट्र NCC नागपूर चे कर्नल अमोद चंदना यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निपथ योजने वर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.


या सेमिनार मध्ये अग्निपथ योजनेविषयी कॅडेट्सनी भाषणे दिली. या सेमिनार ला प्रमुख उपस्थिती सुबेदार काश्मीर सिंग आणि हवालदार अर्जुन यांची होती तर अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. जांभुळकर मॅडम ह्या होत्या.


सेकंड ऑफिसर नरेश बेलेकर सेमिनार चे संचालन केले तर, आभार केअर टेकर सतीश मडावी यांनी मानले.

मागील दहा वर्षापासून मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त लखमापूर हनुमान मंदिर येथील अभिषेक,रामायण पाठ पूजन कार्यक्रम

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.अनिल डोंगरे यांचे माध्यमातून मागील दहा वर्षापासून श्री.लखमापूर हनुमान मंदिर येथील अभिषेक,रामायण पाठ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात.

याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन. या कार्यक्रमाची सूरवात हनुमानजीच्या मूर्तीला हार,फुल दुधाचा अभिषेक,रामायण पाठ संकल्प व हनुमानजीच्या मूर्तीचे पूजन,आरती करून झाली हनुमानजी मूर्तीला उपस्थित सर्वांनी साखळ घालून प्राथना केली हे संकट मोचन हनुमानजी आमचे नेते सुधीर भाऊ यांना महाराष्ट्रातील दिन दुर्बल जनतेचे प्रश्न सोडविताना व सेवा करीत असताना त्यांना यश दे. बळ दे.तसेच त्यांचे आरोग्य निरोगी सुदृढ राहू दे त्यांना दीर्घ आयुष्य दे याप्रमाणे सर्वांनी मिळून प्रार्थना केली. या कार्यक्रमाला मा.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा मा.रामपाल सिंह भाजपा जेष्ठ नेते मा.सौ.शोबाताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा. मा.दुर्गाताई बावणे तालुका महामंत्री भाजपा मा. विलास टेभूर्णे. मा.अजय चालेकर तालुका उपाध्यक्ष भाजपा.मा.विनोद खडसे तालुका सचिव भाजपा मा.विकास जुमणाके. सौ.माधुरी सागोरे सरपंच.सौ.संगीता हेलवडे.सौ.किरण डोंगरे.सौ.किरण अलोने सौ.सुनिता पिंपलकर सौ.कांता खोब्रागडे श्री.शंकर खांडारकर श्री.अशोक पटेल. श्री.रोहन चालेकर श्री.मनोज ठेंगणे श्री.नानाजी थेरे श्री.अर्जुन नागरकर श्री.सुदर्शन निषाद. श्री.रामदास मिलमिले श्री.मारोती पिंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन.श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. पवन डोंगरे.श्री.संदीप ठाकरे. यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मालेगाव : कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व 205 पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दादा भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलिसांच्या प्रश्नांच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील आहे. पोलिसांच्या घरांच्या बाबतीत मुंबईत बैठक घेण्यात आली आहे. येत्या काळात शासनाच्या सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून पोलिसांच्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येईल. मुंबई पोलिसांसाठी 50 हजार घरांची गरज आहे. मात्र सध्या 19 हजार घरे उपलब्ध आहेत. सद्यस्थितीतील घरांच्या डागडुजी व देखभालीची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शासन काम करत आहे.
सध्याचे सरकार हे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांचे सरकार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे काम शंभर टक्के झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन युद्ध पातळीवर काम करत आहे. लवकरच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणार आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वास्त केले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कपात करून पाच रुपयांनी दर कमी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ग्रीडद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सरकारचा संकल्प लोकहिताचे कामे करण्याचा आहे. लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य हे शासनाचे ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार दादा भुसे म्हणाले की, मालेगाव येथील पोलिसांसाठीचे 54 कोटी 49 लाख खर्चून सुसज्ज निवासस्थान झाले‌ आहे‌‌. उर्वरित अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आणखी निवासस्थाने मंजूर करावीत. तसेच पोलीस शिपाई भरती करावी.

यावेळी 5 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात निवासस्थानाच्या किल्ल्या देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्याकडून या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी मालेगाव पोलिसांच्या ताफ्यातील नवीन चारचाकी वाहनांचे लोकार्पण हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (ता.मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे ( 169.24 कोटी) भूमिपूजन व कोनशीला अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार दादा भुसे उपस्थित होते.

उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक; एक ठार तर दोन जखमी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी-यवतमाळ महा मार्गावरील सोमनाळा (निंबाळा) फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी कारने जोरदार धडक दिली. यात कार चालकाच्या बाजूला बसलेला युवक जागीच ठार झाला तर, चालकासह कार मधील इतर एक जन गंभीर जखमी झाले. ही (ता.30 जुलै) रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
जखमींना तात्काळ शहरातील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार ट्रक वणी-यवतमाळ राज्य मार्गावर ट्रक उभा होता. मारेगावकडून येत असलेली सँट्रो (Santro) कार सरळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागुन धडकली. या भीषण अपघातात अमोल देठे नामक इसम हा जागीच ठार झाला. तर लालसरे व मडावी हे जखमी झाले.
अपघातात मरण पावलेला व जखमी झालेले सदरहू युवक छोरीयातील रहिवासी असल्याचे कळते. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, एकाला खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. मृतक अमोल देठे (45) मुळ गाव भालर असून ते वेकोली  (wcl)मध्ये काम करित असल्याचे समजते. 

            जाहिरातसाठी संपर्क : 9011152179

भारतीय जनता पक्ष वरोरा तर्फे लोकनेते,विकासपुरुष सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांच्या वाढदिवसनिमित्य शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग किट वाटप

कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : चंद्रपुर जिल्ह्याचे माजी पालाकमंत्री तथा अध्यक्ष लोकलेखा समिती,माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष वरोरा तर्फे शहरातील नगर परिषद शाळेतील व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग किट वितरण करण्यात आले.

या प्रसंगी अहेतेशामअली मा.नगराध्यक्ष.न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप, डॉ.भगवान गायकवाड (तालुका अध्यक्ष), बाबासाहेब भागडे जेष्ठ नेते, सुरेश महाजन (शहर अध्यक्ष), ओम मांडवकर जेष्ठ नेते, करन देवतळे (उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा), आशिष ठाकरे, सौ.शुभांगी निंबाळकर, वंदना दाते, विनोद लोहकरे, जगदीष तोटावार, सौ.सुनिताताई काकडे, विलास गैनेवार, मधुकर ठाकरे, आशिष रणदिवे, संजय राम, दीपक घुडे, जगन ढाकणे, पंढरी वर्भे, दिलीप घोरपडे, ओम यादव, डॉ.गुणानंद दुर्गे, बाळूभाऊ भोयर, सुनील समर्थ, परसराम मरसकोल्हे, अक्षय भिवदरे, अमित चवले, मोहन रंगदळ, उमेश शर्मा, सुधाकर कुंकुले, रोशन लखोटे, अभिजित गैनेवार, निलेश देवतळे, शरद कातोरे, आदेश बावणे, खुशाल बावणे, अभिजित गैनेवार, राजेश साकुरे, दादू खंगार, कमलाकर व्हीलेकर, सौ.चन्द्रकला मत्ते, सौ.सुषमा कराड, ज्योतीताई किटे, छाया चौव्हान, अरुण मोदी, गजानन राऊत, मधुसुधन टिपले, निशी शिरसागर, बघेले साहेब, कमलाकर किनेकर, अक्षय वाटकर, अजहर खान, दिपक जिवतोडे सह आदींची उपस्थिति होती.

डॉक्टर असोसिएशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्त गावात आरोग्य शिबीर

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात पुरग्रस्त गावात आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर आज (ता.30 जुलै) ला घेण्यात आले आहे. या शिबिरात पशु चिकित्सक सुद्धा उपलब्ध असून, जनावरांची तपासणी व औषधं देण्यात आले आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील सावंगी,कोसारा, शिवणी, आपटी व अन्य गावात पुर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पीडितांना एक हात मदतीचा म्हणून शिबिर घेण्यात आले. आज शनिवारला सावंगी व कोसारा येथे पुरग्रस्त भागात जावून डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा व क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राकेश भाऊ खुराणा व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले.
यावेळी कोसारा येथील सरपंच, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, अंकुश माफुर, डॉ धिरज डाहूले, डॉ मालवटकर, डॉ सुबोध अग्रवाल, आशिष आगबत्तलवार, नेहा ठाकरे आदींनी आरोग्य या शिबिराकरिता सहकार्य केले.

ऑगस्ट महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? - पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

प्रत्येक बँकेच्या ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण 12 दिवस सुट्टी राहणार आहे.

पहा कश्या असतील सुट्या ?

7 ऑगस्ट रविवार

9 ऑगस्ट मोहरम 

11 ऑगस्ट रक्षाबंधन 

13 ऑगस्ट दुसरा शनिवार 
14 ऑगस्ट रविवार

15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस  

16 ऑगस्ट पारशी नूतनवर्ष 

21 ऑगस्ट रविवार 

26 ऑगस्ट पोळा  

27 ऑगस्ट चौथा शनिवार  

28 ऑगस्ट रविवार 

31 ऑगस्ट गणेश उत्सव 

असे आहेत ऑगस्ट महिन्यात बँका 12 दिवस बंद राहण्याचे शेड्युल, त्यामुळे नागरिकांची बाजार पेठेत येत्या महिन्यात चांगलीच रेलचेल असणार आहे.

युवा कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मारेगाव तालुक्यातील युवकांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या उपस्थितीत त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. 

यावेळी काँग्रेस नेते माननीय वामनराव कासावार, डॅनी सेंड्रावर, डॉ.महेंद्र लोढा, ओम ठाकूर, इजहार शेख, व महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी व ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी महिला वर्ग आदी उपस्थित होते.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये धनंजय आसुटकर, प्रफुल मानकर, 
अनिकेत काटकर, तेजस वाघमारे, सुमेध तोतडे, पवन सातपुते, आशिष पाटील, नितीन तुरणकर, राजू मेसेकर
शुभम मेश्राम, भुपेंद्र खुलसंगे आदी अनेक युवकांनी प्रवेश केला आहे.

आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत होऊ घातल्या असतांना धनंजय आसुटकर  नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तळागाळातील लोकांशी जुळलेली काँग्रेसची नाळ ती कायम ठेवण्याकरिता व लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाला समर्थन देणे हे कधीही चांगले, तेव्हाच आपली लोकशाही मजबूत राहील असे या प्रसंगी त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना आसुटकर यांनी सांगितले. 

माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मारेगाव तालुक्यातील पूर ग्रस्तांच्या जाणून घेतल्या व्यथा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गेल्या महिनाभरापासून पाऊस विदर्भाला झोडपतो आहे. या पावसाने शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी उप मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज (ता.29 जुलै) त्यांनी मारेगाव तालुक्यातील दापोरा चा दौरा केला. या दरम्यान त्यांनी नुकसानीचे पाहणी केली. ही विदारक परिस्थिती सरकार दरबारी मांडून तात्काळ नुकसान भरपूर व ओला दुष्काळ जाहिर करण्याकरिता देखील त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडू असे अजित पवार यांनी सांगितले.  
यावेळी तालुक्यातील पूर परिस्थितीची इत्थंभूत माहिती अजित दादांना दिली. या अतिवृष्टीने झालेले नुकसान, त्याचे होणारे दूरगामी परिणाम आणि करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या शासन दरबारी मांडून पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना 75 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मोठी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांनी दादांना निवेदनातून करण्यात आली.
वणी मारेगाव झरी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे, बेंबळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्यामुळे बेंबळा सिंचन विभागाकडून नुकसान भरपाई म्हणून सरसकट 75 हजार रुपये मंजूर करण्यात यावे तसेच वणी उपविभागीय ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी सह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा झंझावत दौरा मारेगाव तालुक्यातील पूर ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू डोळ्यात साठवून विरोधी पक्ष नेत्याचा ताफा सेलू ता.वणी कडे रवाना झाला.

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता किंवा पोट-निवडणुकीकरिता सरपंच पदासाठी नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असून त्याचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी नसावे. ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले नसेल, ती त्या गावाच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा पंचायतीच्या सरपंच पदासाठी पात्र नसेल.
या अधिनियमात थेट निवडून आलेल्या सरपंचाविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावास ग्रामसभेद्वारे शिरगणना करण्याच्या पद्धतीने साध्या बहुमताने अनुसमर्थन देण्यात येईल, असेही प्रावधान करण्यात आले आहे. या अविश्वास प्रस्तावास अनुसमर्थन दिल्यानंतर सरपंचास देण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार उप-सरपंचाकडे देण्यात येईल.
जर सरपंच आणि उप-सरपंच या दोघांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असेल तर असा अविश्वास प्रस्ताव निर्णीत होईपर्यंत गट विकास अधिकाऱ्याकडून प्राधिकृत करण्यात येईल आणि हा अधिकार विस्तार अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडे देण्यात येईल, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आलेले आहे.

कलकम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य आरोपींना पकडा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच प्रामुख्याने विदर्भात गाजत असलेला कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज घोटाळाल्यातील संचालक, कार्यालयीन विदर्भ प्रमुखावर कठोर कार्यवाही करून त्यांना गजआड करा अशी मागणी आज शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष चंद्रपूर निमेश मानकर यांच्या नेतृत्वात भेट घेऊन विरोधी पक्ष नेते मा.अजितदादा पवार साहेब यांना चंद्रपूर दौऱ्यात करण्यात आली.
या अगोदर दादांना मुंबई येथे ९ जून २०२२ ला निवेदन देण्यात आलेले होते. संबंधित विषय गृहविभाग कडे पाठवलेला होता. परंतु अजूनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने आज दादांना सांगण्यात आले. निवेदन दादांच्या लक्षात येताच त्यांनी सदर बाब वैयक्तिकरित्या माननीय ना.मुख्यमंत्र्यांसमोर नेणार असे सांगितले. त्यामुळे कलकम पीडित लोकांनी सुटकेचा श्वास सोडला.या अगोदर सदर प्रकरनाची तक्रार माजी गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे साहेब, मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करण्यात आलेली होती. मा.गृहमंत्र्यांनी स्पेशल स्क्वाड नेमून चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले होते. परंतु मागील एक महिन्यापासून महाराष्ट्र आणि विदर्भात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे, संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंतून होती. त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष देता आले नाही.परंतु दादांनी लक्ष घातले म्हणजे प्रकरणाला गती मिळेल यात शंका नाही.
निवेदनता सदर फरार आरोपी विजय येरगुडे याला पकडावे तसेच कंपनीचे मुख्य संचालक विष्णू पांडुरंग दळवी व त्यांच्या सहकार्यावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्या दिशेने तपास करून त्यांना सुद्धा गजआड करावे आणि आणि पीडिताना न्याय द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. निवेदन देताना शरद पवार विचार मंच प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, संजय तूरीले,बाबा सातपुते तसेच पीडित उपस्थित होते.

अभिष्टचिंतन: इजहारभाई शेख यांना यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

                   
                       जनम दिन मुबारक...!!

जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा नगरपरिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष  व सामाजिक नेहमीच सक्रिय होणारे वणी येथील प्रतिष्ठित कार्यकर्ते श्री इजहार भाई शेख यांना  वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!

भाई आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच मनस्वी सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक वणी मारेगाव झरी (जामणी) इजहार भाई  शेख मित्र परिवार 

राज्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम; राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी

अतुल खोपटकर | सह्याद्री चौफेर 

मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांसाठी सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.

‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इ. याची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागास /नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यात यावा. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

पुणे : निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसाठी आयोजित कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सभागृहात राज्यातील उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपायुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुक विषयक कामकाज करताना आलेल्या अनुभवाची देवाण-घेवाण उपयुक्त आहे. निवडणुक प्रक्रियेतील आपले हे अनुभव पुढील निवडणूक कामकाजासाठी दिशादर्शक ठरतील. कार्यशाळेतील विचारमंथनाच्या आधारे पथदर्शी मुद्दे समोर यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या निवडणुक प्रकियेबाबतचे प्रशासकीय नियोजन, आधार लिंकेज, स्वीप कार्यक्रमात नाविन्यपूर्ण कामकाज, समाज माध्यमांचा वापर, भविष्यातील नियोजन याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा निवडणूक विषयक कामकाजासाठी अधिकाऱ्यांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, असे श्री.देशपांडे म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावरील काही प्रकल्प करण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यावर सोपवली आहे. अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी राज्यावर सोपविणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशात निवडणूक विषयक कामकाजात राज्याने चांगली कामगिरी केली आहे. राज्यात निवडणूक यंत्रणेतील सर्वांच्या क्रियाशील सहभागाचे हे यश असल्याचा उल्लेखही श्री. देशपांडे यांनी केला.
सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी भारत निवडणूक आयोगाने केलेल्या कायद्यातील बदलाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.

दोन दिवसीय कार्यशाळेत विविध तज्ज्ञ निवडणुक विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले आहेत.

मारेगाव: जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेली तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत आज (ता.28 जुलै) ला जाहीर करण्यात आली. 
मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत बोटोणी - वेगाव गटात सर्व साधारण अनु.जमाती तर कुंभा मार्डी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले.
      

पंचायत समिती वेगाव गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र ), बोटोणी गणात अनु.जमाती महिला राखीव , कुंभा गण -सर्व साधारण महिला तर मार्डी गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले.
      
या आरक्षण सोडतीने अनेकांचा हिरमोड झाला असून, बहुतांश कार्यकर्त्यांचा मार्गही सुकर झाल्याचे पाहुण मग "काय ते डोंगर काय ते झाडी काय ते हाटील सगळं कसं एकदम ओके" असणार असं बोलले जात आहे. या निवडणूकीच्या धुरळ्यात आपले बाहुबली उमेदवार उभे करून सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रणधुमाळीत 'जनता जनार्दन'ला खिळवून ठेवणार.