राज्यपालांच्या "वादग्रस्त" वक्तव्याचा युवासेनेकडून निषेध

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मधल्या काळात तर ते आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारीदेखील त्यांनी अशाच प्रकारचं अडचणीत आणणारं वक्तव्य करुन स्वतःची सोबतच भाजपची देखील चांगलीच गोची केल्याचं पाहिला मिळालं.
गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी, विरोधकांसह राज्यातील सर्वसामान्यांनी खडे बोल सुनावले. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर वणी विधानसभा मध्ये त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आज (ता.31 जुलै ) ला जोरदार निषेध करण्यात आला.
हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला, केंद्राने त्यांना परत बोलवून घ्यावे याकरिता आज रविवार रोजी वणी विधानसभा युवासेने तर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना विस्तारक दिलीप घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान आंदोलन कर्त्यांनी शिवतीर्थावर जोरदार घोषणा देत कोश्यारी यांचा निषेध केला.
यावेळी सतिश वारटे युवासेना जिल्हा समन्वयक, चंद्रकांत गुगुल, निलेश बेलेकर, दिपानकर वनकर, विक्रम कुलकर्णी, राकेश माकडे, महेश चौधरी, मंगल भोंगरे, मोंटू वाधवानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल बोरडे, अमृत फुलझले, सचिन पाटील, माकबूल शेख, शकील सिद्दीकी, रिंकू पठाण, शिवा शर्मा, पवन खुळसंगे, प्रवीण वरारकर, युवासेना पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी महाराष्ट्रा, मराठी माणसाची ची माफी मागावी अशी मागणी वणीत युवासेनेकडून स्वाक्षरी मोहीम राबवून करण्यात आली आहे.