शासकीय वसतिगृहाच्या सन २०२१-२२ साठीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने सन 2021-22 साठी वसतीगृह प्रवेश मिळविण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे :- शालेय विद्यार्थी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.

पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

बी. ए./बी. कॉम / बी. एस. सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम. ए./ एम. कॉम. / एम. एस. सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि .4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.

पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021.

पहिली निवड यादी अंतिम करणे दि.6 जानेवारी 2022 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 20 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 25 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.1 फेब्रुवारी 2022.

पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या रकान्यामधील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश द्यावा (स्पॉट अॅडमिशन) असे पुण्याचे समाजकल्याण आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून देशात 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून महाराष्ट्रात ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यास सुरूवात झाली.

हे महा आवास अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविण्यात आले आणि या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आलेली गतिमानता व गुणवत्तावाढ विचारात घेऊन 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च, 2022 पर्यंत पुन्हा ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ हे सन 2021-22 या वर्षामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे, शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे, घरांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम घडवून आणणे, जनजागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे ही या महा आवास अभियानाची उद्दिष्टे आहे. या अभियानाच्या कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे तसेच बहुमजली इमारती व गृहसंकुले उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया किमान कालावधीत पूर्ण करून मंजुरी देऊन घरकुल मंजुरीचे पत्र त्वरीत वितरित करण्यात येतील.

राज्यात महिला स्वयंसहायता गट / ग्राम संघ / प्रभाग संघ / विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी समुदाय आधारित संस्थाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक घरकुल मार्ट सुरू करून त्याद्वारे घरकुलाचे बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जातील. त्याचप्रमाणे सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाच्या भौतिक प्रगतीनुसार टप्पानिहाय सर्व हप्ते किमान कालावधीत वितरीत करण्यात येतील.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यानंतर 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील. यात घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणाचे विश्लेषण व त्यावर उपाययोजना करणे. पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिफंड करून रिमांड करणे.

घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट देणाऱ्या संस्थांशी समन्वय ठेवून कुशल गवंडी तयार करण्यात येणार आहे. प्रशिक्षित ग्रामीण गवंडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील इतर उपलब्ध गवंडी याची ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करून त्याचे पॅनेल बनवून या पॅनेलमधील गवंड्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील बांधकामात सहभाग घेण्यात येईल.

घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत डेमो हाऊस निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड त्यांचे आधार सिडींग करण्यात येईल. राज्यपुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मधील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड काढून त्याचे आधार सिडींग व जॉब कार्ड मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.

ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन, पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन, गॅस जोडणीसाठी उज्ज्वला योजना, विद्युत जोडणीसाठी सौभाग्य योजना, उपजिविकेसाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अशा विविध शासकीय योजनांशी कृतीसंगमातून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृतिसंगम साधण्यात येणार आहे.

या गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता सुधारणासाठी बहुमजली गृहसंकुले उभारणे व त्याच्या सहकारी संस्था स्थापन करणे, भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या जागांची लॅण्ड बँक तयार करणे, वाळू करिता सॅण्ड बँक आणि वाळूला पर्याय म्हणून क्रश सॅण्ड, प्लाय ॲश ब्रिक्स, इंटर लॉकींग ब्रिक्स, हॉलो ब्रिक्स इत्यादीसोबतच अन्य बांधकाम तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे.

महा आवास अभियान ग्रामीण 2021-22 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेबरोबरच विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून सोबतच ग्राम कृती गटाचे गठन, लाभार्थी मेळावे, बँक मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सनियंत्रण व मूल्यमापन समितीची रचना करण्यात आली आहे.

महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘महा आवास अभियान पुरस्कार 2021-22’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, इत्यादी ग्रामस्तरीय पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना यांचा समावेश असणार आहे. या उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारांची नामांकने निवडण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

बेघर आणि गरजू लोकांना हक्काचे आणि पक्के घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या महाआवास अभियानाच्या टप्पा-2 द्वारे राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची काळजी शासन आणि त्यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी घेत आहेत.

 

संजय डी.ओरके

सहाय्यक संचालक (मा.)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

मंत्रालय, मुंबई-32

अनुसूचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याच्या योजनेसंदर्भात लाभार्थी व संस्थाना आवाहन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : सन 2009-2010 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत "अनुसूचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देणे" ही योजना मंजूर आहे. या योजनेकरिता इच्छुक अनुसूचित जमातीच्या मुलांनी तसेच वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या मोटार वाहन अधिनियमाखाली नोंदणीकृत व मान्यताप्राप्त संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा,असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

बापूराव विश्वनाथ टोंगे यांचा सेवानिवृत्त सत्कार



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील सेवक पदावर वयाची २५ वर्षे कार्यरत असलेले श्री. बापूराव विश्वनाथ टोंगे हे वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयात लोकमान्य पगारदार सहकारी पतसंस्था, कर्मचारी कल्याण निधी व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांना पतसंस्थे तर्फे धनादेश, स्मृतिचिन्ह व भेट प्रदान करण्यात आली.

शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मा. श्री. अशोक सोनटक्के, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे
प्रा. आनंद नार्लावर, प्रा. भास्कर पिसे, प्रा. अभिजित अणे, प्रा. गजानन अघळते, श्री. जयंत व्यवहारे ह्यांनी सत्कारमूर्ती श्री. बापूरावजी टोंगे ह्यांच्या कार्याला उजाळा देत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. राजू आगलावे यांनी तर उपाध्यक्ष श्री. अरविंद ब्राह्मणे आभार प्रदर्शन यांनी केले.
सूत्रसंचालनाची धुरा संघटनेचे सन्माननिय सचिव श्री. आनंद नगराळे यांनी पार पाडली. या कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. जयंत त्रिवेदी, मुकेश वाढई, राहुल करमरकर, संजय चुरे, संजय बिलोरीया आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

प.स झरी ग्रामसेवक संघ १३७० शाखाचे एक दिवसीय धरणे व सामुहिक सुट्या टाकून कामबंद आंदोलन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : पंचायत समिती झरी अंतर्गत एकूण ५४ ते ५३ ग्रामपंचायत येथे असून आज रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ याचा वतीने प.स झरी एक दिवसीय धरणे व कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

संदर्भ क्र. १ नुसार ४० ते ५० सविनय निवेदने लोकशाहीच्या मार्गाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार असताना देखील समस्या जिल्हा परिषद स्तरावरून निकाली न काढल्यामुळे दिनांक ०१ जानेवारी २०२२ पासून सामूहिक सुट्टया टाकून संपूर्ण कामबंद आंदोलन समस्या निकाली लागे पर्यत करणे बाबतचा निर्णय झालेला असून ग्रामसेवक संघाच्या एकूण १ते११ मागण्या असून त्या अनुषंगाने रजा मंजूर करून मुख्यलय सोडण्यांची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ झरी ग्रामसेवकांनी उपस्थिती दर्शवून केली आहे.

या सभेला येथील मुख्याध्यापिका सौ. निर्मला जगन्नाथ रोगे, श्री. विठ्ठल नानाजी ठावरी पद. विषय शिक्षक, सौ. संगीता खंडारे पद. विषय शिक्षक, श्री. सूर्यभान नागोबा चिडे पद. विषय शिक्षक, श्री. डोंगरकर सर सहा. शिक्षक, कु. डबाले मॅडम सहा. शिक्षिका, कु. गजघाटे मॅडम सहा. शिक्षिका, कु. चालखूरे मॅडम, कु. शुभांगी ठक मॅडम सहा. शिक्षिका व अनेक महिला पुरुष पालक हजर होते.

नरसाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी संजय चंद्रकांत भुसारी तर उपाध्यक्ष पदी अरुणा रामटेके यांची निवड

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
प्रथम सदस्यांची निवड करण्यात आली नंतर अध्यक्ष पदी श्री संजय चंद्रकांत भुसारी यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सौ. अरुणा गजानन रामटेके यांनी करण्यात आली असून सदस्य म्हणून शितल कैलास चिने, सविता मारोती खंडरे, प्रियंका गजानन उईके, जयश्री महेंद्र उईके, आशिष अरविंद मत्ते, विजय दादाजी उईके, दिनेश देविदास राजगडकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी पुढील वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या

खांबाडा येथे सौर पंपाचे लोकार्पण

सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

चिमूर : दिनांक 30 डिसेंबर 2021 ला खांबाळा येते सौर पंपाचे सौ लताताई पिसे सभापती पंचायत समिती चिमूर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.

चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या खांबाळा हे गाव दोन हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून,येथील एका वाड्यातील गेल्या काही दिवसांपासून महिलांची पाणी भरण्याची अडचण होती ही बाब लक्षात घेता लताताई पिसे सभापती यांनी आपल्या पंधराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून खांबाळा येथील हातपंपावर सौर पंप व टाकी लावून महिलांची अडचण दूर केली.
या वेळी खांबाळा येथील सरपंच काजल ननावरे, उपसरपंच मंगेश धाडसे, सदस्य अमोल गजबे, सुनील कडवे, रामभाऊ चौखे, सुनंदा खाटे, वंदना बावणे, दुर्गा चौखे व कर्मचारी आणि गावातील मंडळी उपस्थित होते.

लोकार्पण सोहळा प्रसंगी खांबाळा वासीय महिलांनी तसेच गावकरी यांनी सभापतींचे आभार मानले.

शहाबुद्दीन अजाणी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : विमाधारकांना तत्पर सेवा व सर्वोत्तम कार्य या करीता सुप्रसिद्ध असलेले एलआईसी ऑफ इंडिया वणी शाखेचे अभिकर्ता शहाबुद्दीन अजाणी यांना "टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर अमेरिका" हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला आहे.

महत्त्वाचे म्हणजे अमरावती विभागाच्या 33 वर्षाच्या इतिहासामध्ये हा सन्मान प्राप्त करणारे श्री शहाबुद्दीन अजाणी हे प्रथम व एकमात्र विमा अभिकर्ता आहे.

"टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर" हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान असून जगातील सर्व विमा कंपनीचा समावेश असलेल्या मिलियन डॉलर राऊंड टेबल-MDRT या अमेरिकेच्या संघटने तर्फे "विशिष्ट अतिउच्च श्रेणीतील सर्वोच्च कार्य" करणाऱ्या विमा प्रतिनिधींना हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
    या सोबतच 18 व्यादा MDRT मेंबरशीप प्राप्त करून विमा क्षेत्रातील विविध स्तरावरील सर्वोच्च बहुमान कार्पोरेट क्लब मेंबर, गॅलेक्सी क्लब मेंबर, झोनल लेवल सुपर स्टार एजंट, लाईफ टाईम MDRT Member असे सर्वच सन्मान शहाबुद्दीन अजानी यांनी प्राप्त केलेले आहे.     
मागील दोन वर्षापासून बाजारपेठेत मंदीचे वातावरण,कोविड- 19 व लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजानी यांनी वर्ष 2021 मध्ये अल्प कालावधीत सदर यश संपादन केलेले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे विविध स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
    
त्यांच्या या विक्रमी यशाकरिता एलआयसी वणी शाखेचे शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी बि. बि. विटाळकर यांनी व शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे.

पार्वताबाई बोदकुरवार यांचे निधन


सह्याद्री न्यूजनेटवर्क | 

वणी : वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मातोश्री पार्वताबाई बापूराव बोदकुरवार यांचे वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने झरी तालुक्यातील लिंगटी या त्यांच्या मूळ गावी निधन झाले आहे. 
   
 त्यांच्या पश्चात आमदारासह चार मुले व दोन मुली आहेत. आज दुपारी 1 वाजता लिंगटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

"कळंब मध्ये तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतून जागतिक पेटेंट प्राप्त"


सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : कळंब येथे तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतुन जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे .
या बाबत सविस्तर वृत्त असे की कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत मुरलिधरराव डेहनकर यांच्या सारथी या नवीन उपकरणाला नुकतेच जर्मनी मधून पेटेंट प्राप्त झालेले आहे.

गेल्या 28 वर्षांपासून पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायिक असलेले कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत डेहनकर यांचे या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडीअडचणी व गरजा या करीता अविरत संशोधन कार्य सुरू असते. 
गेल्या जवळपास बारा वर्षां पासून त्यांनी अनेक उपकरणे या दरम्यान विकसित केली व इंडियन ऑईल कार्पोरेशनची मान्यता मिळवून त्या उपकरणांना संपूर्ण देशात त्यांच्या ए टू झेड इंजीनियरिंग च्या माध्यमातून वितरीत केले.

अलीकडेच त्यांनी तयार केलेले "सारथी" नावाचे नवीन उपकरण त्यांच्या या व्यवसायात अतिशय उपयोगी ठरणारे आहे ज्याच्या माध्यमाने एकावेळी दोन सिलेंडरची हाताळणी व गोडाऊन किंवा गॅस बॉटलिंग प्लांट मध्ये विना प्रयासाने सहज शक्य आहे .

 या उपकरणामुळे गॅस गोडाऊन मध्ये सिलेंडरची होणारी ने आन अतिशय सोपी झालेली असून पर्यायाने होणारी आदळ आपट सुद्धा बंद होईल व सिलेंडरचे आयुर्मान वाढण्यास मदत होईल त्यामुळे कंपनीचे सिलेंडर दुरुस्ती वर होणाऱ्या भल्यामोठ्या खर्चाची बचत होईल.

या उपकरणाची गरज गॅस बॉटलिंग प्लांट व एलपीजी वितरकांचे गॅस गोडाऊन या ठिकाणी असेल.
याचे यशस्वी प्रात्यक्षिक इंडियन ऑईल कार्पोरेशन च्या धनज जिल्हा वाशिम या बॉटलिंग प्लांट मध्ये नुकतेच पार पडले. 
आणि याचा उपयोग महाराष्ट्रा मधील इंडियन ऑईल कार्पोरेशन च्या सर्वच बॉटलिंग प्लांट व काही वितरकांच्या गोडाउन मध्ये सुरू झालेला असून याबाबतीत तेथील कामगार व कर्मचारी अतिशय आनंदी आहे.

जगात टेक्नॉलॉजी च्या बाबतीत अग्रगण्य असणाऱ्या जर्मनी सारख्या प्रगत देशा मधूनच जागतिक पेटेंट या उपकरणाला मिळालेले असल्या मुळे यवतमाळ जिल्ह्या करिता हा मोठा बहुमान आहे. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी , जर्मन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिस चे मुख्य कार्याध्यक्ष कॉर्नेलिया रुडलोफ शोफर यांचे कडून हे पेटंट मंजूर झाले असून या बाबतीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते त्यांचे वडील श्री मुरलीधरराव डेहनकर यांना देतात कारण वडील सुद्धा संशोधक वृत्तीचे असून त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
 
एकाच वेळी दोन सिलेंडर वाहून नेणाऱ्या "सारथी" उपकरणा साठी त्यांना इंडियन ऑईल कार्पोरेशन चे विक्रय अधिकारी श्री. निलेश ठाकरे, व मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. अनिल मेहेर नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे असे त्यांनी नमूद केले.
अभियंता असलेले उद्योजक श्री प्रशांत डेहनकर हे पर्यावरण प्रेमी सुद्धा आहे ज्यांनी आतापर्यंत कळंब च्या आजूबाजूला हजारो वृक्षांची लागवड स्वखर्चाने करून त्यांचे संगोपनाचे कार्य सुद्धा अविरत सुरू असते.
पर्यावरणाच्या या कार्या सोबत प्रशांत हे उत्कृष्ट गायक व अभिनेता सुद्धा आहे ज्यांचे देशात अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले असून आतापर्यंत इंडियन ऑईल कार्पोरेशन करिता स्वरचित एज्युकेशनल व मोटिवेशनल दहा ते बारा शॉर्ट फिल्म स्वतः अभिनय करून तयार केलेल्या आहे.

सध्या सारथी या उपकरणाची निर्मिती सुरू असून लवकरच देशभरातील गॅस व्यवसायिकांच्या एलपीजी गोडाऊन वर व बॉटलींग प्लांट वर याचा उपयोग सुरू होईल अशी माहिती प्रशांत मुरलीधरराव डेहनकर. कळंब यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांना दिली.

नव्या वर्षाचे स्वागत यावर्षी घरच्या घरी! कारण कोरोना अजून संपला नाही


इंग्रजी नववर्षानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31 डिसेंबर रोजी त्याचे आगळे वेगळे सेलिब्रेशनदेखील ठरलेले असेल, असो. या आनंद सोहळयात नववर्षाचे स्वागत आप्तस्वकियांबरोबरच करा. हा आनंद आपल्या आठवणीच्या गोड कुपीत जपून ठेवताना काही अनर्थ होणार नाही याची काळजी घ्या. अगदी असेही म्हणेन की, हॅपी न्यू ईअर साजरा करा पण घरच्या घरी.. कारण कोरोना अजून संपलेला नाही..

नववर्षाचे स्वागत आपण सर्व मोठ्या उत्साहात करत असतो. खूप आनंदी वातावरण असते. नववर्षाच्या स्वागताचा आनंद घेताना या आनंदाचा बेरंग होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस, आर.टी.ओ. विभागाकडून वाहन चालविण्याबद्दल असलेल्या महत्वाच्या 'डोन्ट ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह' या सूचनेकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपला जीव जसा अनमोल आहे तसाच तो इतरांचाही आहे. आपण सर्वजण समजदार आहोतच पण कधी कधी अतिरेक होतो आणि मग.... असो या बद्दल जास्त चर्चा नको. यावेळी मात्र नववर्षाचा आनंद हा घरच्या-घरीच घ्यावयाचा आहे.

आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे. रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, याकडे लक्ष द्यावे. याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे आदी मार्गदर्शक सूचना गृह विभागाने दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना प्रत्येकाने विचारात घ्याव्यात. कारण आपला कोरोनाशी असलेला मुकाबला अद्याप संपलेला नाही. ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. त्याचा योग्य विचार करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्याच लागत आहेत. यात प्रामुख्याने दोन डोस घेणे, मास्क वापरणे, सॅनीटायझरचा वापर, योग्य व सुरक्षित अंतर याचे भान ठेवावे.

सामाजिक भान :
सार्वजनिक ठिकाणी वावरताना कसे वागावे? कसे चालावे? बोलावे ? काय सामाजिक भान ठेवावे? याची आचारसंहिता असते. त्याचे पालन करावे. घरापासून, आपल्या प्रदेशापासून थोडे दूर विशेषत: पर्यटन अथवा अन्य कामासाठी आपण आलो की थोडे मोकळेपणा येतो आणि मनातील अतिसुप्त गुणांना वाव मिळतो. विशेष म्हणजे मित्रवर्ग सोबत असेल तर आणखी जास्त उधाण येते. नववर्षाचे स्वागत करताना हे जरा जास्तच होते. कुठल्याही प्रकारची नशेबाजी करुन अतिउत्साहामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे उचित ठरेल. मद्यपान करुन समुद्रामध्ये पोहण्यास जाणे टाळावेच तसेच पोहण्यास येत असेल नसेल तरीही खोल समुद्रामध्ये पोहण्यास जाण्याची जोखीम घेऊ नका, स्थानिकांच्या तसेच किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आपल्यामुळे इतरांच्या उत्साहास त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. नववर्षाच्या या आनंददायी सोहळ्यास अनुचित प्रकाराच्या निमित्ताने गालबोट लागणार नाही हे पहावे आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत करावे.

वाहन असो की फटाके आनंदाच्या भरात याचा आवाज किती मोठा होतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. प्रदूषणाचा कळस होतो. इतरांना त्याचा त्रास होतो. हे त्यावेळी समजत देखील नाही. तेव्हा पर्यटन, नववर्ष साजरे करताना अगदी आपल्याकडून हे टाळलेच पाहिजे.

विशेषत: कोकणात फिरायला जातांना समुद्राचे आकर्षण असलेली बरीच हौशी पर्यटक मंडळी अथांग सागर व किनारा पाहून भारावून जातात, आणि मग स्विमींग चॅम्पियन असल्यासारखे वागून पाण्यात स्वत:ला झोकून देतात. इथेच मोठा घोटाळा होतो. उत्साहाच्या भरात आपण समुद्रात किती लांबवर आलो ते कळत नाही. शेवटी जे नको ते होते. तेव्हा सागर किनारी, बीचवर लावण्यात आलेल्या सूचनांचे पालन कराच.

शेतकरी पुत्रांचे सिमेंट प्रकल्पच्या विरोधात आंदोलन सुरू


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : तालुक्यातील मुकूटबन येथे जनसुनावणीच्या वेळी प्रत्येक शेतकऱ्याला कंपनीत नोकरीवर घेऊ असे लॉलीपॉप दाखवून येथील अनेक शेतकऱ्यांनी दहा वर्षापूर्वी स्वतः ची शेती आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीला विकत दिली.

चार वर्षापासून आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीचे युद्ध स्तरावर काम सुरू आहेत. परंतु स्थानीक शेतकरी पुत्रांना कंपनीत कामावर घेण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. सिमेंट कंपनीत काम करण्याकरीता हवे तेवढे शिक्षण युवकाकडे आहे परंतु स्थानिकांना कामावर घेण्यास कंपनी डावलत आहे. या कंपनीत स्थानिक बेरोजगारांना कंपनीत हक्काच्या नोकऱ्या तर मिळाल्याचं नाही त्यामुळे बेरोजगार शेतकरी पुत्र सिमेंट प्रकल्पाच्या विरोधात आज गुरुवार (ता. ३०) पासून आंदोलन करीत आहे. मागणी मंजूर न झाल्यास आमरण उपोषण सुध्दा करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यानी दिला आहे.

मुकूटबन ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शेतकरी पुत्रांना रोजगार, शहराच सौन्दर्यीकरण या बाबीच ठोस आश्वासन दिले. दहा वर्षापासून येथील स्थानिक बेरोजगारांना मोठी आशा लागली होती की, सिमेंट कंपनीत प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल. परंतु कंपनीने शेतकरी पुत्रांच्या हातात तुरी देण्याचं काम केलं आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा या बाबीकडे लक्ष देत नाही.

मुकूटबनात परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला असून परप्रांतीयांचा भरणाच कंपनीत आहे. तरूणांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सिमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, अच्छे दिन आने वाले है, असे नाना तऱ्हेची आश्वासनाची खैरात वाटली गेली. मात्र आता कंपनीचे अच्छे दिन व तरूणांचे बूरे दिन आल्याने कंपनीला शेती दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला प्रा. लि. कंपनीने मुकूटबन मध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्तीपत्र देऊन थेट कंपनीत समाविष्ट करून नौकरीवर घेण्यात यावे. कंपनीच्या नियमानुसार वेतन देण्यात येऊन भविष्य निर्वाह निधी (प्रोव्हिडेंट फंड) कपात करुन इतर सेवा सवलती देण्यात यावे. या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. 


प्रदुषणाचा हाेताेय नागरिकांना अधिक त्रास- लॉयडस् मेटल कंपनीच्या विराेधात घुग्घुस शहर काँग्रेसचे आंदोलन


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : औद्योगिक नगरी म्हणून आेळख असणा-या घुग्गुस शहरात आज गुरुवार दि. ३० डिसेंबरला सकाळी ११ वाजता स्थानिक गांधी चौक पासून तर लॉयड्स मेटल कंपनी गेट पर्यंत शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात लॉयड्स मेटल कंपनीच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या माेर्चात महिला नेत्या संगीता बोबडे, निर्मला जोगी, पुष्पा नक्षिणे यांचेसह शहरातील अन्य महिला व युवक कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. आंदाेलनाच्या संदर्भात राजू रेड्डी यांनी समाज माध्यमातून दाेन दिवसांपुर्वीच या मोर्चात माेठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी हाेण्यांचे आवाहन केले हाेते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक या मोर्चात सहभागी झाले हाेते. घुग्गुस वासियांच्या दृष्टीकाेणातुन त्यांच्या मागण्या रास्त हाेत्या. सदरहु कंपनीच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना बराच त्रास करावा लागत असुन विविध आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे बाेलल्या जाते. त्याच साेबत या कंपनीत स्थानिकांना राेजगार न देता बाहेरच्या लाेकांना राेजगार देत असल्याची खंत अनेकांनी या वेळी बाेलून दाखविली.

गांधी चौकातुन घोषणा देत निघालेला हा मोर्चा लॉयड्स मेटल कंपनीच्या गेटवर पाेहचला त्या ठिकाणी लॉयड्स मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनकर्त्यांशी चर्चा केली नंतर मागण्यांचे एक लेखी निवेदन त्यांना सादर करण्यांत आले. या माेर्चाने आज नागरिकांचे लक्ष वेधून घेतले हाेते.
 

चंद्रपूर : येत्या नविन २०२२ या वर्षात एक सुट्टी जाहीर करा - क्रां.नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेची जिल्हाधिका-यांकडे मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असुन याच प्रदेशात बाबुराव शेडमाके या स्वातंत्र्यविरांचा जन्म झाला आहे. तदवतचं जल, जंगल, जमीन या साठी आपल्या प्राणाची आहुती देणारे जननायक बिरसा मुंडा हे क्रांतिकारक आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासीच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी एक जाहिर नामा प्रसिध्द करुन ९ ऑगष्ट हा जागतिक आदिवासी गाैरवदिन घाेषित केल्याचे सर्वश्रूतच आहे. उपरोक्त तीन दिवसांचे आदिवासी समाजाला फार महत्व आहे. एव्हढेच नाही तर त्यांच्याशी या समाजाच्या भावना जुळल्या आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता ९ ऑगष्ट, २१ ऑक्टाेबर किंवा १५ नाेव्हेंबरला (या पैकी एका दिवसाला) एका दिवसाची आपल्या अधिकार क्षेत्रातील सार्वजिक सुट्टी जाहिर करावी अश्या आशयाच्या मागणीचे एक लेखी निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना आज गुरुवार दि.३० डिसेंबरला क्रां. नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेच्या वतीने सादर करण्यांत आले.
 
सदरहु निवेदन सादर करतांना जागर तथा उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष अशाेक तुमराम, बिरसा क्रांति दलाचे सचिव जितेश कुळमेथे, अ.भा.आदिवासी युवा परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गेडाम, आदिवासी विद्यार्थी संघचे कंटु काेटनाके, सामाजिक कार्यकर्ता अशाेक उईके, बिरसा क्रांति दलचे राहुल पेंदाम आदीं उपस्थित हाेते.

लाखापूर येथील युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लाखापूर येथील एका (22 अंदाजे) वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली.

विठ्ठल सुनील कनाके रा. लाखापूर असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तो एकटा घरीच होता त्याचे आईवडील बाहेर गावी गेले होते. त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आल्यानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे माहिती आहे.

विठ्ठलच्या आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठमागे आई वडील दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

चिमूर नगर परिषद च्या परिसरात अस्वच्छता, प्रशासनाचे दुर्लक्ष?

 सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

 चिमूर : नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात स्वच्छता होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नप प्रशासनाने दखल घेण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे.

नगर परिषद ला मागील ऐक वर्षांपासून प्रशासन बसले तेव्हा पासून नगर परिषदचे कोणत्याही कामाकडे लक्ष नाही स्वच्छता आणि नाल्या सफाईची निविदा काढण्यात आली काही महिने ठेकेदारने कामे केली पण ठेकेदारने मजुरची मजुरी दिली नाही म्हणून मागील काही महिने महिन्यापासून नाल्या उपसा झाल्या नाही. त्यामुळे नालीतील पाणी प्रवाह वाहत नसल्याने पाणी साचून राहत असल्याने मच्छर वाढत आहे. रस्त्याची साफसफाई होत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा ढिग पडून आहे. कचरा गाडी दोन,तिन दिवसानंतर योतो पण काही प्रभागात सातही दिवस येत नाही,आणि सार्वजनिक विहीर, हेंण्ड पंप ( बोरिंग )ला सुद्धा ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचा प्रकार निदर्शनास येत असल्याने याकडे नगर परिषद प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सफाई ठेकेदारावर कार्यवाही करावी आणि नगर परिषद ने स्वच्छताकडे लक्ष देऊन पूर्णपणे कामे करावी असी मागणी चिमुर कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे. 
अन्यथा सफाई कर माफ करण्यात यावे.

राेशन-कल्याणीचे अतुट प्रेम; त्यांचे जीवन साथी हाेण्याचे स्वप्न साकारले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी या गावी काल महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या पुढाकारातुन राेशन रघुनाथ कडवे व कल्याणी परसराम कामडी यांचा प्रेमविवाह पार पडला.

हे प्रेमी युगुल चिमूर या एकाच गावचे रहिवाशी असून या दाेघांचे एकमेकांवर ब-याच दिवसांपासून अतुट प्रेम हाेते.या विवाहाला प्रेमी युगुलाच्या परिवारांकडुन विरोध दर्शविला जात हाेता. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमी युगुलांनी जीवनसाथी बनण्यांचे वचन घेतल्यामुळे त्यांनी थेट आंतरजातीय प्रेम विवाहासाठी नेरीच्या तंटामुक्ती समितीकडे अर्ज सादर केला.

समितीच्या पदाधिका-यांनी त्यांचे सर्व जन्मतारखेच्या दाखल्यासह इत्तर कागदपत्रांची तपासणी करुन नेरी ग्राम पंचायतच्या परिसरात विवाह लावून दिला. सध्या नेरीत या प्रेमविवाहची एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.

वणी तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, बिनधास्त सुरु आहे ओव्हरलोड वाहतूक !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी येथून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेले रस्तेही उखडू लागले आहेत. तालुक्यातील वांजरी व गौराळा येथिल लाइमस्टोनच्या खदानींमधून मुकुटबन येथिल बिर्ला सिमेंट कंपनीत ओव्हरलोड लाइमस्टोनची वाहतूक सुरु असतांनाही आरटीओ विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. शहरातील वाहतूक विभागही आरटीओ विभागाकडे बोट दाखवून ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवित आहे. वणी मुकुटबन हा नव्यानेच तयार करण्यात आलेला रस्ता ओव्हरलोड वाहतुकीमुळे उखडू लागला आहे. वणी वरून मुकुटबन सिमेंट कंपनी व अडेगाव वरून राजूर चुना कारखान्यांमध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरु असून क्षमतेपेक्षा अती जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभागाने धडक कार्यवाही करणेच बंद केल्याने वाहतूकदार निर्धास्त झाले आहेत. परिणामी नव्यानेच डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागले आहेत.

काही महिन्याआधी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ओव्हरलोड वाहनांची शोध मोहीम राबवून पासिंग क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीवर रोख लागली होती. वाहतूकदारही आरटीओच्या कार्यवाहीच्या धास्तीने ओव्हरलोड वाहतूक करतांना घाबरायचे. पण मागील काही महिन्यांपासून आरटीओचे ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. ओव्हरलोड वाहनांवरील कार्यवाहीच थंडबस्त्यात आली आहे. चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहतूक पोलिसांचा पहारा असतो. तेथूनच ही ओव्हरलोड वाहने बिनधास्त वाहतूक करतात. पण वाहतूक पोलिस वाहनधारकांजवळ कांटा पर्ची व रॉयल्टी असल्याने आम्ही कार्यवाही करू शकत नसल्याचे सांगतात. या वाहनांवर कार्यवाही करण्याचे अधिकार आरटीओलाच असल्याचे सांगत आपले अंग काढून घेतात. प्रत्येक हप्त्याला वणी येथे आरटीओचा कॅम्प असतो. आधी कॅम्पमध्ये येणारे आरटीओ ओव्हरलोड वाहतूक होणाऱ्या मार्गावर गस्त घालून ओव्हरलोड वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. पण आता ओव्हरलोड वाहनांवर तशी कार्यवाही होतांना दिसत नाही. पूर्वी कुणालाही सुगावा न लागू देता आरटीओ वणीला यायचे व पासिंग क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची धरपकड करायचे. या वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. पण आता आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर गस्त घालणेच बंद केल्याचे वाहतूदर चांगलेच निर्ढावले आहेत. पासिंग क्षमतेपेक्षा १० ते १५ टन अतिरिक्त वजनाची मालवाहतूक सर्रास केली जात आहे. सिमेंट उपयोगी असलेल्या लाईमस्टोनची वांजरी व गौराळा येथून मुकुटबन येथील बिर्ला सिमेंट कंपनीमध्ये वाहतूक केली जाते. पासिंग क्षमतेपेक्षा अतीजास्त वजनाचा माल ट्रकांमध्ये वाहून नेला जातो. कित्येक ट्रकांच्या लिफ़्टरची चाके उचललेली असतात. काही वाहनांच्या लिफ्टरला तर टायरच लावलेले नसल्याचे पाहायला मिळते. उघडपणे ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांनाही आरटीओ विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही, याचेच नवल वाटते. वार्षिक व मासिक हप्त्यांची जुनी परंपरा आजही चालूच आहे की काय, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. रस्त्यांची हालत खस्ता करणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीला आळा बसेल काय, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ओव्हरलोड वाहनांवर आरटीओने धडक कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

त्याचप्रमाणे शहर व तालुक्यात टॅक्स, इन्शुरन्स व फिटनेस ची मुद्दत संपलेली वाहनेही कोळसाखाणी व कंपन्यांमध्ये मालवाहतूक करतांना दिसत आहेत. स्कॅनिंग करून वाहनांच्या कागदपत्रांमध्ये हातचलाखीने तारखा वाढविल्या जात आहे. कम्पुटरमध्ये स्वतःच स्कॅनिंग करून वाहतूकदार टॅक्स, इन्शुरन्स व फिटनेसच्या तारखा वाढवत असल्याचे धक्कादायक प्रकारही तालुक्यात सुरु आहेत. कागदपत्रांच्या तारखा वाढवून वाहनांना मालवाहतुकी करिता कोळसाखानी व कंपन्यांमध्ये परवानगी मिळविण्यात येते. शासनाचा विविध प्रकारचा वाहन कर बुडवून वाहनांची वाहतूक सुरु आहे. फिटनेस संपलेली वाहनेही बिनधास्त रस्त्यांवर धावत आहे. याकडेही आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्या - आ. किशोर जोरगेवार यांची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ओमायक्रोनचा वाढता धोका व बंद असलेली बससेवा लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना केली आहे. सदरहु मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
    
कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे सर्व महाविद्यालये बंद होती. मात्र शासन धोरणाप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस नियमितपणे सुरु होते. आता कोरोनाचा प्रसार मंदावल्याने महविद्यालय नियमित सुरु झाले असले तरी अजूनही वसतिगृह सुरु झालेली नाहीत. त्यातच महाराष्ट्र परिवहन सेवा खंडित असल्यामुळे बाहेरगावी असलेले विद्यार्थी अद्यापही महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहिलेले नाही. आता विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यास्थितीत राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असून बहुसंख्य विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही तसेच नियमित बस सेवेचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, बंद वसतिगृह आणि अपूर्ण लसीकरण या सारख्या विविध समस्यांमुळे विद्यार्थांपुढे ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्यास अडचण निर्माण झालेली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी सदरहु निवेदनाच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज केली आहे.

मंजूर कामे तातडीने सुरु करा- यंग चांदा ब्रिगेडची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : शहरातील इंदिरा नगर येथील हनुमान टेकडी परिसरात नागरिकांच्या मागणी नंतर अनेक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात अद्यापही सदरहु कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामूळे मंजूर सर्व कामे तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या इंदिरानगर शाखेच्या वतीने करण्यात आली असून सदरहु मागणीचे निवेदन अतिरिक्त उपआयुक्त विपीन पाल यांचे मार्फतीने महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना आज देण्यांत आले यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नरेश मुलकावार, तापोश डे, हेरमन जोसेफ, शकील शेख, बंडू पटले, नितेश गवळे, फुलचंद पाटील, सिद्धार्थ मेश्राम, गणेश किन्निकर, नितेश बोरकुटे आदींची उपस्थिती होती.          
  
इंदिरा नगर परिसरातील हनुमान टेकडी येथे विविध समस्या आहेत. त्यामूळे या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा अधिका-र्यांना वांरवार निवेदनही देण्यात आले आहे. याची दखल घेत मनपा उपायुक्त यांच्या मार्फतीने सदरहु परीसराची पाहणी करून अहवाल मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसात सदरहु कामे सुरु करू असे मनपाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते. मात्र, आता 2 महिण्यांचा कालावधी लोटून सुध्दा मंजूर कामे सुरु झालेली नाही. त्यामूळे येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गांभिर्याने दखल परिसरातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी सदरहु निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे.

आमदारांकडून गडचांदुरकरांची निराशाच झाली प्रदूषणाचा मुद्दा सभागृहात मांडलाच नाही


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्याच्या
गडचांदूर औद्याेगिक नगरीतील नागरिकांना माणिकगड कंपनीच्या प्रदूषणामुळे रोगराई व डस्टच्या त्रासाला गेल्या अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे. याबाबत माणिकगड कंपनीने डस्ट कलेक्ट मशीन व इएसपी यंत्रणा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू असताना विधानसभेत जिल्ह्यातील आमदारांकडुन हा प्रश्न चर्चेला जाईल असे वाटत हाेते. गडचांदूर येथील अनेक सजग नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांना होत असलेल्या प्रदूषण व गंभीर त्रासाबद्दल अवगत देखिल केले होते. दुर्दैव असे की, इतका गंभीर प्रश्न असून देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने तो प्रश्न सभागृहात मांडला नाही. 
जो पर्यंत विधायक मार्गाने प्रश्नाला वाचा फुटणार नाही तोपर्यंत माणिकगड प्रशासनाची मुजोरी थांबणार नाही. मात्र स्थानिक नेत्यांच्या पाठबळ असल्यामुळे ही कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी बिनधिक्तपणे खेळत आहे. 

एका बाजूने प्रदुषण विरोधात आवाज उचलायचा आणि दुसऱ्या बाजूने आपला आवाज न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीचा प्रचार व प्रसार करायचा यातच नागरिकांचे अहित आहे. मुळात कंपनीच्या युनिट २ ला ना हरकत देण्यासाठी त्यावेळच्या ग्रामपंचायतीने ठराव पारित केला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. गावाच्या विकासासाठी कंपनीला कोणत्याही अटी वा शर्ती लागू दिल्या नाही. त्या वेळेस जर अटी शर्ती सत्ताधा-यांनी ठेवल्या असत्या तर गावातील अनेक कामे झाली असती तदवतचं प्रदूषण सुद्धा कमी झाले असते. सदरहु युनिट २ कार्यान्वित होताना सद्याचे आमदार हेच त्यावेळी आमदार होते. त्यामुळे जो पर्यंत आमदार हा प्रश्न मांडणार नाही तो पर्यंत नागरिकांचा प्रश्न सुटेल कसा व प्रदूषण नियंत्रण होईल कसे असा प्रश्न सतीश बिडकरसह नागरीक आता विचारू लागले आहे.

ग्रामीण विभाग प्रगतीचे दालन- डॉ.अजिंक्य कोत्तावार


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : "ग्रामीण विभाग हा आपल्या प्रगतीला अडथळा नसून उलट तेथे असणाऱ्या समस्या याच आपल्या संशोधनाचा आधार असतात. मूलभूत संशोधन आणि त्याचे नाविन्यपूर्ण अविष्कार यातील फरक आपल्याला समजून घेता यायला हवा. आपल्या समोर असणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करीत त्यात संधी होता यायला हवी आणि त्या मिळालेल्या संधीचे सोने करता यायला हवे. आपल्या स्वतःचे ध्येय निश्चित करून त्याला छोट्या छोट्या भागात विभाजित करीत सातत्यपूर्ण सुयोग्य शैलीने ते ध्येय साध्य करणे हाच यशाचा मार्ग आहे." असे विचार युवा शास्त्रज्ञ ज्ञान फाउंडेशन चे कार्यकर्ते डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी व्यक्त केले.
  
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिनर्जी या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात इंवेंशन ते इनोवेशन याविषयी आवडते विद्यार्थ्यांची आभासी पद्धतीने संवाद करीत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ऍड लक्ष्मण भेदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी शिक्षण हे केवळ पैसा मिळवण्याचे माध्यम नसून इच्छाशक्ती आणि वेगळ्या प्रकारच्या प्रवासाची उर्मी आपल्याला संशोधनाचा आणि जीवनाचा आनंद प्रदान करेल असे म्हणत त्या विषयातील प्रत्यक्ष कृतिशील आदर्श म्हणून आजच्या वक्त्यांना आमंत्रित केले आहे हे अधोरेखित केले.

वक्त्यांचा परिचय करून देताना डॉ. मनोज जंत्रे यांनी कोत्तावार यांनी ५०पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मिळवलेले पुरस्कार, त्यांच्या नावावर असलेले ३४ पेटंट तथा ४००० वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी केलेले इनोवेशन यावर प्रकाश टाकला. 
आपल्या अभ्यासपूर्ण रेखीव आणि थेट संवाद साधणाऱ्या शैलीत डॉ. कोत्तावार यांनी बसच्या हवेवर मोबाईल चार्ज करणारे यंत्र, बायोडिझेल चा पहिला प्रयोग टेरेस गार्डन नळाचे पाणी वाचवणारे साधन अशा स्वतः केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंवेंशन आणि इनोव्हेशन मधला नेमका फरक सोदाहरण विशद करून दाखविला.
 
एका ग्रामीण भागातून आलेले स्वकर्तृत्वावर इतकी मोठी उंची गाठलेली आणि तरीही मातीशी जुळलेले व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या साठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात अध्यक्षीय मनोगतात एड. लक्ष्मण भेदी यांनी वक्त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. नीलिमा दवणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले.

ब्राह्मणी येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील ब्राह्मणी या गावातील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शेतात गेलेल्या या युवकाने स्वतःच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांना तो शेतात पडून दिसल्याने त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन महादेव मंगाम (२७) रा. ब्राह्मणी असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष असलेल्या या युवकाने अचानक आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या युवकाचे लग्न जुळले होते, व साखरपुडाही झाला होता. पण बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. तो सकाळी शेतात जातो म्हणून घरून निघाला. त्याच्या मागोमाग वडीलही शेतात गेले. वडिलांना तो शेतात निपचित पडून दिसला. वडिलांनी तत्काळ त्याला अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पच्छात आई, वडिल व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्यापही कळू शकले नाही. 

पोलिस त्या दिशेने तपास करित आहे.

लिखीत आश्वासनाने चौथ्या दिवशी उपोषणाची सांगताआरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे भरणार


(मुकूटबन : जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम उपोषणकर्त्यांना फ्रुटी मँगो ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करताना.)


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : मुकूटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ पदे रिक्त असून, ही २३ रिक्त पदे न भरल्यामुळे मंगळवार (ता. २१) पासून ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे हे मुकूटबन येथे आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणाची सांगता शुक्रवार (ता. २४) संध्याकाळी सहा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांचे हस्ते निंबु शरबत पाजून समाप्ती करण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम व तहसीलदार गिरीश जोशी यांनी मुकुटबन येथे (ता. २२) उपोषणकर्त्यांना भेट घेऊन, आपण उपोषण सोडावे अशी विनंती केली. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी सुध्दा व्हॉट्स अपद्वारे पत्र पाठवून (ता. २० व २३ ला) उपोषणकर्त्यांना उपोषणापासून प्ररावृत्त व्हावे अशी विनंती पत्राद्वारे केली. परंतु उपोषणकर्त्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. जोपर्यंत २३ रिक्त जागा भरण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही यावर ठाम होते.

त्यानंतर कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तीवारी यांनी मुकूटबन येथील रिक्त पदाचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडला तसेच अर्चना पाटील डायरेक्टर आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचेशी संपर्क साधून चर्चा केली. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मुंबई येथील अधिवेशनात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली. या सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशी चर्चा करून उपोषणाच्या चौथ्या दिवशी (ता. २४) शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व त्यांची जिल्हा चमू यांनी मुकूटबन येथे उपोषण मंडपला भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्या सोबत चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या समस्या जाणून घेतल्या. चर्चे अंती एक आरोग्य अधिकारी व दोन आरोग्य सेवकांची स्थायी स्वरूपाची नेमणूक करण्यात आली. तसेच झरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक औषधी निर्माण अधिकारी, एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक लिपिक यांची आठवड्यातून तीन दिवसासाठी नेमणूक मुकूटबन येथे करण्यात आली. व उर्वरित पदे लगेच अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येईल त्या भरतीतून ता. ५ जानेवारी २०२२ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन येथील सर्व रिक्त पदे प्रथम प्राधान्याने व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथील रिक्त पदे भरण्यात येईल असे लिखीत आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दिले. या सर्व बाबी ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे यांनी मान्य केल्या. यावेळेस मुकूटबनचे सरपंच मिना आरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार, तहसीलदार गिरीश जोशी, तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, भालचंद्र बरशेट्टीवार, जगदीश आरमुरवार, सुरेश मानकर, रमेश उदकवार, खुपिया पोलीस संजय खांडेकर, नागेश अक्केवार, संजय आकीनवार, शेख शरीफ शेख कासम हे उपस्थित होते.



राजूर येथील युवकाच्या खुनाचा पोलिसांनी अति शीघ्र लावला छडा, चार मारेकऱ्यांना केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सात दिवसांपूर्वी खुनाच्या झालेल्या घटनेने राजूर (कॉ.) हे गाव परत एकदा चर्चेत आले. प्रेम संबंधातून राजूर (कॉ.) येथील युवकाची त्याच्याच प्रियसीने हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उघड केले. एका चुन्याच्या भट्ट्यावर काम करणाऱ्या विवाहित महिलेबरोबर त्या युवकाचे सूत जुळले होते. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या त्यांच्या प्रेम संबंधाची परिसरातही चर्चा होती. विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणारा तो युवक नंतर तिच्याच नातलगांना खटकू लागला. कारण तिचा भटवाही (बहिणीचा नवरा) तिच्यावर भाळला होता. भटव्याचीही साळीवर वाईट नजर होती. अशातच त्या दोघांच्या मिलनस्थळी भाटवाही धडकल्याने प्रियकर व भाटव्यात चांगलीच जुंपली. प्रियकर व भाटव्यात उफाळलेला वाद पाहून प्रियसीने वडील व मामालाही घटनास्थळी बोलावून घेतले. मग काय सर्व नातलग झाले एक, व प्रियकराचाच केला गेम. महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या युवकाला सर्वांनी मिळून यमसदनी धाडले. त्यात प्रियसीनेही हातभार लावला. प्रियकराच्या खुनात हात रंगविलेल्या प्रियसीसह पोलिसांनी तिचा भाटवा, तिचा बाप व तिचा मामा यांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

अतिशय गुंतागुंतीचे असलेल्या या खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी छडा लावला. एपीआय माया चाटसे यांनी कुशलतापूर्वक तपास करून खुनाच्या या रहस्यावरून पडदा उठवला. सुरुवातीपासूनच पोलिसांना युवकाची हत्या झाल्याचाच संशय होता. पोलिसांनी तेथे राहणाऱ्या काही मजुरांना तत्काळ चौकशी करीता ताब्यात घेतले. तेवढ्यात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात अतुल सहदेव खोब्रागडे (३९) याचा गळा लावल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर पोलिसांनी तपासाला गती देत संशयितांची कसून चौकशी केली. सुरुवातीला सोनू राजू सरावणे (२५) हिने आपला भाटवा हर्षद अंबादास जाधव (४५) याच्या मदतीने प्रियकर अतुल खोब्रागडे याचा खून केल्याचे सांगितले. नंतर त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर घेण्यात आला. पीसीआर दरम्यान सोनू सरावणे हिने सत्य हकीकत पोलिसांसमोर मांडली. अतुल खोब्रागडे व तिच्यात अनैतिक संबंध होते. ते भाटव्याला खटकत होते. ज्यादिवशी अतुल व सोनू ज्याठिकाणी भेटले, त्याच ठिकाणी सोनूचा भाटवाही आला. त्यांचे मिलन पाहून त्याचा चांगलाच पहारा चढला. त्याने अतुलशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला जाऊ लागल्याने तिने मदना जि. वर्धा येथून तिचे वडिल राजेश आनंदराव वाघमारे (४१) व मामा शंकर नत्थूजी वरघणे (३८) यांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व नातलग एक झाले, व त्यांनी अतुल खोब्रागडे याला गळा दाबून जिवानिशी ठार मारले. अतुल खोब्रागडे याची हत्या केल्यानंतर लगेचच वडिल व मामा चारचाकी वाहनाने मदना जि. वर्धा येथे निघून गेले. सोनू सरावणे हिने दिलेल्या बायनावरून पोलिसांनी २६ डिसेंबरला वडिल व मामला अटक केली. २० डिसेंबरला राजूर (कॉ.) परिसरातील चुना भट्ट्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या निवासस्थानासमोर राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रं. ३ मध्ये राहणाऱ्या अतुल खोब्रागडे याचा मृतदेह आढळून आला. यानंतर ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे यांनी योग्य दिशेने तपास करित युवकाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. पोलिसांनी प्रियसी सोनू राजू सरावणे (२५) रा. राजूर (कॉ.), हिच्यासह हर्षद अंबादास जाधव (४५) रा. वार्ड क्रं. ३ राजूर (कॉ.), राजेश आनंदराव वाघमारे (४१) रा. मदना जि. वर्धा, शंकर नत्थूजी वरघणे (३८) रा. मदना जि. वर्धा यांना अतुल खोब्रागडे याच्या खून प्रकरणात अटक केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, परि. पोउपनि आशिष झिमटे, स.फौ. प्रभाकर कांबळे, नापोकॉ अविनाश बानकर, उमा कऱलूके, अमोल नुनेलवार, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, राहुल बोन्डे, यांनी केली. पुढील तपास सपोनि माया चाटसे करित आहे.

"आरोग्यमिञ" आरोग्य कार्डचा जनतेंनी लाभ घ्यावा !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ,चंद्रपुर तसेच परिवार विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत सोमवार दि.२७डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा चुनाळा येथे आरोग्य मित्र हेल्थ कार्डच्या कँप घेण्याबाबत एक महत्वपूर्ण चर्चासञ आणि हेल्थ कार्ड काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्यमिञ या कार्डमुळे चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील नामांकीत खाजगी हॉस्पीटलमध्ये बहुतांश प्रमाणात सवलत व सुट दिल्या जाते. ग्रामीण तथा शहरी भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन या निमित्ताने आयाेजकांकडुन करण्यांत आले.

या वेळी सरपंच बाळनाथ वडस्कर पोलीस पाटील निमकर, साईबाबा इंदुरवार मुख्याध्यापक जि. प. शाळा चुनाळा, आरोग्य केंद्र चुनाळाच्या अंगणवाडी सेवीका व आशासेवीका मंदा धुर्वे, सोनाली वांढरे, वंदना वांढरे, वसंता मारपेली, चांदेकर वैद्यकीय अधीकारी, अशोकजी अंबागडे, सौरभ मादासवार , प्रशिल भेसेकर व इतर शिक्षकगण उपस्थित होते.

मोमीनपुरा येथे बालकांवर द्रव्य फेकण्याचे प्रकार सुरूच, तीन दिवसांत तीन चिमुकल्यांवर फेकल्या गेले द्रव्य

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील मोमीनपुरा येथिल रहिवासीयांमध्ये धास्ती पसरविण्याच्या उद्देशाने एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीकडून एक विचित्र प्रकार घडविला जात आहे. येथील चिमुकल्या मुलांच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे द्रव्य फेकून दहशत पसरविण्याचा प्रकार मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु आहे. चिमुकल्यांवर विशिष्ट द्रव्य फेकणारा व्यक्ती अद्याप कुणाच्या नजरेत पडला नसून या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहे. पण त्याच्या या विकृत मानसिकतेमुळे मोमीनपुरा येथिल रहिवासी मात्र कमालीचे वैतागले आहेत. २६ डिसेंबरला सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास एका सहा वर्षीय बालकावर द्रव्य फेकल्याची घटना ताजी असतांनाच आज आणखी एका चार वर्षाच्या मुलावर द्रव्य फेकल्या गेल्याने जनप्रक्षोभ उफाळून आला. २५ डिसेंबरलाही एका चिमुकलीवर द्रव्य फेकल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे जनमानसात चीड निर्माण करणारे विकृत कृत्य करणारा तो व्यक्ती आहे तरी कोण, या एकाच चर्चेला सध्या शहरात उधाण आले आहे. 
मोमीनपुरा येथील चिमुकल्या बालकांवर द्रव्य फेकणारा विकृत व्यक्ती नागरिकांच्या रोषाचे तर पोलिसांच्या डोकेदुखीचे कारण ठरू लागला आहे. कुणाच्याही न कळत चिमुकल्यांवर द्रव्य फेकून तो पळ काढत असल्याच्या घटनेने सध्या रान उठवले आहे. या व्यक्तीचा पोलिस कसून शोध घेत असून नागरिकही आता त्याच्या पाळतीवर आहेत. २५ डिसेंबरला एका चार वर्षाच्या बालिकेवर, २६ डिसेंबरला सहा वर्षाच्या बालकावर तर आज २७ डिसेंबरला परत चार वर्षाच्या बालकावर एका अज्ञात व्यक्तीकडून द्रव्य फेकण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटना घडवून हा विकृत मानसिकतेचा व्यक्ती चर्चेचे बनू लागला आहे. या द्रव्यामुळे कुणालाही दुखापत झाली नसली तरी असे करण्यामागची त्याची मानसिकता काय, याचा शोध घेणे आता जरुरीचे झाले आहे. समाजात विद्रोह निर्माण करू पाहणाऱ्या या विकृताला लवकरात लवकर पकडणे गरजेचे झाले आहे. त्याच्या या विकृतीमुळे परिसरात दहशत पसरली असून पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता निर्माण झाली आहे. बालकांवर द्रव्य फेकून चर्चेचा विषय बनू पाहणाऱ्या या व्यक्तीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

आरोग्य व्यवस्था व डेरा आंदाेलनातील कर्मचा-यांच्या वेतना बाबत आ.किशोर जोरगेवारांनी हिवाळी अधिवेशनात केले अनेक प्रश्न उपस्थित

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : आज साेमवारी हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य व्यवस्थेबाबत विविध प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. तदवतचं यावेळी आमदार जोरगेवार यांनी शहरात गेल्या ब-याच दिवसांपासून सुरु असलेल्या डेरा आंदोलनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथाही सभागृहा समोर मांडत त्यांचे वेतन कधी देणार असा प्रश्न देखिल उपस्थित केला.मुंबई येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनचा चौथा दिवस आहे. प्रश्न उत्तरांच्या तासाला बोलतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आ.जोरगेवार यांनी आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात वांरवार होत असलेल्या औषधसाठाच्या तुटवड्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मेडिकल कॉलेजच्या बांधकामास विलंब होत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. 300 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि 100 खाटांचे महिला रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये संलग्न करण्यात आले आहे. त्यामूळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हे मेडिकल कॉलेज कधी सुरु होणार आहे. असा प्रश्नही सुध्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला, कोविड काळात रुग्ण सेवा देणा-या कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही देखिल मांडला .येथील कंत्राटी कामगार वेतन न मिळाल्यामूळे मागील अनेक महिण्यांपासून आंदोलन करीत आहे. मात्र,अद्यापही त्यांच्या आदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. कोरोनाच्या महामारीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणा-या कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनासाठी आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे आ.जोरगेवार यांनी म्हटले असून या कर्मचा-र्यांचे वेतन कधी देता असा प्रश्न अधिवेशनात बोलतांना उपस्थित केला आहे. यावर आरोग्यमंत्री यांनी उत्तर देत याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वस्त केले आहे. 
   मागणीची दखल घेत प्रेक्षक गॅलरीतील आमदारांची व्यवस्था फ्लोरवर केल्याबद्दल आ. जोरगेवार यांनी सभागृह अध्यक्षांचे या वेळी आभार मानले.

बल्लारपूर शहरात वंचितने केले रस्त्यावरील खड्याचे लोकार्पण


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : बल्लारपूर शहरात करोडो रुपयांची लागत लावून रस्ते, नाल्या व गल्लीतले रोड बांधण्यात आले होते. परंतु जीवन प्राधिकरणाच्या नळ योजनेमुळे शहरातील संपूर्ण रस्ते नाल्या व गल्लीतील रोड फोडण्यात आले. नगराध्यक्षांच्या व काँग्रेस,भाजपा व इतर पक्ष नगरसेवकांच्या चुकीच्या नियोजनामुळे नगरपरिषदेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीने नगर परिषदेसमोर आज साेमवारी खड्ड्यांचे लोकार्पण करून तिव्र आक्रोश आंदोलन केले.
  
बल्लारपूर नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून भाजपा प्रणित नगराध्यक्ष यांच्या गलथान व नियोजशुन्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. सुधीर मुनगंटीवारजी मंत्री असताना त्यांनी विकासाच्या नावाने वारेमाप निधीचे वाटप केले. परंतु त्यांनी व त्यांची सत्ता असणाऱ्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे व भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याची ओढ लागल्याने करोडो रुपयांचे रस्ते नाल्या बांधण्यात आले. आणि तेच रस्ते फोडून त्यामध्ये पाईपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. यामुळे रस्ते बांधण्याकरिता करोडो रुपये वाया गेलेच परंतु रस्ते फोडण्याकरिता सुद्धा आर्थिक निधीचा वापर करण्यात आला.

रस्ते फोडल्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून नगरपालिका प्रशासन आर्थिक निधीचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करीत आहे. वारंवार या संबंधात निवेदन देऊनही प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने राजु झोडे यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आक्रोश आंदोलनात राजु झोडे यांनी भाऊंनी खड्ड्यांच्या लोकार्पणाला यावे असे आवाहन केले होते.

विकासाच्या नावाने लूटमार करून नगरपालिकेच्या व शासनाच्या तिजोरीची लुट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राजू झोडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रोश आंदोलनातुन केली. नगराध्यक्षांचा गलथान कारभार व त्याला साथ देणार्‍या काँग्रेस, भाजपाच्य नगरसेवकांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे याकरिता आंदोलनकारी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली.

सदरहु आंदोलनात राजू झोडे, सचिन पावडे, नविन डेविड, धिरज बांबोडे,प्रदिप झामरे, जाकिर खान, सचिन थिपे,गौतम रामटेके,सुरेश डेगरे,स्वप्निल सोनटके,छोटूभाई अली, परमानंद भड़के आदींनी आंदोलनात सहभाग घेतला या शिवाय वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.

रा.से.यो विभागातर्फे संत गाडगे बाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियान राबवून साजरी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संत गाडगे बाबा ची पुण्यतिथी महाविद्यालय परिसर स्वच्छता करून राबविण्यात आली.

 याप्रसंगी महाविद्यालयाचे अधीक्षक रवींद्र धानोरकर यांनी संत गाडगे बाबाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच डॉ. गजानन सोडणर यांनी संत गाडगे बाबाच्या गावोगावी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेवर प्रकाश टाकण्यात आला.

सदर उपक्रमास यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. यावेळेस बहुतांश विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून तालुक्यात संदेश पोहचवून आपला सहभाग नोंदविला.

शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी प्रयत्नशील - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुबंई : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये काही कागदपत्राअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये आलेल्या आहेत अशा शाळा तसेच वर्ग तुकड्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ३० दिवसाच्या आत प्रस्ताव दाखल करूनही सहा ते सात महिने उलटले तरी शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळालेले नाही यासंदर्भात लक्षवेधी सभागृहात मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शासनाकडून पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून अनुदानासाठी प्राप्त असल्याबाबत काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. ज्या शाळा त्रुटी असल्याच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या आहेत त्या शाळांना तीस दिवसात त्रुटी पूर्तता प्रस्ताव शासनास सादर करण्यास कळविले होते. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यापुढे कोणत्याही शाळा अथवा तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यापूर्वी वित्त विभागाची मान्यता आवश्यक राहील असे कळविले होते त्यानुसार वित्त विभागाकडे याबाबतीत काढण्यात आलेल्या त्रुटीं दूर करण्याबाबत स्वत: पाठपुरावा करू, सर्व आमदारांसह उपमुख्यमंत्री यांना भेटून हा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चंद्रपूर : रामाळा तलाव ऐतिहासिक चंद्रपूर शहराचा वारसा आहे. मात्र, हा तलाव अनेक पर्यावरणीय व जलप्रदूषणासारख्या समस्येच्या विळख्यात अडकलेला आहे. या तलावाचे खोलीकरण केले तर एकप्रकारची नवसंजीवनी तलावाला मिळेल. त्यामुळे तलावाच्या सौंदर्यीकरणावर आपला भर असून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

शहरातील इतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, डॉ.सुरेश महाकुलकर, अधीक्षक अभियंता श्री.पाटील, कार्यकारी अभियंता श्री.काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

चंद्रपूरच्या ऐतिहासिक तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, याचा आनंद आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, उन्हाळ्यात या तलावाची पाहणी केली त्यावेळी असह्य दुर्गंधी या तलावाच्या परिसरात पसरली होती. शहरातील सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले होते. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता अत्यंत वाईट अशी अवस्था या तलावाची झाली होती. यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सतत पाठपुरावा केला. गोंडराजाचा व भोसल्यांचा इतिहास या शहराशी जोडलेला आहे. या शहराच्या ऐतिहासिक वैभवाला जपण्याचे काम करण्यात येणार असून तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या तीन वर्षात किमान 60 ते 70 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पर्यटनाला येणारा प्रत्येक व्यक्ती रामाळा तलावाला भेट देईल, असे काम या तलावाचे होणार आहे. या तलावाचे एसटीपी, फूट ओव्हरब्रीज व रिटेनिंगवॉल ही तिन मुख्य कामे असून यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात केवळ रामाळा तलावच नाही तर इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी मार्चच्या बजेटमध्ये 25 कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.

कोविड काळात काही प्रमाणात विकासकामांना ब्रेक लागला पण आता विकासकामांना गती मिळाली आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मॉडेल ठरेल अशी विकासात्मक कामे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे लोकांच्या सेवेचे स्थान आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये प्राप्त झाले असून साजेशी ऐतिहासिक इमारत उभी राहील, या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात गोंडराजाच्या वाड्यासारखे स्वरूप देऊन येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी विश्रामगृह उभारण्यात येणार आहे, यासाठी 23 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे. ताडोबा प्रवेशाच्या तीन ते चार गेटचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे,यामध्ये सर्व गेट भव्य करण्यात येणार असून पर्यटकांना त्या ठिकाणी सोयीसुविधा, विरंगुळा, करमणूक होईल अशा सुविधा तर जिल्ह्यात तयार होणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचा ओढा जिल्ह्याकडे यावा अशी विकासात्मक कामे करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी चंद्रपूरकरांच्या स्वप्नातील शहर उभे करण्याचे काम करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील एक ते दीड वर्षापासून रामाळा तलावाच्या खोलीकरणाचा प्रश्न सुरू होता. इको-प्रोचे बंडू धोत्रे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने रामाळा तलावाच्या माध्यमातून जिल्ह्याला चांगले पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे. तलावाची एसटीपी, फूट ओव्हरब्रीज व रिटेनिंग वॉल ही तिन महत्त्वपूर्ण कामे येत्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. रामाळा तलाव सौंदर्यीकरण करीता उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार बैठका घेण्यात येत होत्या.

वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व मदत मिळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चंद्रपूर : पीडित व संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर हे महत्त्वाचे केंद्र असून खऱ्या अर्थाने पीडित महिलांना एकाच छताखाली अपेक्षित सर्व मदत मिळण्यास सोईचे होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

पीडित व संकटग्रस्त महिलांसाठी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, संरक्षण अधिकारी कविता राठोड, श्याम मोदेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,पीडित महिलांसाठी एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने महिलांना भटकंती करावी लागणार नाही. महिलांशी निगडीत सर्व तक्रारींचे निवारण एकाच केंद्रातून केले जाणार आहे.

पीडित व संकटग्रस्त महिला तसेच मुलींसाठी जिल्ह्यात एकाच छताखाली तात्पुरत्या निवासाची सोय, आरोग्यविषयक, कायदेविषयक, मानसशास्त्रीय, समुपदेशन, वैद्यकीय,संकटकाळात प्रतिसाद आणि संकटमुक्तीची सेवा यासारख्या सर्व सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यभरात सुरू आहे. संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.

प्रणालीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भव्य स्वागत

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : पर्यावरण प्रेमी कु.प्रणाली चिकटे ही महाराष्ट्र भ्रमती करून तब्बल चौदा महिन्याच्या १४ हजार किलोमीटर चा प्रवास करून स्वगृही तालुक्यात प्रवेश करत आहेत.

वेळी तिचे मारेगांवच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तिचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी कु.प्रणाली चिकटे यांनी जागतिक पर्यावरण समस्येवर प्रकाश टाकला आणि पर्यावरण वाचवने किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी तसेच सर्व महाविद्यालय प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच वणीतील स्माईल फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.

परमेश्वर सूर्यवंशी यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्यच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवड संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राज्य प्रदेश उपकार्यध्यक्ष अमोल दिलीपराव सोळंके यांनी दिले आहे.

या नियुक्ती बद्दल जिल्हा सचिव प्रदीप वानखेडे, मराठवाडा उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर, महिला जिल्हा सचिव कविता डोनेकर, प्रसिद्धी प्रमुख आनंद सोनटक्के, सदानंद गजभारे सर, अर्चना शर्मा, संगीता झिंजाडे, प्रणिता जोशी, प्रणिता देशमुख, रंजनी मडपल्लेवार यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याच्या वतीने श्री सूर्यवंशी यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचा कामगारांनी घेतला लाभ


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : संभाजी ब्रिगेड झरी तालुक्याच्या वतीने मुकुटबंन येथे ई-श्रम कार्ड शीबिराचे आयोजन केले होते. असंघटित श्रेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले उचललेली जात आहे. अश्या सर्व लोकांसाठी ई श्रमिक कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकारी योजने पासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी संभाजी ब्रिगेडने या शिबिराचे आयोजन केले होते. 
      
सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर देशातील कोनात्याची काना कोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध सरकारी योजणांचा लाभ घेता येणार आहे. प्रत्यक्षात हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑफलाईन करता येणार आहे. अर्ज न करता योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा कॅम्प मुकुटबंन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करून नोंदणी ची सुविधा उपलबध करून दिली होती.
      
शिबिराचा कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे, उद्घाटक पी एस आई राजेश मदेवार (धंतोली नागपूर पोलीस स्टेशन), प्रमूख पाहुणे राजू लोडे, उपस्थिती समीर लेनगुडे (संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष यवतमाळ), देव येवले (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष), केतन ठाकरे (तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ), शंकर झाडे (शाळा सुधार समिती अध्यक्ष) अशोक पणघाटे (माजी ग्राम पंचायत सदस्य), प्रफुल भोयर (रक्तविर बहुउद्देशीय संस्था) आशिष झाडे अध्यक्ष (शिवाक्रांती कामगार संघटना ), सुरज सुरपाम यांचा उपस्थिती त पार पडला. 
  
कार्यक्रमाचे संचालन शुभम राऊत यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमित क्षीरसागर, मंगेश झाडे, संदीप आसुटकार, लखन कांबळे, दीपक हिरादेवे, विवेक सोनटक्के, प्रशांत बोबडे, दिलीप पाचभाई, आकाश पारखी, संदीप येवले, गौरव धोटे, गणपत गेडाम, प्रणय काळे, आदींचे सहकार्य लाभले.

लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण, नंतर झाली गर्भधारणा; मुलगी सात वर्षाची झाली तरी आरोपी पोलिसांना मिळेना !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अनुसूचित जमातीतील महिलेचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या तेथीलच युवकाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश न आल्याने पीडित महिला ही मागील सात वर्षांपासून पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवित आहे. सदर युवकाने लग्नाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या शारीरिक संबंधामुळे झालेल्या गर्भधारणेतून महिलेच्या पोटी जन्माला आलेली मुलगी आज सात वर्षाची झाली आहे. पण तिच्या कायदेशीर लढ्याला मात्र,अद्यापही यश आलेले नाही. पोलिसांनी आता तिच्या तक्रारीची दखलही घेणे बंद केल्याचे तिने आज २६ डिसेंबरला विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. शारीरिक शोषणकर्त्या युवकाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच पोलिसांच्या कार्यवाहीला ब्रेक लावला असल्याची पीडितेची खंत आहे. युवकाकडून शारीरिक शोषण झाल्यानंतर गर्भधारणा होऊनही पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याऐवजी पीडितेवरच दबाव आणल्याची कर्मकहाणी तिने पत्रकार परिषदेत कथन केली. शारीरिक उपभोग घेऊन युवकाने तर पळ काढला पण त्याच्या पासून झालेल्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी मात्र पीडिता एकाकी पार पाडत आहे. मुलीला वडिलांचे नावही न मिळाल्याने तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लग्न करण्याची ग्वाही देऊन शरीर संबंध ठेवले, व मातृत्व लादून तो फरार झाला. त्याच्या शारीरिक सुखाची ती बळी ठरली. तिच्यावर झालेल्या अन्यायाची ती स्वतःच शिक्षा भोगत असून त्यालाही त्याच्या चुकीची शिक्षा मिळावी या अपेक्षेने मागील सात वर्षांपासून न्यायासाठी ती पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवित आहे. पण तो सापडतच नसल्याचे कारण सांगून तिला आल्यापावली परत पाठविले जात आहे. कधी तरी पोलिस आरोपीचा शोध लावतील, व आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळेल, हा विश्वास घेऊन ती सतत पोलिस स्टेशनला येत असते. 

तिने आपल्या दुर्दैवी जीवनाची कहाणी कथन करतांना सांगितले की, २००६ मध्ये तिचे लग्न झाले. मुलगा एसटीमध्ये नोकरीला आहे, असे सांगून या सामान्य कुटुंबाची फसवणूक करण्यात आली. नंतर दहा दिवसांतच तिचा घटस्पोट झाला. पच्छात ती रोजमजुरी करून आईवडिलांकडे राहू लागली. अशातच तिच्या भावाचा मित्र असलेला राकेश शंकर उईके रा. विरकुंड याचे त्यांच्या घरी जाणे येणे सुरु झाले. तो तिच्याशी निमित्त साधून बोलत असायचा. घराशेजारीच राहणारा व भावासोबतच इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करणारा राकेश उईके हा नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार महिलेसोबत बोलू लागला. सतच्या होणाऱ्या संवादातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. नंतर एकमेकांत भावना गुंतत गेल्या. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिनेही आपले सर्वस्व त्याला अर्पण केले. २००९ पासून त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. २०१३ मध्ये तिला त्याच्या पासून दिवस गेल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नासाठीचा आग्रह धरला. पण त्याच्या कुटुंबाला हे प्रकरण माहिती होताच त्यांनी साफ नकार दिला. व मुलाला मार्डी येथे लपवून ठेवले. पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे कळातच तिने पोलिस स्टेशनला तक्रार देण्याची तयारी दर्शविली. पण तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी गावातच न्यायनिवाडा लावून देतो, असे सांगत सभा घेण्याच्या बहाण्याने त्यांना समिती कार्यालयातच डांबून ठेवले. पण समितीच्याच एका पदाधिकाऱ्याने त्यांची तेथून कशीबशी सुटका केली. नंतर पिडीतेने फेब्रुवारी २०१४ मध्ये सरळ वणी पोलिस स्टेशन गाठून राकेश उईके याच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६, ४१७ नुसार गुन्हाही नोंदविण्यात आला. पण राकेश उईके याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असल्याने व त्याचा काका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याला अटक मात्र झाली नाही. त्याला त्याचा काका, कुटुंबातील अन्य सदस्य व त्याच्या एका मित्राने ऐन पाळण्याच्या दिवशी वणी तालुक्यातूनच फरार केले. त्यानंतर कार्यवाहीही थंडस्त्यातच चालली. त्यावेळी काकाने पोलिसांची बाजू धरून ठेवली. कार्यवाहीला वेग येण्याआधीच आर्थिक अडथळे निर्माण केले. त्यामुळे पोलिसांनीही महिलेलाच धाकदपट करणे सुरु केले. तिलाच आरोपी शोधण्याचं आव्हान दिल्या गेलं. सामान्य कुटुंबातील या महिलेला न्याय देण्याऐवजी अन्यायकारक वागणूक दिल्या गेली. तरीही पोलिसांवर व न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेऊन ती सात वर्षांपासून सतत पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहे. कधी तरी आरोपीला अटक होईल व आपल्याला न्याय मिळेल हा तिचा विश्वास आजही जिवंत आहे. आता तिला खरोखरच न्याय मिळेल की, अन्यायकारकच जीवन तिला जगावं लागेल, हे आता येणारा काळच सांगेल. पण न्यायासाठी धडपडत असलेल्या पीडित महिलेने पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.