वनराई बंधाऱ्याची श्रमदानातुन निर्मिती - जिल्हाधिकारी गुल्हाने यांची उपस्थिती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : आज रविवार रोजी सकाळी 10 वाजता बल्लारपूर तालुक्यातील मोैजा ईटोली येथील हत्ती नाला येथे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग बल्लारपूर, save फॉरेस्ट save चंद्रपूर एनजीओ, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद बल्लारपूर यांच्या संयुक्तिक विद्यमाने 50 मिटर x 2.5 मिटर वनराई बंधारा तयार करण्यात आला. यासाठी 1500 रिकाम्या सीमेंट बोरीचा वापर करण्यात आला असल्याचे तहसीलदार राईंचवार यांनी सांगितले. सदरहु बंधा-याची सुरुवात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते श्रमदान करून करण्यांत आली.
या वेळी बंधारा पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रामुख्याने मुंडे acf, डॉ.दीप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी, संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर, संतोष थीपे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी, सतीश नाईक save फॉरेस्ट save चंद्रपूर एनजीओ यांचे सहकारी यांनी श्रमदान केले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते या प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा येत्या १७ नोव्हेंबरला मूल दौरा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदराव पवार यांचा येत्या १७ नाेंव्हेबररला विदर्भातील गडचिरोली,मूल, चंद्रपूर दौरा असून याच तारखेला मूल नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान मूल येथील बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयात होणाऱ्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम (नियाेजना) बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक बैठक पार पडली.
सदरहु बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस मूल तालुक्याचे अध्यक्ष गंगाधर कुणघाडकर, जेष्ठ नेते निपचंदजी शेरकी, मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,मूल तालुका कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, पोंभूर्णा शहर अध्यक्ष भुजंग ढोले, पोंभूर्णा महिला शहर अध्यक्ष सोनाली भुरसे, बोदलकर, पावडे, दुर्वास घोंगडे, मूल तालुका युवक अध्यक्ष समीर अल्लूरवार, अशोक मार्गनवार, सोनल मडावी, हेमंत सुपणार, संदीप तेलंग, नंदू बारस्कर, प्रा.प्रभाकर धोटे, प्रशांत भरतकर, अंकीत वन्नतवार, दुशांत महाडोळे, ईश्वर लोनबले, अजय त्रिपतीवार, विनोद गुरनुले, आदीं पदाधिकारी उपस्थित हाेते.

वांजरी येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोसत्व साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
केळापूर, (३१ ऑक्टो.) : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ५३ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, वांजरी यांच्या वतीने सामुदायिक ध्यान आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. या महोत्सवीप्रसंगी गावात रामधून फेरी काढण्यात आली व राष्ट्रसंत तुकडोजी मंदिरात भजनाचा कार्यक्रमही पार पडला.

यावेळी किसन शेडमाके, सुभाष कुमरे, राजू गुडेवार, ह.भ.प. ईश्वर महाराज मासटवार, चंद्रशेखरजी बुर्रेवार, मोहनजी राखुंडे, अर्जुनजी सोयाम, विश्वनाथजी पडलवार, नरेंद्र कावडे, अशोक कुमरे (पोलीस पाटील), महादेव गुडेवार व बालगोपाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिना निमित्त नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : भारत देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिनी आज दिनांक ३१ ऑक्टोंबर, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्थानिय प्रियदर्शिनी चौकातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी इंदिराजींच्या पुतळ्याला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली. या वेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. च्या वतीने पुतळ्याला मालार्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

नरेशबाबू पुगलिया आपल्या मार्गदर्शन पर भाषणात या वेळी म्हणाले की, इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी आपल्या कणखर व दूरगामी नेतृत्वात देशाच्या व जनतेच्या विकासाचे व हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. भारताच्या स्वातंत्रप्राप्ती नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात विज्ञान, अणुशक्ती, उद्योग, कृषी सिंचन, शिक्षण इत्यादि क्षेत्रात देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी विविध योजना, प्रकल्प व धोरण अमलात आणली.
 पुगलिया पुढे म्हणाले, "राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःची कुर्बानी दिलेली आहे. इंदिराजी आपल्या प्रेरणास्त्रोत असून आदर्श आहेत. इंदिराजींच्या आदर्शानुसार आपण कार्य केले पाहिजे हीच खरी राष्ट्रमाता इंदिराजीना श्रध्दांजली ठरेल".
यानंतर विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ, बिस्कीट वाटप व मातोश्री वृध्दाश्रम येथे भोजन वाटप करण्यात आले.

सदरहु कार्यक्रमाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर, ग्रामिण जिल्हा अध्यक्ष गजाननराव गावंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया, जिल्हा महासचिव अॅड. अविनाथ ठावरी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक अशोक नागापूरे, इंटक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, नगर परिषद चंद्रपूरचे माजी उपाध्यक्ष अरुनभाऊ बुरडकर, माजी नरगसेवक विनोद पिंपळशेंडे, काँग्रेसचे रमजान अली, कामगार संघटनेचे रामदास वाग्दरकर, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, काँग्रेसचे सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, मुरलीधर चौधरी, रतन शिलावार, गोविंदा आदे, अनिता बोबडे, संगिता बैद, अंजली लहामगे, सिमा शेडाम, अर्चना नागापूरे, हेमन्त आक्केवार, सचिन गावंडे, किष्णा यादव, दर्शन बुरडकर व शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते.

... आणि म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या

                       

                          Il लक्ष्मी ll 

           घरची लक्ष्मी असते पत्नी... 
           घराचे घरपण असते पत्नी... 
           दिव्यातली वात असते पत्नी...
          अंगणातील तुळस असते पत्नी...

पत्नीला कितीही उपमा द्या कमीच असते. तिच्या मुळे घर हसते तिच्यामुळे घर बोलते. तिच्या मुळे घराला घरपण असते. 
पण ऐक बोलावंसं वाटते कित्येक घरी पत्नीला समजून घेतले जात नाही. पत्नीला मान मिळत नाही. तिला समजून घेत नाही. जरा विचार करा ती आपलं माहेर सोडून आपली माहेरची माणसं सोडून सासरी येते. सासरच्या सर्वाना आपलं मानते. सर्वांचा सांभाळ करते. सर्वांची सेवा करते. ती तर नेहमी साठी आपल्या घरी आलेली असते. तुम्ही फक्त्त ऐक दिवस घर सोडून बघा तुम्हालाच कळेल काय अवस्था होते तुमची, आणि ती जर चार दिवस आपल्या घरी नसेल तर बघा घराची काय अवस्था होते. घराला घरपण राहत नाही. घर शांत राहील घर बोलणार नाही. आणि हो आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. साधं एखाद काम जरी करायचं म्हंटले तरी ते तुम्हाला जमत नाही. जे काम रोजच अगदी व्यवस्थित चाललेलं असते. ते फक्त पत्नीमुळे. 
 
ज्या वेळेला ती तुमचा हात धरून तीच घर सोडून या घरी आली या घरची लक्ष्मी झाली. तीन तुमचं घर सहज आपलं म्हणून .सावरलं यात माहेरच्या आठवणींच किती हुंदक तीनी आवरलं. तीनी तिची आवड तिची स्वप्न बाजूला ठेवली. पतीच स्वप्न पतीची आवड ती जपत गेली. 
 तिचे काही स्वप्न असतील तिच्या काही आवडी असतील हे कधी तिला तुम्ही विचारलं...
  
तिच्या हातचे जेवण रोजच जेवलात एखादा पदार्थ बिघडला तर लगेच नाव ठेवली. पण कौतुकाचे दोन शब्द कधी तुम्ही बोलले नाही. पण हे करत असतांना तिनं किती चटके सोसले तिला किती त्रास झाला याचा कधी तुम्ही विचार केला 
विचार केला नसेल तर विचार करा. 
  
तुम्ही चार पैसे कमावले तिने दोन पैसे वाचविले. तुमच्या नकळत भविष्यासाठी तिने साठवले....
 पती घर चालवते, पत्नी घर सांभाळते. चालवन्या पेक्षा सांभाळणं कठीण असते. तिला जर कुणी म्हंटल मुलं मोठी झाली मार्गी लागली. ती म्हणते चांगली निघाली बापावर गेली. वडिलांच्या संस्कारामुळे चांगली वागू लागली. पण मुलांना घडवतांना ती किती रात्र जागली तिला किती त्रास झाला याचा कधी विचार केला. अशीच वर्ष जात आहे ती मात्र सतत तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सोबत आहे.

"संसाररुपी सागरात संघर्षाच्या लाटा ll 
 पतीच्या सुखदुःखात पत्नी चा बरोबरिचा वाटा ll 
खरंच आहे ती तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. तसे तुम्हीही तिच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोला. आणि मग बघा घर कसं आंनदी राहत घर सुखशांतीने भरून जाते. कारण घरातील लक्ष्मी आंनदी तर पूर्ण घर आंनदी म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या आणि ही दिवाळी आंनदाने प्रेमाने साजरी करा.

ओबीसी, व्ही. जे. एन.टी.साठी नवीन वसतिगृहासह सर्व वसतिगृह तात्काळ सुरू होणार - ना.विजय वडेट्टीवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र, जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती, व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन 72 वसतिगृह मंजूर करून व राज्यातील कोरोना सदृश वातावरण संपले असल्याने राज्यातील सर्वच वसतिगृह तात्काळ सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तात्काळ वसतिगृह सुरू करावे असे आशयाचे निवेदन नुकतेच विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकास मंत्री यांना आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात व इतर पदाधिकाऱ्यांच्या एक शिष्टमंडळाने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे भेट घेऊन दिले त्यांचेशी शिष्टमंडळाने चर्चा केली असता ना.वडेट्टीवार यांनी उपराेक्त विषय समजून घेऊन याबाबत सर्व आराखडा व निधी मंजूर करून घेतलेले आहे.
कोरोनामुळे बंद पडलेले सर्व वसतिगृह दिवाळी नंतर सुरू करण्यास संबधित विभागाला तात्काळ सूचना करणार असे आश्वासित केले. सर्व वसतिगृह लवकरच सुरू होणार असे चर्चा दरम्यान सांगितले. या वेळी आनंदराव अंगलवार सतीश मालेकर, ए.ए. डहाक, चंद्रशेखर कोटेवार, विजय पोहनकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (३१ ऑक्टो.) : वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला व स्व.इंदिराजी गांधी प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारताची प्रधानमंत्री प्रथम महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी देशाची धुरा सांभाळली व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असलेल्या त्यांना आर्यन लेडी म्हणून उपाधी देण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमोद निकुरे शहराध्यक्ष, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष, इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष, ओम ठाकूर, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, डॉ मोरेश्वर पावडे, अनंत चौधरी सुधीर खंडाळकर, सुरेश बन्सोड, रफिक रंगरेज, बाबाराव गेडाम, राजेंद्र खोब्रागडे,  सौ ज्योती सुर, सौ संध्या बोबडे, मंगला झिलपे, वंदना धगडी, वंदना आवारी, मंदा पुसनाके, मंदा सोनारखन इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

झरीत ओबीसी चे एक दिवशीय धरणे आंदोलन


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३१ ऑक्टो.) : झरी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने शनिवार दिनांक ३० आक्टोबर २०२१ रोजी झरी तहसील कार्यालयासमोर स.११ ते दु.२ वाजे पर्यंत एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
   
ओबीसीचीं जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या मागासवर्गीय समितीने दि.५-१०-२०१५ मागासवर्गीय मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह निर्माण करून देखबाल करण्याच्या सूचना केल्या होत्या. युती सरकारच्या काळात ३० जानेवारी २०१९ प्रत्येक जिल्ह्यात एक यानुसार ३६ वसतिगृहे सुरु करण्याचा आदेश देण्यात आले. २२ आगस्ट १९ ला नागपूर अहमदनगर यवतमाळ ज्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात अनुमती देण्यात आली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एका जिल्ह्यासाठी दोन या प्रमाणे ३६ जिल्हयात एकूण ७२ शासकिय वसतिगृहे उभारण्याचे आश्वासन दिले. पण मात्र, कुठेच आजवरी एकही वस्तीगृह उभारलेले दिसत नाही. एक प्रकारे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची फसगत केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळ खेळल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावना चा विचार करून प्रत्येक मुला मुलींसाठी सहा विभागात पाचशे पाचशे जागेचे वस्तीगृह बांधण्यात यावे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडे तत्त्वावर सुरू करण्यात यावे. या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार झरी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी जनगणना कृती समितीचे आशिष साबरे, प्रकाश बेरेवार, आजाद उदकवार, प्रफुल चुकलवार, साई बोंगिरवार, तुळशीदास आवारी, नेताजी पारखी, सौ.छबुताई आसुटकर, ममता पारखी, सविता व-हाटे, संतोष गोहकार, गणेश बुट्टे, संजय चामाटे, सुनील शिरपूरे निलेश निलमवार, प्रेम नडलवार यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जड वाहतूक शहरातून बंद करून घुग्घुस नगरी प्रदुषण मुक्त करा - यासाठी आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण आरंभ !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : घुग्घूस शहरातून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. तदवतचं प्रदूषणात वाढ होत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन गप्प बसले आहे.

घुग्घूस शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शहरात प्रदूषण अत्यंत झपाट्याने वाढत असुन नागरिकांना वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. लहान मुलांना दमा, शुगर, लकवा, सदृश्य आजार होत असुन शहरांमध्ये दररोज वाहतुकीची काेंडी हाेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नित्य दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात घडत आहे. प्रत्यक्ष पाहता जड वाहतूक WCL च्या मार्गाचा पर्याय उपलब्धआहे पण, WCL चे अधिकारी व ट्रांसपोर्ट कंपनी चे मधुर संबध असल्यामुळे हा प्रकार सातत्याने सुरु आहे.

प्रदूषण करणारे ट्रकवर शहरातून सरार्सपणे नियम मोडून ट्रकला ताडपत्री न टाकता ओवरलोड वाहतूक करण्यात येते. पण RTO विभाग सुध्दा डोळे बन्द करुन कुंभकर्णी झोपेत गेला आहे. ह्या सर्व समस्या लक्षात घेता आम आदमी पार्टी द्वारा ३० ऑक्टाेंबरला साखळी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, तहसिलदार, पोलिस स्टेशन घुग्घुस यांना देण्यात आले. परंतु याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी आज रोजी पासून आप तर्फे स्थानिक छत्रपति चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. घुग्घुसचे शहर अध्यक्ष अमित बोरकर हे उपोषणाला बसले असून बहुजन समाज पार्टीने देखिल या आंदोलनाला आपले समर्थन जाहिर करत BSP चे अध्यक्ष मोहन येमुर्ले उपोषणात सहगागी झाले आहे.
उपाेषण मंडपस्थळी प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, अभिषेक सपडी, सागर बिऱ्हाडे, राजेश चेडगुलवार, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश, निखिल बारसागडे, संदीप पथाडे, रवी शंतलावार, अभिषेक तालपेल्ली, भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, भद्रावती ता. सचिव सुमित हस्तक, रजत जुमडे, सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे,धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर, आदी उपस्थित होते.

दालमिया सिमेंट कंपनीने कामगारांचा अंत बघू नये - ॲड.संजय धोटे

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनी सुरु होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे,परंतु त्या ठिकाणी कामगारांना अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. त्याकडे वारंवार कामगार संघटना व कामगारांनी कंपनी प्रशासनाला यासंदर्भात माहिती देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली परंतु त्याकडे कंपनी प्रशासनाने पुर्णता दुर्लक्ष केले. दरम्यान, भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे दालमिया सिमेंट कंपनी येथे गेट मिटिंगचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कंपनी प्रशासनानी कामगारांना स्थानिक कामगारांना प्रामुख्याने कामावर घ्यावे व कामगारांचा अधिक अंत बघू नये. नारंडा परीसरातील सर्व कामगारांना कामावर न घेतल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी दिला आहे यावेळी ते अध्यक्षस्थाना वरुन बोलत होते. मंचावर भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते ॲड.शैलेश मुंजे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, सिमेंट संघाचे उपाध्यक्ष किशोर राहुल, वनोजा सरपंच दिलीप पाचभाई, कढोली खुर्द उपसरपंच विनायक डोहे, पिपरी येथील माजी सरपंच कवडू कुंभारे, नारंडा उपसरपंच बाळा पावडे, अनिल मालेकर,अजय तिखट आदीं उपस्थित होते.

        
दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनाने वारंवार भारतीय सिमेंट मजदूर संघासोबत बैठक आयोजित केल्या कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार कंपनीतर्फे वेळ मागण्यात आला, परंतु १ वर्ष उलटूनही त्यांच्यातर्फे फक्त वेळकाढूपणाचे धोरण राबविले जात असून, कामगारांची दिशाभुल करण्याचा प्रकार कंपनी प्रशासनातर्फे होत आहे यासमोर असा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही अन्यथा कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा भारतीय सिमेंट मजदूर संघाचे नेते शैलेश मुंजे यांनी दिला आहे.         
कंपनी प्रशासनाने नारंडा परिसरातील कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात यावे, O&M कामावर घेत असताना त्यांच्या जुन्या पदस्थापनेनुसारच कामावर घेण्यात यावे, पॅकिंग प्लांट मध्ये सर्व जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे, तसेच कामगारांना पगार वाढ देण्यात यावी अश्या प्रमुख मागण्या यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी कामगारांसोबत चर्चा करताना सांगितल्या.
     
यावेळी कंपनीतील कामगार व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामरूप कश्यप, राजू गोहणे, सुनील टोंगे, प्रवीण शेंडे, वैभव गाडगे, अक्षय भोसकर, वैभव तिखट यांनी परिश्रम घेतले.

वणी : रसायनशास्त्राची विद्यापीठ स्तरीय सेमिनार स्पर्धा संपन्न



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (३० ऑक्टो.) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत समस्त विज्ञान महाविद्यालयां मधील विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित रसायनशास्त्र विषयाची सेमीनार स्पर्धा लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्यासपीठावर संपन्न झाली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, उद्घाटक आणि बीजभाषक डॉ एस पी देशमुख यांच्यासह डॉ पी आर राजपूत, डॉ. के.एन. पुरी, डॉ. पी. जे गांजरे, डॉ. एस एस कांबळे, डॉ सुमेर ठाकूर तथा डॉ. प्रवीण रघुवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रसायन शास्त्र विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयातील विविध प्राध्यापकासह सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन सेमिनार स्पर्धेत सहभाग घेतला.
प्रास्ताविकात लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांनी अशा स्वरूपातील स्पर्धा 15 वर्षापूर्वी देखील आयोजित केली होती हे सांगत इतिहासाला उजाळा दिला आणि रसायन शास्त्र विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.
बीजभाषणामध्ये डॉ. देशमुख यांनी आयुक्टा चे कार्य विशद करून सध्या सुरू असते या रजत महोत्सवाबद्दल उपस्थितांना उद्बोधन केले.
डॉ. राजपूत यांनी आशा सेमिनार चे महत्व स्पष्ट केले तर डॉ. पुरी यांनी विद्यार्थी जीवनातील परीश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या विविध कार्याचे कौतुक केले.
या वेळी घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या सेमीनार स्पर्धेत श्रद्धा गणेश मेहरे, सुरभी अतुल अटारा आणि समन शेख यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके आयुक्टा च्या वतीने तर श्रावणी नंदकिशोर बावणेर हिला लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. डॉ. प्रविण गांजरे आणि डॉ. शैलेश कांबळे यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. श्रद्धा मेहरे हिने विजेत्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित काळे यांनी तर आभार प्रदर्शन श्वेता राऊत यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शोध पत्रांचा संग्रह लवकरच ई-बुक स्वरूपात किंवा युट्युब लिंक च्या माध्यमातून सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा श्रोत्यांमधून व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेल च्या वतीने सत्कार

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (३० ऑक्टो.) : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका सचिव व काळी दौ च्या माजी सरपंच सौ साधनाताई आळणे यांची भाची कु. दिक्षा अरुण भवरे (मोहदी) हिने युपीएससी (UPSC) परीक्षेत राज्यात (STATE) दुसरा क्रमांक घेऊन यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आझाद पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वहाब भाई, अनिल चवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हंसराज मोरे, सामाजिक न्याय विभाग सेल चे तालुकाध्यक्ष उज्वल रणविर, शरद काळे, राजू राठोड, विश्वपाल ढोबळे, आदिंची प्रमुख्याने उपस्थित होते. सदर छोटेखानी कार्यक्रम अशोक आळणे यांच्या निवास्थानी कार्यक्रम संपन्न झाला.

मुकुटबन : क्रेशरने घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील मजुराचा बळी

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑक्टो ) : तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडकी (गणेशपूर) शेत शिवारात एका मजुराचा सोयाबीन काढत असतांना क्रेशर मध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 च्या दरम्यान घटना घडली.

मृतक विलास भूदाजी तोडासे (अंदाजे वय ५५) रा. भाटाडी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. 
सध्या जिल्ह्यात मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील जिल्ह्यातील मजूर कामाला येत आहे. कापूस वेचणी ला वेग आला असून समोर दिवाळी असल्याने शेतातील शेतकऱ्यांचे सोयाबीन मोठया क्रेशरने (हडंबा) काढून देण्याचे काम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गँग मजुरीसाठी या परिसरात येऊन असून, त्या गँग मधील काही लोक खडकी येथील विठ्ठल ठावरी यांच्या शेतात क्रेशरने सोयाबीन काढण्याचे काम करीत होते. पुढे दीपावली असल्याने हे मजूर आज सर्व कामे आटोपून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असतांना दि.३० ऑक्टोबर रोजी विलास तोडासे नामक व्यक्तीचा  सोयाबीन काढतांना अचानक तोल जाऊन क्रेशेरच्या पट्ट्यावर मजूर पडल्याने तो सरळ क्रेशेरच्या आतपर्यंत गेल्याने अर्धे शरीर छिंनविच्छिन्न झाले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताची माहिती खडकी,मुकुटबन,गणेशपूर व अडेगाव पर्यंत वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांची गर्दी पाहण्याकरिता उसळली.
सदर घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजू लोंढे व पोलीस पाटील मंगेश बरडे हजर होते त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राजू नेवारे व पोलीस नाईक संतोष मडावी घटनास्थळी पोहचले. पंचनामा सुरू होता. पंचनामा करून शव शविच्छेदन करिता झरी येथे पाठविण्यात येणार आहे. मात्र येत्या सणासुदीच्या पर्वावर तोडासे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. 

 

 











पत्रकारांशी उर्मटपणे वर्तणूक करणाऱ्या एपीआय वर कारवाई करा - पुरोगामी पत्रकार संघाची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० आक्टो.) : अपघातस्थळी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत यांच्याशी राजुरा येथील एपीआय गोडसे व सोबत असलेल्या पोलीस चमूनी उर्मटपणे वर्तन केले. या पोलिस प्रशासनातील असभ्य वर्तणूक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी काल शुक्रवारला पुरोगामी पत्रकार संघाने चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक यांच्याकडे एका लेखी निवेदनातुन केली आहे .

या बाबत असे कळते की गेल्या चार दिवसां पूर्वि राजुरा तालुक्याच्या ठिकाणापासून 3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमठाणा फाट्यावर दुचाकीचा दुर्दैवी एक अपघात झाला. या अपघातात दोन भावंडांपैकी एकाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. सदरहु घटनेची माहिती हाेताच राजुराचे नवभारत प्रतिनिधी तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांनी राजुरा पोलिस स्टेशनला दूरध्वनी वरून माहिती देत आपली सहकार्याची भूमिका बजावली .इतकेचं नाही तर त्यांनी पोलिसचमू घटनास्थळी येईपर्यंत जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. एव्हढं सारं करुन देखिल राजुरा येथील एपीआय गोडसे सह आलेल्या पोलिस चमूने पाेलिस प्रशासनाला सहकार्य करणारे अमोल राऊत यांच्याशी विनाकारण हुज्जत घालत असभ्य वर्तणूक करत प्रशासनालाच मलिन केले आहे . यामुळे सर्व सामान्य माणसाशी पोलिसांची भूमिका व वर्तणूक किती असहाय आहे याचे यावेळेस प्रत्यक्ष दर्शन एपीआय गोडसे यांच्या वर्तणुकीतून द्रूष्टीक्षेपात पडले. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून मालिन करणाऱ्या एपीआय व सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. जेणेकरून यानंतर अश्या प्रकारच्या असभ्य वर्तणुकीला अंकुश बसेल व सामान्य जनतेत पोलिस प्रशासनाबद्दल आपुलकीची व प्रेमाची भावना टिकून राहील. अशी देखिल मागणी याच निवेदनातुन करण्यांत आली आहे. निवेदन देतांना पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नरांजे ,विदर्भ संघटक निलेश ठाकरे, तालुका अध्यक्ष चंद्रपूर मुन्ना तावाडे, तालुका संपर्क प्रमुख राजुरा तथा नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक यांनाही निवेदनच्या प्रति पाठविण्यात आल्या आहे.

पव्वा! चढ्या दरात विकतो "येथील" परवाना धारक, उत्पादन शुल्क विभागाचे होत आहे दुर्लक्ष


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑक्टो.) : माथार्जून येथील दारू च्या दुकानातून चढ्या दरात पव्वा विकला जात आहे. त्यामुळे तळीराम संतापले असून ओरडा ओरड करीत आहे.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या माथार्जून येथील देशी दारूचे दुकान सुरु आहे. मधील काळात पाच वर्षे बंद होती, आता गेली तीन वर्ष झाली पुन्हा सुरु झाली असून या कठीण काळात परवाना धारक हा ज्यादा दाराने दारू विकत आहे. असे परिसरातील तळीरामांची तक्रार आहे.
विशेष उल्लेखनीय कि, अहो रात्र घरून दारू विकल्या जात असून ठरलेल्या वेळेवर दुकान सुरु न करता सकाळीच आठ वाजता दुकान सुरु होत असून देशी दारूच्या किंमतीत ही वाढ करून विकल्या जात आहे. प्रत्येक पव्यावर 10/20 रुपयाने चढ्या भावात विकल्या असून ही सर्व सामान्य जनतेची लूट होत असल्याचे बोंबाबोंब होत आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे ही दूर लक्ष होत असून या देशी दारू दुकानात बे हिसाब पैसे मोजावे लागत आहे. 60 रुपयांचा पव्वा 70 ते 80 रुपयाला तळीरामांना पव्वा विकल्या जात आहे. कामामुळं सीनभागाडा (थकवा) येतोय त्यामुळे दारू पितो, किंबहुना दारूची या अनेकांना लतही लागली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आणि चा आहे. परंतु हा परवाना धारक काही च्या काही दरात दारू विकली जात आहे. अशी तळीरामात ओरड आहे. परिणामी सणासुदीच्या पर्वावर उत्पादन शुल्क विभागाने अशा बे हिसाबी विकणाऱ्या धारकांवर नियंत्रण ठेवावे व तळीरामांना प्रिंटेट किंमतीनुसार विक्री करण्याचे सक्त आदेश देण्यात यावे. अशी मागणी तळीरामातून होत आहे.
 

मूल शहरात अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : काल शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "वार्ड तिथे राष्ट्रवादी "या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सुचनेच्या अनुषंगाने तथा बल्लारशहा विधान सभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात मूल नगरीत एक बैठक घेण्यात आली.
सदरहु बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १४ येथे पार पडली.बैठकीत अनेक युवा कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. दरम्यान या वार्डातील अनेक युवकांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.

पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची नविन वार्ड कार्यकारणी करण्यात आली.
        
आयाेजित बैठकीत विशाल श्रीकोंडावार, आशिष रामटेके, अमोल वाकडे, विनोद गुरनुले ,अंकित वन्नकवार, प्रदीप देशमुख, प्रकाश बावणे, प्रीतम भडके, जुगल भडके, दादू भडके, अमोल वाढई, गोलू ढोले, नयन भोयर, गणेश भोयर, कमलेश भोयर , तुषार शेंडे, विनोद गुरनुले, प्रणय घोगरे, नंदलाल भडके, कृष्णा वाढई, संदीप वाढई, थामदेव रामटेके, रसिक वाडगुरे, राजेश्वर मोहूर्ले, अमित गिरडकर, दीपक महाडोळे, नंदकिशोर शेंडे गणेश शेंडे, सुजल शेंडे राजू भोयर, अतुल मडावी , सुरज शेंडे,शंकर क्षीरसागर, गणेश गिरडकर, धनराज गिरडकर, जोगेश गिरडकर, राकेश कन्नाके ,कार्तिक शेंडे,सुमीत वासेकर,प्रवीण मडावी,अमोल वाढई, गुलशन रामटेके,सतीश गुरनुले,राजेश्वर मोहूर्ले, राजू बोळे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
आगामी नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी या बैठकीत दिली.

सुरजागड : ठिय्या आंदोलन !



               सुरजागड, ठिय्या आंदोलन !

२५ ऑक्टाेंबर पासुन सुरजागड खनिज प्रकल्पाच्या विरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन वरवर पाहता आदिवासींचा हक्क, अधिकार यासाठी लढा आहे असे वाटत असले तरी आंदोलकांची या मागची काय भुमिका आहे हे समजुन घेतले पाहिजे.

या खदानीमुळे केवळ सर्व सजीव सृष्टीचे सौंदर्य, पर्यावरणाचे संरक्षण, विस्थापन, प्रदुषण, आरोग्य, विकास, रोजगार हे प्रश्न निर्माण होणार आहेत असे नव्हे तर आदिवासींची आयडेंटिटी नाकारणारा विकास आहे हे समजुन घेतले पाहिजे. इलाक्यातील हजारो आदिवासींनी का रस्त्यावर उतरावे? आपले घरदार मुले बाळ, गुरेढोरे, शेतीवाडी सारे सोडून झाडाच्या खाली चुली पेटवून खुल्या जागेवर थंडीमध्ये धरणीला पाठ टेकवावी व आकाशाकडे बघत आहेत ते का मुर्ख आहेत का? असे दुर्दैवी चित्र दिसत आहे यावर प्रसार माध्यमांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, अभ्यासू, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन शासन प्रशासनासोबत संवाद साधला पाहिजे.

आदिवासींसाठी असलेले संविधानातील हक्क, पाचवी अनूसूचि,स्वशासन चालवण्यासाठीचा पेसा कायदा याचा आधार घेत आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलकांची ही मागणी रास्त आहे की, नाही यावर खरे तर चर्चा होणे गरजेचे आहे. विकासाची नेमकी परिभाषा कोणती याची मांडणी होणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैचारिक भूमिका मांडली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. इलाका गोटुल ने या संघर्षाची सुरवात केली. ज्याला मागासलेला म्हणतात तो अशिक्षित आदिवासी माणुस शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतो आहे. हे वाखाणण्याजोगे आहे. खरं तर, गडचिरोली जिल्हा देशपातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींमुळे नावारुपाला आला आहे. त्यात काही बाबतीत अभिमानास्पद व काही बाबी दुःखपूर्ण आहेत. त्यातील अभिमानास्पद बाब म्हणजे मेंढा लेखा व देवाजी तोफा होय. सरकारचे प्रतिनिधी म्हणून रमेश जयरामजी स्वतः येऊन आदिवासींचे मायबाप होऊन घरपोच हक्क प्रदान केले. याचा गडचिरोलीचा देशपातळीवर गाजावाजा झाला . आणि म्हणूनच देशभरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने मेंढा लेखा चे अनुकरण करण्यासाठी व शिकण्यासाठी गडचिरोलीत येतात. परंतु याच जिल्ह्यात मात्र संविधानातील आदिवासींचे हक्क पायदळी तुडवले जाताना दिसत आहेत.

वन विभागाने व शासनाच्या आदिवासी विभागाचे सहकार्याने दुर्गम भागातील आदिवासींना गॅस सिलिंडर वाटप केले आहे ते कशासाठी तर सरपणासाठी लागणारे लाकडे जंगलातून तोडून नेतात ते थांबले जावे व जंगल नष्ट होऊन जाऊ नये यासाठी ती योजना आखली होती आणि खदानीच्या रुपाने हजारो हेक्टर जमीनीवरी घनदाट जंगल कापून नष्ट होत आहे त्याबद्दल काहीही नियोजन नाही. कंपनीचे दलाल म्हणतात की, कंपनी यवतमाळ जिल्ह्यात जंगल उभे करणार आहे. ते आदिवासी जीवनमूल्ये, संस्कृती, रितीरिवाज परंपरा पण उभे करून देणार आहेत का? कोरोना काळात जीवन जगण्यासाठी निरंतर संघर्ष झाला. लाखो जीव ऑक्सीजन बेड न मिळाल्याने किड्यामुंग्या सारखे रस्त्यावर मेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग मुळे अमेरिका सारख्या अनेक देशात अभ्यास केला जात असतांना आदिवासी जीवनमूल्ये विश्वाला कसे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशी आदिवासी जीवन पद्धती खदानीच्या अघोरी विकासात मुळासह खोदून नष्ट करत असतांना आदिवासींच्या अशा आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जीवंत राहण्यासाठी आव्हान निर्माण झाले असतांना जनतेनी जागृत होऊन एकजुटीने सक्षमपणे व शांततेने लोकसहभाग वाढवला पाहिजे.

जिल्हा प्रशासनातील प्रमुख जिल्हाधिकारी हे आदिवासी बहूल जिल्ह्यात आदिवासीचे उपायुक्त असतात. त्यांना विषेश अधिकार आहेत. पोलिस प्रशासनाने त्यांना व आदिवासी विभागाला हाताशी घेऊन आदिवासींसोबत समन्वय साधला पाहिजे अशी अपेक्षा आहे. वनखात्यानेही आत्मपरीक्षण करावे आदिवासींसाठी वनविभागाचे नाते का जोडले गेले नाही? ते जोडले जावे. नेमके आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात त्यांचा संबंध अराजक शक्तीसोबत जोडुन प्रशासनाने आपली कमजोरी दाखवली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या आदिवासी बहुल भागात लोकशाही कां सुदृढ होऊ नये याचे आकलन होत नाही. संपूर्ण देशभरातील डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्ते बनवले जातात. मेट्रो, उडाणपुल, बुलेटट्रेन, चौपदरी रस्ते याची जितकी आवश्यकता शासनाला वाटते तितकीच शिक्षण, आरोग्य, मुलभूत सुविधा, स्त्रिया व बालकांचे योग्य संगोपन, वृध्दाचे प्रश्न, दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची सुविधा, सुरक्षा, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ची अधिकची यंत्रणा, अद्यावत आरोग्य सुविधा शाश्वत रोजगाराच्या संधी, सुरक्षा तळागाळात पोहचवण्यात याव्यात. कोणत्याही टाकावू बाबींवर अतोनात खर्च केला जातो पण, वन उपजावर प्रक्रिया करून अनेक वस्तू तयार करता येईल याच्या वर आधारित कौशल्य विकास आराखडा, प्रशिक्षण, निर्माण प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्ध करता येईल. या जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग म्हणजे जणु घाण्याला जुंपलेला बैल झाला आहे असे निदर्शनास येत आहे.

पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी यांची वनविभाग व आदिवासी विकास विभाग यांना घेऊन आम जनतेला दिलासा मिळेल व प्रशासन व शासन यांचे वर दृढ विश्वास होऊन विकासाच्या कामात गती देण्यासाठी प्रयत्न करावे. सुरजागड आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आदिवासींचे मायबाप व्हावे एवढी मनापासून अपेक्षा आहे. तदवतचं सुरजागड व अन्य खाणी बाबत आदिवासी हिताचे बाजूने निर्णय घ्यावा. लोकशाही मार्गाने शांततामय आंदोलनाची आम्ही आदिवासी कधीही कास सोडणार नाही.
~ कुसुम अलाम 
आदिवासी सेवक तथा साहित्यिक गडचिराेली ९४२१७२८४८९

नियमाची पायमल्ली,पटवारी सदस्यांची दिशाभूल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२९ ऑक्टो.) : तलाठ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक मागण्यांसाठी इमाने इकबारे लढणारे तथा सेवेत असतांना शासनाविरुध्द आवाज बुलंद करणारे विदर्भ पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षी स्व.वि.म. उजवणे यांनी पटवारी संघटनेची मुहुर्तमेढ राेवत त्या संघटनेच्या शाखा प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरांवर सुरु केल्या हाेत्या.

विदर्भ पटवारी शाखेप्रमाणचे या देखील शाखांचे काम नियमानुसार व नियोजित वेळेनुसार व्हायला हवे. या भूमिकेशी ते नेहमीच कायम व प्रामाणिक राहिले हाेते. एव्हढेच नाही तर, विदर्भ पटवारी संघटनेच्या संपूर्ण ध्येय धाेरणानुसार आजपर्यंत चालणारी त्यांची कार्यप्रमाली सर्वांनी अनुभवली हाेती. परंतु अलिकडे त्यांनी संघटनेसाठी घालून दिलेल्या नियमांची अक्षरश: पायमल्ली करुन स्वमर्जीने निर्णय घेण्याची प्रथा सुरु झाली असुन, असाच एक प्रकार राजूरा उपविभाग पटवारी संघटनेकडुन राजूऱ्या नव्यानेच बांधलेल्या परस्पर गाळे विक्री प्रकरणात उघडकीस आला आहे. या बाबतीत राजेन्द्र पचारेसह अन्य सदस्यांनी विदर्भ पटवारी संघटनेचे केन्द्रीय अध्यक्ष नागपूर यांचेकडे लेखी तक्रार नाेंदविली आहे.
उपराेक्त संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते की, राजूरा उपविभाग शाखेमधील सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, या शिवाय जिल्हा अध्यक्ष जिल्हा सचिव व १३ सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत निव्वळ संदेशाच्या माध्यमांतुन दि.१९\१०\२०२१ ला तहसिल कार्यालय राजूरा येथील सभागृहात एक सभा पार पडली यात गाळे बाबत निर्णय हाेता. दरम्यान या पूर्वी दि.११\९\२०२१ राेजी पटवारी मागणी दिनामध्ये समाेरील गाळे किरायाने देण्याबाबत ठरले हाेते. ठरल्याप्रमाणे प्रथम दर्शनी दाेन गाळे अतिमहत्वाचे असुन ते रस्त्या लगतचे आहे. ते लिलावात देखील जाणारे हाेते. त्यासाठी निविदा काढायची असे सर्वानुमते ठरले हाेते. याच बांधकाम झालेल्या समाेरील गाळ्याची पगडी तीन लाख रुपये व मासिक किराया पाच हजार रुपये तर, मागील गाळ्याबाबत पगडी दाेन लाख व प्रतिमाह किराया तीन हजार रुपये ठरविण्यात आलेला हाेता. बांधकाम ठेकेदारास बांधकामाचे वाढीव रक्कम विस लाख रुपये देणे असल्यामुळे आठ लाख रुपये पगडी व उर्वरीत गाळे पुढील सभेत किरायाने देण्याचे ठरले हाेते. जमा सहा लाख पन्नास हजार रुपये त्यात आठ लाख रुपये अधिक जवळपास एकुण संघटनेकडे १५ लाख रुपये जमा हाेणार हाेते. एका सभेत काही जेष्ठ मंडळीनी निविदा सुचनेची जाहिरात देण्याबाबत (भाड्याने देण्याबाबत) सुचित केले हाेते त्यास सर्वांनी मान्य करत हाेकार देखील दिला. दि.१९\१०\२०२१ च्या सभेत चर्चा किंवा निर्णय हाेणार असे सर्व सदस्यांना वाटत हाेते. त्यामुळे गाळे किरायाने घेण्यांसाठी काही सभासद उपस्थित राहिले. परंतू १२३, १२४, १२५, व १२६ पैकी प्लाट क्रं.५५ क्षेत्र ३०० चाै.मी. वर नवीन बांधकाम निर्मिती करुन ग्राँऊंड लेवल वर तयार करण्यात आलेले १५ गाळ्यांपैकी समाेरचे दाेन गाळे उपविभाग शाखेचे सध्याचे कार्यरत असलेले अध्यक्ष व जिल्हा शाखेचे विद्यमान उपाध्यक्ष यांनी अन्य सभासदांची दिशाभूल व नियमांची पायमली करुन स्वता खरेदी करण्याबाबतचा परस्पर ठराव घेतला. तसेच या गाळ्या बाबतची बेसीक प्राईज ठरविण्यात आली नाही व त्याची प्रसिध्द सुध्दा देण्यात आली नाही. उपरोक्त सभेबाबत संघटनेच्या नियम २९ व ३० नुसार काेणतेही अनुपालन करण्यात आले नसुन स्वताच्या मर्जीतुन एक तर्फी निर्णय घेतला असा स्पष्ट आराेप राजेन्द्र पचारे यांनी आज बाेलतांना 
राजूरा मुक्कामी केला.

सदरहु बांधकामात गुंतविलेली रक्कम ही स्व.वि.म. उजवणे यांचे हयातीत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या केन्द्रीय सभेत ठराव पारीत करुन संघटनेची राजूरा स्थित जुणी वास्तु नव लक्ष २५ हजार रुपयांत विक्री करुन ती रक्कम बंँकेत जमा करण्यांत आली हाेती. त्याच कालावधीत उजवणे हयातित असतांना केन्द्राध्यक्ष यांचे पुर्वसंमतीने १२३\१२४\१२५\१२६ पैकी प्लाट क्र.५५ क्षेत्र ३०० चाै.मी. खरेदी करण्यात आला. या मध्ये ख-या अर्थाने सेवानिवृत्त तलाठी, मंडळ अधिकारी सभासद, दिवंगत झालेले तलाठी बांधव व आज हयातीत असलेले पटवारी व मंडळ अधिकारी यांचा सिंहाचा व माेलाचा वाटा हाेता हे विसरता येण्या सारखे नाही. जमा झालेली गुंतवणूक रक्कम व त्याची जपणूक ठेवण्याचे काम त्यांनी आज पावेताे प्रामाणिकपणे केले. यांची कल्पना सर्वांनाच हाेती.
विद्यमान असलेले पदाधिकारी, अध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी व इत्तरांनी आपल्या स्वार्थापाेटी उपरोक्त भूखंडाची विल्हेवाट लावण्यांचे षडयंत्र रचले. हा प्रकार एकंदरीत दिशाभूल करणारा असून भविष्यात संघटनेत दुफळी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरहु संघटना ही नाेंदणीकृत असून सभेचे सर्वांना नाेटीसा देणे हे अनिर्वाय हाेते परंतु उपरोक्त काही ठराविक पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांना विश्वासात न घेता मालमत्तेची पुर्णता विल्हेवाट लावली आहे.

अशा या प्रकारामुळे काही जुन्या व नव्या सदस्यांत नाराजीचा सुर उमटला असून, उपरोक्त प्रकरणात याेग्य चाैकशी व्हावी अशी अपेक्षा राजेन्द्र पचारेंसह अन्य काही सदस्यांनी व्यक्त केली आहे.  

राज्य कर्मचारी वर्गांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९ : ऑक्टो.) : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता आज शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोंबर 2021 ला दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
             
यासाठी सांप्रत महाविकास आघाडी सरकारने
1) NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी.
2)देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधीमंडळाच्या ठरावाव्दारे केंद्र शासनाला केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुध्दा अशी शिफारस तात्काळ करावी.
3) NPS धारक कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन आणि उपदान अनुज्ञेय करावे.
4)राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या 14 टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी आणि
5) ऑक्टोंबर 2005 पूर्वीच्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्विकारलेल्या तसेच नोव्हेंबर 2005 पूर्वी निवड होवून उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी परीभाशित पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देषाने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

उपराेक्त ठिय्या आंदोलनाला अध्यक्ष म्हणून दिपक जेऊरकर, प्रमुख अतिथी म्हणून अरुण तिखे, अविनाश सोमनाथे, शालीक माऊलीकर, सुचिता धांडे व बंडु मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. चंद्रकांत कोतपल्लीवार, अमोल आखाडे, सिमा पॉल, राजु धांडे, अरुण तिखे, शालीक माऊलीकर, सुचिता धांडे, सुनिल दुधे व दिपक जेऊरकर आदींनी मार्गदर्शन केले. सदरहु ठिय्या आंदोलनाचे सुत्रसंचालन संतोष अतकारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत गहुकर यांनी केले.
             
पार पडलेल्या या आंदोलनात महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, आरोग्य विभाग, पोलीस अधिक्षक कार्यालय कर्मचारी आदी विभागाचे कर्मचारी तसेच दिपक जेऊरकर, राजु धांडे, संतोष अतकारे, राजेश लक्कावार, राजेश पिंपळकर, श्रीमती सिमा पॉल, चंद्रकांत कोतपल्लीवार, श्रीमती रजनी आनंदे, अजय चहारे, संदीप गणफाडे, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, राजेंद्र समर्थ, गणेश मानकर, अतुल भिसे, शैलेंद्र धात्रक, प्रविण अदेंकीवार, अतुल किनेकर, अमोल अवधाने, मंगेश कोडापे, रविंद्र आमवार, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, नितीन पाटील, श्रीमती एस.आर. माणुसमारे, अनंत गहुकर, महेश पानसे त्याचबरोबर विविध कार्यालयीन संघटनांनी आपला सक्रिय सहभाग दर्शविला होता.

माजी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नेहारे काळाच्या पडद्याआड

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑक्टो.) : सुरेश किसनाजी नेहारे  (६०) रा. मारेगाव यांचे अल्पशा आजाराने आज  १२.२० वाजताचे दरम्यान, निधन झाले. मारेगाव येथील सिंहझेप तथा मारेगाव वार्ता (पोर्टल) मराठी दैनिकाचे प्रतिनिधी पंकज नेहारे यांचे ते वडील होते.

श्री.सुरेश नेहारे हे मागील चार दिवसापूर्वी स्वगृही प्रसाधन गृहात पडले होते. त्यांना लगेच चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर वर असतांना त्यांची प्राणज्योत मालविली.
सन १९८०-९० च्या दशकात त्यांनी राजकारणात उडी घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. लगेच जिल्हा पक्ष प्रमुखांनी उभरता शिवसैनिक म्हणून सुरेश नेहारे यांच्यावर 'तालुका शिवसेना प्रमुख' म्हणून जबाबदारी सोपविली होती. तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ते शिवसेनेचे मारेगाव तालुक्यातील प्रथम शिवसेनाप्रमुख होते. तालुक्यात शिवसेनेचा जन्म होताच सुरुवातीलाच तालुका प्रमुख होत त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. कालांतराने पक्षातील वैयक्तिक मतभेद व गटातटाने नेहारे यांनी माघार घेत राजकारणाला पूर्ण विराम दिला होता.

परिणामी आज अल्पशा आजाराने त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. सुरेश नेहारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा आप्तपरिवार आहे. 

लापता भिमराव पोतु टेकामचा "रेस्क्यू टीम" घेणार शोध


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२८ ऑक्टो.) : केळापूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अर्ली पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळशेंडा या गावातील शेतकरी भीमराव पोतू टेकाम (६५) हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला असता, शेजारील नाल्यांमध्ये शौचास बसल्या ठिकाणी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.

भिमराव वर वाघाने हल्ला तर केला नसेल ना! असा  संशय व्यक्त केला जात असून, पांढरकवडा पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोळी साहेब, वनविभाग, अभयारण्य विभागाची टीम तसेच शेकडो गावकऱ्यासह शोध मोहीम राबवली असून, गेल्या आठ दहा तासापासून सात ते आठ किलोमीटरचे अंतर शोधले, परंतु भिमराव चा कुठेच शोध न लागल्याने आज रेस्क्यू टीम कडून शोध घेण्यात येणार असल्याचे समजते.
या शोध भूमीमध्ये पोलीस विभाग, वनविभाग व गावकरी यांच्या माध्यमातून शोधाशोध केली असता, भिमराव न सापडल्याने वाघाने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
"गावकऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार भिमराव टेकाम हा ईसम २७ ऑक्टाेंबर पासून बेपत्ता असल्याचे कळले त्या अनुषगाने जंगल व परिसरात शोध घेण्यात येत आहे. परंतु अजून पर्यंत भिमराव चा शोध लागलेला नाही."

~ महेश बाळापूरे
वनपरिक्षेत्र अधिकारी टीपेश्वर अभयारण्य

लोकमान्य टिळक महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद


• रासेयो व राष्ट्रीय छात्र सेना आणि नगरपरिषद वणी प्रशासनाचा संयुक्त उपक्रम


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (२९ ऑक्टो.) : स्थानिक वणी दिनांक 22/10/2021 पासुन राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना व वनी नगर परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन कवच-कुंडल अभियाना अंतर्गत महाविद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेला महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.
 या लसीकरण शिबिराला महाविद्यालयालतील प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे , राष्ट्रीय छात्र सेना चे ANO प्रा.डॉ. रवींद्र मत्ते रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नीलिमा दवणे आणि प्रा. किशन घोगरे यांनी उपस्तीत राहून लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. व शुभेच्छा देत महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.  
    
या लसीकरण मोहिमेला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेवक हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

मारेगाव: वेगाव येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑक्टो.) : मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील महिलेला सर्पदंश झाल्याने तिचा मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज गुरुवारला सायंकाळी ६ च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने वेगाव सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
    
जिजा पुरोषात्तम माथनकर (५८) असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम असल्याने कापूस घेऊन महिला गोठ्याकडे आली. बैलांची व्यवस्था करीत असतांना गोठ्यातच जिजा ला सर्पदंश झाला. तातडीने तिला मारेगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.