Showing posts with label महत्वाचे. Show all posts
Showing posts with label महत्वाचे. Show all posts

सुरमाज फाउंडेशनने आझादी चा अमृत महोत्सव आणि ध्वजारोहण केला साजरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारत सरकारने आझादी का अमृत महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन केले होते, सुरमाज फाउंडेशन ने 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत चोपडा शहरातील लोकांना भारतीय ध्वजाचे मोफत वाटप करून हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आणि रॅली काढली.
त्यांनी तिरंगा कसा लावणार याचे मार्गदर्शन केले, त्याचवेळी मुलांमध्ये आझादी का अमृत महोत्सव या विषयावर निबंध आणी भाषण स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती असलेले प्रेम, प्रामाणिकपणा आणि प्रगती याविषयी जागृती केली आणि 15 ऑगस्ट 2022 ला सुरमाज फाउंडेशनने कार्यालयात ध्वजारोहण केले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी हाजी उस्मान शेख, झियाउद्दीन काझी साहेब, अबुल्लैस शेख, डॉ. रगीब, शोएब शेख, जुबेर बैग, मुजाहिद-ए-इस्लाम, शाहिद शेख, फिरोज भाई, डॉ. मोहम्मद जुबेर शेख व सूरमाज फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.