Showing posts with label सह्याद्री काव्यरंग. Show all posts
Showing posts with label सह्याद्री काव्यरंग. Show all posts

गुढी आनंदाची....

गुढी आनंदाची

सण आला हा पाडव्याचा 
घेऊन नवचैतन्य उत्साहाचा 
ध्यास असू द्या मनी प्रेमाचा
 आनंद हा नववर्षाचा,

फुलवा नात्यांचा गोडवा 
द्वेष मत्सराची गुंतागुंत सोडवा 

गुढी उभारा मनी प्रेमाची 
जणू पालवीच्या नवपर्णाची,
 
आसमंत गेला भरुनी 
वसंताच्या निर्मळ स्पर्शाने 
हिरवळ परिमळ झाली सृष्टी पशुपक्ष्यांची कोमलदृष्टी,

कलारव किलबिलांचे गुंजन
 गगन गेले सप्तसुरांनी रंगून 

जीवनी तुमच्या आनंद वसु दे 
हीच सदिच्छा मनी असू दे.

    
मंजुषा राजेंद्रप्रसाद पांडे



बाईपण....सौ समीक्षा गणेश डवरे देऊळकर यांच्या शब्दात


बाईपण

आईपण आणि बाईपण 
दोन्ही जिवांचा सांभाळ करते, 
ति आई कुठे काय करते..!

आईचो माया मुलांना देते, 
बाई म्हणून संपुर्ण वेळ घरात देते, 
जबाबदारी सोबत, सर्वांचा सांभाळ करते, 
ति आई कुठे काय करते..!

डोक्यावर जरी बापाचं छप्पर असले तरी,
 त्या घराला घरपण आई देते, 
नऊ महीने स्वतः त्रास घेते,तेव्हा ति एका बाळाला जन्म देते, शिक्षणासोबत त्यांना संस्कार करते, 
ति आई कुठे काय करते..!

घरातला त्रास सर्वांची कटकट सहन करते, 
समाज काय बोलले. नेहमी ति एकच विचार करते, 
ति आई कुठे काय करते..!

दुःख जरी असले तरी सर्व संकटांवर मात करते, 
पोट च्या गोळ्याला लहाण्याचं मोठं करते,
ति आई कुठे काय करते..!

सौ. समीक्षा गणेश डवरे देऊळकर 
रा. खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर 

शेतकरी रे माझा बाप...



शेतकरी रे माझा बाप...
राब-राब राबुनिया निघतोस रे त्याच्या अंगातून घाम 
शेतकरी रे माझा बाप...
करितोस जीवाचे तो हाल अन् कुटुंबाची समाजात ठेवतोस रे तो लाज.. 
शेतकरी रे माझा बाप...
पावसाळा आला की होते रे त्याची घणा-घाण.....त्याची झाली जरी घाणा-घाण....पण तो कधीचं मनत नाही दुखते रे माझे अंग पाय.. 
शेतकरी रे माझा बाप...
त्याच्या मनी कुठलाचं नाही गम....पेरणी, डवरनी ,फवारणी करूनचं टाकतो तो दमात-दम....व त्याच्या सोबतीला बैलाची जोड.. 
शेतकरी रे माझा बाप...
पेरणी, डवरनी ,फवारणी झाली की पुन्हा एकच चिंता त्याच्या मनी कधी पडेल रे पाणी आपल्या रानो-रानी
शेतकरी रे माझा बाप...
असाचं वर्षानुवर्ष करितोस रे रानात काम... 
पाहिजे तशी केली नाही त्याने शान..
 शेतकरी रे माझा बाप...
दुखते रे त्याचे खांद, मान तरी कष्ट करितोस रे तो बे-भान
शेतकरी रे माझा बाप...
आमच्या आयुष्यात आले- गेले किती पण दुःखाचे वारे...अन् खाण्याचे वांदे...तरी सुद्धा या महागाई च्या काळात कधीचं झुकू नाही, दिली कोणासमोर त्याची अन् आमची मान.. 
शेतकरी रे माझा बाप...
म्हणूनचं तर लोक म्हणतात माझ्या बापाला अहोऽ ऽ पाटील राम- राम -राम राम..
 शेतकरी रे माझा बाप...!!