मारेगाव येथे ग्रामसभा कोष समिती सदस्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : यशदा पुणे जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद यांचे सयुक्त विद्यमाने पंचायत समिती मारेगाव येथे पेसा ग्रामसभा कोष समितीच्या सदस्याचे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत दि.30 ते 31 जानेवारी ला दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
   
पुरातन काळापासून भारतामध्ये आदिवासी समाजाचे वास्तव्य आहेत. म्हणूनच त्यांना आदिवासी म्हणजे मुलनिवासी ही संज्ञा प्राप्त झाली आहेत. या समाजाची भारतात स्वातंत्र्य राज्ये होती. हा समाज दुर दऱ्याखोऱ्यात रहात असल्याने या क्षेत्रात दळण वळण, शिक्षण, आरोग्य व इतर पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे हा समाज या सुविधापासून वंचित राहिला. केंद्र शासनाने 73 वी घटनादुरुस्ती करून पंचायती राज संस्थाचे बळकटीकरण करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यामुळे लोकसहभागातून अनुसूचित क्षेत्राचा विकास साधन्यांची एक संधी पेसा गावातील आदिवासिंना मिळाली आहे.
"पेसा" कायदा हा आदिवासिंच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. हा कायदा आदिवासिंच्या जीवन शैलीशी निगडित आहे. तसेच आदिवासी समाज अजूनही सामूहिकरीत्या निर्णय घेत असल्याने ग्रामसभेच्या माध्यमातून तो गावाच्या विकासाचे निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
1996 मध्ये पंचायत क्षेत्र विस्तार कायदा परित झाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या कायदयाचे नियम तयार केले असून ते दिनांक 4 मार्च 2014 रोजी प्रसिद्ध केले आहेत. तरीही अजून पर्यंत पाहिजे तसी कायद्याची अमंलबजावणी प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. मारेगाव तालुक्यात एकूण २५ पेसा ग्रामपंचायत आहेत. पेसा ग्रामपंचायत मध्ये पेसा कोष समिती ही महत्वाची समिती असून, त्या समितीला गावाच्या लोक संख्या नुसार मोठया प्रमाणात गाव विकासासाठी निधी येतात. पण बऱ्याच ग्रामपंचायतीने अजूनही पूर्ण निधी गाव विकासासाठी वापरल्याचे दिसून येत नाहीत. किंवा बऱ्याच पेसा ग्रामपंचायतीने त्या निधीचा खर्च केला असेल तर त्यांच्या पेसा कोष समितीलाही त्याची माहिती सुद्धा नसल्याचे अनेक पेसा कोष समितीच्या सदस्यांनी चर्चेत सांगितले आहेत.

मात्र,काही हुशार ग्रामसेवक व सरपंच यांनी फक्त चेकवर त्यांची सही घेण्यासाठीच त्या पेसा कोष समितीचा वापर केल्याचे बोलल्या जात आहेत. अजूनही त्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराबाबत माहिती सुद्धा नसल्याचे चित्र तालुक्यातील पेसा कोष समितीच्या सदस्यामध्ये दिसत आहेत. करिता त्या पेसा कोष समितीच्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत मारेगाव येथे ग्रामसभा कोष समितीचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. सदरहू प्रशिक्षणाचे उदघाटन मा. गटविकास अधिकारी गज्जलवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाचे संचालन सुत्र संचालक पी. आर. टी. सी. चे निदेशक संजय राठोड यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये यशदा पुणे प्रविण्य प्रशिक्षक सुभाष पवार, मदन गेडाम, मारोती पाचभाई, संतोष आस्वले यांनी पंचायत क्षेत्रविस्तार कायदा 1996 यांचे ठळक वैशिष्ट्ये पूर्ण इतिहास,नियम 2014 पेसा क्षेत्रविस्तार कायद्यातील महत्वाच्या तरतुदी,ग्रामसभा त्याचे अधिकार अशा अनेक महत्वाचे व मोलाचे मार्गदर्शन केले. यामुळे आता पेसा कोष समितीच्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराची बरीच माहिती मिळाल्याने उपस्थितानी आयोजकांचे मनस्वी आभार मानले. या प्रशिक्षण शिबिराचा दोनही दिवस एकूण 25 गावाच्या पेसा समितीने उपस्थित राहून लाभ घेतला. 

राज्यव्यापी संप : उद्या मनरेगा कंत्राटी कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचा विविध मागण्या मान्य करण्यासाठी दि.27 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या असहकार आंदोलन तसेच मागण्या न झाल्यास उद्या 1 फेब्रुवारी रोजी पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी (CDO), डेटा ऑपरेट,ग्रामरोजगार सेवक यांचा काम बंद आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असून तोडगा न निघाल्यास आंदोलन असेच सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनास जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यात ग्रामरोजगार सेवक संघटना शाखा मारेगाव चे  तालुका अध्यक्ष खुशाल येरगुडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत सपाट, तालुका सचिव भगवान धाबेकर यांनी उद्या होणाऱ्या काम बंद आंदोलनास सहभागी होण्याचे आवाहन ही केले. 

निव्वळ संस्थेला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र : अ‍ॅड. देविदास काळे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी तालुक्याला सहकार क्षेत्राचा वारसा लाभला आहे. सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ओळखली जाते. अ‍ॅड. देविदास काळे यांच्या अध्यक्षतेत या पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. या पतसंस्थेला प्रगतीपथावर नेण्यात अ‍ॅड. देविदास काळे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळात या पतसंस्थेनं साधलेली प्रगती सर्वश्रुत आहे. आज रंगनाथ स्वामी ही पतसंस्था विदर्भात नंबर एकची पतसंस्था म्हणून ओळखली जाते, मात्र याच रंगनाथ स्वामी पतसंस्थेतून कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले होते. त्या अनुषंगाने आज 30 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी रंगनाथन चेंबर येथे पत्रकार परिषद घेऊन त्या आरोपाचे खंडन केले. संस्थेमधून कमी करण्यात आलेल्या कर्मचारी व अभिकर्त्यांनी संस्थेचा गैरव्यवहार अनियमित नियमबाह्य कर्ज वाटप इत्यादी बाबत आरोप केले त्या संदर्भात काही वृत्तपत्रात एकतर्फी दुसरी बाजू समजून न घेता बातम्या छापण्यात आल्यामुळे या संदर्भात या पत्रकार परिषदेत खुलासा करण्यात आला आहे.

वरोरा येथील दैनिक अभिकर्ते हे पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहकारी पतसंस्था या संस्थेचे काम करीत होते. सन 2008 ते 2011 पासून ते श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वरोरा येथे दिनांक 30/9/ 2011 ते 2022 या संपूर्ण काळात दैनिक अभिकर्ता म्हणून रंगनाथ स्वामी नागरिक सहकारी पतसंस्था वणी कडून एकूण कमिशन पोटी एक कोटी 81 लाख 16 हजार 653 रुपये त्यांना देण्यात आले. वरील दैनिक अभिकर्ते हे इतरही संस्थेत ठेवी गोळा करण्याचे काम करीत होते. व संस्थे विरुद्ध दुसऱ्या संस्थेत जास्त व्याजदर आहे. तुम्ही तुमच्या ठेवी श्री. रंगनाथ संस्थेत न ठेवता दुसरीकडे ठेवण्यास प्रवृत्त करीत होते. त्यामुळे त्यांची वागणूक संस्थेविरुद्ध असल्यामुळे त्यांना कामावरून कमी केले. संस्थेने वैयक्तिक नोटीस दिली व दैनिक लोकमत मध्ये 30/9/22 रोजी सूचना प्रकाशित केली आहे.

30 सप्टेंबर 22 रोजी 19 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. यामध्ये वणी, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, गडचांदूर, भद्रावती येथील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. यात कुणावर अफरातफर व कुणावर संस्थेची बदनामी करीत असल्याचा आरोप ठेवून संस्थेच्या संचालक मंडळ व अध्यक्ष यांनी कार्यवाही केली होती. त्या कर्मचाऱ्यांनी संस्थेला बदनाम करण्यासाठी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष व संचालक मंडळांनी अमर्यादित कर्ज वाटप इंडस्ट्रियल झोनवरील जमीनीवर पाच कोटी रुपयांचे कर्जवाटप, रंगनाथ चेंबर खरेदी इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नावर संस्थेचे अध्यक्ष ॲड.देविदास काळे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा देत संस्थेवर केलेले आरोप हे बिन बुडाचे व विरोधकांचे षडयंत्र असल्याचे सांगितले,तसेच 28 जानेवारी शनिवारी व 29 जानेवारी रविवार असल्याने दोन दिवस पतसंस्था बंद असल्याने व महिन्यांचा शेवटचा दिवस असल्याने आरडी (RD) भरण्यासाठी ग्राहकांची संस्थेत गर्दी झाली होती.त्यावर विरोधकांनी या गर्दीचा फायदा घेत अपप्रचार करून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. असे सुध्दा संस्थेचे अध्यक्ष ॲड देविदास काळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे संचालक रमेश भोंगळे, हरिभाऊ पांडे, सुरेश बरडे, निलिमा जिवने, छाया ठाकूरवार इत्यादी उपस्थित होते.

डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, TAIT परीक्षेची घोषणा, पाच वर्षांची प्रतिक्षा संपली

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

पुणे : पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा काल झाली असून राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. यासाठी उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे. या संगणकीय प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने 2017 मध्ये घेतला होता. त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये TAIT परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर अजून पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहेत. मात्र परिषदेकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.

असे आहे वेळापत्रक 
▪️ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी - 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
▪️परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी - 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
▪️प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
▪️ऑनलाईन परीक्षा तारखा - 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)

डिझेल च्या नादात गमावली लाख रुपयाची मोटारसायकल

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. अशातच डिझेल आणून देण्याचा बहानाकरून एका भामट्याने कैलास लक्ष्मण जुमनाके (वणी-मारेगाव बजरंगबली मंदिर परिसर) नामक इसमाची मोटारसायकल लांबवल्याचा घटना समोर आली.

काल दि.३० जानेवारी ला एका भामट्याने "तुला स्वस्त दरात ट्रॅक्टरसाठी डिझेल आणून देतो, तू पैसे दे म्हणत दुचाकी आणि सात हजार रुपये घेऊन गेला. मात्र मोटारसायकल भामटा, डिझेल आणि पैसे घेऊन गायब झाला. ही घटना दुपारी 1 वाजता च्या दरम्यान, घडली. माझ्या ओळखीचे खूप सारे जेसीबीवाले आहेत, दुचाकी वाहन धारकांना विश्वासात घेवून तुमी पैसे द्या मी डिझेल आणून देतो म्हणून पोबारा केला आहे. कैलास यांनी बराच वेळ त्याची वाट बघितली परंतु भामटा आलाच नाही, दुचाकी चा शोधही घेतला. मात्र मोटारसायकल कुठेही आढळून आली नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात घेत अखेर मारेगाव पोलीस स्टेशन गाठून या बाबत रीतसर तक्रार दाखल केली.

दुचाकी क्रमांक. एम. एच. 29 एच. बि आर. 8257 होंडा कंपनीची असून भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असता पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे. 

महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहिर

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहिर झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे.

यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्या मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.

दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या पथसंचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ संचलित होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या आशयाखाली "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती" हा विषय निवडला होता. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या लोककला आणि मंदिर शैलींचा वारसा दाखवण्याचाही यातून प्रयत्न करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ कर्तव्यपथावर संचलित झाला होता. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्या विलोभनीय प्रतिकृती चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असणारा लोककलाकार भव्य स्वरूपात दर्शवण्यात आला होता. चित्ररथा सोबत निषाद गडकरी व सुमित यांच्या समूह पथकाने शानदार नृत्य सादरीकरण केले होते. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले होते. कौशल इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन सुंदर गीत तयार केले होते. सिद्धेश व नंदेश उमप यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.

या चित्ररथाची मूळ संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची होती तर या संकल्पनेचे विस्तारीकरण प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक विभीषण चवरे यांनी केले होते. शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथावरील शिल्पाचे काम साकार केले होते.
१९७१ पासून महाराष्ट्राला १४ वेळा पारितोषिक

दरवर्षी २६ जानेवारीला नवीदिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होत आहे. आतापर्यंत म्हणजे १९७१ पासून ते २०२३ पर्यंत महाराष्ट्राला १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. सर्वप्रथम १९८१ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. तर १९८३ मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळाले. यानंतर १९८६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारीत चित्ररथास दुसरे पारितोषिक तर १९८८ साली लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारीत चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. यानंतर १९९३ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर १९९४ साली हापूस आंबा या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले. १९९५ साली बापू स्मृती या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने पारितोषिकांवर आपली आघाडी सिध्द केली आहे.

२००७ मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथास तिसरे पारितोषिक तर २००९ मध्ये धनगर या चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. २०१५ मध्ये "पंढरीची वारी" या चित्ररथास पहिले पारितोषिक तर २०१७ मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांनी दिलेल्या स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे या घोषणेचा शताब्दी महोत्सव तसेच सर्वाजनिक गणेशोत्सव अभियानाची १२५ वर्षे या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळाले. २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. तर २०२२ मध्ये महाराष्ट्राची जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास सर्वात लोकप्रिय चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळाले. आणि आता २०२३ मध्ये "महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती" या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

यावर्षी प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतही महाराष्ट्राच्या चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे, हे विशेष. व्हिजनरी परफॉर्मिंग आर्ट या पथकाने हे अप्रतिम सादरीकरण केले होते. सांस्कृतिक संचालनालयाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्ररथ या दोन्हीवर खूप मेहनत घेतली होती.

आतापर्यंत एकूण ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक तर ४ वेळा दुसरे पारितोषिक आणि २ वेळा तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंहांचे मानले आभार

१९७० पासून दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्र चित्ररथ सादर करीत आहे. मात्र दरवर्षी काही राज्यांनाच चित्ररथ सादर करण्याची संधी मिळत असल्याने आतापर्यंत ११ वेळा महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली नाही. तशी ती यावर्षीही नाकारण्यात आली होती. मात्र नागपूर अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून महाराष्ट्राला यावर्षी चित्ररथ सादर करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्री. मुनगंटीवार यांनी श्री. सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज दि.३० जाने. रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के,
औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.

भव्य शुभारंभ : न्यू पारस गंधर्व

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : खरं तर आपण सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या सहकार्यातून विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज यांचे कृपेनें दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोज बुधवार पासून "न्यू पारस गंधर्व" फ्लाय ऍश ब्रिक्स अँड सिमेंट पेवर चा शुभारंभ संपन्न होत आहे. हा शुभारंभ आदर्श उपक्रम म्हणून पुढे ठरावा या उदात्त हेतूने येथील कामगारांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. हे विशेष..

आमच्या या नव्याने सुरू होत असलेल्या उद्योगाला आपण माझे सहकारी मित्र तथा स्नेही म्हणून उपस्थित राहाल अशी मी आणि माझ्या सोबत असलेला सहकारी मित्र आपण सर्वांची येण्याची वाट पाहतो आहे.
येत्या बुधवार ला नांदेपेरा रोड रसोया फॅक्टरी च्या समोर वणी येथे दुपारी 1 वाजता पूजन. त्यानंतर लगेचच दु. 2 ते 5 या वेळात स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार या भव्य शुभारंभाला आवर्जून यावे असे, न्यू पारस गंधर्व चे संचालक अविनाशभाऊ लांबट व प्रवीणभाऊ बोथले यांचे तर्फे आग्रहाची विनंती करण्यात येत आहे. 

कर हर मैदान फतेह: आपटी घाटावर रेती तस्करांची खेळ पट्टी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर स्थानिक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी मात्र, तालुक्यातील नदी घाट रेती तस्करांनी बहुतांश साफ केले आहे याचं काय? कोरोडोची संपत्ती चोरीला गेली त्याचा कोण हिशेब देणार आणि घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या महिन्यात कोसारा येथील कार्यवाही, मागील आठवड्यात करणवाडी त्यानंतर दांडगांव येथील ट्रॅक्टर पकडून त्यावर कारवाई केली गेली. आणि ह्या कारवाया होतच राहतील,परंतु तस्करी व शासनाला लावलेला चुना हा थांबतील का?...तालुक्यातील नदी घाटावरील हजारो ब्रास रेती गायब झाली, त्याचं काय? जवळपास करोडो रुपयांची रेती चोरीला गेली असल्याचा अंदाज वर्तविला जात असून अजूनही रेती तस्करी वर पाहिजेत तसे नियंत्रण संबंधित विभाग, प्रशासन आणू शकले नाहीत किंबहुना कारवाई शंकाच्या भोवऱ्यात असल्याचे बोलल्या जात आहे. 
शहरासह ग्रामीण भागात रेती चोरीला जाने हा नित्याचाच विषय असून तस्करीला मोठे उधाण आले आहे. दिवस-रात्रीचा फायदा घेत आपटी या नदी घाटातून खुलेआम रेती तस्करी करून त्या ठिकाणी "खेळ पट्टी" च्या मैदानाचे स्वरूप आल्याचे चित्र पाहावयास मिळतेय. चक्क नदी काठा च्या या पलीकडून ते मध्यभागी पाणी असलेल्या भागापर्यंत किमान रेती गायब, किंबहुना वाळू ची चोरी झालेली दिसून येते. हे सर्वश्रुत उघड असतांना देखील यावर का अंकुश लावण्यात प्रशासन कुठे "फेल" अपयशी ठरत आहे ? असा प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. या रेती तस्करीत गांव पुढारी, नेते मंडळी यात गुंतल्याचे, बोलल्या जात आहे. या गोरखधंद्यात आपापल्या परिसरातील आपला घाट वाटून घेत शासनाचा करोडोचा महसूल रेती तस्करांनी आपल्या घशात घातला आहे. शिवाय यात बहुतांश हात संबंधिताचे ओले होत असल्याने नेमका कारवाईचा बडगा कसा व कुणावर उगारायचा, हा पेच'च आहे. असेही चर्चील्या जाते.
तूर्तास तालुक्यासह आपटी घाटा वर मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून स्थानिक प्रशासन याला आळा घालू शकतील का? याकडे पाहणे गरजेचे झाले असून,रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने गरजूना वाळू मिळतेय खरं, परंतु बेभावात रेती घ्यावी लागत असून यात शासनाला मात्र रेती चोरट्यांनी चुना लावला हे खरे.

परिणामी मारेगाव तालुक्यातील रेती तस्करी, हा गहन विषय झाला असून अवैध रेती तस्करांवर अंकुश ठेवायचे असेल तर योग्य नियोजन, रोखठोक कार्यवाही त्या शिवाय पर्याय नाही...!
असं स्थानिकाकडून बोलल्या जातेय हे विशेष... 

जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

   
   
       ⚛️ राशीभविष्य : सोमवार ३० जानेवारी २०२३

मेष:
कामाची लगबग राहील. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांच्यात रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. हातातील कामात यश येईल. संयम वाढेल, पण मनही अस्वस्थ होऊ शकते.व्यवसायाच्या विस्तारासाठी पालकांकडून पैसे मिळू शकतात.एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते.

वृषभ:
प्रवासात काहीसा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. मन प्रसन्न राहील.राग कमी होईल.कुटुंबाचे सहकार्य मिळेल.व्यवसायावर लक्ष केंद्रित करा.अडचणी येऊ शकतात.सावध रहा.बौद्धिक कार्यातून उत्पन्न वाढेल.

मिथुन:
औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. तुमची समाजप्रियता वाढेल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. मनात आशा-निराशेची भावना येऊ शकते.आरोग्याबाबत सावध राहावैद्यकीय खर्च वाढू शकतो.कुटुंबाचे सहकार्य मिळेल.शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील.

कर्क:
वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. चिकाटी सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल, पण मनात चढ-उतार असतील.कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.गोड खाण्यात रस वाढेल.जगणे वेदनादायक असू शकते.

सिंह:
व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मन अस्वस्थ राहील.आत्मविश्वासाची कमतरता राहील.जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.इमारतीच्या आनंदात वाढ होऊ शकते.कुटुंबात धार्मिक कार्यक्रमही होतील.खर्च जास्त होईल.

कन्या:
जोडीदाराच्या मताचा आदर कराल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील. मनात चढ-उतार असतील.मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.नोकरीत अधिका-यांचे सहकार्य मिळेल, परंतु काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

तूळ:
कामाला योग्य दिशा मिळेल. उत्कृष्ट साहित्य वाचनात येईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. कामे वेळेत पूर्ण करता येतील. मन थोडे चंचल राहिल, पण आत्मविश्वास भरभरून राहील.कला किंवा संगीताकडे कल वाढेल.शैक्षणिक कार्यात संशोधन कार्यासाठी परदेशात जाऊ शकता.

वृश्चिक:
आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडावे. गरज पाहून खर्च करावा. मानसिक शांतता राहील.आत्मविश्वासही भरपूर असेल.मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधी मिळू शकतात.गर्दी वाढेल.लाभाच्या संधी मिळतील.

धनू:
शांत व संयमी विचारांची जोड घ्यावी. उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आत्मसंयम ठेवा.अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा.मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या.नोकरीच्या व्यापात वाढ होऊ शकते.अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

मकर:
मानसिक चंचलता जाणवेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. काही कामे तुमचा कस पाहतील. मन प्रसन्न राहील.तरीही आत्मसंयम ठेवा.मित्राच्या मदतीने व्यवसायासाठी गुंतवणूक करू शकता.वडिलांकडून पैसे मिळू शकतात.आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ:
श्रमामुळे थकवा जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. पैशाचे गणित तपासून पहावे लागेल. कामात चंचलता आड आणू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे. कला किंवा संगीताकडे कल वाढेल.आईचा सहवास मिळेल.नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.उत्पन्न वाढेल.खर्चही वाढू शकतो.

मीन:
गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. झोपेची तक्रार दूर करावी. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. संयम वाढेल.शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात रस वाढेल.मित्रांशी सुसंवाद ठेवा.निरुपयोगी वादविवाद टाळा.प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

किरणताई देरकर उपेक्षित महिलांना आधारवड...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्त्यां सौ किरण संजय देरकर ह्या उपेक्षित महिलांच्या आधारवडच बनल्या,असं म्हटणं वावगं ठरणार नाही. त्या सतत कर्तबगार महिलांना सक्षमीकरण या उदात्त हेतूने दरवर्षी काहीं ना काही व्यवसायाचे साधन उपलब्ध करून देतात. त्यात व्यवसायाचे पीठ, शिलाई मशीन अशाप्रकारे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकरी, स्त्रिया,कामगार महिला,व व्याधीने अडचणीत असलेल्या भगिनींना आधार देत,स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आधार दिला जात आहे.

यावर्षी सुद्धा सन्मान स्त्री शक्तीचा या फाऊंडेशन द्वारे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रम परमडोह येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्त्री -शक्तीचे दमदार स्वागत व जल्लोष करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अधक्ष किरण देरकर या प्रमुख उपस्थित होत्या. सोबतच प्रमुख पाहुणे म्हणुन गीता काकडे,(पोलीस पाटील), कलावती डवरे,लता वाभीटकर, कु.श्वेता जैन (ईंडेन गॅस संचालीका),सुरेखा ढेंगळे (व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष), शारदा चिंतकुंटलवार (सा.कार्यकर्त्या)होत्या. वेळी गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.

या प्रसंगी किरण देरकर यांनी उपस्थीत महिलांना विधवा प्रथा,रुढी-परंपरा समाजाला कशा घातक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले. परिसरातील महीला वर्ग यांना सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची चळवळ प्रत्येक स्त्री पर्यंत कशी पोहचेल आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करुन महिलांना न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी परमडोह येथे 'सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन' ची स्थापना करण्यात आली,ही संघटना नेहमी तत्पर असेल असे आश्वासनच नाहीतर विश्वास निर्माण केला.

दरम्यान आशासेविका योगीता डाखरे, फुलझेले मॅडम (पि एस सि), भावना किनाके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील विधवा महिलांना वाण देऊन आपल्या बोलण्यातुनच नाही तर कृतीतुन समाजात बदल घडवून आणण्यच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे असं त्या या प्रसंगी म्हणाल्या. यावेळी उपस्थीत महिलांनी आपल्या नावीन्यपूर्ण कला सादर केल्या. 
 
या कार्यक्रमाला उपस्थित फाउंडेशन च्या सदस्या वैशाली देठे, शारदा चिंतकुंटलवार, सुरेखा ढेंगळे, मीनाक्षी मोहीते, अर्चना पिदूरकर, वेणु झोडे व सजीता मोहुर्ले, गीता सोयाम, माधुरी टेकाम, प्रीया कोडापे, बेबीबाई सुरपाम, शोभा सोयाम, मंदा पेंदोर, शारदा पेंदोर गावातील सर्व महीला भगीनी,गावातील सरपंच, सर्व महीला बचत गट व युवक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन सहकार्य केले. कार्यक्रमाचे नागेश मोहूर्ले यांनी सूत्रसंचालन केले व राजेंद्र ईद्दे यांनी प्रास्ताविक मधुन "सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन" यांच्या कार्यावीषयी माहीती दिली. किरणताई उपेक्षित महिलांना आधारवडच, असे उपस्थित महिलांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी बेटी "बचाओ बेटी पढाओ" शपथ देऊन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

संजय देरकर यांचा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मतदार संघातील मनमिळावू संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले व समाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या खास शैलीत आपली कारकीर्द ओळख करणारे संजय भाऊ देरकर यांचा 59 व्या वाढदिवस 17 जानेवारिला विविध समाजपयोगी सामाजिक कार्यक्रम राबविले, ह्या मध्ये भव्य मॅरेथान घेण्यात आली. ह्या चार प्रमुख गटात ही स्पर्धा घेण्यात आली. ह्या प्रत्येकी चार बक्षीस ठेवण्यात आले ह्या मॅरेथान मध्ये जवळपास 350 च्या मुली/ मुली स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 
पुरुष खुला गट
प्रथम दिपक प्रसाद चंद्रपूर 3000/रोख व सन्मान चिन्ह, 
द्वितीय क्रीश मिस्त्री राजूर 2000/ रोख व सन्मान चिन्ह, 
तृतीय प्रणय लांडे दाताला चंद्रपूर 1500/ रोख व सन्मान चिन्ह, चतुर्थ रितिक ढोढरे चंद्रपूर 1000 /रोख् व सन्मान चिन्ह व इतर पाच लोकांना प्रोत्साहनपर मेडल देण्यात आले.

महिला खुला गट
प्रथम गौरी मधुकर नन्नावरे 3000/ रोख व सन्मान, 
द्वितीय निलिमा निकोडे वणी 2000/रोख व् सन्मान चिन्ह,
तृतीय चित्रा अनिल टेकाम यांचा ही बक्षीस मिळवण्यात समावेश आहे.

राजुर कॉलरी येथे जिजाई ऑनलाइन ड्रायविंग लायसन्स सेंटर व राजुर बचाव संघर्ष समिती जनसंपर्क कार्यालय चे उज्घाटन संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

 वणी : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून राजुर येथे काल दिनांक 27.01.2023 रोजी जिजाई कम्प्युटर आणि राजुर बचाव संघर्ष समितीच्या वतीने राजुर येथे विध्यमान सरपंच मा. विद्याताई पेरकावार, माजी सरपंच मा. प्राणिताताई मोहम्मद असलम व मा. संघदीपभाऊ भगत यांच्या हस्ते जिजाई ऑनलाइन सेंटरचे राजुर बचाव संघर्ष समितीचे उज्घाटन करण्यात आले.यात जिजाई कम्प्युटर कडून विविध कार्डचे शिबीर दिनांक 26/01/2023 ते 10/02/2023 पर्यंत घेण्यात येत आहे, या शिबिरात करण्यात येणारी कामे १. ड्रायव्हिंग लायसन्स २. पॅन कार्ड ३. आयुष्यमान भारत (गोल्डन कार्ड)(मोफत) ४. आभा कार्ड (मोफत) ५. एम्प्लॉयमेंट कार्ड ६. श्रम कार्ड ७. वोटिंग कार्ड ८. विमान पासपोर्ट ९. उद्योग आधार १०. शॉप ऍक्ट लायसन्स इत्यादी व अन्य कामे करण्यात येईल. यावेळी जिजाई कम्प्युटर च्या वतीने जनतेला आव्हाहन केले की शासकीय व निमससकीय योजना व कार्ड बनविण्याचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाला उपस्थित कुमार मोहरमपुरी, मोहम्मद अस्लम, अशपाक अली, साजिद खान, नंदकिशोर लोहकरे, रियाजुल हसन, सुशील आडकीने, दिशा फुलझेले, कन्हय्या कलपूरवार, संजय पिसे, नंदकिशोर मून, साबीर अली, भास्कर कलपूरवार, सुरज कश्यप, यश क्षीरसागर, शेखर पेंटापट्टीवार, यशवंत दोरखंडे, नूतन कवाडे, हिना हसन ई. उपस्थित राहून कार्यक्रमाला द्विगुणीत केला.

कोर्टात सदुचं लग्नं; अहो आश्चर्यम! 26 जानेवारी ह्या सुट्टी च्या दिवशी कोर्टात लागले लग्नं


सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगांव : कोर्टात लग्नं लागणे हा नित्याचाच प्रसंग. पण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी ला कोर्टात कसं काय लग्नं हा प्रश्न साहजिकच मनात आल्याविना राहात नाही.
       
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दीर्घ काळानंतर मारेगांव वकील संघातर्फे मारेगांव दिवानी व फौजदारी न्यायालय परिसरात धमाल रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धाची दिवसभर रेलचेल होती. त्यात वीस ते पंचवीस वर्षापासून अक्ख्या महाराष्टाला वेड लावलेली हुंडा पद्धती विरोधातील भन्नाट विनोदी दोन अंकी नाटीका सादर करण्यात आली. सर्वच कलाकारांनी जीव ओतून आप आपली पात्र साकारली. शांता च्या भूमिकेत प्रगती मुरस्कार, बाळू ची भूमिका वसीम शेख, कांचन ची भूमिका अ‍ॅड. करिष्मा किन्हेकर, रामभाऊ ची भूमिका विनिश मेश्राम, बारीकराव ची भूमिका ऍड. मेहमूद खान, सदूची भूमिका प्राचार्य हेमंत चौधरी आणि पाते इत्यादिंनी भूमिका साकारल्या.
       नाटीकेची निर्मिती प्रा. हेमंत चौधरी, रंगभूषा ऍड मृणाली गाणार तर संगीत नियोजन अजित खंडारे व रवि घुमे, इत्यादीन्नी सांभाळली.
            (पहा दोन अंकी नाटकाची छोटीशी झलक)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी. बी. नाईकवाड तर उदघाटक म्हणून मारेगांव चे न्यायाधीश श्री निलेश वासाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून केळापूरच्या न्यायाधीश एस. एस. कुलकर्णी मॅडम, मारेगांव वकील संघांचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. हुसैनी, सचिव अ‍ॅड. परवेज पठाण, वणीचे न्यायाधीश पी. सी. बछले, एस. के. शेख, अ‍ॅड. शामली वासाडे, सौ. मेघा नाईकवाड इत्यादी हजर होते.

सार्वजनिक ठिकाणी येऊन अश्लील चाळे करणं आले त्यांच्या अलंगट



सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील प्रेमनगर रेड झोन परिसरातील देह विक्री करणाऱ्या महिला सार्वजनिक ठिकाणी येऊन अश्लील चाळे करत पुरुषांना मोहात अडकवण्याच्या नाद त्यांच्या अलंगट आला असून यासंदर्भात तिघीं विरुद्ध वणी पोलिसांनी कार्यवाही केली. 

या परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिला चक्क सार्वजनिक ठिकाणी येत अंगाचे प्रदर्शन करत आपल्या मोहपाशात अडकविण्यासाठी पुरुषांना हातवारे करणे सुरू केल्यामुळे तिन महिला विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

आज दि.शनिवारी 28 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर हे 1 वाजता चे सुमारास रेड झोन (प्रेमनगर) येथे सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, महिला पोकों प्रगती काकडे यांचे सह गस्ती वर असतांना तीन देहविक्री व्यवसाय करणाऱ्या मादक महिलांनी सार्वजनिक ठिकाणी येऊन येजा करणाऱ्या इसमांना आपल्या अंगांचे प्रदर्शन मांडून अश्लीलरित्या हातवारे ईशारे करत चिल्लमचाल्ली करीत असतांना मिळून आल्या. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याचे संकेत लक्षात घेत त्यांचे विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम 7.8 नुसार कार्यवाही करून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रदिप शिरस्कर वणी, सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, पोहवा सुहास मंदावार, महिला पोकों प्रगती काकडे यांनी केली.


नगरसेवक आकाश बदकी यांच्या निवासस्थानी माजी मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिली व्हिजिट

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज दिनांक 28/01/2023 रोजी शनिवार ला वणी येथे विजया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल च्या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवर कार्यक्रमाचे अध्यक्ष, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजुयभाऊ बोदकुलवार प्रमुख अतिथी, डॉक्टर महेंद्र लोढा, रवीभाऊ शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

त्यानंतर लगेच सदगुरु जगन्नाथ बाबा यांच्या दर्शनासाठी सन्माननीय माजी मंत्री विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवर यांनी जगन्नाथ बाबा समाधीस्थळी भांदेवाडा जाऊन समाधीचे दर्शन घेतले व त्यानंतर मारेगांव येथील आकाश बदकी नगरसेवक यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. दरम्यान,अनेक राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा केल्या नंतर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर यांच्या सुद्धा घरी जाऊन भेट दिली.

यावेळी मार्डी चे सरपंच रविराज चंदनखेडे, प्रफुलभाऊ विकणकर, गणेशभाऊ चवले, अंकुश माफुर, यादवराव काळे, देविदास खोले, गजुभाऊ चौधरी, प्रविण कुचनकार, राजुभाऊ किन्हेकार, चेतण आवारी, विठल काळे, साहेबराव ठाकरे, सतिष गारसे, व तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच तसेच सोसायटीचे अध्यक्ष संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुगंधित तंबाखू सह एका इसमाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणीत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ च्या वतीने मोठी कारवाई करत तब्बल 2 लाख 63 हजार 670 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज 28 जानेवारी 23 रोजी गुन्हा नोंदवून केली.

राज्यात गुटखा बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्री केली जात आहे. वणीत देखील मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरीष्ठाना अवघत करत प्राप्त आदेशानुसार गोपनीय माहिती ची खात्री केली असता शहरातील साने गुरुजी नगर फाले ले ऑऊट मध्ये क्र. एम एच 29 ए आर 5468 हे चार चाकी वाहणासह एक इसम उभा असलेला दिसून येताच त्याची विचारपूस करून माहितीप्रमाणे खात्री करून घेतली असता आरोपी मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलेकर (34) यास ताब्यात घेवून अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना पचारण करून दि.28 जानेवारी रोजी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे व अन्न व औषधं प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलेकर विरुद्ध वणी पोलिसात भांदवी कलम 188,272,273,338, अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमने 2011 चे कलम 26 (2), 27.30 (2) (अ) कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान,सुगंधित तंबाखू व मारोती सुझूकी वाहन जप्त केले,सदर घटनेने परिसरात सुगंधित तंबाखू ची विक्री व शॉप वापरकर्त्यांची दाणादाण उडाली. 

जिल्ह्यात कुठेही प्रतिबंधित गुटखा व विक्री होत असल्यास तसेच सुगंधित तंबाखू साठा आढळून आल्यास स्थानिक गुन्हे शाखेला कळवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, पोना सुधीर पांडे, पोहवा नरेश राऊत यांनी केली आहे.

दोन चोरट्यांना वणी पोलिसांनी केली अटक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील दिपक टॉकीज परिसरात दोन इसम चोरीच्या दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी डिबी पथकांच्या चमुंना त्या परिसरात पाठविले असता बजाज प्लॅटिना एम एच 34 बिडी 3248 ह्या क्रमांकाची दुचाकी घेवून फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना मोटारसायकल बाबत विचारपूस केली, परंतु त्यांनी सुरुवातीला थातूर मातुर उत्तरे दिली. दरम्यान, चोरीच्या दुचाकी असल्याचा संशय बळावला आणि त्यांना विश्वासात घेत विचारले असता त्यांच्या चोरटेपणाचा कार्यक्रम ओपन झाला. त्यांनी वरोरा येथून चोरून आणल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर त्यांनी आणखी प्रेमनगरातील झुडुपात लपवून ठेवल्याचेही सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चोरट्यांनी दुचाकी चोरून आणलेल्या वणी शहरात विकण्याच्या बेताने दोघेजण दिपक चौपाटी परिसरात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळाली, त्या आधारे दोन डिबी पथकाच्या चमुंना पाठवून दोन सराईत चोरट्याना ताब्यात घेण्यास वणी पोलिसांना यश आले. त्यांनी चोरून आणलेल्या पाच मोटारसायकल,दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद अब्दुल कादिर थैम (26) रा. मोटर मॅकॅनिक हनुमान वार्ड मेन रोड वरोरा, रंजित रंगराव कनाके (25) कॉलरी वार्ड वरोरा जिल्हा चंद्रपूर दोघेही येथील रहिवाशी असून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे प्रमुख सपोनि माधव शिंदे, सफौ सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिन्दकुमार भारती, संतोष आढाव, व पुरुषोत्तम डडमल यांनी केली. 

उद्या संडे'ला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धा मारेगाव येथे


सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव :
 उद्या शहरात 29 जानेवारी रोजी येथील नगर पंचायत च्या भव्य पटांगणात विदर्भ स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धे चे आयोजन संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था मारेगाव द्वारा संलग्नित 'स्वरधारा ग्रुप' च्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेत समूह नृत्या साठी जनहित कल्याण संघटनेच्या पारितोषिक,स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नृत्य कलावंतांच्या कलेला वाव देण्यासाठी दरवर्षी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरधारा ग्रुप चे नागेश रायपुरे, अशोक कोरडे, विशाल किन्हेकार, विवेक बोबडे, सचिन देवाळकर, शेख इफ्तेखार, आकाश येरमे, श्रीकांत सांबजवार, निखिल कोरडे, हरीश नेहारे, दिलीप आत्राम, मोहन शेंडे, सागर लोणारे, अनिकेत माफूर आदींनी केले आहे. 

शाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधारसक्ती, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निर्णय..

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचं आधार कार्ड देखील लिंक केलं जाणार आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकनं हा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी पटसंख्या प्रकरणी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल स्वीकारून राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. 

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आधारसक्तीचा निर्णय 
बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यानंतर आता यापुढं शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही आधारसक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (27 जानेवारी) घेतला आहे.
शाळा प्रवेशामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं काही मार्गदर्शक सूचना देखील तयार केल्या आहेत.

शाळा प्रवेशाबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना

● विद्यार्थ्यांचे प्रवेश हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसोबत जोडण्यात यावेत.
● प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड सादर करण्यात यावे
● शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम करेल
● विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरून घ्यावा. प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी असावी. 
● प्रवेश अर्जावर पालक आणि विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असावेत. 
● प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्र प्रमुखास देण्यात यावी. तर एक प्रत शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावी.
● शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटपडताळणी पार पाडावी त्यात दुरउपयोग आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करावा,
काही कारणांमुळे पालक आधारकार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणांमध्ये पालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा.

मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

पुणे : आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

यशदा येथे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात शाळेतील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी शासन सहकार्य करेल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला इमारती, संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणाऱ्या खर्चात अधिक वाढ करण्यात येणार आहे. मुलींच्या खेळ व शिक्षणावर शासनाने विशेष लक्ष दिले आहे. त्यांना अधिकच्या सुविधा मिळण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर करावा.

श्री. पाटील पुढे म्हणाले, छोट्या शाळेत प्रयोगशाळेसारखे खगोलशास्त्राचा अभ्यासाकरीता आभासी तारांगण उभारण्याच्या प्रयत्न करण्यात येणार आहे. मोठ्या शाळेत मिळणाऱ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन आग्रही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्या इयत्तेआधी ३ वर्ष बालकांवर उत्तम संस्कार होण्याच्यादृष्टीने देशाची, भूगोलाची, राष्ट्रपुरुषांची माहिती होण्यासाठी त्यांच्या वयोमर्यादेचा विचार करुन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. लहानपणी घेतलेल्या शिक्षणाचा परिणाम भविष्यात होत असतो. आगामी काळ गुणवत्तेचा असून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता संपादन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

प्रस्ताविकात श्री. प्रसाद म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. जिल्हा परिषदेने चांगली कामगिरी करुन विद्यार्थी निवड संख्येत वाढ केली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासकीय, अनुदानित, खासगी शाळेत दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 'निपूण भारत' कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात दोन ते तीन वेळेस विद्यार्थीनिहाय सुक्ष्म अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येतो. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

आचार्य विनोबा भावे ॲप तयार करण्यात आले आहे. शाळा सुधार कार्यक्रम जिल्ह्यात ३९७ शाळेत राबविण्यात येत असून या शाळा आदर्श शाळा करण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून देशासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री प्रसाद म्हणाले.
पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथामिक व पूर्व माध्यमिक परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले १०५ विद्यार्थी, इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत देशात व राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेले १० विद्यार्थी, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणलेल्या ६ शाळा आणि जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झालेल्या शाळांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

वन्य जीवन वाचवा सर्पमित्राना संपर्क करा- सर्पमित्र हरीश कापसे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : पावसाळ्यात जेव्हा साप बाहेर पडतात तेव्हा लोक घाबरतात आणि त्यांना अनेकदा मारतात, जेव्हा जेव्हा साप बाहेर पडतात तेव्हा त्यांना मारण्याऐवजी सर्पमित्रांना बोलवा. नागरीकांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा जेव्हा एखादा साप बाहेर येतो तेव्हा सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरुन सर्पमित्राला लवकरात लवकर पकडता येईल.

पावसाळ्यात जमिनीच्या आत बनवलेल्या बिळात साप राहतात, या बिळात पाणी भरल्याने ते बाहेर पडतात. कोरड्या जागेच्या शोधात ते घरात घुसतात. त्यासाठी शहरातील सर्पमित्रांना फोन करताच ते सहकार्यासाठी येतील.
तालुक्यातील सर्पमित्रांचे क्षेत्रनिहाय संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:

सर्पमित्र हरीश कापसे वणी -7350264964.      
              
अविनाश हिवळेकर वागदरा वणी -8080244250,.    
                      
गजानन क्षीरसागर केसूर्ली- 9284870679.            

बापू मडावी नवीन वागदरा वणी - 9325303087.                                             
जमशेद हुसेन वणी - 8888718031

मोरेश्वर धाबेकर मंदर - 9307924119.             

सुरज नथुजी पारशिवे उकणी- 9689599822.              

गोलू चौधरी बेलोरा -7249551287.

गणेश चौधरी उकणी -8381090755.                         

अभय मोडक उकणी -7038173523.                          

प्रफूल पिंपळशेडे - 9284317479.   

नितीन माणुसमारे तरोडा सुंदर नगर - 9763881652.                        
अर्जुन राठोड करंजी रोड - 7796393878.                         

निखिल जाधव मारेगाव - 9579039256.                          

सम्यक तेलंग रांगना भुरकी -9673410930.                

महेंद्र उईके रांगना भुरकी -9673410930.

आर्यन कवाडे घुघूस -7972248765.

 नितीन वाढई घुघूस -8378057839

 स्वप्नील गोवारदीपे उकणी -7743803924

धनराज मतीरे उकणी -7666356391

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन नियोजनबध्दरित्या अचूकपणे कामे पार पाडावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपटट्टे यांनी आज येथे दिले.

पदवीधर मतदार संघाच्या 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने नियोजनभवन येथे मतमोजणीचे सादरीकरणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावन कुमार, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, विजय भाकरे, अजय लहाने, अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, रविंद्र महाले यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत मस्के यांनी यावेळी उपस्थितांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले.

या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 340 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

मतमोजणीची प्रक्रिया

बडनेरा येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर हजर राहावे. सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर मतपेट्या स्ट्राँग रुममधून आणून उघडण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस टेबल राहणार असून त्यावर 28 चमू मतमोजणीचे काम पार पाडणार आहे.

संशयित मत पत्रिकांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

संशयित बॅलेट पेपरसंदर्भात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कुठलीही चूक होऊ नये म्हणून सर्वांनी जाणीवपूर्वक व खबरदारीपूर्वक काम करावे. मतमोजणीसंदर्भात कुठलाही चुकीचा संदेश प्रसारित होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करावे, असेही निर्देश श्री. पांढरपट्टे यांनी दिले.

या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये

मतमोजणी पूर्व तपासणी, मतमोजणीसाठी अनुषंगीक माहिती नमूद करण्याचे विवरणपत्रे, टपाली मतपत्रिकांची मोजणी, मतपत्रिका वैध व अवैध ठरविणे, अवैध मतपत्रिकांची वर्गवारी, टेबलवरील मतपत्रिका मोजणी आदीबाबत मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत म्हस्के यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गणना पर्यवेक्षक व गणना सहायक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले. मास्टर ट्रेनर गजेंद्र बावने व श्यामकांत म्हस्के यांनी प्रशिक्षण दिले. मतमोजणीच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल घालून काम करणे आवश्यक असते. कुठेही दिरंगाई किंवा एकही चूक होता कामा नये. अन्यथा लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे व सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. आधीच सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे श्री. बावने यांनी सांगितले.

मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे १५ अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.

चित्रपट परीक्षणाकरीता ३३ टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

मोठी बातमी ! विद्यापीठ कॉलेज कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून संपावर परीक्षांच्या कामकाजावरही होणार बहिष्कार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर

पुणे : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे.

पहा काय आहे कारण:

महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी, बैठका व आंदोलन होऊनसुद्धा शासनाकडून कोणतेही दखल घेतली जात नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे 

 तसेच महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आज जारी होणार तुमचं हॉल तिकीट; या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध..

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध झाली आहेत. http://www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसंच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठीकोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे

हॉल तिकिट्समध्ये काही चूक असल्यास?
प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असंही सांगण्यात आलं आहे. प्रवेशपत्रं हरवलं तर? प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्रं हरवलं तर?
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय प्रजासत्ताक दिनी चिमुकल्यांनी केले मार्डीवासियांना मंत्रमुग्ध

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
         
मारेगाव : मारेगाव तालुक्यात 26 जानेवारी 'प्रजासत्ताक दिन' मोठया थाटात सपन्न झाला. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही प्रजासत्ताक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले. या सोहळ्या मध्ये जि.पं. शाळा हायस्कुल, महाविद्यालय कान्व्हेंट सह अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या कलाकारांनी सहभाग घेतला होता.

तालुक्यातील मार्डी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण कला सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. या मंच बहारदार नृत्य सादर करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. यात ईन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कूल ला प्रथम क्रमांक मिळाला. या सांस्कृतिक कार्यक्रमात अंगणवाडी क्र 1, अंगणवाडी केंद्र क्रमांक 2, इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कूल, इंडियन स्कॉलर ऍकेडमी,जिल्हा परिषद शाळा, आदर्श हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हर्षदा गानफाडे या विद्यार्थीनीने 'आई ' ही थीम सादर करताना दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणले.
 
मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संस्कृतीक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुधाकर डाहुले, सदस्य सुरेश चांगले, गणेश कनाके, सूरज पंडिले, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, भास्करराव धानफुले, किसनराव चौधरी, माणिक कांबळे, प्रफुल झाडें, राजकुमार बोबडे, बेबी मोहुर्ले, मनीषा चौधरी, मंगला टिपले, शोभा कालर, छाया पुसाटे उपस्थित होते. सूत्रसंचालन भास्कर राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे परीक्षण जि प शाळेचे मुख्याध्यापक गिरिधरराव राऊत, सुरेश नाखले यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने गोधणी येथे तृणधान्य वर्ष साजरे

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास 194 देशांनी मिळून त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीपासून ते गाव पातळी पर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी श्री.सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक श्री सचिन आत्राम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 रोजी गोधनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा सहभाग घेऊन गावात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढावे या करिता शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणार्‍या विविध घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली.

प्रभात फेरी मध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सांगणारे माहितीपत्रके वाटप करण्यात आले. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविणे, पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढविणे व पौष्टिक तृणधान्याची आरोग्य विषयक महत्त्व बाबत जनमानसात जनजागृती करणे, तृणधान्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्यासह विविध उपपदार्थ तयार करणे व त्यांचा आहारात समावेश वाढविणे असे उद्देश समोर ठेवण्यात आलेले आहेत.

कार्यक्रमात कृषी सहाय्यक सचिन आत्राम , मनोहर पेठे मुख्याध्यापक जि. प.शाळा गोधणी यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील मूल्य व त्याचे आहारातील महत्त्व या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली तसेच लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत आरोग्याच्या समस्या, स्थूलता, बद्धकोष्ठता, मधुमेह महिला व लहान मुलांमध्ये अनेमिया यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे नियमित सेवन करण्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा यासारख्या पौष्टीक तृणधान्यांचा समावेश वाढविणे त्याचबरोबर सदरील पौष्टिक तृणधान्यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ, बेकरीचे पदार्थ तयार करणे शक्य असून त्यांचा आहारात वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म उन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 35 टक्के व जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत प्रक्रियेसाठी अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी, युवकांनी, बचत गटाच्या महिलांनी लाभ घेवून प्रक्रिया उद्योग उभे करावेत असे सदर प्रसंगी बोलताना आवाहन केले.

याप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांनी शेत तिथे तृणधान्ये व मिलेट ऑफ द मंथ या संकल्पना शेतकर्‍यांपर्यंत रुजवून आत्मसात करणे बाबतचे मत व्यक्त केले. या प्रसंगी गावातील सरपंच सौ.मंदा मंडाळी, उपसरपंच श्री धनंजय गवळी, पोलिस पाटील सौ.मीना गवळी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, ग्राम पंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

केगांव बोदाड रस्त्याची झाली दयनीय अवस्था

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील अनेक खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था वाईट झाली आहे. अशातच मार्डी वरून बोदाड-केगांव कडे जाणारा रस्ता जास्तच खराब झाला आहे. 

तालुक्यातील केगांव रस्ता उखडला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्या उखडल्याने खड्ड्यांचा लांबून त्यांचा अंदाज येत नसून वाहन धारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे रात्रीच्या (Night) वेळी दुचाकी स्वारांची गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केगांव रस्त्याच्या (kegaon Road) दुरावस्थेमुळे या मार्गांवर प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे बोलले जात आहे.

गेली दोन वर्षापासून केगांव ते मार्डी चार ते पाच किलोमीटर अंतराचा हा रस्ता बहुतांश उखडलेला असून, या रस्त्यावर चार चाकी वाहन नाचत चालली असल्याचा भास होतो. त्यात रात्रीच्या वेळी कोणता खड्डा चुकवू अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले असून या रस्त्याची तंदुरुस्त करण्याची अपेक्षा आहे. 

सलून व्यावसायिक प्रमोद जांभुळकर यांना पितृशोक

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : येथील प्रमोद जांभुळकर सलून व्यावसायिक यांचे वडील वासुदेव जांभुळकर वृद्धापकाळाने आज पहाटे 4.00 वाजता निधन झाले. मृत्यू समयी 75 त्यांचे वय होते. 

मारेगाव शहरातील वासुदेव जांभुळकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी आज शुक्रवारी पहाटे 4. वाजता दरम्यान,निधन झाले. आज दि.27 जाने. रोजी 2. वाजता त्यांचे पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, ष्णूशा, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 

संविधानिक मूल्यांची जपणूक करुया – पालकमंत्री मंत्री संजय राठोड    

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : देशाला दिशा देणाऱ्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात श्री. राठोड बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कर्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक पवन बनसोड, यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. राठोड म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान हे सर्वोच्च स्थानी असून संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत हा देश विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान असलेल्या संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून महाराष्ट्राचा विकास होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिपणे पार पाडल्यास बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले राज्य व देश निर्माण होईल. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचाही समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आला आहे. समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क, संविधानिक प्रतिकाराचा हक्क आदी मौल्यवान हक्क या घटनेने नागरिकांना बहाल केले आहेत असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्री राठोड यांनी मुख्य कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. त्यांनी यवतमाळ पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊट गाईड आदी पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. या सर्व पथकांनी मुख्य मंचासमोरून पथ संचलन केले. श्री. राठोड यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली.
यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांबासह ताल योगासनांचे प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यावेळी आयएसओ मानांकन मिळाल्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अमरावती विभागातून उत्कृष्ट उपजिल्हा निवडणुक अधिकारी म्हणुन मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने पुरस्कृत केल्याबाबत उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, ७/१२ संगणकीकरणात उत्कृष्ट काम करणारे करळगाव येथील तलाठी आशिष पाचोरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कवळी, अप्पर जिल्हाधिकारी पेअविण सिंह दुबे, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तसेच सर्व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कान्हाळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयमध्ये दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. 
या आजोजित फेस्टिवलचे उदघाटन श्री.नरेंद्र कांडुरवार
गटशिक्षणाधिकारी मारेगाव, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ताटकोंडावर सर, सौ,भाग्यश्री संजय ठावरी, तर 
महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप देरकर, पालक प्रतिनिधी श्री संजय पाटील नक्षणे कार्यक्रमाला उपस्थीत होते.
दोन दिवसीय वार्षिक महोत्सवात क्रीडा खेळ,गायन,नृत्य, स्पर्धा घेण्यात आले व शैक्षणिक सत्र फेबु/मार्च 2022 मध्ये एच.ए.सी प्रथम, द्वितीय, तृतीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी कांडुरवार साहेबांनी पुढील भवितव्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. कुळमेथे व प्रा.पोटे यांनी केले तर आभार प्रा. जाधव सर यांनी मानले. प्रा,पुडके, भारत लाडके, देवेंद्र देठे, इत्यादीनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात सहकार्य केले.

चंद्रकांत लांबट यांना राष्ट्रपती पदक जाहीर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : रामनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत गणपत लांबट यांना त्यांच्या कार्यकाळातील गुणवत्तापूर्ण व विशेष कामाबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. 
मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. चंद्रकांत लांबट 1988 मध्ये गडचिरोलीत पोलीस हवालदार म्हणून रुजू झाले.
सन 1988 ते 2007 पर्यंत त्यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त भागात एकूण 20 वर्षे सेवा बजावली, त्यानंतर त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली, ऑक्टोबर 2020 रोजी त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली, तेव्हापासून ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. 
त्यांच्या कार्यकाळात दर्जेदार आणि उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले, याआधी त्यांना विशेष सेवा पदक, अंतर्गत सेवा पदक, पोलीस महासंचालक पदक सन्मान आदींनी गौरविण्यात आले आहे.
विशेष उल्लेखनीय की, चंद्रकांत गणपत लांबट हे मारोती गौरकर (ता मारेगाव) यांचे भास जावई असून वनोजा देवी यथील धांडे परिवाराचे जावई आहे.