देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मारेगाव येथे नारीशक्ती मेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : भगिनींनो घाबरण्याचं कारण नाही, कारण देवेंद्रजी उर्फ देवाभाऊ तुमच्या आमच्या पाठीशी आहेत, लाडकी बहीण योजना ही कायम असणार आहे, आज समाधान आहे सरकार आपलं आहे, अशा आणखीन योजना भविष्यात आपल्याला भाजप सरकार देतील,असे प्रतिपादन प्रदेश महामंत्री भाजप महिला मोर्चाच्या अलका आत्राम यांनी केले.

मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल मध्ये आयोजित नारीशक्ती मेळावा समारंभात त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मारेगाव तालुकाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा ता. अध्यक्ष शालिनी दारुण्डे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा नक्षीने,जिल्हा सचिव सुनीता पांढरे, संध्या अवताडे, किसान चे दिनकर पावडे, भाजपा चे नितीन रासेकर, ता.अध्यक्ष अविनाश लांबट, सुशीला भादीकर, संध्या लोडे, सुनीता नेपलवार, रजू कुरेशी, पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही आमिषास बळी न पडता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात अनेक योजना राबविण्यात येत आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. गरिबी काय असते हे मला चांगल माहितीये, कारण गरिबीतून मी याठिकाणी आलेली आहे. महिलांना सन्मानजनक वागणूक दिली जात असेल तर फक्त आणि फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टी मध्ये. भाजपा मध्ये महिलांना ताई म्हटलं जातं आणि इतर पक्षात वहिनी म्हणून बोललं जातं यावरून त्यांची मानसिकता काय आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपलं सरकार शेतकरी, विद्यार्थी, कामगार, गरोदर माता यांनाही योजना राबविण्यात येते. आज तुम्ही माझ्या माता भगिनीं ताई इतक्या मोठ्या संख्येने या मेळाव्यात आल्या याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रदेश महामंत्री अलका आत्राम यांनी सांगितले. विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सरकार आणि मी तुमच्या पाठीशी आहे. कुठलंही कामे असुद्या एकदा या भावाला सांगा भेटा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या भावाला शुभेच्छा दिल्या व दहा वर्ष प्रेम केलं, आणि असेच पुढेही असुद्या असे गौरोद्गार त्यांनी काढले. तसेच जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी विरोधाकावर निशाणा साधत म्हणाले आमच्या माता बहिणी व मुलीवर जर कोणी अश्या वाईट जनरेने पाहील त्यांचे "ऐनकाउंटर" च होतील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा नक्षीने, प्रास्ताविक सुनीता पांढरे तर आभार प्रदर्शन शालिनी दारुण्डे यांनी केले. या प्रसंगी भाजपचे मंगेश देशपांडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, प्रसाद ढवस, गणेश झाडे, सुनील देऊळकर, सूर्यभान ठोबरे, पवन ढवस, गंगाधर कुंटावार, राहुल राठोड, यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, मदतनीस तसेच शेकडो महिला व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या, यावेळी कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

सरकारकडून विधानसभा निवडणुकापुर्वी धडाका !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यासह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. विविध लाभाच्या योजना जाहीर करीत सरकारने विधानसभा निवडणुकीचा धडाका उडवून दिला आहे, आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकाचे मने जिंकण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. 

विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी हे महत्त्वाच निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, कोतवालांच्या मानधानात १० टके वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल. त्यामुळे, राज्य सरकारच्यावतीने जास्तीत जास्त निर्णय घेऊन जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण, विधानसभा निवडणुकानंतर नवीन सरकार स्थापन होईल. तत्पूर्वी बैठकांचा आणि निर्णयाचा धडाका सुरू आहे. कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ,अनुकंपा धोरणही लागू, ग्राम रोजगार सेवकांना आंता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान ऑरेज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार, एमएमआरडीए ला बिनव्या राजी दुय्यम कुड़े सहाय्य देण्यास मान्यता. ठाणे वर्तुळाकार मंट्री रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार, १२ हजार २०० कोटींचच्या सुधारित आराखड्यास मान्यता, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार, देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना, भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार, रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार, जळ‌गाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता ३० हजार हेक्टर जमीन सिचिंत होणार, लातूर जिल्ह्यातील हासाळा, उबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता. धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थाच्या विकासासाठी जमीन, रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार, एमएआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत, केंद्राच्या, मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार, दुर्बलासाठी घराच्या योजनाना वेग येणार, पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रस्ट्रिक्चर विकासक, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे योजना,

धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी, सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले. अधिकाधिक शेतकऱ्याऱ्यांना लाभ होणार. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य करणार. राज्यातील होमगाडांच्या भत्त्यात भरीव वाढ, सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ. नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार, आयुर्वेद, यूनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती. राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थाचे नामकरण, आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ.

विविध लाभाचे निर्णय घेत जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सद‌स्यांची संख्या वाढवून १५ अधिसंख्य कर्मचाऱ्याचा एक दिवसाची तांत्रिक खंड क्षमापीत, बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था, मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हा पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत, जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्याना एक वेळ पर्याय, पचगंगा नदी प्रदूषणासाठी साइपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार, राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती, ४८६० पदे शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही, अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा जनजागृतीवर भर. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला. राज्यातील सैनिकी शाळासाठी आता सुधारित धोरण, डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार, उत्पादकांना मोठा लाभ. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा, असे विविध खात्यातील निर्णय सरकारने आज घेत जनतेला आपल्याकडू आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीच लाड़की बहीण सारखी योजना राबवून महिला वर्गाला आपल्याकडे, आकृष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न या सरकारने केला आहे. आता आचारसंहिता लागण्यापूर्वी समाजातील सगळ्याच वर्गाला विचारात घेऊन सरकारकडून योजनांचा धडाका दिसतेय.

यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
 
राळेगाव : भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड करण्यात आली. 

शिर्डी येथील हाॅटेल साईगोल्ड इन मध्ये दिनांक २९/९/२४ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती देण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्हा भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पत्रकार, तसेच विविध बहुउद्देशीय संघाचे प्रतिनिधि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनोद माहुरे यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच "सह्याद्री चौफेर" ई न्यूज परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा... 

महादापेठ रस्त्यावर जीवघेणे खड्डे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : करणवाडी ते खैरी या मार्गावरील महादापेठ परिसरातील खड्ड्यांनी वाहनधारकांच्या नाकीनऊ आणले आहेत. हा मार्ग उपविभागाने येथे केलेल्या थातुरमातूर उपाययोजनेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. यामुळे येथील खडड्यांनी आपले ‌डोकं वर‌ काढण्यास सुरवात केली आहे. या खड्ड्याने अपघाताची शक्यता बळावली असून स्थानिकही प्रचंड हैराण झाले आहेत.
 
या मार्गाने वाहतूक बोटावर मोजण्याइतकी आहे. तरीही एवढी बिकट अवस्था अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरून वाहने, दुचाकीवरून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. महादापेठ कुंभा या रस्त्यावर एवढा भयावह गड्डा असूनही संबंधितांना दिसत कसा नाही असा प्रश्न उपस्थित होत आहेत. 

रस्त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च?

महादापेठ ते कुंभा रस्ता असो की तालुक्यातील रस्ते ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही मात्र अलीकडच्या काही दिवसात या मार्गावर जीवघेणे खड्डे पडलेत, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा आहे. 
-विजय बोथले 
उपाध्यक्ष : तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव

वणी विधानसभेची उमेदवारी कोणाच्या पत्यावर; कार्यकर्त्यांचा मुक्काम पोस्ट शिगेला


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी मतदारसंघ हा पंचरगी मतदार संघ म्हणून ओळखला जातो.याच मतदार संघात निवडणूकीचा सामना अटीतटीचा रंगताना आगामी विधानसभेच्या अनुषंगाने पाहायलाही मिळतो. जर मागील काळ बघितला तर माजी आमदार वामनराव कासावार यांनी वणी या मतदारसंघांमध्ये मागील २० वर्षाची सत्ता भोगली आहे. तसेच याच विधानसभेत मागील बऱ्याच वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक काम करत आहे. कासावार नंतर नांदेकर हे आमदार झाले आणि या वणी मतदार संघाचे चित्र आणखीनच बदलले. मात्र,यादरम्यान सेनेचा मित्र पक्ष भाजपने कासवाच्या चालीने जनसंपर्क वाढवत २०१४ पासून सत्ता काबीज केली आणि दहा वर्ष काँग्रेस आणि शिवसेना सत्तेपासून दूर लोटली गेली. राज्यात पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा बाळासाहेबाचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दृढ विश्वास ठेवत वणी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक गटबाजीला झूगारून आपापल्यापरीने आजही कार्य करत आहे. जिल्हाप्रमुखांनी पक्षांमध्ये अनेक कार्यकर्ते जोडले असून, त्यांच्या पंचवार्षिक काळामध्ये त्यांचे कार्य तर अतुलनीय आहेत त्यांनी मतदार संघातील अवैध धंदे प्रथम बंद केली, जे आजतागायत कोणी करू शकलं नाहीत. तसेच गावोगावी शाखा उघडल्या आहे. गावोगावी, खेडोपाडी जाऊन अनेक उपक्रम राबविली आहे. त्यामुळे त्यांचं वलय अजूनही असल्याचे बोलल्या जाते. मात्र होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची उमेदवारी मिळाल्यास जनसामान्यांची सेवा करण्यासाठी आता अनेक जन दावेदार उभे ठाकले असल्याचं आता चित्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या तोंडावर ग्रामिण भागात दावेदार उमेदवारांनी भेटी चालू केल्या असून, विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागले आहे. मात्र, होऊ घातलेल्या वणी विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे मतदारांचे लक्ष लागले असताना शिवसेना (उबाठा) कडे वणी विधानसभेची शीट गेल्याची बातमी वायरल झाली असल्याने अनेकांना धक्का बसला तर, नव्याने आमदार होऊ पाहणाऱ्यांचे स्वप्नभंग होणार का?,असे तूर्तास बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्यांनी स्वतंत्र दावा केला त्यांना तर मोठा धक्कातंत्र असल्याचे चर्चा आता रंगत आहे. मात्र, महाविकास आघाडी असल्याने कोणाचं काहीही चालणार नाहीत. आघाडी नाहीतर बिघाडी. तूर्तास यवतमाळ जिल्ह्यात चार काँग्रेस, एक राष्ट्रवादी (शपागट) तर दोन शिवसेना (उबाठा) असा फार्मुला ऐकीवात असल्याने उद्धव सेनेमधून कोणाच्या गळ्यात माळ पडणार ही चर्चा आता जनतेतून होऊ लागली आहे. वणी मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे वातावरण गरम असल्याने नांदेकर, देरकर, निखाडे की, कातकडे अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव सेनेत दोन गटबाजी, यातूनच फोर्थलाईन मार्ग निघू शकते असेही आता चर्चील्या जात आहे.

राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता ताटके

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वासिम : रातोरात श्रीमंत होण्याचा फंडा म्हणून राजकारणातलं करिअर अनेकजन निवडतात.गॉगल घातलेले एक दोन चार कार्यकर्ते,आलिशान कार, आणि लोकांचा गराडा.अशी भुरड अनेकांना पडते. मात्र राजकारणात अपयश आलं की राजा रंक कसा होतो, तसं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वासिमचे महादेव ताटके. राजकारणापायी कोट्यावधी संपत्तीचा कचरा झाला,आणि ते रस्त्यावर आले. राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता महादेव ताटके (मंगरूळपीर जि.वासिम) 

ज्यांनी कार्यकर्त्यांना मोटारसायकली वाटल्या,ज्यांनी चारचाकी भेट म्हणून दिल्या,ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटलं,त्याच महादेव ताटकेवर आज उपासमारी ची वेळ आली आहे. 
कुणी पन्नास शंभर रुपये दिले तरी एकवेळ चे पोट भरतं अशी वाईट परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे. वासिम च्या मंगरूळपीरचे महादेव ताटके हे रोजगाराच्या शोधात मुंबई ला गेले.लाखों नाही तर, करोडो रुपये कमवून त्यांनी आपलं नाव मोठं केलं. गरीबीची जाण असणाऱ्या महादेव ताटके यांना समाजसेवा करण्याचा विचार आला आणि ते मुंबई सोडून परत गावी आले.समाजकारण करताना त्यांना राजकारणाचा विचार आला आणि तिथेच त्यांचा उलट प्रवास सुरू झाला.

ताटकेंच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर 2009 साली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांनी निर्णय घेतला.कार्यकर्त्यांना त्यावेळी त्यांनी 75 मोटारसायकली भेट दिल्या.टाटा कंपनी ची 3 चारचाकी वाहनही भेट दिल्या.खत, बी बियाणे, साडया चोळी वाटप केलं.वर्तमान पत्रातून त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या.मात्र 2009 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

मी आयुष्यात स्वतःचा विचार कधीच केला नाही. लोकांचा, गोरगरीबांचा विचार केला.कारण गरिबी मी जवळून बघितली.कमीतकमी त्यावेळी माझे निवडणुकीत दोन करोड रुपये गेले.सामाजिक कार्य करताना दोन करोडो रुपये खर्च झाले.आहो त्यावेळी माझ्याकडे करोड रुपये होते साहेब, आता दहा रुपये सुद्धा नाही. अशी परिस्थिती आली आहे, मुंबई च घर, ऑफिस सगळं विकून टाकलं, आता इथलं पण घर विकायची पाळी आली, माझ्यावर लोकांचं कर्ज आहे.
-महादेव ताटके

राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटकेंना हातचा पैसा गमवावा लागला.

दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महादेव ताटकेची ओळख मात्र,राजकारणात त्यांनी मोठा खर्च केला,हातचे सगळे पैसे संपले,कार्यकर्ते दुरावले,ज्यावेळी त्यांना मदतीची गरज होती, त्यावेळी त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. 

त्यावेळेस भरपूर पैसा होता,त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला जबरदस्त गर्दी राहायची.जसाजसा पैसा कामी झाला तसेतसे लोकं त्यांना सोडत गेले.आज त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की, त्यांना त्यांच घर चालवणे ही कठीण आहे.
-नागरिक 
कालपर्यंत ज्यांनी मदतीचा हात इतरांना दिला,ते आता मदतीची आस लावून बसले आहे.ज्यांनी माणुसकी चा धर्म पाळला,माणुसकी चा धागा विनला त्याच ताटकेंना,माणुसकीचं दर्शन घडणार का?,ताटकेंच्या मदतीसाठी पुढे कोणी येणार का? असाच प्रश्न ताटकेंच्या नजरेतून दिसतोय. आपल्या मतदार संघातील लोकांसाठी, आपल्या कार्यकर्त्यासाठी ज्यांनी लाखों करोडो चा खर्च केला त्याच्यावर अणवानी चालण्याची वेळ आली आहे.
एकेकाळी नेते मंडळींच्या गराड्यात असणारे ताटके, आतामात्र ऐकाकी पडले आहे.एकेकाळी इस्त्रीचे कडक कपडे घालून फिरणारे ताटकेंवर फाटके कपडे घालून फिरण्याची वेळ आली आहे.त्याला कारण ठरलीय ती राजकारणाची वाट.ही वाट धरली नसती तर कदाचित तटकेंचे दिवस काही वेगळे असते.
आता ते म्हणतात की, तरुणांनी राजकारणात पडू नये, राजकारण करा, पण व्यवसाय सोडून करू नका. राजकारणात काही पडलं नाही. तुमच्यासमोर ताज उदाहरण आहे मी. माझी कळवडीची विनंती आहे की आधी शिक्षण घ्या, व्यवसाय, घर सांभाळा ही सगळ्या तरुण पिढीला विनंती आहे.







संत नगाजी महाराज मंदिराच्या नियोजित जागेवर रोवली पताका


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : "ऐशा संता शरण जावे" अशा ओळी जनाबाई लिहून गेल्या तर "आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे संत एती घरा " हा सेना महाराजांचा अभंग.

मारेगाव संत सेनाजी नगाजी महाराजांच्या मंदिराला जागा देण्यात येऊन कित्तेक वर्ष निघून गेली, मात्र मंदिराच्या जागेवर आजतागायत कुठलीच हालचाल झाली नाही. कित्तेक वर्षानंतर युवा पिढी जागृत झाली व मंदिर बांधण्याच्या हालचालीन्ना वेग आला. अणेक बैठका झाल्या. सलून व्यवसायिक व काही इतर नाभीक बांधव दर शनिवारला जागेवर सकाळी एकत्र येऊन त्या जागेवरचा कचरा साफ करू लागली. त्यातील एखादा पुढाकार घेऊन स्वखर्चाने नास्ता देऊन एकत्र येण्याचा व जागेची साफसफाई करण्याचा कार्यक्रम पावसाळ्यापूर्वी नित्य सुरु होता.

मात्र,गेल्या दहा - बारा दिवसापासून एक तेजस सुधाकर मांडवकर नावाचा युवा नाभीक बंधू झपाटल्यागत त्या जागेवर मला भजन करायचं असा आग्रह करू लागला. समाज माध्यमावर सगळ्या बांधवांना सोबत घेऊन त्याने इच्छा प्रकट केली व स्वतः मंदिराच्या जागेवरील कचरा साफसफाई करून जागा स्वच्छ केली.

इंदिरा एकादशीचे अवचित्त साधून त्याने स्वखर्चाने महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून नियोजित जागी पताका रोवली,भजन केले व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी मारेगाव व आजूबाजूच्या गावातील नाभीक बांधवानी व महिला मंडळींनी उपस्थिती दर्शवून सहकार्य केले. व तेजस चे कौतुक केले.

शब्दांकन : रवि घुमे

राजूर येथे भगतसिंग जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजूर कॉलरी : देशाला निव्वळ इंग्रजांपासून स्वातंत्र्यच नाही तर या देशाला शोषण विरहित समाजव्यवस्था असलेली समाजवादी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ह्या साठी लढा देत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी सातत्याने वृत्तपत्रात लिखाण करणे, रॅली चे आयोजन करणे, जातीभेद नष्ट करण्यासाठी वर्ग जागृती करणे, युवकांचे संघटन बांधणे, त्यांना संघर्षासाठी तयार करणे आदी कार्ये भगतसिंग वयाचा २० व्या वर्षी करीत होते. हे सर्व करीत असताना त्यांना इंग्रजांनी पकडून वयाचा २३ व्या वर्षी फासावर लटकाविले. अश्या या महान शहीद-ए-आझम भगतसिंग ह्यांची जयंती दिनांक २८ सप्टेंबर ला राजूर येथील शहीद भगतसिंग चौकात साजरी करण्यात आली.

शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा प्रतिमेला गावातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन साजरी करण्यात आली. 

या जयंती कार्यक्रमाला कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. नंदकिशोर लोहकरे, प्रीतम हनुमंते, विनोद इंगळे,आशिष पाटील, चैलेश आरमोरिकर, अमर चीटपल्लिवार, स्वप्नील हस्ते, माणिक खैरे, पप्पू भगत, भोला दाढे, लड्डू दुर्गमवार, पोयाम, राजू हिकरे, मास्टर हीकरे आदी गावातील तरुण उपस्थित होते.

सरपंच शुभम भोयर यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांची खा. धानोरकर यांच्याकडे मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पावसाचे पाणी गावाबाहेर जाण्यासाठी भुमिगत नाली बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच शुभम भोयर यांनी खा.प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.
 
मारेगाव तालुक्यातील किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गावाच्या बाहेरील भूमिगत नाली ही पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून गावाबाहेरील पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात संपूर्ण पावसाचे पाणी हे गावामध्ये येत असल्याने ते पाणी गावातील घरांमध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकार दरवर्षीच घडत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून गावकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावालगत भुमीगत नाली बांधकाम करणे आवश्यक असल्याने या कामासाठी आपल्या स्थानिक विकास निधी मधुन निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांच्याकडे किन्हाळा गावाचे सरपंच शुभम भोयर यांनी केली आहे. 

यावेळी उपसरपंच प्रशांत तोरे, भास्कर कपाळकर, रतन आत्राम, धीरज डांगाले, बंडू क्षीरसागर, विशाल सोमटकर, अनंता काथवटे, पुष्पराज गानफाडे, राजू शास्त्रकार, प्रवीण काकडे, संजय टोंगे, योगेश काथवटे, नितेश भोयर, गुणवंत येरमे, अनंता आसेकर तसेच इतर गावकरी उपस्थित होते.

आशा व गटप्रवर्तकांचा मेळावा यवतमाळ येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : आशा व गटप्रवर्टकांना वेतन न देता तटपुंजे मानधन देऊन त्यांच्याकडून आरोग्याची महत्त्वाची कामे करवून घेतली जात आहेत. किमान वेतन कायदा हा मानव म्हणून जगत असताना त्याला मूलभूत असणाऱ्या किमान मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आजचा घडीला किमान 26000 रुपये मान्य केलेले असताना आशा कर्मचाऱ्यांना वेतन न देता मानधन का दिल्या जाते, असा प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारने घोषित केलेला 15000 हजार रुपये मानधन हा 18 हेड कामे पूर्ण करण्याची सक्ती करणारा शासन निर्णय उलट मानधनात कपात करण्याचा असून हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी ह्या आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) संलग्न सी आय टी यू च्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य जिल्हा मेळाव्यात करण्यात आली.

सीटू संलग्न असलेल्या आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) च्या वतीने यवतमाळ येथील सहकार सांस्कृतिक भवन येथे भव्य मेळावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचा राज्य महासचिव कॉ. पुष्पा पाटील, तर उद्घाटक म्हणून किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके होते. कॉ. मनीष इसाळकर, कॉ. अनिता खुनकर, कॉ. रमेश मिरासे, कॉ. प्रीती करमरकर, निर्मला मेश्राम, विजया शिसले, शिला खेडकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

या मेळाव्याचे संचालन व प्रास्ताविक संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांनी केले तर आभार कॉ. प्रीती करमरकर यांनी मानले. या मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक कामगारांनी भाग घेतला.

पटवारी यांच्या रजा आंदोलनामुळे सामान्य जनतेला मिळत आहे सजा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : महसूल विभागात पटवारी हा अतिशय महत्वाचा घटक आहे परंतु त्यांच्या मागण्या संदर्भात मागील पाच दिवसांपासून पटवारी संघटनेचा रजा आंदोलन सुरू करण्यात आले असुन त्याची सजा सामान्य जनतेला मिळत आहे म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख नेतृत्त्वात झरि तहसील कार्यालयाकडे अर्धवन येथील बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सदस्य विठ्ठल भाऊ गेडाम यांनी निवेदन सादर केले सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की तालुक्यातील मौजे अर्धवन , रायपूर, दुर्बा कमळवेळी, राजनी सहीत इतरही गावातील वन जमिन धारक शेतकऱ्याचे सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी, पंचनामे, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी करून पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असताना पटवारी दिपक मोरे यांनी कारवाई केली नाही आता तर रजा आंदोलनाचे निम्मित सांगून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटना ने निवेदनातून केला आहे पटवारी दिपक मोरे हे आदिवासी लोकांसोबत फोन वर व्यवस्थित बोलत नाही, सादर केलेल्या निवेदनानुसार कारवाई करत नसल्यामुळे मौजे रायपूर येथील आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी चा सन 2023 च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल सादर केला नाही असे अनेक प्रकार पटवारी दिपक मोरे यांच्या बाबतीत आहेत तरी सुद्धा पटवारी संघटनेच्या रजा आंदोलनाले शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने जाहीर समर्थन करीत असल्याचे मत प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी व्यक्त केले यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे,अर्धवन सहीत तालुक्यातील बिगर सातबारा शेतकरी उपस्थीत होते.

केंद्र व राज्य सरकार दलित आदिवासींच्या प्रश्नाकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे - जगदीश कुमार इंगळे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारे संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र व राज्य सरकार दलित आदिवासींच्या मूलभूत प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळे विदर्भासहित राज्यातील हजारो दलित आदिवासी जमिनींच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालासमोर आंदोलनात्मक भूमिका घेऊन संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सुखदेव कांबळे यांनी पाठपुरावा केला परंतु नितीन गडकरी हे नागपूरला नसल्यामुळे येत्या 29 सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलनात्मक भूमिका घेऊन लक्ष वेधणार असल्याची माहिती डॉ. सुखदेव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेमध्ये भाई इंगळेनी सांगितले की, आपण 75 विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. परंतु आजही दलित आदिवासी जिथे घर बांधून राहतात ते घर त्यांच्या नावावरच नाही, जी जमीन कास्त कारीत आहेत ती जमीन सुद्धा त्यांच्या नावावर नाही यापेक्षा दुर्दैव कोणतही नाही.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय क्रांतिवीर शहीद बापूराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे डॉ. सुखदेव कांबळे, भंडारा जिल्ह्यातून महिला अध्यक्षा सौ. इंदुताई गोपाले, काशीराम ठाकरे, श्रीमती वैशाली शिरसाम सोबत गडचिरोली जिल्ह्यातून दलित आदिवासी महिला व अनेक पुरुषांची उपस्थिती होती. यावेळी वनजमीनधारकांनी केंद्र व राज्य सरकार प्रती मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करतांना दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नाकडे सरकार जर लक्ष देत नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांना किंमत मोजावी लागणार असल्याची बिगर सातबारा शेतकऱ्यांनी सांगितले. ही संपूर्ण माहिती पत्रपरिषदेत भाई जगदीश कुमार इंगळे यांनी पत्रकारांना दिली.

केळापूर येथे पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : आज केळापूर येथे पांढरकवडा बीटच्या अंगणवाडी सेविकांनी पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुमन सोयाम मॅडम आणि पर्यवेक्षिका पेंदोर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमात उपस्थित मातांना पोषण आहार, बालकांच्या वाढ व विकासाबाबत सखोल माहिती देण्यात आली. यावेळी लेखा परीक्षण चार्टद्वारे पोषण आहाराचे महत्व स्पष्ट करण्यात आले. तसेच बाल संगोपनाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अनेक मातांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली. 

हा कार्यक्रम बालकांच्या पोषणासंदर्भातील जनजागृतीसाठी उपयुक्त ठरला आहे.

नरसाळा येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील एका तरुण शेतकऱ्याने बुधवार दि.२५/०९/२०२४ ला सकाळी शेतात जातो असे सांगून शेतात गेला. व तिथे कपाशीवर फवारणी साठी ठेवलेले तणनाशक औषधं प्रशान करून आपले जीवन संपवले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शैलेंद्र सोनबाजी उईके (अंदाजे वय ४०) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शेतातच तणनाशक प्राशन केले, सदर माहिती मिळताच जवळील नातलगांनी त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात भरती करून उपचार सुरु होते. मात्र, गुरुवार दि. २६/०९/२०२४ रोजी अंदाजे दुपारी ४:१६ ला त्याची प्राणज्योत मालवली. 

शैलेंद्र याने आत्महत्या का केली हे अजूनही अस्पष्ट असून या मृतक शेतकऱ्यांवर अनेक कर्ज असल्याचे गावात चर्चा आहे. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.


क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयासमोर अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे धरणे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोळसा खदानी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना दुर्घटना झाल्यास एक करोड १५ लाख आणि ठेका कामगारांना ४० लाख रुपये दुर्घटना इन्शुरन्स देण्यात यावा, सीएमपीएफ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, घोटाळ्यातील आरोपी दोषीवर कारवाई करण्यात यावी, सी एम पी एफ मध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा अनेक विविध मागण्यांना घेऊन (ता. 26) रोजी भारतीय कोयला खदान मजदूर संघ च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

वणी नार्थ भालर वसाहत कार्यालयासमोर भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे वणी माजरी क्षेत्राचे महामंत्री जगन्नाथ जेनेकर यांच्या नेतृत्वात कामगारांची सुरक्षा सी एम पी एफ समस्या संदर्भात एकूण १७ मागण्या घेऊन अखिल भारतीय खदान मजदूर संघाच्या वतीने भारतीय कोळसा खदान मजदूर संघ, वणी-माजरी द्वारे गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालया समोर धरणे देण्यात आले.

या वेळी मंगेश अजमिरे सह कोषाध्यक्ष अ.भा.ख.म. संघ, कमलाकर पोटे सदस्य अभाखम संघ, शंकर एडलावार कार्याध्यक्ष, गणेश चौधरी अध्यक्ष वणी नाथ क्षेत्र, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य गुलाब चौधरी, दिलीप जुनघरी, क्षेत्रीय सुरक्षा समिती सदस्य शरद डवरे, या सह मोठ्या प्रमाणात वेकोली कामगार, कंत्राटदार उपस्थित होते.

मारेगाव येथील नव्या बस स्थानकाचे भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथे सुमारे 2 कोटी 49.68 लक्ष खर्चुन नव्याने बांधण्यात येणाऱ्या मारेगाव बस स्थानकाचे भूमिपूजन विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते आज करण्यात आले. 

मारेगावात राज्य परिवहन महामंडळाचे नवीन बस स्थानक व्हावे यासाठी स्थानिकांनी वर्षानुवर्षे मोठा लढा दिला होता. अनेकदा आंदोलन, मोर्चे, उपोषण अशा विविधांगी लढ्याच्या माध्यमातून मागणी होत होती. त्यामुळे तालुक्यातील जनतेची, विद्यार्थ्यांची व बाहेरगावी प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे विशेष प्रयत्नाने खनिज निधी अंतर्गत (2 कोटी 49.68 लक्ष) खर्चून बांधण्यात येणाऱ्या आज गुरुवार (ता. 26) ला मारेगाव शहरात सुसज्ज नवीन बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटात पार पडला.या प्रसंगी आंदोलन, उपोषण कर्त्यांच्या हाताने नारळ फोडून भूमिपूजन केले. 

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साठे काका, कॉम्रेड बंडू गोलर, भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की, नगरसेवक हर्षांली महाकुलकर, नगरसेवक अंजुम शेख, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, पवन ढवस, प्रसाद ढवस, पत्रकार श्रीकांत तांबेकर, नगरसेवक राहुल राठोड, रमण डोहे, गणेश झाडे, सुनील देऊळकर, प्रसाद झाडे, नगरसेवक वैभव पवार, प्रवीण बोथले, योगीराज बलकी, दादाराव ठोबरे, लता रामटेके, काॅ.विलास ढुमने, अक्षय रामटेके, धनराज अडबाले, दत्तु कोहळे, इरफान भाई, शारदा गेडाम, प्रवीन आडे, अजय मेश्राम, संदिप टेकाम, चंद्रभान ढेगळे, दशरथ येनगंटिवार, प्रमोद पहुरकार, पांडुरंग ठावरी, वासुदेव गोहने, यांच्यासह अधिकारी व भाजप पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळंब येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : महिलांचे अधिकार, मुली व महिला वर होणारे अन्याय , अत्याचार या महत्त्व पूर्ण विषयावर चर्चा करण्याच्या उद्देशाने पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कळंब विभागाच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोज शनिवारला सकाळी ११ वाजता राम मंदिर कळंब येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष डॉ संघपाल उमरे यांच्या अध्यक्षतेखाली "महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे" व समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटपाचे आयोजन केले आहे.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राजेश राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष मानकर गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, श्री. धिरज स्थुल तहसीलदार कळंब, श्री. अमोल वरसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळंब, डॉ. विजय अकोलकर तालुका आरोग्य अधिकारी कळंब, वंदना नानवटे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कळंब, जया अराठे यवतमाळ महिला अध्यक्षा पो. मि. प. स. समिती, श्री मनीष गुडघे अमरावती विभाग प्रमुख , श्री पवन धोत्रे ग्रामीण पत्रकार सघं उपाध्यक्ष ,निखिल वाहाने चांदुर (रेल्वे) विभागीय प्रमुख इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. 

तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती पोलीस मित्र समन्वय समिती कळंबच्या वतीने करण्यात आली आहे.

वणी येथील मान्यवरांनी घेतली साहित्यीक बाबाराव मडावी यांची स्नेह भेट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : वणी येथे दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी आदिवासी सामाजिक न्याय संसद होत असुन, या संसदेचे निमंञण घेवुन वणी येथील मान्यवर ऊत्तम गेडाम, गित घोष, रामदास गेडाम, भाऊराव आञाम, श्रीकृष्ण मडावी, महेश आञाम यांनी आदिवासी साहित्यीक बाबारावजी मडावी यांची भेट घेतली. आदिवासी न्याय संसदेबाबत गित घोष आणि ऊत्तम गेडाम यांनी सविस्तर चर्चा करुन भुमिका सांगितली. या संसदेस विविध पक्षाचे मंञी, खासदार, आमदार यांना निमंञीत करण्यात आले आहे. संसदेत आदिवासीच्या संविधानात्मक हक्कावर होत असलेल्या अन्यायाचे संबधाने भुमिका घेणार आहात की नाही? अशी रोखठोक भुमिका घेण्यात येणार आहे. आदिवासीचा विकास राजकिय प्रतिनिधिंच्या अनास्थेमुळे अडगळुन पडला असुन आदिवासींनी केवळ मतदान देण्याची भुमिका घ्यायची व अन्याय सहन करीत रहायचे काय. या भुमिकेवर या संसदेने आदिवासीत जागरण करुन राजकिय विद्रोही भुमिका घेण्याचे ठरविले. ही भुमिका आदिवासीच्या राजकिय विद्रोहाची ठीणगी होय. ती पेटणे आवश्यकच होते. राजकारण अन्याय शोषण झुगारणारे असल्या शिवाय विकास होणार नाही. विशेषतः आदिवासी राजकिय प्रतिनिंधींनी राजकिय सशक्त भुमिका स्विकारुन समाज विकासासाठी सावध होणे गरजेचे आहे. आदिवासीचे आरक्षण पळवल्या जाते? बोगस आदिवासी लुटताहेत म्हणजे आदिवासींच्या संविधानात्मक स्वातंञ्यावरच घाला होय. ही जबाबदारी समजुन घेऊन वणी येथील समाजनेत्यांनी आदिवासी न्याय संसद आयोजीत करुन सुरवात केली आहे. या निमंत्रण अनुषंगाने सर्व मान्यवरांचे साहत्यीक बाबारावजी मडावी व सुनंदा मडावी माजी नगरसेविका यांनी स्वागत केले.

ह.भ.प. युवा किर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचे 28 सप्टेंबरला वणीत जाहीर व्याख्यान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पारसमल प्रेमराज फाउंडेशनच्या वतीने वणी येथे दिनांक 28 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध ख्यातनाम वक्ते ह.भ.प. युवा किर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचा व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

युवकांच्या उज्वल भविष्याकरिता मार्गदर्शन व पालकांची भूमिका या विषयावर हे जाहीर व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा लाभ वणी उपविभागातील विद्यार्थी, युवक युवतींनी तसेच पालकांनी घ्यावा, असे कळकळीचे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी केले आहे.

लाखो युवकांचे प्रेरणास्थान सोपानदादा कनेरकर हे आपल्या प्रबोधनातून विद्यार्थी, युवक युवतींना व पालकांना भगवद्गीतेद्वारे आवडेल अशा वाणीतून ते यशाचा कानमंत्र देतात. त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.


खासदार धानोरकर यांना सकल नाभिक समाजाचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वसंत जिनिंग कार्यलयात २४ सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी 3 वा. 'जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी नाभिक युवा क्रांती बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मारेगाव तालुक्यातील सकल नाभिक समाजाच्या नेतृत्वात दि.30 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या आजाद मैदान आंदोलनाबाबत चर्चा करून खा. धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदन देताना नाभिक युवा क्रांतीचे उपाध्यक्ष निरंजन येसेकार, कोषाध्यक्ष मनोज चौधरी, सेनाप्रमुख भाऊ वाटेकर, विनोद आंबेकर, तुळशीदास वाटेकर व मारेगाव ता.नाभिक असोसिएशनचे अध्यक्ष आनंद नक्षीने, गजू नक्षीने आदींची  उपस्थिती होती.

चतुर्थ श्रेणीच्या मागणी साठी भर पावसात कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, दि. २४ सप्टेंबरला राज्य कोतवाल संघटनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले.

राज्य कोतवाल संघटनेचे राज्य स्तरीय लक्षवेधी आंदोलन मंत्रालयस्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे, यासह विविध मागण्या सोमवार, दि. २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण न झाल्याने दि. २४ सप्टेंबरला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. या भरपावसात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो कोतवाल सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले. 

यावेळी कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके, जिल्हाध्यक्ष उत्तम पाचभाई, उपाध्यक्ष पंकज जाधव, सचिव प्रशांत प्रभाते, महिलाध्यक्षा छाया दरोडे यांच्यासह दिलीप इंगोले, देवानंद फोपसे, अतुल अहिरे, अमोल लोंढे, किरण मोरे, राकेश संकिलवार, शंकर चव्हाण, रोशन जोगे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि शेकडो कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.


आजपासून कामबंद आंदोलन करणार

कोतवाल संघटनेच्यावतीने बुधवार, दि. २५ सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार असून गुरूवार, दि. २६ सप्टेंबरपासून मुंबई आझाद मैदान मागण्यापूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील कोतवाल संघटना सहभागी होणार आहे.

-उत्तम पाचभाई
जिल्हाध्यक्ष, कोतवाल संघटना


-

सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ; तर आता ग्रामपंचायत अधिकारी पद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज (ता. 23) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना 2 हजार, 3 हजार आणि 4 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1 हजार, दिड हजार आणि 2 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात 27 हजार 943 ग्रामपंचायती आहेत.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद

राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी’ करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ग्रामसेवक (एस-8) व ग्रामविकास अधिकारी (एस 12) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25500 – 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस 14) वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी (एस 15) व तीस वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस 20) असा मिळेल.

सौ. रश्मी उद्धव ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे व शिवसेना प्रणित युवासेना चे सचिव वरुन सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त वणी ग्रामीण रुग्णालयात युवासेना विस्तारक यवतमाळ जिल्हा धिरज खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या वतीने रुग्णांना फळ वितरण करुन रश्मीवहिनी ठाकरे व वरून सरदेसाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे हे काही ना काहीदरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित असतात. नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या उपजिल्हा प्रमुखांनी आपल्या युवा सैनिकांना घेऊन सौ रश्मी उद्धव ठाकरे व वरून सरदेसाई यांचा एकत्रित वाढदिवस साजरा केला. यानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. व आरोग्याची विचारपूस केली 

यावेळी धनराज येसेकर, सुधीर ठेंगणे, संतोष राजुरकर, तेजस नागपुरे, सागर गोलाईत, बादल येसेकर, जर्मन शेख, करण नागपुरे, धनराज मडावी, रतन धोबे, अमोल आरेलवार, आर्यन राऊत, सप्नील बल्की इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते.

पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच खात्यातील रक्कम उडविली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील राहुल मेडिकल स्टोअर्स'चे संचालक अतुल देविदास बोबडे यांनी पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच त्यांच्या वेगवेगळ्या दोन बँकेच्या खात्यातील रकमा उडवून त्यांना वीस हजार रुपयाचा गंडा दिला आहे. 
          
मार्डी येथील व्यावसायिक अतुल बोबडे यांनी पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच मोबाईल हॅक करून 19 सप्टेंबरला मोबाईल बंद केला. 20 सप्टेंबर रोजी मारेगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतून 5000 रुपये तर, एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 1100 रुपये परस्पर लांबविण्यात आले. दुसऱ्या दिवशी 21 सप्टेंबरला पुन्हा वेगवेगळ्या ट्रांजेक्शन मधून 12263 रुपये हडप करण्यात आले. यानंतर हॅकरद्वारा व्हाट्स ऍप, फोन पे, गुगल पे बंद करून वेगवेगळ्या कंपनीचे ओटीपी मॅसेज येऊ लागल्याने बोबडे यांनी त्वरित डेबिट कार्ड ब्लॉक केले. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.      
मात्र,सायबर क्राईम च्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने मोबाईलधारकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

विधानसभेच्या रिंगणात हरीश पाते उतरणार!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा युवा कार्यकर्ता तथा भावी आमदार हरीश पाते वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबातील हरीश पाते मागील काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 
गोरगरिबाच्या कामासाठी धावून जातात तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी, बेरोजगारांसाठी काम करत असतात. जात पात न पाहता रात्री बे रात्री उठून ते धावून जातात. तसेच जिथे अन्याय होत असेल तर, ते धावून जातात. आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर हात घालून सर्वच कामे प्रशासन दरबारी रेटून धरली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची, बेरोजगारांची त्यांनी काम करून दिलेले आहेत. सर्व समाजातील घटकावर वरती काम करत असतात. असा नवा चेहरा वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहेत. 
आंबेडकरी चळवळीचा युवा कार्यकर्ता हरीश पाते....काही ग्रामीण भावात संवाद साधत असताना पिण्याच्या पाण्याच्या, पांदन रस्ता, शेतजमिनीचा मोबदला ह्या समस्या जाणून आल्या. हा प्रश्न सोडण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असे, यावेळी प्रथम 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभा लढवावी, अशी वणी विधानसभा मतदार संघातील युवकांची इच्छा आहे. आज सर्व संघटना तयार असून सगळ्या कार्यकर्त्यांची देखील एकमेकांशी चर्चा करून इच्छा जाहिर केली आहे.

त्यामुळे "नवा चेहरा, बदल हवा" अशी एक संकल्पना घेत हरीश पाते हे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा लढवण्यास ईच्छुक आहेत.

आदिवासीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये-

सह्याद्री चौफेर । कुमार अमोल 

जिवती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातुन भारतीय राज्यघटना लिहून त्यात भारतीय समाजातील जातीय असमानता दुर करून समताधिष्टीत बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. भारतीय संविधानात एस. टी. आरक्षण लागू केले आहे. मात्र अजूनही या समाजाचे मागासलेपण संपलेले नसल्याने एस.टी. समुहाला घटनेनुसार प्राप्त आरक्षणाला धक्का लावून केंद्र किंवा राज्य सरकारने धनगरासह अन्य कोणत्याही जातीला या प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच धनगर जातीला, आदिवासी/अनुसूचीत जमातीचे यादित समाविष्ठ करता येत नाही, असे स्पष्ट केलेले आहे. तरीपण धनगर जातीचा समुह, आदिवासींच्या यादित धनगर जातीला समाविष्ठ करण्यासाठी राजकिय दबाव आणत आहे. 

यापूर्वी TISS संस्थेकडून अभ्यासगट तयार करून धनगर व आदिवासी यांचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केलेला आहे. सदर अहवाल आजही प्रकाशित न करता नव्याने धनगर जातीचा समावेश आदिवासीचे प्रवर्गात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. घटनात्मक कायद्याने सरकारने धनगर समाजाला आरक्षण निश्चितपणे द्यावे मात्र अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) यादीत समावेश करण्यात येऊ नये. धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून 'धनगर व धनगड' हे एकच असल्याचे म्हटले आहे. 

यावर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आदिवासी संघटनांनी विरोध दर्शविला व गजानन जुमनाके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आदिवासीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी प्रा. लक्ष्मण मंगाम, माजी सभापती भीमराव मेश्राम, सोनेराब पेंदोर, मारोती कुमरे, शित्रू गेडाम, गोचू पेंदोर, सुखलाल कोटनाके, आनंदराव कोटनाके, मारोती सिडाम आदींची उपस्थिती होती. उच्च न्यायालय मुंबई, तसेच सर्वोच्च न्यायालयात धनगड (जमात) व धनगर (जात) हे या भिन्न जमाती व जाती असून धनगर या जातीला आदिवासींमध्ये समाविष्ट करता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला. तरीही निवडणुकांवर डोळा ठेवून, मते मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. असे झाल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

आरोग्य जपा,आरोग्य हिच सर्वात मोठी संपत्ती आहे -आ. संजीवरेड्डी बोदकुरवार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : नागरिकांना एक चांगली सुविधा द्यावं, केवळ राजकारण करत असताना केवळ विकास, भौगोलिकता, रस्ते, वीज, पाणी होते. परंतु माझ्या विधानसभेत माझ्या माता बहीनींचं आरोग्य उत्तम राहावं. व आनंद मिळावा, असे प्रतिपादन आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी केले. लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल,वणी येथील भाजप शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.शेवटी हेच विचारलं जातं की, तुमची तब्बेत कशी आहे; मुलंबाळ किती आहे असेही ते म्हणाले.
दि. 22 सप्टेंबर रोजी वणी येथे आयोजित सेवा पंढरवाडा कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल नांदेपेरा रोड येथील शाळेत निशुल्क भव्य आरोग्य शिबीर, सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्व रोगनिदान व उपचार सावंगी (मेघे) येथील तज्ञ डॉ. एल पी शिंगणे व डॉ. अभिषेक इंगोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या शिबिरात झरी, मारेगाव, वणी तालुक्यातील जवळपास चार हजार गरजू रुग्ण सहभागी झाले. 
शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते दीपप्रज्वललन करून करण्यात आले. यावेळी मंचावर ललितारेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, रवि बेलूरकर, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, संध्या अवतारे, मंगला पावडे, लिशा विधाते, उमा पिदूरकर, उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री. बोदकुरवार म्हणाले, तुमच्याकडे संपत्ती किती आहे, पैसे किती आहे हे कोणी विचारत नाही. म्हणून आरोग्य जपा,आरोग्य हिच सर्वात मोठी संपत्ती आहे. हे आपण सर्वांनी जपून राहावं, म्हणून मी या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून भाजप व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) च्या वतीने निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले. एक चांगली सुविधा नागरिकांना या शिबिरातून मिळतेय, मी मनापासून या आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. यापुढेही सेवाभावी उपक्रम सुरू राहणार आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील 3600 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, तर डॉक्टरांनी 300 रुग्णांना शस्त्रक्रियाचा सल्ला देण्यात आला. त्यांना सावंगी (मेघे) येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. शिबिरात रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, नाक कान घसा इत्यादी रुग्णांची तपासणी तज्ञाकडून करण्यात आली. सर्व रुग्णांना निशुल्क औषधी वाटप केली. 
कार्यक्रमाचे संचालन नितीन वासेकर यांनी केले तर, मान्यवरांचे आभार जयमाला दर्वे यांनी मानले. वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या निशुल्क भव्य आरोग्य शिबीराची संक्षिप्त रूपरेषा मांडली. दरम्यान, सर्व रुग्णांसाठी आयोजकांतर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली होती. 
या शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. प्रेमानंद आवारी, केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशन वणी, आशा वर्कर, गट प्रवर्तिका, ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, लॉयन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांची टीम तसेच भारतीय जनता पार्टीचे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली.

आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेची मागणी पूर्ण होणार

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे वारे जोरात वाहत असून सत्तरूढ़ भाजपाने अजुन पावेतो उमेदवारी घोषित किंवा उमेदवाराचे संकेतही न दिल्यामुळे पांढरकवडा व घाटंजी तालूक्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या विविध आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून एक बैठक घेतली.भाजपाचे जेष्ठ नेते पांढरकवडा गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व माॅ.जगदंबा पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.काशिनाथजी मिलमिले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली,या सभेत स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी याकरीता चार नावे भाजपा पक्ष श्रेष्ठीकडे पाठविण्यात यावे असे ठरले.यातूनच भविष्याचा उमेदवार निश्चित होणार असल्याचा विश्वास आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, १६८० मध्ये हा मतदार संघ अनुसुचित जमाती करीता आरक्षित झाला.केवळ एक पंचावार्षिक वगळता इतर सर्व दशके या मतदार संघाबाहेरील उमेदवाराला प्रतिनिधीत्व मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे आदिवासी मतदार संघ असून सुध्दा गेल्या ४५ वर्षात या मतदार संघाचा विकास होवू शकला नाही,उलट मागासलेपणा वाढतच गेला.कॉंग्रेसने देखिल आत्ता पर्यंत मतदार संघा बाहेरील उमेदवार दिला,त्यामुळे सातत्याने मतदार संघाचा खरा स्थानिक आदिवासी डावलला गेला.त्यामुळे सत्तारूढ भाजपा मध्ये सुध्दा स्थानिक उमेदवाराच्या मागणीचा जोर वाढला आहे.व जनतेची आग्रही भुमीका सुध्दा दिसून येते.अशा परिस्थितीत अनेक जण ईच्छूक असले तरी पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे जिल्हा महामंत्री व पांढरकवडा पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके व सामाजिक कार्यकर्ते संजय आत्राम व माजी गटशिक्षणाधिकारी पांडूरंगजी कुमरे व महंत श्री.दत्त भारती विद्यालय आर्णिचे मुख्याध्यापक अमोल मंगाम यांची नावे सर्व संमतीने ठरवून यापैकी कोणालीही उमेदवारी दयावी अशी मागणी भाजपा पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली.तसेच श्रेष्ठीचा निर्णय अंतीम मानण्यात येईल असे सुध्दा ठरविण्यात आले.निवडणूकीतील ईतर सर्व विषया सोबतच या मतदार संघात स्थानिक उमेदवार हा मुद्या महत्वाचा ठरत आहे.त्यामुळे या बैठकीत ठरविलेल्या नावांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.यावेळी जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती,तथा माजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन बेजंकीवार यांनी सभेला मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले.यासभेला प्रामुख्याने गजानन बेजंकीवार यांचेसह घाटंजी बाजार समितीचे अध्यक्ष नितिन कोठारी, उपसभापती घाटंजी बाजार समिती सचिनभाऊ पारवेकर, आबासाहेब पारवेकर जिर्नीगचे अध्यक्ष संभारेडडी येल्टीवार,माजी उपसभापती प्रकाश पाटील डंभारे,पारवा विविध का.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष पोचारेड्डी,नगर परिषद घाटंजीचे गट नेते माजी भाजपा तालूका अध्यक्ष तथा न.प.माजी सभापती सतिष मलकापूरे,व्यापारी आघाडी व घाटंजी बाजार समितीचे माजी संचालक भरत पोतराजे,पांढरकवडा बाजार समितीचे माजी संचालक दिलीप अंगलवार,घाटंजी तालूका कारागीर सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा घाटंजी बाजार समितीचे संचालक प्रकाश खरतडे,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक महेश बोळकुंटवार,माजी शिक्षण सभापती घाटंजी न.प.प्रशांत उगले,जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते अंकुश ठाकरे,माजी अध्यक्ष पहापळ सोसायटी तथा पांढरकवडा खरेदी विक्री संचालक निलेश ठाकरे,माजी उपसंरपंच आकोली महेश चिंतावार,जिनिंग प्रेसिंगचे संचालक नरेंद्र बनपेल्लीवार,सहकारी संथा बेलोरीचे माजी अध्यक्ष गिरिधर पावडे,माँ.जगदंबा पतसंस्थेचे सचिव तथा उपसरपंच पहापळ रमेश भुरे ईत्यादि उपस्थित होते.

संजय खाडे यांचे रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अवजड वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्‌यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी भालर रोडवर कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्‌यात बेशरमाचे झाड लावून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. याबाबत त्यांनी निवेदन देत तालुक्यातील रस्ते तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात अशोक चिकटे, अरुण चटप, प्रमोद लोणारे, रवि कोटावार, तेजराज बोढे, विकेश पानघाटे, प्रफुल्ल उपरे, कुचनकर, कैलास पचारे, कल्पना मुने, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक नागभिडकर वंदना आवारी, काजल शेख, मंदा भांगरे, संगिता खाडे, सविता रासेकर, सुपेखा वडिचार, कल्पना मुने, कमल लोणारे, सुशिला कांबळे, अशोक पांडे, अरुण मगराळे, संदीप कांबळे, संदीप ढेंगळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व परिसरातील गावकरी सहभागी झाले होते.

जीवन एक संघर्ष - किशोर चलाख

 जीवन एक संघर्ष 

सूर जणू सप्तरंगी
असे आपुले जीवन
मज नाही हे कळले
कसा गेलो मी गुंतून

वाटा या वळणदार
सुख दुःख सोबतीला
जावे चालत एकटं
कोणी नसे मदतीला

जरी संकटे आलीच
तरी सुखच वेचावे
दुःख ठेवुन बाजूला
मागे फिरून पहावे

उडी मारून सुखाची
प्रेम आपण घेऊया
देऊ सोडून नैराश्य
दुःख सारे विसरुया

असे जीवन संघर्ष
गात हसत जगावे
वैर सोडून देऊन
सदा प्रेम उधळावे

-किशोर बळीराम चलाख
मु.पो.गोंडपिपरी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर 
भ्रमणध्वनी क्र.9405900987
ईमेल- kchalakh@gmail.com

अंबादासजी कनाके यांचे निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील रहिवाशी अंबादासजी कनाके यांचे दिनांक 21 सप्टेंबर रोज शनिवार ला रात्री 9.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते गेल्या अनेक वर्षापासून आजारपणात होते. त्यांचे मृत्यू समयी वय 80 वर्ष होते. 

आज दिनांक 22 सप्टेंबर रोज रविवारी सकाळी 11 वाजता वणी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, नातू असा मोठा परिवार आहे.