स्व. सिंधुताई मस्की स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयाला फोल्डिंग बेड भेट...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : स्वर्गीय सिंधुताई दिगांबर मस्की यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री. दिगांबर मस्की यांच्याकडून येथिल ग्रामीण रुग्णालय मारेगाव,आज दिनांक ३१ मार्च २०२५ ला रुग्णालयातील रुग्ण सेवेसाठी फोल्डिंग बेड भेट देण्यात आला. 

विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या कोसोदूर असलेले हे परिवार, सामाजिक कार्यात मात्र सतत हिरीरीने नेहमीच मस्की परिवार अग्रेसर असतात. यावेळी सुद्धा "मस्की" कुटुंबीय सामाजिक कार्यात सरसावल्याचे दिसून आले आहे. येथील श्री. दिगांबर मस्की यांच्या सामाजिक जणींवेतून स्वर्गीय सिंधुताई दिगांबर मस्की यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज सोमवार ला ग्रामीण रुग्णालयाला रुग्ण सेवेसाठी फोल्डिंग बेड भेट देण्यात आला आहे. 

त्यानिमित्त उपस्थित असलेले मान्यवर दिगाबरराव नारायण मस्की, प्रा.डॉ.राजेंद्र कुमार सुर ,श्री सुनील कोगरे, श्री गोपाल काळे, मारुती भाऊ देवाळकर, डॉ. मनीष तुळशीराम मस्की नगरपंचायत नगराध्यक्ष मारेगाव, श्रेयश गोपालराव काळे ,भार्गव मनीष मस्की व ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, सिस्टर्स, व ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण स्टॉप प्रामुख्याने हजर होते. 

आदिवासी बेरोजगार तरुणांना स्थानिक कंपन्यामधे रोजगार द्या - ए टी एस


सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यात नावाजलेल्या अनेक खाजगी कंपन्या आहेत.त्या कंपन्यामध्ये परप्रांतीय व राजकीय नेते ह्यांच्याशी सलोखा असणाऱ्या किवा स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी यांच्याशी संबध असणारे ह्यांचीच शिफारिस असेल तर त्या कंपनी मध्ये खाजगी रोजगार दिला जातो. अशी खंत जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

चंद्रपूर गडचिरोली आदिवासी बहुल जिल्हे असून अनेक आदिवासी बेरीजगार युवक आहेत. त्यांना जिल्ह्यातील विविध कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा अश्या मागणी चे निवेदन नामदार डॉ.प्रा.अशोकराव उईके आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर महा.राज्य यांना आज संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, जितेश कुळमेथे विदर्भ प्रवक्ता,साईनाथ कोडापे विदर्भ सचिव,आदिवासी टायगर सेना च्या वतीने करण्यात आली.

क्षुल्लक कारणावरून मारहाण,तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वर्दळी च्या ठिकाणी मोटारसायकल ला कट लागला म्हणून एका इसमास त्याचे घरी जाऊन मारहाण केल्याची तक्रार गुरुवारी रात्री 8.30 वाजता घडली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

अर्पित अग्रवाल (25), विजय अग्रवाल (55) व संजय गोयल (50) रा. वणी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कृष्णकुमार नंदकिशोर वर्मा (63), रा. राम मंदिर जुनी स्टेट बँक जवळ वणी यांनी याबाबत तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार फिर्यादी गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलवरून गांधी चौकातून घराकडे जात होते. दरम्यान गांधी चौकाकडे जात असलेल्या अर्पित अग्रवाल याच्या दुचाकीचा त्यांच्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर फिर्यादीने दुर्लक्ष करून घराकडे निघून गेला. मात्र, अर्पित हा त्यांच्या मागेच घरी आला व फिर्यादी सोबत परत वाद करुन शिवीगाळ केली.

त्यानंतर अर्पित अग्रवाल यांनी फोन करून त्याचे वडील विजय अग्रवाल यांना बोलाविले. विजय अग्रवाल यांनी फिर्यादी यास शिवीगाळ व थापड बुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय त्यांच्या सोबत आलेला संजय गोयल यांनीसुद्धा शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी मधात आली असता तिलाही शिवीगाळ व ढकलढुकल केले. क्षुल्लक कारणावरून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी यांनी लावला आहे. फिर्यादी कृष्णकुमार नंदकिशोर वर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गैरअर्जदार विरुद्ध कलम 115(2), 352, 351(2), 351(3) BNS नुसार गुन्हा दाखल केला.

यवतमाळ : लाखांचा मुद्देमाल आयजींच्या हस्ते वितरित

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : फेब्रुवारी महीन्याच्या पहील्या आठवड्यात वणी शहरातील साधनकर वाडीत राहणारे विमा कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी प्रदीप चिंडालीया यांच्या घरात झालेल्या घरफोडीत 14 लाख 80 हजार रूपयाचा माल चोरट्यानी लंपास केला होता. तसेच 6 डिसेंबर ला येथील जिल्हा परीषद कॉलनीतील कमलबाई भुसारी यांचे 9 तोळे सोने व 45 हजार रूपये रोख चोरट्याने लंपास केले होते. दोन्ही गुन्ह्याच्या आरोपींना वणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.
                       
गुरूवारी यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात अमरावती परिक्षेत्राचे विशेष आयजी रामनाथ पोकळे यांच्या हस्ते चोरी गेलेला मुद्देमाल तक्रारदाराला परत करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

यात उज्वला प्रदीप चिंडालिया यांना 142.25 ग्रॅम सोने व 47.760 ग्रॅम चांदी देण्यात आली. कमलबाई बाळकृष्ण भुसारी यांना 89.140 ग्रॅम सोने परत देण्यात आले. 

यावेळी वणी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर हे उपस्थित होते.

मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांमध्ये निवारा हा महत्त्वाचा घटक असून तो आम्हाला मिळालाच पाहिजेत . यासाठी मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीने संविधानात्मक मार्गाने महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात नुकतेच आझाद मैदानात धरणे आंदोलन केले असून यामध्ये प्रामुख्याने" केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे " या धोरणाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अर्थमंत्री अजित पवार, यांच्याकडे मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी रीतसर करून त्यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
       
त्यानुसार मुंबई महानगरातील भाडेतत्त्वावर राहणारे शेकडो महिला आझाद मैदान मध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या असून आपल्याला हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त करत होता. यावेळी संघाचे संस्थापक जगदीश भाई कुमार इंगळे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात आपल्याला जे काही अधिकार मिळाले आहेत त्याकडे सरकार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेले असताना आपल्याला राहण्याची हक्काचे घर नाही यापेक्षा दुसरी कोणती शोकांतिका नाही त्यासाठीच मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन उभे केले.शासनाने जर दखल घेतली नाही तर संपूर्ण मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करण्याचा इशारा आंदोलनातून दिला आहे.
      
केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व येथे घरे योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे गरजवंतांना घराचा लाभ मिळत नाही त्यामुळे शासनाने गंभीर बाबीचा विचार करून मुंबई महानगरातील बेघर नागरिकांना शासनाच्या "सर्वांसाठी घरे" योजनेची त्वरित अंमलबजावणी करून सर्व भाडेकरूंना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय त्वरित काढून भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे असा इशाराही मुंबई भाडेकरू रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे व मुंबई प्रदेशाध्यक्ष गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांनी आंदोलनातून देण्यात आला आहे.. 
   
या आंदोलनाच्या निमित्ताने पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांनी गृहनिर्माण उपसचिव अजित कवडे यांची भेट घेऊन आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून निवेदन देण्यात आले. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आपला प्रश्न सोडवण्यात येईल ज्यांना भारतात/महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे घर नाही अशा बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येतील असेही आश्वासन दिले.
        
या आंदोलनात मुंबई महानगरातील मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे सचिव कविता निकाळजे, कल्पना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी, भांडुप, सायन, मानखुर्द, घाटकोपर, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगर, भागातून भाडेकरू रहिवासी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

स्वरांगण तबला विद्यालय मारेगाव तर्फे गुढी पाडवा व रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा...!

गुढी पाडव्याच्या व रमजान ईद च्या स्वरांगण तबला विद्यालय मारेगाव तर्फे हिंदू मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा...!

-रवि घुमे
उच्च शिक्षित तबला शिक्षक
तबला विशारद, तबला भास्कर व पत्रकार

मांडोस निमित्त गोंड पंच कमिटी माथार्जुन गोणा बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यामधील माथार्जुन या गावामध्ये पारंपारिक गोंड पंच कमिटी यांची सभा पिढीन पिढी चालवत येत असलेले या परंपरा आपल्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे गोंड पंच कमिटी मध्ये एक न्याय करते म्हणून चार लोक निवडले जातात त्यामध्ये घटया महाजन कारभारी व भूमक यांचे कार्य समाजामध्ये वादविवाद असल्यास एक गोणा बैठकीमधून निर्णय लावण्यात येते. सांस्कृतिक,लग्न,समारंभ देव कार्य मृत्यक कार्य व देवकार यांच्या समक्ष केल्या जातात..समाजाचे संपूर्ण कार्य हे पंच कमेटीनुसार करण्यात येतो.

पारंपारिक चालत येत असलेल्या गोंड पंच कमेटी गोंड समुदायाच्या लोकांमधून लोकशाही पद्धतीने घटया, महाजन, कारभारी व भूमक निवडण्यात येते.
 
पारंपारिक रूढी परंपरानुसार चालत येत असलेल्या माथार्जुन येथे घटया पदी संतोष तुमराम. महाजन पदी मनोहर मेश्राम,कारभारी पदी अरविंद नैताम, तर भूमक या पदी धर्मा गेडाम, यांची गोंड पंच कमेटी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अपघातात दोघे गंभीर जखमी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकल चालकाला बेधडक दिली. या अपघातात दोन युवक गंभीर झाल्याची घटना दि. 29 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वाजता राज्य महामार्गावरील घोगुलदरा फाट्यानजीक घडली. दरम्यान दूचाकीस्वाराला अक्षरशः चारशे मिटर फरफटत नेत कारवाला पसार झाला. 
वणी-मारेगाव वरून भरधाव करंजी दिशेने हे अज्ञात वाहन जात होते. याच दिशेने दुचाकीस्वार मारेगाव तालुक्यातील वाघदरा येथील सतीश झिगूं आत्राम व निलेश तुकाराम दडांजे हे जात असतांना राज्यमहामार्गांवर असलेल्या घोगुलदरा फाट्या पासून अज्ञात कार ने अक्षरशः दुचाकीला फरफटत तब्बल तीनशे ते चारशे मिटर वरील बोटोणी नजीक सराटी फाट्यापर्यंत नेले. हा थरार येथील अनेकांनी प्रत्यक्षात बघीतला. येथे गतिरोधक असल्याने दुचाकी कडेला पडली यात दुचाकीस्वार दोघेही गंभीररित्या जखमी झाले. मात्र, हे अज्ञात वाहन धारकांनी वाहणासह घटनास्थळावरून पोबारा केला.
गंभीर जखमी दुचाकीस्वार सतीश व निलेश यांना करंजी येथील प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

गुढी आनंदाची....

गुढी आनंदाची

सण आला हा पाडव्याचा 
घेऊन नवचैतन्य उत्साहाचा 
ध्यास असू द्या मनी प्रेमाचा
 आनंद हा नववर्षाचा,

फुलवा नात्यांचा गोडवा 
द्वेष मत्सराची गुंतागुंत सोडवा 

गुढी उभारा मनी प्रेमाची 
जणू पालवीच्या नवपर्णाची,
 
आसमंत गेला भरुनी 
वसंताच्या निर्मळ स्पर्शाने 
हिरवळ परिमळ झाली सृष्टी पशुपक्ष्यांची कोमलदृष्टी,

कलारव किलबिलांचे गुंजन
 गगन गेले सप्तसुरांनी रंगून 

जीवनी तुमच्या आनंद वसु दे 
हीच सदिच्छा मनी असू दे.

    
मंजुषा राजेंद्रप्रसाद पांडे



मारेगाव तालुक्यातील सर्व जनतेला गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा...


आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरवात होते तसेच साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर गुढी पाडवा साजरा केला जात आहे. 

यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह मारेगाव तालुक्यातील जनतेला नवीन वर्ष व गुढीपाडवाच्या शुभेच्छा...

शुभेच्छुक :- 
माजी तालुका अध्यक्ष : रुपेश ढोके, मनसे 
सरपंच : सुषमा रुपेश ढोके, कानडा ग्रामपंचायत 

गणेशभाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

अ|भि|ष्ट|चिं|त|न 

सुखाची लाट तुमच्या जीवनात यावी, दुःखं दूर जावीत आणि तुम्ही सदैव आनंदी राहा. तुमच्या जन्मदिनी अनंत शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव द्विगुणित मिळो. भाजपा मारेगाव तालुका सरचिटणीस तथा जिवलग मित्र गणेश भाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक : सर्व मित्र परिवार 
मारेगाव, वणी, झरी तालुका 

वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी रात्री ८ वाजता पार पडली. 

रमजान ईद, रामनवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमेटीची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रमजान ईद, रामनवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरे करावे. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी, असे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सांगितले.

यावेळी पुरुषोत्तम पाटील सर, रवि बेलुरकर, मंगल तेलंग, यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर, नारायण गोडे, दिपक छाजेड, रमेश येरणे, संतोष डंभारे, सत्यजित ठाकुरवार, नितीन बिहारी, सौ.शालिनीताई रासेकर, मंदाताई बांगडे, विजयाताई आगबत्तलवार,सौ. आरती वांढरे, सौ सुमित्राताई गोडे यांच्यासह महिला प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावर्षी श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार 

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री राम नवमी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. २२ वर्षांपासून सर्व धर्माचे सहकार्य लाभत असुन मला कोणत्याही समाजाचा त्रास झाला नाही असे श्री राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी शांतता कमेटीच्या बैठकीत सांगितले. यावर्षी राम लल्ला, श्री कृष्ण, हनुमानाची मुर्ती, साई रथ, रामाची पालखी, तसेच लाईव्ह हनुमान व शेगाव येथील रिंगण भेदी भजन मंडळ वणी करांना मंत्रमुग्ध करणार आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने श्री राम भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी दिली.

वणीत पाणपोईचे उदघाटन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील गांधी चौक तुटी कमान नजीक पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

वणी शहरातील श्री जैन महिला मंडळ यांच्या पुढाकारातून पाणपोई हा मानवी दिलासादायक उपक्रम परमपूज्य १००८ आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त राबविण्यात आला.
    
सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांनी या पाणपोईचे उदघाटन केले. यावेळी दीपक छाजेड श्री जैन महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ प्रमिला चंद्रकुमार चोरडिया, सचिव रूपाजी खिवंसरा, सहसचिव विद्या मुथा, सदस्य ज्योतीबाई चोरडिया, प्रिया कटारिया, राखी कुचेरिया, शोभा खिवंसरा, अंशुमा झाबक, पुष्पा कोटेचा, प्रेमा चोरडिया यांच्यासह मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.

या सामाजिक उपक्रमाने वाटसरू, फेरीवाले यांना सूर्य आग ओकणाऱ्या उन्हामध्ये थंड पाण्याची सोय झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

विदर्भ नृत्य स्पर्धेत योगन्या वासेकर व सुरज धनुष्यकर प्रथम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शेतकरी लॉन येथे 22 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विदर्भ नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, उद्घाटक एकविरा महिला पतसंस्थेचे अध्यक्ष किरण देरकर, प्रमुख पाहुणे अ‍ॅड. देविदास काळे, माधव सरपटवार, शारदा ठाकरे, वंदना आवारी, साधना गोहोकर, प्रा. दिलीप अलोणे, प्रमोद वासेकर, अशोक सोनटक्के यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी समाजात फक्त निःस्वार्थ कार्य करतात अशा महिलांचा सत्कार करण्यात आला. नंदा शेलवडे, मंगला झिलपे, भारती सरपटवार यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भरतनाट्यम पारंगत नृत्य प्रशिक्षक आणि नृत्यांगणा सूचना बंगाले यांनी उपस्थित महिलांना महिलांविषयी मार्गदर्शन केले.

नृत्य स्पर्धेत चार गट असून प्रथम क्रमांक अ गट योगन्या वासेकर ब गट सुरज धनुष्यकर, पैठणी विजेत्या महिला क गट सुनीता डाबरे, ड गट समूह नृत्य मध्ये गोंडी नृत्याला प्राप्त झाले. शेतकरी लॉन चे कार्यवाहक व मानवी हक्क परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष मनीषा सुरेंद्र निब्रड यांचा प्रयास संस्थेचे अध्यक्ष पौर्णिमा शिरभाते व त्यांच्या चमूने उत्कृष्ट आयोजनाकरिता त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

स्पर्धेचे परीक्षण नागपूर येथील शुभांगी सरोदे, अश्विनी मानेकर, गौरव श्रीरंग यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका कोटनाके, आभार सागर मुने यांनी मानले. या स्पर्धेकरिता सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, जय जगन्नाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पंढरीनाथ सोनटक्के, राजु खुसपुरे, सुरेखा वडीचारे सुमित्रा घोडे, प्रिया कोणप्रतिवार, निशा उपरे, जयश्री सोनटक्के,संदीप बेसरकर, राजू धावन्जेवार, वृषाली मुंजेकर, स्नेहल कोटनाके यांनी परिश्रम घेतले.

वणीत हॉटेलमध्ये भीषण आग,संपूर्ण साहित्य जळून खाक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील साई मंदिर चौकात भीषण आगीची घटना घडली आहे. नांदेपेरा मार्गावरील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात आगीचे लोळ भीषण दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील साई मंदिर चौक रसोई हॉटेल मध्ये ही आग लागल्याचे समजते. गुरुवार दि. 27 ला रात्री 1 ते 1.30 वाजता च्या दरम्यान ही आग लागल्याचे बोलल्या जात आहे. आग लागल्याने काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला. या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवतहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
 
ही आग गुरुवार मध्यरात्रीच्या वेळी लागली होती. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथे पोलीस प्रशासन दाखल झाले त्यांनी अग्निशमन दल पाचारण केले आणि आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी ही भीषण आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, हॉटेलमध्ये मोठा स्फ़ोट झाल्याची चर्चा आहे. 

घटनेचा व्हिडीओ पहा :



वणी उपविभागात 'महाकुंभ' तीर्थदर्शन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सामाजिक समरसतेचा मंत्र घेऊन वणी उपविभागीय क्षेत्रातल्या 33 वस्तीमध्ये तीर्थ कलश दर्शन सोहळे संपन्न झाले.
प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान भरलेला महाकुंभमेळा आता संपन्न झाला आहे. हा 45 दिवसांचा धार्मिक कार्यक्रम होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भाग घेतला. परंतु ग्रामीण भागातील यामध्ये जे 'महाकुंभ' ला जाऊ शकले नाहीत, त्यांच्या पर्यंत तीर्थ कलश दर्शन आणि जल पोहोचवण्याचे कार्य अनुलोम भाग वणी च्या वतीने उपविभाग प्रमुख सुनील दालवनकर, वैभव मेहता व वैभव सुर भाग जनसेवक यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन हरिभक्त परायण मुन्ना महाराज तुघनायत,
दीपक नवले, घनशाम आवारी, चिंतेश्वरजी वैद्य, गजानन विधाते, प्रज्योत हेपट, अमित उपाध्ये यांनी तीर्थ कलश दर्शन दरम्यान केले.

बाईपण....सौ समीक्षा गणेश डवरे देऊळकर यांच्या शब्दात


बाईपण

आईपण आणि बाईपण 
दोन्ही जिवांचा सांभाळ करते, 
ति आई कुठे काय करते..!

आईचो माया मुलांना देते, 
बाई म्हणून संपुर्ण वेळ घरात देते, 
जबाबदारी सोबत, सर्वांचा सांभाळ करते, 
ति आई कुठे काय करते..!

डोक्यावर जरी बापाचं छप्पर असले तरी,
 त्या घराला घरपण आई देते, 
नऊ महीने स्वतः त्रास घेते,तेव्हा ति एका बाळाला जन्म देते, शिक्षणासोबत त्यांना संस्कार करते, 
ति आई कुठे काय करते..!

घरातला त्रास सर्वांची कटकट सहन करते, 
समाज काय बोलले. नेहमी ति एकच विचार करते, 
ति आई कुठे काय करते..!

दुःख जरी असले तरी सर्व संकटांवर मात करते, 
पोट च्या गोळ्याला लहाण्याचं मोठं करते,
ति आई कुठे काय करते..!

सौ. समीक्षा गणेश डवरे देऊळकर 
रा. खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर 

पत्नी कमावती असल्यास पोटगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पती आणि पत्नीची आर्थिक तसेच सामाजिक स्थिती समान असेल, तर पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  

प्रकरणाचा तपशील:
एका महिलेने विभक्त पतीकडून पोटगी मागण्यासाठी याचिका दाखल केली होती. पती आणि पत्नी दोघेही सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याने न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असल्याने तिला पोटगीची आवश्यकता नाही. 

न्यायालयाचे निरीक्षण:
•दोघांची आर्थिक स्थिती समान असल्यास पतीवर पोटगीची जबाबदारी राहणार नाही.  
•पत्नी स्वतःच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करू शकत असल्यास पोटगीची गरज नाही.  
•पतीचे मासिक उत्पन्न 1 लाख आणि पत्नीचे 60 हजार असूनही, आर्थिक समानतेच्या तत्त्वावर निर्णय घेण्यात आला.  

पत्नीचा युक्तिवाद:
महिलेने दावा केला की – "मी कमावत्या असले तरी पोटगी मिळण्याचा मला हक्क आहे."
पण पतीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आर्थिक समानता असल्याने हा हक्क ग्राह्य धरला जाऊ शकत नाही.  

महत्त्वाचे निर्देश:
सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नीला मागील वर्षभराच्या पगाराच्या पावत्या सादर करण्याचे निर्देश दिले होते. कनिष्ठ न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही महिलेची पोटगी याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.  

निर्णयाचा प्रभाव:
•स्वावलंबी महिलांच्या हक्कांबाबत स्पष्टता  
•आर्थिक समानतेच्या तत्त्वाचा पुनरुच्चार  
•दोघांची परिस्थिती सारखी असल्यास एकाने दुसऱ्यावर अवलंबून राहू नये  

निष्कर्ष:
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल महत्त्वाचा ठरतो, कारण तो न्याय्य आणि आर्थिक समानतेच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. भविष्यातही असेच निर्णय दिले जाऊ शकतात. 


वणी येथील शिवतीर्थावर तरुणांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : झरी जामणी तालुक्यातील अडेगांव येथील काही तरूणांनी सोमवार दि.24 मार्च पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

हिरापुर बिटच्या वनरक्षकाला निलंबित करा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या तरूणांनी सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी यावर तोडगा निघाला नाही.

2 मार्च 2025 रोजी रात्री महिला वनरक्षक हिरापूर बिट यांनी वनविभागाच्या हद्दित नसतांना अवैधरित्या रेतीचा ट्रॅक्टर पकडून 40 हजार रुपये बळजबरीने वसुल करीत वनमजुर व वनरक्षकाचा भाऊ यांनी लाठी काठीचा धाक दाखवून व अश्लील भाषेत शिवीगाळ करून पैसे देण्यास भाग पाडले. 

या बाबतची तक्रार सहाय्यक वनरक्षक वणी यांच्याकडे महिला वनरक्षकाला निलंबित करा व दोन्ही वन मजूरांसह संबंधित भावावर कारवाई करण्यात यावी,अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर वनविभागाचे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

दांडगाव गावाच्या जुन्या रिठावर वाघाचे ठसे व दर्शन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील एका गावकऱ्याला वाघ दिसला. तो पाहताच त्याचा थरकाप सुटला. त्याने याची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी लागलीच ती माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाची चमू त्याठिकाणी शोध घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. 

मारेगाव तालुक्यातील दांडगाव जुना रिठावर आज सकाळी विशाल सुभाष भुसारी या शेतकऱ्याला वाघ दिसला. त्याने होमगार्ड नरेंद्र गजानन चिंचोलकर यांना गावात येऊन वाघ असल्याचे सांगितले, त्या दोघांनी जावून वाघाच्या पायाचे ठसे मोबाईल मध्ये टिपले, वाघ जुन्या गावात असल्याने गावकऱ्यांचा चांगलाच थरकाप उडाला आहे. 

दांडगाव शेतशिवारात भला मोठा पट्टेदार वाघ दिसला. वाघ पाहताच त्यांना थरकाप सुटला. तो वाघ गावाच्या जुना रिठ वर असल्याची माहिती त्यांनी मोबाईल वरून लगेच वनविभागाला कळविले असता वनविभागाची चमू दांडगाव परिसर व ज्या ठिकाणी वाघ गावाकऱ्यांनी पाहला त्या ठिकाणसह इतरही भागात त्याचा शोध घेत आहे. अशी माहिती गावाकऱ्यांसह वनविभागाच्या टीमने दिली. 

विशेष म्हणजे,जंगलात भटकणारा वाघ आता शेत शिवार व गावाच्या जवळपास भटकत असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत टीम ला विचारणा केली असता वाघ नसून वाघीण आहे, ती पाण्याच्या शोधात आली असावी. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. वरिष्ठाना कळवून वाघीण चा शोध घेतला जात आहे.त्यामुळे दांडगाव परिसरात वाघ असल्याचे मात्र कन्फर्म झाले. 

विदर्भ स्तरीय नृत्यस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शेतकरी लाॅन वणी येथे दिनांक 22 मार्च ला विदर्भाच्या मातीतील नृत्यकलावंताच्या सुप्त कलागुणाना वाव देण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ता सौ. मनिषाताई सुरेंद्र निब्रड याच्या प्रमुख आयोजनात विदर्भ स्तरीय राजे नृत्य स्पर्धा संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन किरणताई देरकर याच्या हस्ते झाले तर अध्यक्ष म्हणून आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून अडव्होकेट देविदास काळे, प्रमोद वासेकर, अडव्होकेट पौर्णिमा शिरभाते, माधव सरपटवार, वंदना आवारी, साधना गोहोकार, शारदा ठाकरे इत्यादीची उपस्थिती होती.

या प्रसंगी आयोजक दाम्पत्य सुरेंद्र निब्रड, मनिषा सुरेंद्र निब्रड यांच्या या कामगिरीबद्दल प्रयास व क्रांतीजोती फेडरेशन च्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. 

स्पर्धेत विदर्भातून नागपूर, चंद्रपूर,वरोरा, भंडारा यवतमाळ, वाशिम, उमरखेड, गोंदीया व स्थानिक परिसरातील स्पर्धकानी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खैरगाव येथे भव्य शंकरपट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील खैरगाव येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅड. कुणाल चोरडिया यांच्या हस्ते सोमवारी 24 मार्च ला दुपारी 2:30 वाजता शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच तुळशिराम कुमरे होते.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, माजी मुख्याध्यापक तुळशिराम पेंदोर, ग्रामसेवक जनबंधू, पोलिस पाटील सौ मालाबाई कुमरे, गंगाधर आत्राम, सुनील गोवारदिपे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शेतकऱ्यांच्या विशेष आवडीची असलेली ही बैलगाडीची शर्यत आहे. यानिमित्ताने तब्बल एक लाख आठ हजाराच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

पोलीस स्टेशन वणी येथील एकुण 123 बेवारस वाहनांचा लिलाव


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पोलीस स्टेशन वणी अंतर्गत सादर करण्यात आलेल्या यादीतील एकूण 126 बेवारस मोटार वाहनांचा उपविभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेश क्रमांकः महसूल सहायत/उपविभागीय दंडाधिकारी/गृहशाखा/2025 अन्वये पोलीस स्टेशन वणी येथील दिनांक 25/03/2025 रोजी 12.00 वाजता पासुन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येत आहे.

सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिनांक 25/03/2025 पुर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन वणी येथे वाहनाचे मूळ कागदोपत्री दस्तऐवजासह यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास बेवारस वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, तद्नंतर कोणतेही आक्षेप हरकत नोंद घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अशी माहिती पोलीस स्टेशन वणी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

वर्धा नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : रविवार दि. 23 मार्च 2025 रोजी, वर्धा नदीपात्रात सकाळी 7.30 वाजता एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती आहे. 

मारेगाव तालुक्यातील पार्डी लगत असलेल्या वर्धा नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला.याबाबत पार्डी येथील पोलीस पाटील बदखल यांनी मारेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

मारेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊले उचलली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतकाचे अंदाजे 30 ते 40 वय असून वृत्तलिहेपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. 

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्यासह शंकर बारेकर हे अधिक तपास करीत आहे. 

जनतेचा मूलभूत अधिकार व सुरक्षेसाठी शहीद भगतसिंगांचा संघर्ष होता - कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राजूर कॉलरी : शहीद भगतसिंग इंग्रजांविरुद्ध लढत असताना त्यांचा संघर्ष निव्वळ इंग्रजाांपासून स्वातंत्र्य मिळविण्यापुरता नव्हता तर या देशात कोणत्याही व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्ती कडून शोषण होऊ नये, जनतेचे मूलभूत अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, जनतेला त्याचे हक्क प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन त्याला संघर्ष करण्याचे अधिकार अबाधित असावे यासाठीचा त्यांचा संघर्ष होता आणि त्यासाठीच सन १९२९ साली संसदेमध्ये जनविरोधी जनसुरक्षा विधेयक (public safety bill), व कामगार विरोधी ट्रेड डिस्प्यूट बिल हे विधेयक ठेवल्या जाणार होते त्याचा विरोध करण्यासाठीच भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकून आणि ह्या विरोधातील पत्रके टाकून स्वतःला अटक करवून घेतली होती. यावरून त्यांचा संघर्ष कशासाठी होता हे लक्षात येते, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा शहीद दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी केले.

राजूर येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा तैलचित्राला सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड पेरकावार व मो. असलम यांच्या हस्ते देशातील युवकांचे आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

यावेळेस डेव्हिड पेरकावार, जयंत कोयरे, महेश लिपटे, कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी उपस्थितांना भगतसिंगाचे विचार व कृती याबद्दलची माहिती दिली. या झालेल्या छोटेखाणी अभिवादन कार्यक्रमात गावातील गायक कलाकार राजेंद्र पुडके व नागो काळे ह्यांनी क्रांतिकारी गाणे म्हणून उपस्थितांमध्ये जोश जागविला.

या अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने पोलिस पाटील वामन बलकी, अशफाक अली, कैलास पाईकराव, अजय भुसारी, राकेश इग्रपवार, संजय कवाडे, स्नेहल वाळके, जब्बारभाई, पंधरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

गणेशपूरात फुलली अंजिराची फळबाग, उत्पन्नात मोठी वाढ!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी : झरी (जामणी) तालुक्यातील गणेशपुर (खुर्द) येथे माळरानात चंद्रकांत दशरथ घुगुल यांनी वैशिष्ट्यपूर्ण व मौल्यवान असलेल्या अंजीर फळांची बाग फुलवून उत्पादन घेणे सुरू केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 

झरी जामणी तालुक्यातील चंद्रकांत घुगूल राहणार पांढरकवडा (लहान) हे शिवेसेनेचे अनेक वर्षापासून तालुका प्रमुख असून राजकिय सामजिक क्षेत्रात त्यांची चांगली ओळख आहे. तसेच त्यांची पत्नी सुद्धा झरी जामणी पंचायत समितीच्या सदस्य होत्या. त्यांचा सातत्याने तोट्यात चालत असलेल्या शेती व्यवसायाला त्यांनी आधुनिक पद्धतीची जोड साधत शेती व्यवसायाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आणि यातूनच त्यांनी अंजिराची फळबाग फुलवली आहे. आपल्या जमिनीत अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते असा विश्वास मणी बाळगून त्यांनी चापली पवनसुत नर्सरी राजु तुरणकर यांचे मार्गदर्शनात उच्चप्रतिच्या पुणेरी जातीचे रोपे आणून सन 2022 मध्ये जवळपास 300 झाडांची लागवड त्यांनी दिड एकरात केली. मागील वर्षी 1 क्विंटल चे उत्पादन घेतले तर, आतापर्यंत दिड क्विंटल अंजीराची विक्री करण्यात आली असून यंदा एकूण तीस क्विंटलच्या वर दोनशे रुपये प्रतिकिलो प्रमाणे म्हणजे जवळपास 6 लाखाच्या वर विक्रमी उत्पन्न होणार असल्याचे शेतकरी चंद्रकांत घुगूल यांनी सांगीतले. संपूर्णतः ऑरगॅनिक पद्धतीने हे उत्पादन सुरू आहे. याकरिता त्यांनी 46 हजार रुपये किमतीचा गोबर गॅस प्रकल्प शेतात उभारला आहे. त्यातून येणारी शेणाची स्लारी पूर्ण झाडांना देण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. 

अंजीर हे वैशिष्टपूर्ण फळ आहे. इतर फळापेक्षा ते मौल्यवान मानले जाते. कारण ते पित्तविरोधी आणि रक्तशुद्धीरोधक असून भारत, अमेरिका आणि आफ्रिका यासह अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचे फळ ताजे आणि सुकलेले अशा दोन्ही प्रकारचे असते. अंजीर पिकल्यावर त्याचा मुरांब्बा बनवून उपयोगात आणला जातो. मात्र, ज्या ठिकाणी हवामान समशीतोष्ण आणि कोरडे असते,अशाच भागात अंजीरची लागवड केली जाते.असं तज्ज्ञ सांगतात.

भारतात तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात याची लागवड केली जाते. चार-पाच वर्षांच्या वनस्पतीतून सुमारे 15 किलो फळे मिळतात. पूर्णपणे परीपक्व झालेला अंजीर एका वेळी 12000 रुपयांपर्यंत कमावून देतो. 

महाराष्ट्रात अशाप्रकारे लागवड

व्यावसायिकदृष्ट्या अंजीरची लागवड केवळ महाराष्ट्रातच केली जाते. महाराष्ट्रात एकूण 417 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाते, त्यापैकी 312 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेर-शिवरा ते जेजुरी या 10-12 गावांचे क्षेत्र महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा एक प्रमुख भाग आहे. अलीकडे सोलापूर-धाराशिव (उस्मानाबाद) मधील शेतक-यांनी अंजीरांची लागवड सुरू केली आहे. चंद्रकांत घुगूल यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम झरी जामणी तालुक्यात सुद्धा अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.

कोणत्या हंगामात अंजीर घेता येते

अंजीर उष्ण आणि कोरडे अशा हवामान चांगले सहन करतात. यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या भागात हे फळ पिकविण्याच्या दृष्टीने वाव आहे. कमी तापमान या पिकाला हानिकारक नाही. पण दमट हवामान नक्कीच धोकादायक ठरु शकते. विशेषत: कमी पर्जन्यमान असलेल्या भागात अंजीर पिकवता येतात, जेथे ऑक्टोबर ते मार्च या काळात पाण्याची उपलब्धता कमी असते.

अंजीर लागवडीसाठी जमीन कशी असावी

माध्यम काळ्या आणि लाल मातीतील अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत फळबागांमधून अंजीराचे उत्पादन घेता येतात. मोठ्या प्रमाणात चुनखडीसह खारट, काळ्या मातीत अंजीर उत्तम वाढते. अंजीरांसाठी चांगले ड्रेनेज असलेली मीटर खोल माती चांगली असते. तथापि या मातीत चुन्याचे प्रमाण असले पाहिजे. या फळझाडासाठी खूप काळी माती अयोग्य आहे. झाड उथळ आणि चांगल्या ड्रेनेज मातीत पाहिजे तसे वाढत नाही.

कोणत्या आहेत प्रगत जाती, अंजीरचे अनेक प्रकार असतात. पुणेरी दिनकर, सिमरन, कालिमिर्ना, कडोटा, अश्या अनेक जातीचे रोपे मिळतात. ताजे अंजिरासाठी प्रगतशील शेतकरी घुगुल यांच्याशी संपर्क साधावा व सर्व प्रकारचे फळ, चंदन, मोहगणी, मिलियादुबिया, अशा अनेक रोपांसाठी चापली पवनसूत नर्सरी (मांगरूळ रोड ता. मारेगाव) ला अवश्य भेट द्या!

रमेश बोबडे राष्ट्रीय स्तरावरील लीडर ट्रेनर स्काऊट एल टी ही परीक्षा उत्तीर्ण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील रमेश प्रभाकर बोबडे हे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नवीन वाघदरा येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 1992-93 या वर्षांपासून स्काऊट गाईड चळवळीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर पचमढी येथे अवघड प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले शिक्षक ठरले. 

या प्रशिक्षणाला प्रत्येक राज्यातील शिक्षक सहभागी होते. या अगोदर स्काऊटचे अनेक प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यांच्या शाळेतील व आजपर्यंत स्काऊट क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर 50 च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यस्तरावर ७०च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 

उत्कृष्ट ट्रेनर म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. त्यांनी पीप प्रकल्प, प्रौढ शिक्षण, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार, तंबाखूमुक्त शाळा, निरंतर शिक्षण यामध्ये उल्लेखनीय कार्य केले. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला. 5 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार त्यांना मिळाला. 

त्याचप्रमाणे स्काऊट विभागांमध्ये उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना तत्कालीन राज्यपाल विद्यासागर यांच्या हस्ते आदर्श स्काऊट म्हणून मुंबई येथे सत्कार झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सन 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबाटो अमेरिका येथे दीडशे देशातील विद्यार्थ्यांना 27 दिवस उपस्थित राहून एडवेंचर ट्रेनर म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यामुळे वणी तालुका तसेच यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे.

जिल्ह्यातील सर्व स्काऊट कार्यालयाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील तालुका कब मास्टर, स्काऊट मास्टर, गजानन गायकवाड जिल्हा संघटक, मनीषा तराळे जिल्हा संघटिका यांनी अभिनंदन केले. वणी तालुक्यातील सर्व क्लब मास्टर, ब्लॉक लीडर यांनी अभिनंदन केले. गुजलवार, काटकर, केंद्रप्रमुख आणि सर्व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.

हिवरा येथे निक्षय शिबिर संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

 मारेगाव : 100 दिवशीय टीबी मुक्त अभियानांतर्गत हिवरा येथे दि. 20 मार्च गुरुवारला निक्षय शिबिर संपन्न झाले.
 यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी देठे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिवरा येथील सरपंच आरतीताई विशाल गाडगे, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील राजेंद्र गाडगे, ग्रामविकास अधिकारी मून, विठ्ठल ठावरी, मुख्याध्यापक इंगोले, जि. प.शिक्षक परचाके, क्षय रोग टेक्निशियन कपिल रामटेके, श्रीमती वानखेडे, आरोग्य सहाय्यक आर. डी.रिंगणे, आरोग्य सेविका श्रुती गलाट, सामुदायिक आरोग्य अधिकारी पराग नगराळे, पल्लवी मडावी, लॅब असिस्टंट जीवन तिरणकर, आरोग्य सेवक प्रशिक बोरकर, अखिल वेलादे, शंकर आत्राम, उपस्थित होते.

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण आणावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टीबी मुक्त अभियान जे राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत 210 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. सोबतच बी पी, सीबीसी, शुगर व सिकलसेल ची तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन आर डी रिंगणे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आरोग्य सेविका श्रुती गलाट यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आशा सेविका सौ मंगला एकरे, कमल दरवेकर, सरिता जीवतोडे, वंदना ढोके,शुभांगी बावणे,गटप्रवर्तक वैशाली खीरटकर, सुहासिनी भगत, व तसेच अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस,प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी,आशा सेविका, तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी विक्की बांगर यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विक्की बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी शुक्रवारी २१ मार्च ला एका नियुक्ती पत्राद्वारे केली.नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, निशांत मेश्राम, सोनु भाऊ पाटील आदी उपस्थित होते.
 
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे विक्की बांगर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पत्रकार प्रतीभा तातेड यांचा अभिष्टचिंतन सोहळा सपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पंचायत समीतीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या गोंडबुरांडा येथील श्री दर्शन भारती विद्यालयाच्या वतीने महीला पत्रकार प्रतिभा तातेड यांच्या वाढदिवसा निमित्त किशोरवयीन मुलींसाठी एकदिवसीय स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल आष्टकर होते, विषेश अतिथी म्हणुन पत्रकार प्रतीभा तातेड होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आशा पर्यवेक्षीका,वंदना बोंडे,आशा वर्कर, वैशाली दानखडे,पोर्णिमा तोडासे,विवेकानंद कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालच्या प्रा.प्रीयंका पोटे,प्रा.जाधव, गोदावरी जोशी,प्रामुख्याने विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी सांध्य दै.मार्मिकच्या तालुका प्रतिनिधी प्रतीभा तातेड यांचा अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त वाढदिवसाचा केक कापुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. किशोरवयीन मुलींनी आरोग्याचे दृष्टीने घ्यावयाची काळजी व शारिरीक स्वच्छता या विषयावर तज्ञा कडुन मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना मार्गदर्शन करताना केवळ महीलांनाच सभागृहात स्थान देण्यात आले होते. मार्गदर्शना नंतर मात्र सभागृहा बाह्य पुरुषांना सभागृहात पुनः आमंत्रीत करण्यात आले होते.प्रास्ताविक संजय मोघे यांनी सुत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी गेडाम,यांनी तर आभार कु. अंकीता जुमनाके यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने किशोरवयीन मुलींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.

रुक्मिणी कोल वॉशरीत काळा भ्रष्टाचार : अरबाज खान यांची पत्रकार परिषदेत माहिती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील रुक्मिणी कोल वॉशरी (RIPL) मध्ये काळा भ्रष्टाचार झाल्याची जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे वणी तालुका अध्यक्ष अरबाज अहेमद खान यांनी आज दि. २० मार्च रोजी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

याबाबत संबंधित विभाग व पोलीस विभाग वणी, यांना निवेदने सादर करून अवगत केले, मात्र सर्वांनी दुर्लक्ष केल्याचेही यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. 

पुढे प्रश्न उत्तराला सामोरे जाताना अरबाज खान यांनी सांगितले की, राजूर येथील रुक्मिणी कोल वॉशरी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) यांची ५० हजार टन कोल वॉश चे काम दिले आहे. परंतु रुक्मिणी कोल वॉशरी येथून भोंगळ कारभार चालू असल्याचा त्यांनी थेट संबंधितावर आरोप केला आहे. 

कोल वॉश करून फक्त महाजनको या कंपनीला ४० टक्के कोळसा व ६० टक्के डस्ट हे मिश्रण करून रेल्वे डब्यानी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या कंपनी ला पाठवीत आहे. व इतर वॉश केलेला कोळसा ते मार्केट मध्ये उच्च भावात विकून महाजनको या कंपनी ची फसवणूक करून त्यांच्यापासून १०० टक्के कोळसाचा पैसा वसुल करीत आहे. असेही ते म्हणाले. 

येथील होणाऱ्या भोंगळ कारभारावर आळा घालण्याकरिता व रुक्मिणी कोल वॉशरी ची योग्य तपासणी करून योग्य कारवाई करण्याकरिता अरबाज खान यांनी संबंधिताना अनेक वेळा निवेदने सादर केले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच या भोंगळ कारभाराविरुद्ध हायकोर्टात पि्टीशन दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

वणी शहरात दिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी शहर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित आहे. वणी शहरात वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वणी शहरातील प्रत्येक चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे ट्राफिक जाम होते हि नेहमीची समस्या असून ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात भरदिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे याबाबतचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक सिता वाघमारे वाहतूक उपविभाग वणी यांना देण्यात आले.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात तर दररोज मोठी गर्दी असते आणि त्यातही दुकानदार आपले दुकान फलक रस्त्यावर ठेवतात त्यामूळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गांधी चौकातील व्यापाऱ्यांचा माल नेहमी ट्रकने येतो, दररोज २ ते ३ ट्रक माल येतो हा माल सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत खाली करण्यात येत आहे. दिवसा जर ट्रक आला तर वणी शहराची वाहतूक व्यवस्था ठप्प होवून सामान्य नागरीकांना त्रास होतो. त्यामुळे दिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी, तसेच वणी शहरात सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेकरीता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक (वाहतूक विभाग) तर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे. वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे प्रदेश कार्यकारी सदस्य, वामनराव कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, अमोल कुमरे, मारेगांव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सु निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

दीनानाथ आत्राम गुरुजी अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम (गुरुजी) वय ७१ यांचे आज बुधवार दि. १९ मार्च ला सायंकाळी ६ वा. अकस्मात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. 

दिवंगत आत्राम गुरुजी यांनी शहरातील नगर परिषद शाळा क्र. 3, शाळा क्र. 4 मध्ये मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन, मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. येथील नगर परिषद शाळा क्र 8 मधून ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी वणी तहसील कार्यालयात आजतागायत निशुल्क सेवा देत होते. शांत व संयमी व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. धार्मिकतेचा त्यांच्यावर चांगला पगडा होता. बुधवारी अचानक सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

गुरुवार दि. 20 मार्च ला श्री दीनानाथ आत्राम यांच्यावर दुपारी 2.9 वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने शहरातील जानेमाने नागरिक तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आमटे दांपत्य 'शिक्षणव्रती' पुरस्काराचे मानकरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : अतिशय दुर्गम भागात अबोलपणे अजोड शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनिकेत प्रकाश आमटे व समीक्षा अनिकेत आमटे यांचा गौरव त्यांना 'शिक्षणव्रती' पुरस्कार प्रदान करुन करण्याचा निर्णय जैताई देवस्थान शिक्षण समितीने घेतला असल्याचे समितीचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

पुरस्काराचे स्वरुप ११००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ आहे. या वर्षी विशेषे करुन हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून या पूर्वी हा पुरस्कार उत्कृष्ट अध्यापकाला प्राचार्य राम शेवाळकर स्मृति उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या नावाने देण्यात येत होता. या वर्षी हा पुरस्कार 'प्राचार्य राम शेवाळकर स्मृति शिक्षणव्रती' पुरस्कार या उपाधीने विशेष बाब म्हणून दिला जाणार आहे. दरवर्षी हा पुरस्कार पू.मामा क्षीरसागर स्मृतिदिनानिमित्त ६ एप्रिलला प्रदान करण्यात येतो. परंतु या वर्षी ६ एप्रिलला रामनवमी असल्याने हा पुरस्कार दि.५ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते आमटे दांपत्याला प्रदान करण्यात येणार आहे.

अनिकेत गेल्या २१ वर्षांपासून तर, समीक्षा गेल्या १७ वर्षांपासून हेमलकसा येथील आश्रम शाळेला व १० वर्षां पासून नेलगुंडा येथील साधना विद्यालयाला आदर्श शाळा म्हणून आकार देण्यात यशस्वी झाले आहेत हे उल्लेखनीय.

सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी-प्रवीण खानझोडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील सार्वला येथील घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२४ मधे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन त्याचा १५००० रुपयाचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला व त्यानुसार त्यांनी राहते घर उकलून घरकुल बांधायच असल्याने तात्पुरती राहायची व्यवस्था केली.

मात्र,फक्त रेतीअभावी घरकुल लाभार्थी आज उघद्यावर आले आहे. त्यामुले तहसीलदार वणी यांना सार्वला येथील घरकुल लाभार्थी ने रेती उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवीण खानझोडे लढा संघटना चे संयोजक वणी यावेळी सार्वला येथील गावातील लाभार्थी पांडुरंग आवगाण, श्रीराम चिव्हाने, कर्नू नैताम, शंकर बावणे, विकास चौधरी, जंगलू नैताम, सुनीता ठमके, संतोष मडावी, संजीवनी मुन, प्रताप मुन, उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, अजय धोबे, आशिष रिंगोले, विकेश पानघाटे यांचीही उपस्थिती होती.

वणीत 22 मार्चला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील मनिषा सुरेंद्र निब्रड व संस्कार भारती समिती आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनींग, येथे जागतिक महिला दिन निमित्त २२ मार्चला साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त अ गट, ब गट, क गट, व ड गट अशी विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

यानिमित्त सकाळी अकरा मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन व जागतिक महिला दिन सोहळा होणार आहे. त्यानंतर दोन ते दहा या वेळात नृत्य स्पर्धा होणार आहे. अ- वयोगट ६ ते १३ असेल, ब- वयोगट १४ वरील आहे तर क-गट हा फक्त महिलाकरिता असणार आहेत. यासाठी (अ) गटाची १०० रुपये, (ब) गटाची २०० रुपये, (क) गट १०० रुपये, तर (ड) गट, महिला स्पेशल समूह नृत्य स्पर्धा गटाची २०० रुपये अशी फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत काही नियम घातले आहे. ते पुढीलप्रमाणे असणार आहे. 
१) पेनड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये गाणे असावे. 
२) कोणत्याही गीतावर नृत्य सादर करता येईल,  
३) एकल नृत्याचे गीत फक्त 3 मिनिट राहील. 
४) समूह नृत्य ५ मिनिटांचे राहील.    
५) प्रत्येक स्पर्धेकाला नोंदणी शुल्क देतांना फार्म भरून देणे आवश्यक राहील. 
६) सर्व अधिकार आयोजकांचे राहील. 

पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकास, द्वितीय, तृतीय, प्रोत्साहन सन्मानचिन्ह देऊन सर्व स्पर्धेकांना गौरविण्यात येणार आहे. महिलांकरिता खास बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सागर मुने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडू - तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
 
वणी : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान करून महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला की काय असेच दिसत आहे. सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली नाही त्यामुळे सरकारला केलेल्या घोषणेचा विसर पडला की काय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न वणी तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. खरीप हंगाम 2025 काही महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे व त्यांच्या समोर मोठी समस्या म्हणजे शेती करिता झालेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लावला तर खर्चापेक्षा उत्पन्न कमी, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला खर्च कसा लावायचा या विवंचनेत शेतकरी आहे. वणी झरी, मारेगाव परिसरात काँग्रेस कमिटीने दौरे करून माहिती गोळा केली असता, असे दिसून आले की परिसरातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ, बी - बियाणे व खताच्या किमतीत झालेली वाढ आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, शेतीकरिता मजुरांची कमतरता, परिणामी मजुरीचे दरात झालेली वाढ या कारणामुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची बँकेचे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न आणि बारा महिन्यांचा शेतीचा व प्रपंचाचा खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आत्महत्येला सुद्धा सामोर जात आहे. 

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे सरकार मायबाप सरसकट कर्जमाफीची घोषणा करेल या आशेवर शेतकरी सरकारकडे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्या - सरपंच संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
 
यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रमाई, शबरी, आदीम, मोदी आवास व पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्या असून रेती अभावी घरकूल योजनेचे सर्व कामे व ग्राम पंचायत स्तरावरील शासकीय विकासात्मक कामे रखडलेले आहे. यवतमाळ जिल्हा विभागामध्ये १६ तालूके असून प्रत्येक तालूक्यामध्ये २ रेती घाट घरकूल योजना व ग्राम पंचायत अंतर्गत शाककीय विकासात्मक कामाकरीता राखीव देण्यात यावे. याआधी सरपंच संघटनेच्या वतिने दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ला निवेदन देण्यात आले होते,मात्र यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट अद्याप सूरू करण्यात आलेले नाही. १५ दिवसाच्या आत रेती घाट सूरू न केल्यास महाराष्ट्र प्रदेश संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने तिर्व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, सौ सविता जाधव जिल्हा महामंत्री, निलेश पिंपळकर यवतमाळ तालुका अध्यक्ष उमेश राठोड, प्रमोद नाटकर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेतर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागपुर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हिडीओज घटनेची व माहितीची शहानिशा न करता व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट प्रसारीत करु नये. कोणत्याही अफवा पसरवु नये. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होवुन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणाऱ्या इसमांस गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजुन त्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

यवतमाळ जिल्हयात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असुन सर्व पोलीस दल सतर्क आहे. तसेच सोशल मिडीया मॉनीटरींग सेल स्थापन करण्यात आला असुन सर्व व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोसल मिडीया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याव्दारे यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरींकाना निर्देश देण्यात येते की, नागपुर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भाने खोटे मॅसेज व अफवा सोशल मिडीयावर पसरविण्यास तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबधीत ग्रुप अॅडमीन यांना जबाबदार धरण्यात येईल असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहीता प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, तरी सर्व व्हॉटसअॅप अॅडमीन यांना सुचित करण्यात येते की, आपण सर्वांनी यवतमाळ जिल्हयामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे.

घरातील हंडा काढावं लागतं, 44 वर्षाच्या इसमाला लाखात फसवले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : घरात सोन्याचा हंडा असल्याचे आमिष दाखवत वणी तालुक्यातील एका व्यक्तीला लाखों रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी एका ठगासह दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. 

४४ वर्षांच्या इस्माला गुप्तधन काढावं लागतं, अन्यथा तुमच्यासोबत, तुमच्या कुटुंबातील लोकांसाबात बरंवाईट होईल अशी भीती देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल १ लाख ६५ हजार रुपये व ११.३४० ग्रॅम सोन्याचा नेकलेस उकळले आहेत. ही घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. 

फिर्यादीच्या तक्रारीवरून असे की,फिर्यादीला दोन महिनेपूर्वी सांगितले की, तुमच्या घरामध्ये सोन्याची हंडी आहे, ती तूम्हाला काढावी लागते, जर तुम्ही घरातील सोन्याची हंडी काढली नाही तर तुमच्या घरातील व्यक्तीला काही कमी जास्त होवू शकते अशी धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या फिर्यादींनी त्यांना घरातील सोन्याची हंडी काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर दिनांक ०५/०३/२०२५ रोजी किष्णा कन्हैया येधानी व त्याचे सोबत जितेंद्र जिवन राठोड, वय २९ वर्षे, रा.आसोला सावंगी, ता. जि. नागपूर यांनी फिर्यादीचे घरी येवून सोन्याचा हंडा काढण्याकरीता पूजा सामग्री करीता नगदी १,६५,०००/- रूपये घेतले व दिनांक ०६/०३/२०२५ रोजी चे दुपारी ०१.३० वा. फिर्यादीचे घरी आले व त्यांनी त्यांची विधी केली. त्यानंतर फिर्यादी ला आतमध्ये बोलावून हातात एक लाल कपड्यामध्ये हंडा देवून तुम्ही या हंड्याला उघडू नका, नाही तर काही तरी अर्नथ होईल असे, सांगून हंडा घराचे आड्याला बांधून ठेवला. आणखी दोन हंडे काढायचे आहे, हा हंडा काढतांना त्याला सोने चढवावे लागते असे म्हणत आरोपींनी फिर्यादीचे जवळून अकरा ग्रॅमचे सोन्याचे नेक्लेस घेतला व तो मातीच्या गड्यात दान केल्याचे सांगितले. दिनांक ०९/०३/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. फिर्यादी घरी हजर असतांना फिर्यादीचे फोन वर यातील एकाने फोन करून दोन हंडे काढण्याकरीता एक विधी कराव लागते, त्यासाठी तुम्हाला १२,००,०००/- रूपये खर्च करावा लागते असे तक्रारीत म्हटलं आहे. तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की, ऐवढे पैसे खर्च करू शकत नाही, तेव्हा आरोपीनी फिर्यादी ला भिती दाखविली की, तुमच्या मुलाला व तुमच्या घरच्यांना जिवीतहानी होवू शकते असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीने त्यांचा साळा यांना सदर घटना सांगितली असता त्यांनी तुमच्या सोबत फसवणूक झाली आहे असे, कान उघडणी केली. फिर्यादीने त्यांचे घराचे आड्याला बांधून असलेला लाल कपड्यामधील हंडा उघडून पाहीला असता त्यामध्ये तांब्याचा हंडा व त्यामध्ये पितळीच्या धातूच्या मुर्त्या दिसल्या. नंतर फिर्यादीचे घरामध्ये खड्डा करून मातीत गाडलेला ११ ग्रॅम चा सोन्याचा नेकलेस खोदून पाहता असता फिर्यादीला त्यामध्ये मिळून आला नाही. त्यामुळे आपली फसगत झाली असे समजताच फिर्यादीने दोंघांना घरी बोलाविले असता त्यांनी घरी येण्यासाठी टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादीने त्यांना की, "मी तुम्हाला विधीचे खर्च देतो" असे म्हटले असता ठगाने मी तुमच्या घरी येवू शकत नाही. चंद्रपूर, वरोरा किंवा वणी येथे भेटू शकतो, असे म्हटल्यावर फिर्यादीने दिनांक १६/०३/२०२५ रोजी वणी येथे आय टी आय कॉलेज, हयात अॅक्वा जवळ भेटण्याचे ठरविले. रविवार दिनांक १६ मार्च रोजी फिर्यादी व त्याचा साळा आणि त्याचे काही मित्र असे, सदर ठिकाणी थांबून असतांना गुन्ह्यातील आरोपी किष्णा कन्हैया येधानी व जितेंद्र जिवन राठोड, आणि वाहन चालक नामे सुशील राजेश द्विवेदी (वय ३६) रा. तारशी, ता. जि. नागपूर असे चारचाकी इनोवा गाडी क्र.एम एच ४४, बि ००५५ ने तेथे आले. तेव्हा फिर्यादीने आरोपीतांना म्हटले की, तुम्ही आमची फसवणूक करीत आहे. आमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही आमचा सोन्याचा नेकलेस आणि पैसे परत द्या. तेव्हा ठगानी फिर्यादीला व त्याच्यासोबत असलेल्या इस्माला शिवीगाळ करून सोन व पैसे परत करत नाही. तुमच्यान जे होते ते करून घ्या अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादीने व त्याचे सहकाऱ्यांनी ठगांना पकडले व वणी ठाण्याला फोन करून पोलीसांना बोलाविले व त्यांना पोलीस स्टेशनला घेवून आले. 

फिर्यादीची फसवणूक केली,त्यांचे विरूद्ध कायदेशिर कार्यवाही करीता पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सदर गुन्ह्याचे तपासात नमूद तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून पो.स्टे. मध्ये आणून अटक करण्यात आली. त्यांचे वर बि एनएस च्या कलम ३१८ (४), ३५२,३५१ (२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीतांकडून नगदी १,५०,०००/- रूपये, तसेच सोन्याचा नेकलेस वजन ११.३४० ग्रॅम कि. अं ९०,०००/- रूपये आणि एक टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी क्र. MH 44 B 0055 कि. अंदाजे ७,००,०००/- रू. असा एकूण ९,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून न्यायालय वणी येथे हजर करण्यात आले. तिन्ही आरोपीतांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. 

सदरची कार्यवाही गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांचे मार्गदर्शनात पोउपनि धिरज गुल्हाने (डि बी पथक प्रमुख), पोका वसीम, पोका गजानन, पोका निरंजन, पोका मोनेश्वर डि.बी. पथक वणी यांनी केली.

विदर्भ बेलदार समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी जयवंतराव वल्लमवार


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : विदर्भ बेलदार तत्सम समाज संघटनेची सभा दि.१६ मार्च रविवार रोजी बचत भवन नगरपरिषद पांढरकवडा येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांतिय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार, प्रांतीय सदस्य सर्वश्री आनंद अंगलवार,मनिष कन्नमवार,आनंद कार्लेकर,संजय कोटेवार, अरुणाताई कोटेवार व समाज संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक आदेवार साहेब,रजनलवार सर,संजय आकीनवार, पार्लावार काका हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

प्रदिर्घ देशसेवा केलेले निवृत्त कॅप्टन पाटण चे सुपुत्र नारायण मुत्यालवार,सुभेदार अशोक शेरकुवार यांचा हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद गांगुलवार यांनी केले. एकसविसाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा अहवाल ॲड.के जी मुत्यालवार यांनी केले. संघटनेच्या पंचविस वर्षात संघटनेच्या कार्याचा अहवाल चंद्रशेखर कोटेवार यांनी सादर केला. त्यानंतर सर्वानुमते जिल्हाअध्यक्ष पदी जयवंतराव भास्करराव वल्लमवार व महिला जिल्हाअध्यक्षपदी सौ.दीपाली संदिप पदलमवार यांची एकमताने निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेद्र भंडारवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप पद्लमवार. प्रकाश कायपेल्लीवार, नितीन बंतपेल्लीवार, संदिप देशट्टीवार, दीपक आईदलवार, गणेश सुंकरवार, राम चिट्टलवार, अनुप हुस्केवार, अविनाश कोटेवार, अरविंद पडलवार, शेखर अलमवार,शुभम पदलमवार, संदीप गंधेवार, प्रवीण चौलमवार, प्रमोद नेल्लावार, सुनिल चिंतावार,विठ्ठल मदिकुंटवार, सुभाष पार्लावार, आकुलवार, सुंकरवार, निलेश कुर्मावार, सुनिल अंबरवार, गजानन बोमेनवार, विजय लक्षट्टीवार सर,रामेश्वर पुद्दरवार आदिनी अथक परिश्रम घेतले.सभेला शेकडो समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

अपघातात तीस वर्षीय युवकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : अपरिचित आडवं जनावरं आले आणि तीस वर्षाच्या युवकाचा अपघात होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना रविवारी 16 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी ते नांदेपेरा मार्गांवर घडली. या घटनेने वांजरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राहूल सुरेश धांडे रा. वांजरी असे मृतकाचे नाव आहे. तो दुचाकी क्र. (एम एच 29-सी डी, 5247) ने वणीवरून वांजरी या आपल्या गावी परतत असताना वणी ते नांदेपेरा मार्गांवर,ठेंगळे यांचे घरा नजीक अनोळखी जनावर आडवं आल्यामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले व हा जनावर आणि मोटारसायकलच्या धडकेत सायंकाळी साडे सात वा.अपघात घडला. यात राहुलला जीव गमवण्याचीही वेळ आली. त्याच्या डोक्यात मुका मार लागल्याने तो ठार झाला. याबाबत वणी पोलिसात माहिती देण्यात आली. 

सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. 

स्व. मारोती रोगे व स्व सुनंदाबाई रोगे स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव येथे पाणपोई सुरु

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मार्च महिना लागताच नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. विविध कार्यक्रम,लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने मारेगावात वाटसरुंची गर्दीही वाढली आहे. अशातच नागरिकांची तहान भागवण्यासाठी मारेगाव पोलीस वेलफेअर पेट्रोल पम्प येथे स्व. मारोती रोगे व स्व. सुनंदाबाई रोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ठाणेदार संजय सोळंके यांच्या विशेष मार्गदर्शनात उपनिरीक्षक जाधव यांनी या पाणपोईचे उदघाटन केले. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता दयाल रोगे यांच्या पुढाकाराने व आईवडील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.यावेळी पोलीस दल, होमगार्ड, व पेट्रोल पम्प कर्मचारी उपस्थित होते.
    

मानवी हकाचे जतन करा - राजु धांवंजेवार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

उमरखेड : सामान्य जनतेवर होणारा अन्याय कधीही खपवुन घेतला आणार नाही परंतु प्रत्येक मानसाने आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची जाण ठेवुन मानवी हकाचे जतन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी उमरखेड येथे मानवी हक सुरक्षा परिषेदेच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. आज दि.१६ मार्च रोजी मानवी हक्क सुरक्षा परिषदेची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमरखेड तालुकाध्यक्ष श्री राजु बोंडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष श्री प्रशांत हरडपकर यांनी मानले.
घटनेतील विवीध कलमान्वये प्रत्येक व्यक्तीला समतेचा, स्वातंत्र्याचा व्यवसाय करण्याचा धार्मीक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
या बैठकीला मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेश कार्यकारी सदस्य परशुराम पोटे, मारेगाव तालुका अध्यक्ष अमोल कुमरे, विदर्भ कार्यकारिणी सदस्य वेणूदास हुसूकले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम काकडे, नवनियुक्त उमरखेड तालुका अध्यक्ष राजु बोंडगे, उपाध्यक्ष संजय भंडारे, सचिव आकाश लोमट, उमरखेड शहर अध्यक्ष प्रशांत हरडपकर, उपाध्यक्ष आत्माराम सुरोशे, सचिव शिशिर गीरी, सहसचिव किशोर बोरगडे, संपर्क प्रमुख नानाराव खापरे, राहुल कोळपे, रत्नदीप पाईकराव, विष्णू गोरे, अवधूत खडकर, बाबा उर्फ आनंद शिंदे, प्रविण सुर्यवंशी यांच्यासह मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.