चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र शासनाच्या एचएससीसी इंडिया लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचे काम सुरु असून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह एचएससीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, चंद्रपूर येथील बांधकामाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली असून यानुसार काम सुरु आहे. एचएससीसी कंपनीची टर्न की तत्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पुढील 3 महिने यंत्रसामुग्री चाचणीसाठी (स्टॅबिलिटी) स्थिर कालावधी असा ठरविण्यात आला आहे.
 गेले काही दिवस कोविडमुळे बांधकाम कामावर परिणाम होत असला तरी आता मात्र बांधकामाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. नेमून देण्यात आलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी एचएससीसीच्या प्रतिनिधी यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि उच्चाधिकारी समिती यांच्या सनियंत्रणात काम करण्याबाबतचे नियोजन करुन सप्टेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करावे, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

अधिकारी प्रभार न सोपवता राहतात गायब,जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी गैरहजर असतात व दुर्गम भागाकडे विभागाचे दुर्लक्ष असते असा आरोप करीत झरी जामणी तालुक्यातील संतप्त सरपंचाने अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आरटीओ कार्यालयाबाहेर काढल्या. व ते इथेच न थांबता त्यांनी त्या खुर्च्या चार चाकी वाहनाने (कार) जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन तिथे जमा नेल्या व आरटीओ अधिकारी प्रभार न सोपवता गायब राहतात त्यामुळे नागरिकांची हेळसांड होते अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्ली ग्रामपंचायतचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत हे सोमवारी दुपारी आरटीओ कार्यालयात गेले असता वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी हा त्रागा केला. झरीजामणी तालुका आदिवासी बहुल असून या भागात आरटीओ विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक समस्या निर्माण असून अपघातात कमालीची वाढ झाली आहे. याठिकाणी नियमित आरटीओ कॅम्प होत नाही. त्यामुळे वाहनांची नोंदणी, वाहनचालक परवाना व नूतनीकरण आदी कामे ठप्प पडली आहे. परिणामी नोंदणी नूतनीकरण न झालेली अनेक वाहने रस्त्यावर धावत आहेत. विनापरवाना वाहन देखील चालविल्या जात असल्याने अपघात वाढले आहे. त्यात ओव्हरलोड वाहतूक व तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी व अन्य तस्करी करणारे अनियंत्रित भरधाव वाहने सुसाट धावत असल्याने लोकांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई होत नाही अशी तक्रार सरपंच हितेश राऊत यांनी केली आहे. सोमवारी दुपारी आरटीओ कार्यालयात ते आले असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दोघेही त्यांच्या कक्षात हजर नव्हते. विशेष म्हणजे त्यांच्या तक्रारींचे समाधान करण्यास कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने संतप्त सरपंच हितेश राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून दोघांच्याही खुर्च्या दालनाबाहेर काढल्या. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात कुणालाही प्रभार न देता गैरहजर राहतात. झरी जामणी सारख्या दुर्गम भागातून नागरिकांना वाहनविषयक कामांसाठी आरटीओ कार्यालयात हेलपाटे खावे लागतात, नागरिकांच्या प्रश्नांचे कुठलेही समाधान याठिकाणी होत नसल्यानेच अधिकाऱ्यांच्या खुर्च्या दालनाबाहेर काढून त्या दोन्ही खुर्च्या वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन तिथे तालुक्यातील समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अशी माहिती हितेश उर्फ छोटू राऊत यांनी दिली. 
अनोख्या कार्यातून नेहमीच चर्चेत

अहेरअल्लीचे युवा सरपंच हितेश राऊत यांनी जनसामान्यांच्या प्रश्नावरून आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेकदा अनोखे कार्य केली. पाटणबोरी ते पाटण या रस्त्याची दुरवस्था आणि स्थानिक अभियंत्यांचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी या मार्गाने अभियंत्यांनी व बांधकाम ठेकेदारांनी परिवारासोबत प्रवास करून दाखवा व पाच हजार रुपये बक्षीस मिळवा या योजनेची जाहिरातच केली होती. पुसद येथे सरपंच परिषदेला संबोधित करणारे प्रशिक्षकच अज्ञानी असल्याचे त्यांनी उघड केले होते. तर अमरावती येथे सरपंच प्रशीक्षण परिषदेत सरपंचांनी केलेल्या प्रश्नाची प्रोसेडीग मध्ये नोंद करून संबोधित करणारे प्रशिक्षक द्वारा प्रश्नांचे निरसन होत नसल्यास आयएएस अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात यावे. अशा अनोख्या कार्यातून ते नेहमीच चर्चेत राहतात.
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढली समजूत 

आदिवासीबहुल तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेले युवा सरपंच हितेश राऊत यांनी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यांची मागणी गांभीर्याने घेण्याची ग्वाही यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी सरपंच राऊत यांना दिली. शिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या भेट म्हणून स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान कायद्यात नाही. त्यामुळे या खुर्च्या साभार परिवहन विभागाला परत करण्यासही त्यांनी सांगितले. अखेर सरपंच राऊत यांनी समजूतदारी घेत त्या खुर्च्या साभार स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहोचत्या केल्या.


जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सह्याद्री | चौफेर न्यूज 
 
नांदेड : अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी कर माफी, शाळांच्या स्थापनेद्वारे विद्याप्रसार तसेच अंधश्रद्धा निवारण अशी अनेक समाजोद्धाराची कार्ये केली. न्यायनिष्ठ, दानशूर व अतिशय कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 31 मे 2022 रोजी समितीचे उपायुक्त तथा सदस्य मा. श्री. ए. एम. शेंदारकर साहेबयांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मा. श्री. आ. ब. कुंभारगावे साहेब, (संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव), श्रीमती सुनीता शिंदे मॅडम (पोलीस निरीक्षक), एस. एम. मुळे, एस. जे. रणभीरकर, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, बाबू कांबळे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, अमोल वाकडे, संजय मंत्री लहानकर, अनिकेत वाघमारे, सुनिल पतंगे यांची उपस्थिती होती.


यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांचे यश, निकालात महिलांची बाजी

 
सह्याद्री | चौफेर न्यूज 

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी १३ व्या आणि ४४ व्या क्रमांकावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील पाचपेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर (१३) अंजली श्रोत्रीय (४४), श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८), आदित्य काकडे (१२९), शुभम भोसले (१४९), विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (२०२), अक्षय वाखरे (२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे (२३०), विशाल खत्री ( २३६), संचित गुप्ता (२३७), उत्कर्ष खंडाळ (२४३), मृदुल शिवहारे (२४७), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (२५२), सुयश कुमार सिंग (२६२), सोहम मांढरे(२६७), अश्वीन राठोड (२६५), अर्शद मोहम्मद (२७६), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (३१५) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुमित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६), आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५), सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (५५८), नितीश डोमले(५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२), आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९).
एक नजर निकालावरः केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२२ महिण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ६८५ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (खुला) गटातून २४४, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ७३, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) २०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १०५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ६० उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये २६ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने १२६ उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट ६३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास वर्ग ३६, अनुसूचित जाती ०७ उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या एकाही उमेदवाराचा आरक्षित सूचीत समावेश नाही.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू: भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) ७२, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १८, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) ४९, अनुसूचित जाती (एस.सी.) २७, अनुसूचित जमाती (एस.टी.) १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (खुला) १४, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०४, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) १०, अनुसूचित जाती (एस.सी.) ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) ०३ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (खुला) ८३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास प्रवर्गातून ५१, अनुसूचित जाती प्रवर्गातून २६, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून २० उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण २४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) १०३, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) २३, इतर मागास प्रवर्गातून ६८, अनुसूचित जाती प्रवर्गातून ३१ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून १७ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब या सेवेमध्ये एकूण ९० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) ३६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०८ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून २५, अनुसूचित जाती प्रवर्गातून १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून ०६ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.       
 ८० उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याचे मोठया प्रमाणात नुकसान

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे,ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ते फुटून उखडले आहे. पावसाळ्यात हेच खड्डे जीवघेणे ठरत असतात. तरी प्रशासन सुस्त आहे.

 "आताच झाला रस्ता अन ही अवदशा रस्त्याची" असे प्रवाशी बोलून जातात. रस्ते बनवायला करोडो रुपये खर्च होतात,  वणी नांदेपेरा बायपास ते मार्डी या मार्गाने क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने या मार्गाने प्रवास करणारे किंबहुना रस्त्यावरील गावकरी परेशान झाले आहे.
ट्रक रेतीचे असो वा कोळशाचे सदर रस्त्याने साईड दिल्या जात नाही. नंबर लावण्याच्या चक्कर मध्ये भरधाव वेगाने वाहन चालविल्या जातात. अशा वेगाने चालणाऱ्या कित्येक वाहने रस्त्याच्या कडेला फसल्याची चित्रे या मार्गांवर पाहायला मिळतात. परिणामी अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेवून मार्गांवर प्रवास करावा लागतो.

प्रा. विठ्ठल पाईलवार पिएच डी (आचार्य) पदवीने सन्मानीत

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : प्राचार्य विठ्ठल निळकंठ पाईलवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून राज्यशास्त्र विषयात आचार्य (पी एच डी) पदवी बहाल केली आहे.

विदर्भातील पेरकी समुदायाचा राजकीय प्रक्रियेतील सहभागाचे चिकित्सक अध्ययन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डॉ पदमा किशोर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन कार्य केले होते.

कटली बोरगाव सोसायटी वर भाजपा-गोंडवाना चा दणदणीत विजय



योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : बहुतांश उपविभागीय क्षेत्रात आघाडीची विविध सहकार सोसायटी वर चलती असल्याचे चित्र असताना मात्र, झरी तालुक्यातील कटली बोरगाव येथील सहकारी संस्था सोसायटी निवडणूकित भाजपा गोंडवाना पॅनल चा १३ पैकी १३ ही सर्व उमेदवार विजयी झाले.

त्यामुळे या सोसायटी वर बाकी पक्षाला आपला ताबा मिळवता आला नसून, सर्वांचा बट्याबोळ झाला आहे. या सोसायटीच्या अध्यक्ष पदी हेमंत मडावी तर उपाध्यक्ष पदी वसंत गेडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मुन्ना उर्फ सुरेश बोलेनवार, बंडू आडे, सचिव किशोर काळे व निवडून आलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.

बोरवेल पाईप वाहून नेणारा ट्रक मेंढोली जवळ झाला पलटी

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : बोरवेलचा धावत्या सहाय्यक ट्रक वाहणाचे समोरील टायर फुटले आणि वाहन पलटी झाले. त्यात एका युवा मजूराचा दबून मृत्यू झाला. ही घटना मेंढोली शिवारातील सूर्यभान मेश्राम यांच्या शेताजवळ आज २९ मे ला दुपारच्या सुमारास घडली.

रामेन अमृतलाल पुसाम (२०) रा. सोनपरी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे दुर्दैवी मजूर मृतकाचे नाव आहे. तर अशोक कलमू, मक्खन उईके व दिनेश गटपल्ली हे जखमी झाले आहेत. 
शिरपूर कडून मेंढोलीकडे बोरवेल पाईप घेवून जात असतांना ट्रक क्र. (MH 29 TO579) हा दरम्यान, मेंढोली गावाजवळ ट्रक चा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाले. या अपघातात काम करणाऱ्या रामेन पुसाम चा दबून दुर्दैव मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
वणी येथील सय्यद सरफराज यांच्या मालकीचा हा बोरवेल पाईप वाहून नेणारा ट्रक असून घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकच्या खाली दबलेल्या युवा मजुराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम 184,304 (अ) 337,338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

गोदावरी अर्बन वणी शाखेचा पाचवा वर्धापन दिन थाटात संपन्न...


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, 5 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील कर्तृत्वान प्रतिनिधींचा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. 
    
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर तसेच वरिष्ठ व्यवस्थापक रविजी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, 5 वा वर्धापनदिन वसंत जिनिंग हॉल वणी येथे दिनांक 27/05/2022 ला मोठ्या उत्साहात पार पडला.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेशजी खुराणा, प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ अर्बन को ऑप बँकेचे संचालक प्रशांत जी मादमशेट्टीवार, कायदेशिर सल्लागार ऍड सुरज महारतळे, रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष संजय जी खाडे, केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखरजी खोंड साहेब, व्यापारी मित्र सहकारी पतसंस्थेचे सचिव पांडुरंग लांजेवार, सामाजिक कार्यकर्त्या निलिमा काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. 
     
 यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले, तसेच दैनिक व आवर्त प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या वणी शाखेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यात सौ हिरल जितेंद्र मुनोत, मनोज लुक्का, सौ. चित्रा विवेक देशपांडे, विजेंद्रजी तातेड, बंडू कडुकर यांचा सन्मान करण्यात आला, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीतील मेंबर्स यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
   
 या कार्यक्रमाचे संचालन राजुभाऊ गव्हाणे, प्रास्ताविक वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर आभार सुरज चाटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, चंद्रपूर शाखा अधिकारी अनिरुद्ध पाथ्रडकर, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार यांनी प्रयत्न केले तर यावेळी समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता, ठेवीदार उपस्थित होते.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड मनोहरराव गोमारे यांच्यासह मान्यवरांची सदिच्छा भेट

बालाजी सुवर्णकर | सह्याद्री चौफेर 

उदगीर : नुकत्याच उदगीर येथे झालेल्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड मनोहर
 गोमारे,अंधश्रध्दा निर्मुलन समितिचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर,सचिव सुधीर भोसले, उदगीर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत शिक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ रावजी मुडपे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा पत्रकार धनंजय गुडसुर, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक तथा सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे संचालक बालाजी सुवर्णकार यांनी सदिच्छा भेट देऊन उदगीर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलना विषयी चर्चा झाली. या वेळी डॉ.अंजुम कादरी (शेख) यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा डॉ.अंजुम कादरी (शेख) व नगरसेवक अहमद सरवर शेख यांनी सन्मान केला.

 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक अहमद सरवर यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद यांनी केले. तर संमनाबद्दल आभार बालाजी सुवर्णकार यांनी केले.

महिला सरपंचांनी युवकाला केली मारहाण, तक्रारीतून कारवाईची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील कोलार (पिंप्री) येथील सरपंचांकडून गावातील युवकाला मारहाण केल्याची घटना शनिवारला दहा वाजताच्या दरम्यान घडली.

गावातील समस्या संदर्भात दीपक नरवाडे यांनी ग्रामसभेत प्रश्नांची विचारणा केली असता, या प्रश्नाचे उत्तरे नंतर देण्यात येईल असे सांगून दीपक नरवाडेंना घरी बोलावण्यात आले.
समस्ये संदर्भात माहिती घेण्यासाठी दीपक सरपंच साधना बंडू उईके यांचे घरी गेला. त्यावेळी 'मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे का देवू' असे म्हणत २५ वर्षीय दीपकला मारहाण करण्यात आली. दरम्यान, बंडू उईके वि दीपक कांबळे हे घरी पोहचले व दिपक नरवाडेला ओढतान करून, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक नरवाडे यांनी तक्रारीतून केली आहे. 

चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झालेले पैसे परत मिळवा

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : हल्ली पैशांचे व्यवहार करण्याचे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत. बँकेचे पैशांचे व्यवहारदेखील आता आपल्या स्मार्टफोनवरून आपल्याला सहज करता येतात. कोणालाही पैसे पाठवणं किंवा कोणाकडून पैसे घेणं आता अगदी सोपं झालं आहे; मात्र स्मार्टफोनवरून किंवा एखाद्या बँक अ‍प्लिकेशनच्या साह्याने व्यवहार करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन पैशांचे व्यवहार कसे करावेत, याची आपल्याला पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे.

ऑनलाइन व्यवहार जेवढे सोपे तेवढेच अवघडदेखील असतात. एखादेवेळी आपण पैसे पाठवत असताना चुकून ते पैसे कोण्या दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याची शक्यता असते. असं झाल्यास घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते तुम्हाला परत मिळू शकतात. 

पैशांचा व्यवहार करताना तुमच्याकडून चुकून पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झाले असतील तर त्वरित तुमच्या बँकेला याची माहिती द्या. त्याचबरोबर कस्टमर केअरला फोन करून घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती द्या. बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर या चुकून झालेल्या व्यवहाराची माहिती द्या. यामध्ये झालेल्या व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात तुमच्याकडून चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती द्या.

घडलेला प्रकार तुम्ही बँकेला कळवल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. काही वेळा अशी प्रकरणं सोडवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीदेखील लागू शकतो. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन याबद्दल चौकशी करू शकता, की ट्रान्स्फर झालेली रक्कम कोणत्या शहरातल्या कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतल्या खात्यात जमा झाली आहे. मग तुम्ही तुमच्या शाखेशी बोलून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. यानंतर ज्या व्यक्तीच्या खात्यात तुमचे पैसे जमा झाले आहेत त्या व्यक्तीच्या बँकेला तुमची बँक घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देईल. त्यानंतर ती बँक त्या व्यक्तीकडून हे चुकून ट्रान्स्फर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागते.
याव्यतिरिक्त अनेक प्रकारांमध्ये तुम्ही कायद्याचा आधारदेखील घेऊ शकता. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत. त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला, तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. कारण त्या व्यक्तीने पैसे परत न केल्यास ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करण्यासारखं आहे.
अशा परिस्थितीत तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. आरबीआयने बँकांना सूचनादेखील दिल्या आहेत, की जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले, तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी लागेल. अर्थात, आपण स्वतःही चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत, यासाठी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.

मुस्कान सय्यद ठरली विद्यापीठ उत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवक पुरस्काराची मानकरी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्काराची यादी आज (२८ मे) ला जाहीर केली. त्यात  लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील राष्ट्रीय सेवा योजना ची स्वयंसेविका कु.मुस्कान सय्यद ही उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

कु.मुस्कान सय्यद हीने रासेयो मध्ये अतिशय महत्वपुर्ण योगदान दिले असून, जनजागृती अभियान, पाणी बचाव अभियान, रक्तदान, मतदान, मुलीच्या जन्माचे स्वागत करू अभियान, आपत्कालीन व्यवस्थापन यात तिने विशेष योगदान दिले असून ती TDRS मध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतांना समाज जीवनात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेतून हजारो विद्यार्थ्याना प्रशिक्षणातून धडे देण्याचे काम केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात रूग्णाना मदतीचा हात सुद्धा मुस्काननी दिला आहे. "बेटी बचावो बेटी पढाओ" या ब्रिद वाक्याच प्रत्यक्ष उदाहरण कु.मुस्कान असून तीच्या कार्याची दखल मा.डॉ.दिलीप मालखेडे, कुलगुरू यांच्या नेतृत्वात व डॉ.राजेश बुरंगे संमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पुरस्कार निवड समितीने घेतली असून, कु.मुस्कान सय्यद हीला राष्ट्रीय सेवा योजना चे उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.
ती आपल्या यशाचे श्रेय मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे, रा.से.यो कर्तव्यदक्ष कार्यक्रम अधिकारी व मुस्कानच्या मार्गदर्शीका डॉ.निलीमा दवणे तसेच प्रा. किशन घोगरे आणि आपल्या आई वडीलांना देते.
मुस्कानला उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झालाबद्दल तिचे सर्वस्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युवा शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका युवा शेतमजूराने आज 28 मे रोजी दुपारीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.

शुभम उत्तम देवतळे (28) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतमजूराचे नाव आहे.

तालुक्यात आत्महत्येची मालिका कायम दिसून येत आहे. आज  म्हैसदोडका येथील एका शेतमजूराने राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून वृत्त लिही पर्यंत इतर माहिती प्राप्त होऊ शकली नाही. मात्र त्याने आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.

साहेब रुग्णवाहीका दिली पण रेफर, अवहेलनाच काय?

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : उपविभागीय कार्य क्षेत्रात आमदार साहेबांनी वणी झरी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा  मिळण्यासाठी रुग्णवाहीका दिल्या. मात्र, येथील सर्प दंश व अपघात झालेले रुग्ण अद्यापही रेफर होत आहे. असे चित्र असतांना साहेबांचे या गंभीर प्रश्नाकडे जणू दुर्लक्ष होताना दिसत आहे. आपण या वणी विधानसभा क्षेत्राचे चे आमदार असतांना आपण ह्या जनतेच्या समस्या सोडवू शकत नसतील तर आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली होती.

जनतेची सेवा करण्यासाठी येथील विधानसभा मतदार संघातील लोकांनी काम करणारा माणूस म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली आहे. शेत पांदन रस्ते, बस स्थानक, क्रीडा संकुल हे अद्याप थंड बस्त्यात आहे. सोबतच मारेगाव ग्रामीण रुग्णालयाची अवदसा झाली असतांना याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अपघातातील रुग्णांना यवतमाळ चंद्रपूर रेफर केल जात किंबहुना येथे अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत तासंतास रुग्णांना ताटकळत बसाव लागत आहे. एकीकडे "सबका साथ सबका विकास" चा नारा देणारे आमदार यावर कोणतीही भूमिका स्पष्ट घेताना दिसत नाही हेच वणी विधानसभा मतदार संघांचे दुर्दैव आहे. उपविभागात तीन रुग्णवाहीका प्रदान केली त्याचा उहापोह होत आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयात काय चालू आहे. याच यांना काहीच ठाव नाही हीच खरी शोकांतिका आहे. एकदा साहेबांनी येथील भोंगळ कारभार चहाट्यावर आणून गोरगरीब रुग्णांना द्यावा अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
गेली दीड महिना वैद्यकीय अधिकारी रजेवर होते, अशात अनेक तक्रारी समोर येत होत्या, अक्खा मारेगाव प्रशासन प्रभारावर असून, रुग्णांना वाऱ्यावर सोडलं जात असतांना साहेब गप्प का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकूणच साहेब केवळ प्रसिद्धीसाठी सगळा लवाजमा करित असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अशावेळी रुग्णवाहीका देण्यापेक्षा रुग्णालयात लक्ष देणे गरजेचे आहे. यातच सामान्यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालय कळंब येथे रुग्णांना फळ वाटप


रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : भारतिय जनता पार्टीचे जेब्ठ नेते केद्रिय मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात भाजप कळंब तालुका यांच्या वतीने रूग्णांना फळ वाटप करण्यात आले .

 यावेळी भाजपा कळंब तालुका अध्यक्ष कैलास बोंद्रे, शहर अध्यक्ष संदीप वैद्य, सरचिटणीस सुरेशजी होरे, अशोकभाऊ गारगाटे, सुभाषजी पवार, गणेशजी वाल्दे, तुषार शेंडे, रुपेशजी सुचक, जगदिशजी भेले, भुजंगराव शिंदे, मलमवारजी, रूपेश सुचक इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..
   

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा कार्यालयाच्या वतीने आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा

सह्याद्री | चौफेर न्यूज 

पांढरकवडा : आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, या कार्यालयाचे स्तरावर आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा 4 जून 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता नृत्य कार्य क्षेत्रातील पथकांनी दिनांक 1 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या नृत्य पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता, पारितोषिक इत्यादी मिळणार आहे.
या प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजामधील विविध जमातींच्या पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

बहात्तर (बोथ) येथे मार्गदर्शन व नेतृत्व कार्यक्रम संपन्न

सह्याद्री | चौफेर न्यूज 

केळापूर : राष्टीय पिछडा वर्ग मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा,राष्टीय आदिवशी एकता परिषद मार्फत मौजा बहात्तर (बोथ) या गावी दिनांक २५ मे रोजी भारत बंद कार्यक्रम आयोजित केले.

या कार्यक्रमाचे नेतृत्व मा.ऍड.अनिल भाऊ किनाके मा.रुची कांलिदे मॅडम यांनी या देशातील बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात प्रमुख मार्गदर्शन आणि नेतृत्व केले.कार्यक्रमाला बहात्तर (बोथ) येथील तमाम कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.
 कार्यक्रमा उपस्थिनी मा.तुकाराम नैताम, भरत मंगाम, अनिल आत्राम, महादेव मेश्राम, वासुदेव पेंदोर,नागोराव धुर्वे,उत्तम साठे, चंदू झामरे, संजय धुर्वे, नामदेव पेंदोर, बळीराम मेश्राम, गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यसनापासून दूर रहा, सुखी जीवनाची सूत्रे गवसायाला वेळ लागणार नाहीत - अनिल डोंगरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : पूजनीय शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून गोंडपिपरी येथील पुरुषोत्तम ठाकूर यांच्या गृहप्रवेश वास्तु पूजनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यसनमुक्ती, मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना. कार्यक्रमाचे उद्घाटक भाऊराव ठाकरे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, प्रमुख अतिथी दिगंबर वासेकर जिल्हा संघटक, भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक, श्री प्रकाश अल्गमकर,श्री दिपक ठाकरे, श्री आकाश शिरसागर,श्री अशोक पटेल,श्री भोजराज एकोणकार,श्री मारुती वाकुलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना डोंगरे म्हणाले की, दारूच्या आहारी गेलेले लोक समाजात आपला मान सन्मान वाढवू शकत नाही,आपल्या परिवारास सुख समाधान,ऐश्वर्य देवू शकत नाही, मात्र व्यसन मुक्त होण्याचा एकदा का निर्धार केला तर "नांदा सौख्यभरे..." सुखी जीवनाची सूत्रे गवसायला वेळ लागणार नाही.
पुढे बोलताना, व्यसनमुक्ती मुळेच आज वास्तु व पूजनाच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला त्या निमित्ताने घरचे प्रमुख व्यक्ती नऊ वर्षापूर्वी दारू व्यसनाच्या आहारी गेले होते, त्यांनी परमपूज्य शेषराव महाराज यांचा दारू व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला आणि ते दारू व्यसन मुक्त झाले. आज ते आपली स्वतः व्यथा मांडत असताना एके काळी ते झोपडीतच राहायचे, त्यांचे मानधन 9000 हजार. मी जर दारू पीत राहिलो असतो  तर एवढे सुंदर पंधरा लाखाचे घर बांधू शकलो नसतो.
आज कित्येक परिवार या दारू व्यसनामुळे उध्वस्त झाले आहे त्यांचे मुले बाळे रस्त्यावर आले आहे.या संघटनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याकरिता हे कार्य जोमात सुरू आहे असे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमांतर्गत सौ कुसुम पुरूषोत्तम ठाकूर या दाम्पत्याचा व कुमारी प्रतीक्षा घ्यार यांचा जिल्हा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.