शिवणाळा येथील युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत यवतमाळ महामार्गांवर भरधाव अज्ञात वाहनाने पायदळी चालणाऱ्या एका होतकरू तरुणाला धडक दिली. या दुर्घटनेत तरुण जागीच ठार झाला असून ही घटना काही मिनिटाअगोदर घडल्याचे समजते.
अनिल कृष्णराव टेकाम (26) रा. शिवणाळा असे या भीषण अपघातात ठार झालेल्या होतकरू युवकाचे नाव आहे. मृतक हा  नेहमी प्रमाणे मिस्त्री काम आटोपून पायदळ गावंच्या दिशेने येत असताना अज्ञात वाहनाने त्यास उडवून पोबारा केला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी 10.15 वाजता चे दरम्यान, यवतमाळ-मारेगाव महामार्गांवरील शिवणाळा फाट्यावर नजीक घडली.

अपघात इतका भीषण होता की, यात मृतकाचे डोके चेंदामेंदा झाल्याचे जमावांनी सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरु असल्याचे समजते.
अनिल याचे पश्चात एकटी आई असून त्याचे वडिलांचे मागच्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले अशी माहिती आहे. जन्मदात्रीचा आधार निघून गेल्याने शिवणाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे. 

ब्रेकिंग न्यूज : पुतण्याने केला चुलत्याचा कोयत्याने "गेम"

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोसारा येथे एका इसमाचा निर्घृन खून करण्यात आला. सदर घटना दि.30 जून रोजी सकाळी दहा वाजताचे दरम्यान, घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाला असून, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष संभाजी पचारे (48) असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी चंपत देविदास पचारे (30) दोघेही कोसारा येथील रहिवाशी आहे. आज सकाळी चुलता आणि पुतण्याने मिळून दारू ढोसली, त्यातून "तू तू मैं मैं" झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून आरोपी चंपत याने आधी चुलत्याच्या छाताडावर दगड आदळला, नंतर कोयत्याने वार केला,मग त्याच्या देहात लाठी गुसवली ही समाजमन सुन्न करणारी घटना गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आज शुक्रवारी सकाळी 10.15 वाजताचे दरम्यान, घडली. दारू ढोसलेल्या पुतण्याने अशी चुलत्याची निर्दयी निघृन हत्या केली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाचा पंचनामा सुरु असल्याचे माहिती आहे. तूर्तास या प्रकरणाची नेमकी कहाणी काय? हे आरोपीच सांगू शकणार...
अधिक तपास पोलीस करित आहे.

आज मारेगाव पोलीस स्टेशन मधून पुरी यांची बदली झाली आणि मारेगाव ठाण्याचे सूत्र जनार्दन खंडेराव यांचे कडे सोपण्यात आले, नवे ठाणेदार रुजी होणार मात्र,त्यांना सलामीसह खुणाची बोयणी झाली, असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. 

जनार्दन एकनाथ खंडेराव यांचेकडे मारेगाव ठाण्याचे सूत्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांची वणी येथे बदली झाल्याने त्यांचे ठिकाणी पोलीस ठाणेदार
म्हणून जनार्दन खंडेराव हे रुजू होणार आहेत,अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी जनार्दन एकनाथ खंडेराव यांच्याकडे मारेगाव पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे.

ठाणेदार पुरी यांची वणी येथे बदली झाल्याने पो. स्टे.यवतमाळ यवतमाळ शहर असलेले स.पो.नि जनार्दन खंडेराव यांनी शुक्रवार (दि.30) जून रोजी मारेगाव ठाणेदार पदाचे सूत्र आज स्वीकारणार असल्याचे माहिती आहे.

जनार्दन खंडेराव यांनी यवतमाळ शहराचे ठाणे योग्यरित्या काम सांभाळले. तसेच यवतमाळ शहराचा चांगला अनुभव, त्यामुळे मारेगाव ठाणे सांभाळताना त्यांना फारशी अडचण जाणार नाही. मात्र, अवैध धंदे फोफावणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे.

तालुक्यातील कोंबडबाजार मटका जुगार, भंगार चोरी, गोवंश तस्करी, सुगंधी तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.

कसा जाईल आपला आजचा दिवस, जाणून घ्या...


    जाणून घ्या आजचे राशीभविष्य : ३० जून शुक्रवार..!

मेष :-
मेष राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि खूप संघर्षानंतर तुम्हाला समस्यांपासून थोडा आराम मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. वाढत्या आर्थिक अडचणींपासून आराम मिळेल. तुम्हाला काही कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला छोट्या अर्धवेळ व्यवसायासाठीही वेळ मिळेल आणि तुमची कामे सहज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, त्यामुळे प्रयत्न केल्यास फायदा होईल.

वृषभ :-
वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. कोणत्याही शुभ कार्याची तुमच्या कुटुंबात चर्चा होऊन त्याची रूपरेषा तयार करता येईल. राहणीमान सुधारण्यासाठी तुम्ही आवश्यक वस्तू खरेदी कराल. संध्याकाळी विशेष पाहुणे येऊ शकतात आणि तुमचा खर्च वाढू शकतो.

मिथुन :-
मिथुन राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि तुम्ही तुमच्या कामात खूप वेगाने पुढे जाल. तुमची प्रगती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल आणि तुमच्या रखडलेल्या योजना यशस्वी होतील. प्रगतीचा हा वेग कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. अन्यथा, प्रतिष्ठा नंतर दुखावली जाऊ शकते. निरुपयोगी कामापासून दूर राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कर्क :-
कर्क राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि तुमची काही महत्वाची कामे पूर्ण करण्यात दिवस खर्ची पडेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नेहमी प्रयत्न करता. तुमचे सर्वांशी संबंध मधुर राहतील. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या आवडीच्या ठिकाणी जागा बदलता येईल.

सिंह :-
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. व्यवसायाची चिंता विशेषत: तुम्हाला त्रास देईल कारण गेल्या अनेक दिवसांपासून व्यवसाय नियमित न झाल्यामुळे तुम्ही खूप गोंधळलेले असाल. अस्थिरता तुम्हाला सोडत नाही. नोकरी, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात काही सुधारणा अपेक्षित आहे. तुम्हाला आळस आणि आराम सोडावा लागेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कन्या :-
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस खास असेल. तुम्हाला विशेष प्रकारची धावपळ करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला त्यात चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमचे काम पूर्ण उत्साहाने कराल तर तुम्हाला फायदा होईल. काही काळानंतर तुम्हाला सर्वोत्कृष्ट करार मिळवून नफ्याच्या संधी मिळतील.

तूळ :-
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ नाही आणि तुमचे भाग्य साथ देणार नाही. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लोक तुमच्या बोलण्याला विरोध करतील. तुम्ही तुमच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने या लोकांना पराभूत करू शकता. मनातील दुर्बलता आणि वाईट गुण सोडून पुढे जा.

वृश्चिक :-
वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुम्हाला कुठूनतरी खूप शुभ बातमी मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रातील ताणतणाव तुमच्यावर वर्चस्व गाजवू देत नसाल तर तुमचा दिवस आनंददायी जाईल. तुमच्या काही नवीन योजना यशस्वी होतील आणि जुनी भांडणे मिटतील. अधिकारी वर्गातील लोकांमध्ये परस्पर सौहार्द वाढेल. निराशाजनक विचारांपासून दूर राहा. दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे.

धनु :-
धनु राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुम्हाला नवीन संपर्काचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमचे काम करावेसे वाटेल. जे लोक कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी संबंधित आहेत त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. रखडलेले पैसे अडचणीने मिळतील आणि दैनंदिन कामात दुर्लक्ष करू नका. सर्वकाही काळजीपूर्वक करा. व्यावसायिक प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि नशीब तुमची साथ देईल. संध्याकाळी शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर :-
मकर राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुमचा आदर वाढेल. ग्रहांची हालचाल तुमच्या भाग्यात वाढ होण्याचे संकेत देत आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवसायात फायदा होईल. सकाळीच शुभवार्ता मिळाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मित्रांमधील परस्पर संबंध खूप गोड असतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा निर्णय घेऊ शकता. मामाचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभ होईल.

कुंभ :-
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर राहील. उच्च अधिकार्‍यांच्या जवळीकीचा लाभ घेण्याची संधी मिळेल. आयात-निर्यात क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाच्या क्षेत्रातील कोणताही निर्णय तुम्हाला भविष्यात लाभ देईल. अध्यात्मात तुमची आवड वाढेल. प्रवासाची संधी मिळेल. वेळेचा योग्य वापर करून तुमचे भाग्य उंचावेल.

मीन :-
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील आणि तुम्हाला फायदा होईल. काही वादग्रस्त अडचणी संपतील. ऑफिसमधील प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, ते परत मिळवणे खूप कठीण होईल.


मार्डी येथे सी एन जी गॅस प्रकल्प निर्मिती केंद्राचे भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : ग्रामीण अर्थव्यवस्थेला शाश्वत रीतीने आधार देण्यासाठी आज गुरुवार (दि.२९) रोजी मार्डी येथे मंजुळ बायोफ्युएल प्रा.लि.मारेगाव, व मा.अनिता फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मारेगाव च्या वतीने सी एन जी गॅस निर्मिती केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजन कंपनीचे डायरेक्टर गजानन चौधरी यांच्या उपस्थितीत माजी सरपंच भास्कर धानफुले यांचे हस्ते करण्यात आले.

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी नविन सी एन जी गॅस प्रकल्प होत असल्याने परीसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सेंद्रिय शेती, ऊर्जा पीक शेती, बायोमास फार्मिंग आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, बायोमास आणि कचरा यांसारख्या गैर-अन्न फीडस्टॉकपासून शाश्वत स्वच्छ इंधन तयार करणे हाच आहे. त्यासाठी लागणार कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून पिकवला जाणार आहे. या गॅस निर्मिती केंद्राकरिता लागणारे रोपटे कंपनीमार्फत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी संबंधितांनी दिली. येथील परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याने या प्रकल्पाची स्तुतीसुमणांनी स्वागत केले जात आहे.

एम सी एल (MCL) उत्पादक संस्था (MPO) शेतकऱ्यांना जैवइंधन उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी, शाश्वत आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांना आर्थिक लाभ देण्यासाठी कंपनी सक्षम असून हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना वरदान ठरणार आहे. 
भूमिपूजनाप्रसंगी माजी सरपंच भास्कर धानफुले, सरपंच रविराज चंदनखेडे, डायरेक्टर गजानन चौधरी, गजानन आसुटकर, प्रवीण कुचनकर, अतुल बोबडे, सारंग लांबट, विकास चौधरी, प्रवीण मिलमिले, राहुल चट्टे, ग्राम उद्योजक बंडू टोंगे, सुरेश मुरस्कर, विजय घोटेकर, आकाश बदकी, धनंजय आसूटकर, भैरव राऊत, अक्षय गलाट, अक्षय एकरे, प्रतीक गावंडे, किशोर उलमाले, संजय वानखेडे, प्रेमानंद देठे,  तुफान अन्सारी, विनोद ठेंगळे, अनंता निब्रड,आदी मंडळी सह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

मारेगाव: चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी ५० गूरूदेव सेवकांसह पंढरपूर रवाना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गुरुपौर्णिमेच्या पर्वावर जिल्ह्यातील विविध भागातील गुरुदेव प्रेमी, उपासक चंद्रभागेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी हजारो सेवक निघाले असता, आज (गुरुवार) ला दुपारी 4 वा. मारेगाव तालुक्यातील 50 गुरुदेव सेवकासह पंढरपूर कडे रवाना झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हजारों हातांनी चंद्रभागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असं मत रवाना झालेल्या गुरुदेव उपासकांनी व्यक्त केले.

आषाढी यात्रेमुळे पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होतात. "सत्ता कि आयु न बढि,सेवा कि ध्वजा सदा खडी" असं महाराजांनी आपल्या भजनवाणीतून सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीचा हात मिळाल्यास चंद्रभागा स्वच्छता अभियान वेगाने रावबिता येईल, या भावनेने पंढरपुरात चंद्रभागा स्वच्छता अभियान, पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूरचे संचालक सेवकराम दादा यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दि.1,2,3, जूलै रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यांच्या या अभियानात रूपेश ढोके, रामदास ढेंगळे, दिवाकर गाडगे, सूरज येवले, सह मारेगाव तालुक्यातील कानडा हिवरा वनोजा येतील कार्यकर्ते चंद्रभागा स्वच्छता अभियान साठी पंढरपूर रवाना झाले असून उद्या सायंकाळपर्यंत सर्व सेवक पंढरपूर ला पोहचणार आहे.

हे अभियान गेल्या 9 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होतात, त्यामुळे आम्ही सुद्धा सहभागी होत आहोत,असे गुरुदेव उपासक रुपेशभाऊ ढोके यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले. 

मंत्रिमंडळ निर्णय: संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दीड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३०० रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून ४० लाख ९९ हजार २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील 'या' जिल्हयांचा समावेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येईल.

या प्रकल्पास डॉलर्स विनिमय दरामधील फरकामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पाचा खर्च ५ हजार ४६९ कोटी रुपये इतका होणार आहे. या प्रकल्पाच्या ४ हजार कोटींच्या मुळ किंमतीमध्ये डॉलर्सच्या वाढत्या दरामुळे ६९० कोटी रुपये वाढ झाली आहे. यातील ४८३ कोटी रुपये जागतिक बँकेकडून मिळणार आहेत. तसेच उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७७९ कोटी रुपये असा १ हजार ४६९ कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येईल. यासाठी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ हजार ६८२ गावे, जळगाव जिल्ह्यातील ४६० गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील १४२ अशा एकूण ५ हजार २२० गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येतो.

समस्त जनतेला आषाढी एकादशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!!


                        || जय हरी विठ्ठल ||
             विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
 जरी बाप साऱ्या जगाचा
परि तू आम्हा लेकरांची विठू माउली

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,

पंढरीनाथ महाराज की जय

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


शुभता, शुभत्व आणि मंगलमय दिनी देवशयनी एकादशीच्या आपणास हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...!!

श्रीहरींच्या आशीर्वादांचा तुमच्यावर अविरत वर्षाव होवो, प्रत्येक घर आणि अंगण धन-धान्याने भरून जावो, प्रत्येकाच्या आयुष्यात अपार सुख, समृद्धी आणि आनंद येवो, हीच मी विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना करतो.


शुभेच्छुक :- श्री. अतुल पचारे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मारेगाव 

मारेगाव येथे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दि.26 जून 2023 सोमवारला कुमार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूट द्वारे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ (सेंडाप) घेण्यात आला.

आगामी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे कॉम्प्युटर टायपिंग (G C C TBC) ह्या अंदाजित परीक्षा 12 जुलै 2023 पासून सुरु होत आहेत. त्या अनुषंगाने सेंटर माहिती, हाल तिकीट, मॅन्युअल टायपिंग, कॉम्प्युटर टायपिंग, स्टेनोग्राफर, शॉर्टहॅन्ड, शासकीय व निमशाकीय अशी माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित केले, या सभेला प्राचार्य राजेश घुमे यांचे मोलाचे माग्दर्शन लाभले.

यावेळी कुमार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूटचे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. 

ट्रक अपघातात एक जन ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : दोन इसम दुचाकीने करंजीकडे जात असतांना बोटोणी जवळ भरधाव वाहतूक करणाऱ्या एका ट्रक'च्या चाकात येवून एक जन ठार झाल्याची घटना आज सायंकाळी साडे सहा वाजता घडली. या धक्कादायक घटनेतील दुचाकी स्वाराने पोबारा केल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव वरून करंजीकडे जात असलेल्या मोटारसायकल वरील मागील व्यक्ती गतीरोधक वर उसळून मागून येणाऱ्या ट्रक (वाहन क्रं. MH.21 BH.7770) च्या चाकात आल्याने एक जन घटनास्थळी ठार झाला. ही धक्कादायक घटना आज बुधवारला सायंकाळी 6.30 वाजताचे दरम्यान, यवतमाळ मारेगाव हायवे रोडवरील बोटोणी गतिरोधक लगत घडली. मात्र, सोबत असलेल्या सहकारी दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पोबारा केल्याचे चर्चा आहे.

वृत्तलिहेपर्यंत मृतकाचे नाव कळू शकले नसून घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे 




मारेगाव : जप्त बेवारस वाहनांचा होणार लिलाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील पोलीस स्टेशन मारेगांव येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेल्या ठाण्यात बेवारस वाहने जप्त करण्यात आलेली होती. सदर गाडीचा लिलाव करणेबाबत विल्हेवाट परवानगी दिल्याने जप्त गाड्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मारेगाव पोलिसांनी दिली आहे.

पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे. त्याचे क्रमांक १) पॅशन एम. एस. ३२ यु १६६८, २) स्टार सिटी एम.एच.३२ ए.सी. ६६८२, ३) पॅशन हिरो हॉन्डा एम.एस. ३४ ए.एफ. ३८२३, ४ ) हिरो होन्डा एप्लेंडर एम.एच.३४ एन. ३७०४,  ५) हिरो स्प्लेंडर एम.एच. ३४ यु ५८६८, ६) कावासाकी एम.एच.२९ जे ४८६९, ७) टि.व्हि.एस. व्हिक्टर एम.एच. २९ एल ८४५५, ८) बजाज बॉक्सर एम. एच. २९ एच. ७४३८, ९) हिरो हॉन्डा पॅशन एम.एस. २९ पी ३८०८, १०) हिरो हॉन्डा पॅशन प्रोरो एम. एच. २९ डब्लु १०४९, ११) हिरो हॉन्डा सन्लेंडर एम. एच. २९ के २५, १२) हॉन्डा एक्टीव्हा एम.एच. ३१ सि.यु. २१७६, १३) सुजुकी चेसीज नं. १७०४७९६०२६, १४) अपाची चेसीज नं.एम डी ६३४ के ई ४, १५) बजाज चेतक स्कुटर असे एकुण १५ वाहनांचा समावेश असून पो.स्टे. बरेच दिवसापासुन बेवारस पडुन आहे.

या वाहनाचे मुळ मालक यांनी त्याचे वाहनाचे मुळ कागदत्रासह पो.स्टे. ला १५ दिवसाचे आत येवून आपली मालकी सिध्द करून वाहन घेवून जावे, अन्यथा नमुद वाहनाचा प्रस्तावित लिलाव शासकीय पध्दतीने करण्यात येईल असे ठाणेदार पुरी मारेगांव यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.



मारेगाव मध्ये पोलिसांनी केले रूटमार्ट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : बकरी ईद आणि गुरुपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्‍ववभूमीवर मारेगाव पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला.

शहरात उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. आगामी बकरी ईद संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक, डॉ. आंबेडकर चौक, गौशिया मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार व होमगार्ड रूटमार्च करीता आदिसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
 पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी रूट मार्च करून कोणत्याही परीस्थिला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे. 


अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेऊन इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इ. 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन 2023-24 ची इ. 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश दिनांक 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत.

इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

बी.सी.झंवर/विसंअ/

टोमॅटो झाला लाल, भाव 100 रुपये किलोवर पोहोचले; जाणून घ्या...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सध्या भाजी मंडईतील टोमॅटोचे भाव लोकांना रडवणारे आहेत. देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात बाजारात टोमॅटोचे दर दुपटीने तर काही ठिकाणी त्याहूनही वाढले आहेत

टोमॅटो 60 ते 100 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे
सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटो त्याच्या गुणवत्तेनुसार 60 ते 100 रुपये किलोने विकला जात आहे. मध्य प्रदेशातही टोमॅटोचे दर 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिशा आणि छत्तीसगड या मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक राज्यांमध्येही त्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

कुठे पाऊस तर कुठे उष्णतेचा परिणाम
एकीकडे बिपरजॉय वादळामुळे झालेल्या पावसाचा महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांतील टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बिहार आणि पश्चिम बंगालमधील कडाक्याच्या उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकावरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नुकसान झाले.

परिणामी, देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली, त्यामुळे दर रात्री गगनाला भिडले. दुसरीकडे पावसाला सुरुवात झाल्याने टोमॅटो पिकावरही परिणाम झाला. केवळ टोमॅटोच नाही तर मंडईतील इतर हिरव्या भाज्यांच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. तथापि, पुढील एक किंवा दोन महिन्यांत टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या नवीन मालाची आवक वाढेल तेव्हा काही राज्यांमध्ये दरात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.


आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य आहे - गीत घोष

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य असून ते शोषित, पिढीत, आदिम मानवाचा हुंकार आणि त्याच्या स्वातंत्र्याचा प्रकाश आहे. असे मत दुसरे नवोदित साहित्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रगतशील साहित्यिक व विचारवंत मा.गीत घोष यांनी मांडले ते विरांगना राणी दुर्गावती स्मृती पर्व निमित्ताने आयोजित दुसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेमध्ये उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडताना बोलत होते.

वसंत को.शेतकरी जिनिंग हॉलमध्ये झालेल्या या परिषदेच्या अध्यक्ष आदिवासी साहित्यिक कवि कुसूमताई अलाम, गडचिरोली ह्या होत्या, उद्घाटन आदिवासी साहित्यिक मा.प्रभू राजगडकर नागपूर यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून आदिवासी साहित्यिक तथा संपादक गोंडवाना दर्शन, गडचिरोली, मा.दशरथ मडावी,आदिवासी साहित्यिक, यवतमाळ, मा.गीत घोष प्रगतशील साहित्यिक व विचारवंत, वणी, मा.निळकंठराव जुमनाके गुरुजी सं बिरसा मुंडा आ.पत.सं,यवतमाळ, मा.अशोकभाऊ नागभिडकर, संचालक वं.को.शेतकरी जि.प्रे.,वणी विनोद वाडेकर, मुंबई हे होते, विशेष अतिथी म्हणून मा.बि.डी. आडे, मा.ल.सू.राजगडकर, मा. एम.के.कोडापे,मा.पैकूजी आत्राम, डॉ. अरविंद कुळमेथे, डॉ. श्रीकृष्ण मडावी, मा.सुधाकर चांदेकर, मा.रमेश मडावी, मा.संतोष चांदेकर हे होते.

पुढे बोलतांना गीत घोष म्हणाले, साहित्य माणसाच्या समजेवर संस्कार करुन त्याच्या दृष्कोनात परिवर्तन घडवून आणत असते त्यामुळे साहित्य हे मानवी जाणीवाच प्रस्थापित व्यवस्थेशी झलेल हे एकप्रकारे युद्धच आहे. या परिषदेत आदिवासी स्त्री काल,आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता.अध्यक्ष मा.प्रब्रम्हानंद मडावी, मुल,हे होते,विषयाचे वक्ते,मा.प्रा. शीतल ढगे, सुवर्णा वरखडे,या होत्या, परिसंवादाचे प्रास्ताविक छायाताई उईके यांनी केले, सूत्रसंचालन आशाताई कोवे (गेडाम) यांनी केले तर आभार रिनाताई आदे यांनी मानले.याच बरोबर कविसंमेलन देखील घेण्यात आले. कविसंमेलनाच्या अध्यक्ष मा.रजनीताई पोयाम ह्या होत्या, निवेदन विनोद आदे यांनी केले तर आभार दत्ताजी गावंडे यांनी मानले, या परिषदेचे बिज भाषण मा.माजी गटविकास अधिकारी, वणी यांनी केले.

प्रास्ताविक मा.वसंत कनाके सर मुख्य आयोजक न.आ.सा.परिषद यांनी केले, संचालन मा.रामचंद्र आत्राम, यांनी केले तर आभार मा.धनराज मेश्राम यांनी मानले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी अड.अरविंद सिडाम, दत्ताजी गावंडे, भगवान कुळमेथे, बेबिताई मेश्राम, आशाताई कोवे (गेडाम), रजनीताई पोयाम, मायाताई मरस्कोले, महेश आत्राम, शालिक कनाके, विनोद आले, लक्ष्मीताई धुर्वे, यांनी अथक परिश्रम घेतले.

शब्द पाळला : सिंधी महागांव येथील उपसरपंचांनी दखल घेऊन त्या रस्त्याची लावली विल्हेवाट


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सरपंच उपसरपंचांनी दिलेला शब्द पाळला पाहिजेत अशी अपेक्षा होती, ती अपेक्षा मार्गी लागली. त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले" - ही म्हण ज्या काळातील आहे तेव्हा बहुतेक खूपच सकारात्मक विचार असावेत कारण "जे बोलला आहे त्या प्रमाणे त्याने करून दाखवले तर त्याचे कौतुक करावे” असेच कार्य सिंधी येथील उपसरपंच यांनी प्रभातील नागरिकांची गांभीर्याने दखल घेऊन ते करून दाखवले आहे.
सिंधी महागांव गट ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होऊ घातलेल्या पावसाने निर्माण झाले होते. जनतेचे प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सरपंच उपसरपंच सदैव तत्पर असून यांच्या विशेष प्रयत्नातून आज मंगळवारी मुरूम टाकून येथील नागरिकांची गैरसोयीना दिलासा मिळाला.

गावातील वार्ड क्र. 2 मध्ये जलमिशन अंतर्गत योजनेचे काही कामे सुरु असल्यामुळे, नुकताच पावसाने येथील नागरिकांची गैरसोय निर्माण झाली व त्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यात उपसरपंच तथा संचालक अविनाश लांबट यांच्या प्रयत्नाने सिंधी येथील शाळेपासून ते हनुमान मंदिर पर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून अडचण दूर करण्यात आले. 

काम सुरू असतांना चांगल्या कामात अडचणी आणणाऱ्या काही विघ्नसंतोषीनी अडचणी आणण्याचं काम करू पाहतेय. परंतु यावर मात करीत सिंधी-महागांव च्या नागरिकांना दिलेला शब्द पाळला केला याचे समाधान आहे.
गावाच्या विकासासाठी साथ द्या

माझ्यावर विश्वास दाखवून गावातील विविध प्रश्नाबरोबरच सिंधी महागांवच्या विकासासाठी आमचे सर्व पदाधिकारी सदैव प्रयत्न करत आहोत, आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनहितार्थ प्रश्न मार्गी लावता येईल. गावंच्या विकासाचे अजूनही प्रश्न बाकी आहेत. महागांव गट ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत अव्वल करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच तथा संचालक अविनाश भाऊ लांबट यांनी केले.

अजित जाधव यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी स्टेशन महत्वपुर्ण ठाणे म्हणून ओळखले जाते, त्यात प्रशासकीय बदल्यांचा आदेश. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी अजित बाळकृष्ण जाधव यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे.

अल्पवाधित लोकप्रियता मिळवलेले प्रदीप शिरस्कर यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले पो. नि अजित जाधव यांनी सोमवार 26 जून रोजी वणी ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले.

अजित जाधव यांनी उपविभागातील मुकुटबन येथे योग्यरित्या काम सांभाळले. तसेच त्यांना परिसराची चांगलीच जाण आहे. त्यामुळे वणी ठाणे सांभाळताना त्यांना अडचण जाणार नाही. मात्र, अवैध धंदे फोफावणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. मटका जुगार, भंगार चोरी, गोवंश तस्करी, सुगंधी तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करण्याचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे आहे.


पैकूजी आत्राम यांना 'आदिवासी समाजभुषण पूरस्कार' प्रदान


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पैकूजी आत्राम हे आदिवासींच्या सामाजिक,कला व साहित्य क्षेत्रात नेहमी उल्लेखनिय कार्य करीत असतात.ते कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या प्रगती साठी कोलामी भाषेतून विविध शैक्षणिक साधने,उपक्रम व लेखन करीत असतात.त्यांनी कोलामी भाषीक विध्यार्थ्यासाठी कोलामी-मराठी द्विभाषीक पुस्तकांची निर्मीती करून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी शाळेत वितरीत केलेले आहे.ते कोलामी भाषीक मुलांसासाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात.नुकतेच त्यांच्या एका उपक्रमाला 'National Level Teacher Innovation Award' मिळालेला आहे.ते आदिम कोलामी भाषेच्या संशोधनासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे येथे कोलामी-मराठी शब्दकोश दिलेला आहे.

जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील बहूल कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या शाळेतील अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.तसेच कोलामी भाषेतील बोधप्रद व प्रेरणादायी गीतांची रचना करून आदिवासी प्रबोधन कार्यक्रमात सादर केलेली आहे.या बाबींचा विचार करून वणी येथे दिनांक २४ जून २०२३ ला दुसरे नवोदित आदिवासी साहित्य परीषदेत त्यांचा 'आदिवासी समाज भुषण पुरस्कार' साहित्य परिषदेच्या अध्यक्षा साहित्यीक व विचारवंत आ.कुसूम अलाम यांच्या हस्ते पैकूजी आत्राम यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी श्री.प्रभु राजगडकर,सौ.उषाकिरण आत्राम, श्री.दशरत मडावी,श्री.वसंत कनाके व सौ.शितल ढगे इत्यादी साहित्यीक व विचारवंत उपस्थित होते.

सिंधी येथील नागरिकांची ओरड, प्रभागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : रविवार च्या मध्यरात्री पासून पावसाची रिपरिप सुरु झाली. काल सोमवारला दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली, त्या पावसाने  घाण वाहून गेली, मात्र काही गावातील पायदळी चालणाऱ्याची डोकेदुखी वाढवल्याचे चित्र आहे.

सिंधी (महागांव) येथील प्रभाग 1 मध्ये, नळ योजनेच्या कामासाठी गावातील चांगल्या रस्त्यांचे खड्ड्यात रूपांतरण झाल्याचे नागरिकांतून ओरड आहे. त्यावर कोणत्याही पद्धतीचे पुनर्भरणा करण्यात आला नसल्याने अधून मधून सुरु असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलाचा नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.

प्रशासन, ठेकेदार, की ग्रामपंचायत पदाधिकारी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर पावसाचे घाण पाणी साचून रस्त्याची चाळण झाली असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळतेय. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याकडे ग्रामपंचायत पदाधिकारीचे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारी समोर येत असून या मार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांकडून संताप व्यक्त आहे.

दोन दिवसापासून वरून राजाचे आगमन झाले असून हवामान अंदाज मुसळधार पाऊस बरसणार असे संकेत असतांना तातडीने या समस्याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास कायमचा सोडवावा अशी मागणी सह अपेक्षा आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. सुरु असलेले काम पुर्ण झाल्याशिवाय सदर रस्ता पूर्ववत करता येणार नाही, मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या मुरूम टाकून दिल्या जाईल.

-अविनाश लांबट
उपसरपंच तथा कृ. बा. स मारेगाव 

यंदाही साई मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यानचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सतत 13 वर्षांपासून रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान दिले आहे, तेच कार्य अविरत सुरु असून याही वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त (2023) भव्य रक्तदान शिबीर रविवार दि.2 जुलै ला सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत येथील महामार्गवरील जगन्नाथ महाराज मंदिर, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरात वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या सौजन्याने पार पडणार असून सायंकाळी 7. वाजता सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. सोमवार दि. 3 जुलै ला दुपारी 3 ते सायं.5 वाजता महा प्रसादाचा लाभ घेता येईल त्यानंतर पाच वाजता भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या भव्य रक्तदान शिबिरास, जाहीर व्याख्यान, महाप्रसाद व शोभा रात्रेत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महाप्रसाद व शोभा यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन साई मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

कोतवाल हा तहसीलचा कणा आहे: तहसीलदार उत्तम निलावाड यांचे प्रतिपादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कोतवाल हा तहसीलचा कणा आहे. त्यांच्याशिवाय अनेक कामे अपूर्ण आहे. पद कोणतेही असले तरी ते लहान नसते. त्या पदाला न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने तुम्ही कोतवाल लोक करीत आहात असे प्रतिपादन तहसीलदार यु एस निलावाड यांनी केले. ते कोतवाल संघटनेतर्फे (ता.२५ जून) नवरगांव येथील स्नेहभोज कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तलाठी रामदास वरारकर, कनिष्ठ लिपिक गजानन ढेंगळे, तुळसामाता देवस्थान नवरगांवचे सचिव विलास नक्षीणे, कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर उपस्थित होते.
   
यावेळी पुढे बोलतांना निलावाड म्हणाले की, तहसील कार्यालयामध्ये अशी अनेक कामे आहेत जी कोतवाल सक्षमपणे करू शकतात. व्यक्ती हा पदाने लहान किंवा मोठा होत नसतो तर, कार्य करण्याची उर्मी आणि कार्यनिष्ठा ही त्या व्यक्तीला महान बनवत असते. काही ठिकाणी रेतीच्या अवैध वाहतुकीवर आम्ही धाडी टाकल्या त्यावेळीही आम्हाला कोतवाल बांधवांचे मोठे सहकार्य लाभले. कदाचित त्यांच्याविना ही प्रक्रिया अधुरी राहिली असती असेही तहसीलदार निलावाड म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष सुरेश येरमे यांनी, प्रास्ताविक अतुल बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन कु. रोशनी वरखडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव त्यांच्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.

Rain update: अखेर पावसाने तालुक्याला भिजवले

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मॉन्सूनची थांबलेली वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली आहे. मागील महिन्यापासून चाळीस अंशाच्या वर असलेले तापमान, त्यातच अधून मधून सुटणारा वादळी वारा, पाऊस कधी पडणार या बाबत हवामान विभागाकडून मिळणार्‍या ‘तारीख पे तारीख’ आणि या सर्वामुळे पाऊस कधी पडणार याची शाश्वती न राहिल्याने रोज आकाशाकडे टक लाऊन बसलेला हवालदिल झालेला जगाचा पोशिंदा, अशी बिकट अवस्था यंदा शेतकऱ्याची झाली आहे.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्र लागले. पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होऊन रात्री झालेल्या
हलक्या सरीने जन सामान्य सह शेतकरी काहीसे सुखावले असले तरी, पाहिजेत तसा पाऊस झाला नाही, मात्र आज सोमवारला दुपारी आलेल्या पावसाने जोरदार शहरासह ग्रामीण भागात हजेरी लावली आहे. 

मागील एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. ऐन उन्हाळी पिकांच्या वेळेला जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे पिक शेतात भिजल्याने उत्पन्न घटले,त्यामुळे उन्हाळ्यात पिकपाणी घेणाऱ्या शेतकर्‍यांचे प्रचंड नूकसान झाले.
तूर्तास संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आकाशाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 
पूर्वमोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीसह पेरण्यांची कामे खोळंबली होती. मात्र, मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर रात्री आणि दिवसांपासून तालुक्यातील विविध भागांत पावसाला सुरुवात झाली असून आता खरिपाच्या पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त तहसील कार्यालयात अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी यादव साहेब व मडकाम मॅडम यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवडणूक विभागाचे श्री यादव साहेब, नायब तहसीलदार मडकाम मॅडम, ढेंगळे साहेब, कांबळे मॅडम, टोंगे मॅडम, प्रशांत ढगारे, मडावी मॅडम, शिपाई धिगाडे, आत्राम, गेडाम, देवगडकर, आरके, राहुल पोतराजे यासह कर्मचाऱ्यांनीही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? जाणूनघ्या...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

Right on the Property of In-Laws : मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, पतीच्या संपत्तीच्या अर्ध्या भागावर पत्नीचा हक्क आहे. (Right Of Wife On Husband Property) एक गृहिणी विश्रांतीशिवाय 24 तास काम करते. न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या एकल खंडपीठाने याचा निरीक्षण केला की, महिला कुटुंबातील सदस्यांना प्राथमिक वैद्यकीय सेवा देऊन होम डॉक्टर म्हणूनही काम करतात.

पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या संपत्तीत महिलेला समान वाटा मिळेल, असा न्यायालयाने निर्धारित केला आहे. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पत्नीशिवाय पती पैसे कमवू शकत नाही, असा न्यायालयाने म्हटले आहे. जोडीदाराच्या नावावर मालमत्ता खरेदी केली असल्यास ती दोघांच्या कमाईतून खरेदी केली गेली आहे, असा न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

या महत्वपूर्ण निर्णयानुसार, पती आणि मुलांच्या संगोपनासाठी स्वतःला झोकून दिल्यानंतर, स्त्रीला प्रत्येक गोष्टीत समान भागीदार म्हणून मान्यता मिळाली आहे. गृहिणींचे योगदान ओळखण्यासाठी कायदा तयार करण्यात आलेला नाही तरी न्यायालये या कायद्याला मान्यता देऊ शकतात. महिलांना त्यांच्या कुटुंबाप्रती समर्पण केल्याबद्दल पुरस्कार मिळाल्यास त्यांना योग्य न्याय मिळेल, असा न्यायालयाने म्हटले आहे.

कन्नियनच्या दुसऱ्या अपील 2016 मध्ये, न्यायालयाने या विवादाचा निरीक्षण केला. त्यांच्या जोडीदाराने 1965 मध्ये लग्न केले होते. या व्यक्तीने 1983 ते 1994 दरम्यान सौदी अरेबियामध्ये काम केले होते.

भारतात आल्यानंतर त्यांनी तक्रार केली की, माझी पत्नी माझ्या कमाईतून खरेदी केलेल्या मालमत्तेवर अतिक्रमण करत आहे. तसेच तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला गेला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांनी त्यांची आईला कंसला अम्मल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वृद्ध महिलेने पतीच्या मालमत्तेत हिस्सा मागितला.

2015 मध्ये स्थानिक न्यायालयाने पाच मालमत्ता आणि तीन मालमत्तांमध्ये समान वाटा असल्याचा अम्मलचा दावा नाकारला. मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सांगितले की, विवादित मालमत्ता तिच्या पतीने स्वतःच्या बचतीतून विकत घेतली असली तरी अम्मलला 50 टक्के वाटा मिळण्याचा हक्क आहे.

कोणत्याही स्वतः कमावलेली मालमत्ता आणि त्याला वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता, असे दोन प्रकार असतात. यातील पतीने स्वतः कमावलेल्या संपत्तीवर त्याचाच अधिकार असतो. यावरुन ती मालमत्ता पत्नीला मिळेल अथवा नाही. याबाबतचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो.

त्या संपत्तीबद्दल कसलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीलाच असतो. ती व्यक्ती मालमत्ता विकूही शकते, दानही करु शकते किंवा त्याच्या मृत्यूपत्रातही जोडू शकते.

कसा राहील तुमचा हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्यच्या माध्यमातून..


                  राशीभविष्य : २६ जून ते २ जुलै..!

मेष :-
कुटुंबातील ज्येष्ठांचा सहवास तुमच्यासाठी शुभ राहील आणि त्यांच्या सहकार्याने जीवनात शुभ परिणाम मिळतील. प्रेम संबंधात वेळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेम दृढ होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची योजना करू शकता. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि उत्सवासाठी शुभ योगायोग तयार होत आहेत. या आठवड्यात केलेली व्यावसायिक यात्रा यशस्वी होईल. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाच्या अनेक संधीही मिळतील. आर्थिक दृष्टिकोनातूनही वेळ अनुकूल आहे आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष दिल्यास बरे होईल. आठवड्याच्या शेवटी, तथापि, आपण त्यानुसार आपले जीवन बदलण्यास सक्षम असाल.
शुभ दिवस : २६, २८, ३०

वृषभ :-
कार्यक्षेत्रात हळुहळू प्रगतीचे योग येतील आणि प्रकल्प यशस्वी होतील. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात तुमच्या जीवनात एक सुखद अनुभव असेल. आर्थिक बाबतीत वेळ प्रतिकूल राहील आणि पैसा खर्च होऊ शकतो. तब्येतीच्या समस्या वाढत आहेत आणि झोपेचा त्रास होत असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. कुटुंबातील निर्णय व्यवहारी राहून घेतले तर बरे होईल अन्यथा परस्पर वैर वाढू शकते. या आठवड्यात केलेल्या प्रवासात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तरच यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी, कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मनात शंका असेल, परंतु शेवटी यश मिळेल.
शुभ दिवस : २७, ३०

मिथुन :-
आरोग्य आणि फिटनेसच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ आहे. कार्यक्षेत्रात तुमची फसवणूक होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला खर्च करणे बंधनकारक वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या गोष्टीबद्दल मन निराश होऊ शकते आणि अस्वस्थताही वाढेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे सामान्य यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी, भागीदारीच्या कामात फूट पडू शकते किंवा तुमचा स्वतःचा विश्वासघात होऊ शकतो.
शुभ दिवस : २७, ३०

कर्क :-
कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रकल्पाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकेल. हा आठवडा आर्थिक बाबींसाठीही शुभ आहे आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असले तरी संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एकाग्रतेने आरोग्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला निरोगी वाटेल. या आठवड्यात प्रवास टाळलात तर बरे होईल. कौटुंबिक बाबींमध्ये आळस अधिक राहील आणि चिंता वाढू शकते. सप्ताहाच्या शेवटी अहंकाराचे भांडण टाळल्यास चांगले परिणाम दिसून येतील. शुभ दिवस: २६, २७, ३०

सिंह :-
कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि कोणत्याही नवीन रोमांचक प्रकल्पाकडे आकर्षण वाढेल. या आठवड्यात दिलेल्या मुलाखती इत्यादींमध्येही चांगले यश मिळेल. कोणत्याही नवीन गुंतवणुकीद्वारे यश देखील प्राप्त होईल आणि धनवृद्धीचा शुभ योगायोग असेल. कुटुंबात आनंद आणि सुसंवाद एक योगायोग होत आहे आणि आपण आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. प्रवासासाठीही हा आठवडा शुभ असून प्रवासादरम्यान वेळ आनंददायी जाईल.
शुभ दिवस: २६, २८, २९, ३०

कन्या :-
आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असून गुंतवणुकीतून यश मिळेल. भागीदारीत केलेली गुंतवणूकही तुमच्यासाठी शुभ परिणाम देईल. नोकरीच्या ठिकाणी कोणतीही बातमी मिळाल्याने मन उदास होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. कुटुंबातील तरुण या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येतील. या आठवड्यात केलेल्या प्रवासात तुम्हाला यश मिळेल आणि प्रवास यशस्वी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या महिलेची मदत देखील मिळू शकेल. या आठवड्यात कार्यक्षेत्रात अडचणी येतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून स्नायू दुखणे वाढू शकते. सप्ताहाच्या शेवटी जीवनात थोडे बंधने येऊ शकतात. शुभ दिवस: २६, २८, २९

तूळ :-
या आठवड्यात तुम्हाला कामाच्या क्षेत्रात थोडेसे प्रतिबंध जाणवू शकतात आणि अस्वस्थता देखील वाढेल. उघडपणे आपले मत मांडता येणार नाही आणि त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीतही खूप अनुकूल परिणाम होतील आणि फिटनेसही राखला जाईल. प्रकृती सुधारण्यासाठी वडिलांचे मत जाणून घेऊ शकता. कुटुंबात आनंद दार ठोठावत आहे आणि काही चांगली बातमी देखील मिळू शकते. या आठवड्यात प्रवास टाळलात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी, उग्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीबद्दल मन चिंतेत राहील.
शुभ दिवस : २७, २८, ३०

वृश्चिक :-
नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल आणि मान-सन्मानही वाढेल. एखाद्या मोहक प्रकल्पाकडे तुम्ही खूप आकर्षित होऊ शकता. तुमची रखडलेली कामेही या आठवड्यात पूर्ण होतील. आर्थिक बाबींमध्ये तुमचा विचार तुमच्या प्रियजनांची समृद्धी वाढवण्याचा असेल आणि त्यांच्या सुंदर भविष्यासाठी तुम्ही काही ठोस निर्णयही घेऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तथापि, या आठवड्यात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास चांगले होईल. या आठवड्यात केलेल्या प्रवासात यश मिळत आहे आणि आपण प्रवास टाळल्यास चांगले होईल. आठवड्याच्या शेवटी मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ होऊ शकते.
शुभ दिवस : २६, २८, ३०

धनु :-
या आठवड्यात तुम्ही तुमच्या सुंदर भविष्यासाठी नियोजनाच्या मूडमध्ये असाल आणि काही ठोस गुंतवणूक देखील करू शकता. आरोग्याचा समतोल राखून आरोग्यविषयक उपक्रम केले तर तुमचे आरोग्य कायम राहील. या आठवड्यात प्रवास टाळणे चांगले. कुटुंबातील कोणाबद्दलही मन निराश होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होतील आणि तुम्हाला एकटेपणा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी कोणीतरी पुढे येऊन तुमच्या आयुष्यात मदत करू शकेल.
शुभ दिवस : २६, २७,३०

मकर :-
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आराम वाटेल आणि परस्पर प्रेमही दृढ होईल. हा आठवडा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा आठवडा आहे. या आठवड्यापासून तब्येतीतही चांगली सुधारणा दिसू लागेल, तरीही थोडी अधिक सुधारणा होण्यास वाव असेल. कार्यक्षेत्रात अडचणी वाढू शकतात आणि न्यायालयीन प्रकरणे या आठवड्यात तुमच्यासाठी प्रतिकूल परिणाम आणू शकतात. प्रवासातूनही शुभ संकेत प्राप्त होतील आणि प्रवास यशस्वी होईल. सप्ताहाच्या शेवटी मुलाचा विचार केल्याने मन अस्वस्थ होऊ शकते.
शुभ दिवस: २७, २८, २९

कुंभ :-
कामाच्या ठिकाणी एक नवीन सुरुवात तुमच्यासाठी जीवनात आनंद आणि समृद्धीद्वारे उघडेल. नवीन प्रकल्प या आठवड्यात उत्कृष्ट परिणाम देईल. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा शुभ असून पैसा वाढेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीबाबत खरेदीच्या मूडमध्ये असू शकता. या आठवड्यात तब्येतीत बरीच सुधारणा होईल आणि मातृसत्ताक स्त्रीच्या मदतीने तुम्हाला बरे वाटेल. कुटुंबात आनंद दार ठोठावत आहे आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही खूप लक्ष मिळेल. या आठवड्यात प्रवास टाळलात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल आणि मन प्रफुल्लित राहील. शुभ दिवस: २६, २७, २८, ३०

मीन :-
कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्ही तुमचा प्रकल्प नव्या उमेदीने पुढे नेतील. या आठवड्यात तुमचे प्रकल्पही तुमच्यानुसार निकाल देतील. प्रवासातूनही शुभ संकेत मिळत असून प्रवास यशस्वी होईल. कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्या आर्थिक स्थितीला हानी पोहोचवू शकतो. आरोग्यावरही विपरीत परिणाम होईल आणि स्त्रीच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहू शकते. कुटुंबात मालमत्ता इत्यादींबाबत अचानक वाद निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी, सर्वांचे ऐका, परंतु मनापासून अनुसरण करा, तरच सुख-समृद्धीचा योगायोग चालू राहील.
शुभ दिवस : २६, २९

पोलीस पाटील परसराम पचारे अनंतात विलीन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील परसराम पचारे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता चिंचमंडळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

परसराम नारायण पचारे यांचे रविवार सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 43 वर्ष होते. आज रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. परशुराम पचारे हे मागील 16 वर्षांपासून पोलीस पाटील पदावर कार्यरत होते. गेल्या तीन महिन्यापासून त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रासले होते. पचारे यांचेवर नागपूर, मेघे सावंगी येथे सतत उपचार सुरु असतांना त्यांनी आज स्वगृही अखेरचा श्वास घेतला. 

आई,पत्नी, दोन मुले यांसह इतर नातेवाईक व अन्य मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता चिंचमंडळ स्मशानभूमी (मोक्षधाम) येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकऱ्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्यांच्या हळद या मालाची उर्वरित रक्कम मिळवून देऊन शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या विदर्भ एग्रो सोल्यूशन कंपनीचे नोंदणी (लायसन्स) रद्द करा अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

बोडखा या गावांतील जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारी वाळलेली हळद दिनांक १२/०४/२०२२ ला योग्य भाव ठरवून व वजन करून वाळलेली हळद कंपनीने घेतली व अॅडव्हान्स म्हणुन प्रत्येकी पन्नास हजार आर. टी. जि. एस. व्दारे दिले. उर्वरीत रक्कमेचे धनादेश दिले मात्र, ते धनादेश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४५ दिवसांनी लावले असता कंपनी संचालकांच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम नसल्यामुळे दोनदा चेक बॉन्स झाले, दरम्यान विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे यांच्याकडे शेतकरी भेटीला गेले असता व वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांना कार्यालयातून हाकलून दिले.
कंपनी संचालकांना माहीत होते की, बँकेत चेक वटविल्या जाणार नाही. तरी सुद्धा जाणून बुजून व त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, दरम्यान एक वर्ष लोटून सुध्दा मालाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी शेतीचे हंगामात शेतीची मशागत कशी करावी व शेतात पेरणी कशी करावी. हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जर शेतात माल न पेरल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, प्रसंगी ते टोकाची भूमिका घेऊ सुद्धा शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपी विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीचे संचालक प्रकाश लोखंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे परत मिळवून द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या केल्यास शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, बोंडखा गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेश्राम यांच्यासह पिडीत शेतकरी विलास तुराळे, पुनेश्वर तुराळे, उत्तम तुराळे, प्रल्हाद मेश्राम, देविदास हुलके, किसना चिडे यांनी दिला आहे. 

प्रवीणभाऊ खानझोडे मित्र परिवाराचा उपक्रम


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पंढरपूर वारी साठी निघालेल्या वारकरी यांचा आदरतिथ्य करून शुभेच्छा दिल्या


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव


वारी....संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी....प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहणे ही सच्च्या वारक. याची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात.

शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्यकरून आपलं जीवनसुकर करण्यासाठी पळसोनी, मुधोंनी, झोला परिसरातील सर्व पांढरपूर प्रेमी यांचा पुष्पहार घालून सर्वांचा स्वागत कारण्यात आले.

ह्यावेळी प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे, जीवेश भट पळसोनी प्रविण भाऊ चौधरी, रूकेश भट, योगराज बोधाणे, संतोष रिंगोले, बंडु रिंगोले, संजय नाईक, शंकर चलाख, दिनेश भट, तुकाराम चौधरी, ढोकेपाटील, अनंता चौधरी, बापूजी झट्टे, व भरपूर असा वारकरी मित्र परिवार उपस्थित होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच, विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभात 249 संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना 119 सुवर्णपदके, 23 रौप्यपदके आणि 25 रोख पारितोषिके, तसेच 46 हजार 144 विद्यार्थ्यांना पदवी व 236 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री. बैस यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, येत्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांत कौशल्य विकास घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक व व्यावसायिकांची पिढी यातून घडेल. विद्यार्थ्यांनी केवळ ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल.

नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालये व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी 'दशसूत्री' दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे.

विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे ‘नॅक मूल्यांकन’ करून घ्यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे. किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे जेणेकरून त्यांच्यात वास्तव व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलीसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी
आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले.

रस्ता अपघात: अश्रू नयनांनी दिला चौघांना अखेरचा निरोप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात मारेगाव शहरातील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी एकाच वेळी चौघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मारेगाव शहरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले.

रफिक आणि युसूफ दोघेही सख्खे भाऊ होते आणि ते वेगवेगळ्या व्यवसायात होते. दोन्ही कुटुंबात एकता होती. नियतीने पत्नीसह दोन्ही भावांवर कहर केला. शुक्रवारी चंद्रपूरहून परतत असताना त्यांच्या बेलोरा गाडीला चिंचाळा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चारही जणांचा मृत्यू झाला. चौघांच्या मृत्यूची बातमी मारेगावात पसरताच शोककळा पसरली. शनिवारी एकाच वेळी चौघांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी तालुक्यातील नातेवाईकांसह  मित्र परिवार, हजारो जनसमुदाय त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.
राजुरा हे एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेले होते:
रफिक भाई यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय होता. तर युसूफ भाई यांचा मुख्य व्यवसाय कोल्ड ड्रिंक एजन्सी व शेती होता. रफिक भाई यांचा मुलगा जावेद मुंबईत इंजिनिअर आहे. आणि मुलगी मुस्कान चंद्रपुरात एमबीए करत आहे. युसूफ भाई यांची मुलगी सानिया NEET ची तयारी करत आहे आणि दुसरी मुलगी तंनवूर बी फॉर्म करत आहे. कुटुंबातील चार प्रमुख कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी गुरुवारी राजुरा येथे गेले होते. परतीच्या प्रवासात युसूफभाईंनी बल्लारपूरमध्ये काही काळ घालवला, युसूफभाईंच्या कुटुंबाची गाडी पडोली मार्गावरून जात असताना चिंचाळा गावाजवळ दुभाजकावर आदळली. ज्यात चौघांनाही आपला जीव गमवावा लागला. 

माझा शेतकरी राजा - समीक्षा देऊळकर

  
                        "माझा शेतकरी राजा"

माझ्या शेतात डुले हिरवे गार रान,
शेताला पाहून शेतकऱ्याची होईल उंच मान...

रात्र न दिवस काम करी कष्ट करी
देवा त्याला अन्न मिळूदे त्याच्या घरी...

करतो नांगरण पेरनं, जमिनीत टाकीन बी
येऊदे पीक भरा भर, देवा कडे प्रार्थना करतो मी..

हीच माझी धर्ती, हीच माझी आई
काळया जमिनी शिवाय कोणीच जगऊ शकत नाही...

सारखा बघतो आभाळाकडे, केव्हा पीक येईल वरती
जेव्हा पीक येईल वरती, हिरवी दिसेल धरती...

शेती साठी जगतो रात्रंदिवस,
पीक वरती यायला अजून लागेल किती दिवस...

दिसे झाड हिरवे हिरवे, तसे पान झुरवे झुरवे
इवल्या इवल्या देठाना पान कोवळे कोवळे...

कोवळ्या कोवळ्या पानांना आहे हिरवे देठ
माझ्या शेतकरी बापाचं भरूदे पोट...

झाड मोठ झालं की, देईल खूप पीक,
शेतकरी म्हणतो देवा मला मागाला लावू नको भिक...