शास्त्री नगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी तालुक्यात आत्महत्येचा आलेख थांबता थांबत नसतांना आज बुधवारी ला शास्त्री नगर येथील विवाहित तरुणाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना दुपारी अडीज वाजता उजेडात आली.

जावेद शहा अहेमद शहा (38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यूज पेपर वाटून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. आज दि. 30 एप्रिल रोजी जावेद हा अक्सा मस्जिद चे कब्रस्तान मधील लोखंडी इलेट्रिक पोल ला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले.त्याच्या अशा निधनाने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून मृतक जावेद यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

गोंडबुरांडा येथील पारधी बेडा वस्ती मधील 2 मे रोजीचा होणारा बाल विवाह रद्द!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह "बालविवाह" ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे.

मारेगांव तालुक्यातील मौजा गौंडबुरांडा येथील 18 वर्षे वय पुर्ण न झालेल्या मुलीचा विवाह दिनांक 2 मे 2025, शुक्रवार रोजी होणार होता, तो मुलीचे आई-वडील यांना भविष्यात मुलीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगून आज दि. 30 एप्रिल 2025 रोजी विवाह रद्द करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री विकास मिना जिल्हाधिकारी यवतमाळ, मा. श्री नितीशकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम निलावाड तहसीलदार, भिमराव व्हनखंडे गटविकास अधिकारी, कळमकर बाल विकास प्रकल्प अधिकारी, विक्की जाधव पोलिस उपनिरीक्षक, हेमराज राठोड सहायक गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव पोलिस पाटील इत्यादींच्या उपस्थितीत करण्यात आली.

भारतात, बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 अंतर्गत जर पुरुष असेल तर त्याने वयाची एकवीस वर्षे पूर्ण केली नसतील आणि स्त्रीने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली नसतील." हा कायदा असेही घोषित करतो की कायदेशीर वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होणारे कोणतेही लग्न रद्दबातल आहे. जर कायद्याला बगल देत कोणी असे विवाह करत असेल तर संबंधित मुलामुली कडील आई-वडील, मंडप डेकोरेशनसह मंगल कार्यालय, लग्न पत्रिका छापखाना, गावातील सरपंच, पोलीस पाटील आदी गुन्हेगार ठरवले जातात अशी कायद्यात तरतूद आहे. 

बालविवाह होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आलेले आहेत.बालविवाह रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामस्तरीय कमिटी यांच्याकडे असते म्हणून ग्रामस्तरीय कमिटीने जास्तीत जास्त ह्या बाबीकडे विशेष प्राधान्याने लक्ष देऊन असे होणारे बाल विवाह रोखण्याची कार्यवाही करावी. बालविवाहमुळे केवळ भविष्यात मुलीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये हीच मोठी कायद्याची अपेक्षा आहे.

वाळूचा ट्रॅक्टर पकडला; 3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वाळू ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 6 हजार किमतीची 1 ब्रास वाळू व 3 लाख रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार (दि.30) ला पहाटे 3.15 वा.करण्यात आली.

या प्रकरणी पोउपनि सुदाम आसोरे  (पोलीस स्टेशन वणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयीत आरोपी विवेक वसंता अवधान (वय 40 वर्ष रा. सावर्ला ता.वणी), यांचे विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विवेक अवधान हे विनापरवाना अवैध्यरित्या वाळूची वाहतुक करताना मिळुन आले. दरम्यान त्यांचे ताब्यातुन महिंद्रा कंपनीचे (Mahindra 575 di sp plus) लाल रंगाचा मुंडा ज्याचा चेचीस नंबर (MBNTFAKAPMNL00469) व ट्रॉलीचा क्र. एम एच 29 एम 4283 (किं.300000 रुपये) असा दिसून आला. सदर ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू (किं. 6000 रुपये) असा एकुण 306000 रु.चा मुद्देमाल मिळुन आला. आज बुधवारी पंचासमक्ष घटनास्थळी जप्तीचा पंचनामा तयार करण्यात आला. त्याचेवर वणी ठाण्यात बिएनएस नुसार कलम 303(2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वणी यांचे आदेशानुसार पोउपनि सुदाम आसोरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल यांनी केली.

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

यवतमाळ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, विकास मींना,यवतमाळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, शाळा, कॉलेज शिक्षक, मंडप संचालक, मेकअप आर्टिस्ट, पंडित, मौलवी व महिला व बाल विकास अधिकारी, यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी मींना यांनी सांगितले.

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास 1098 हा टोल-फ्री नंबर आहे. या क्रमांक वर संपर्क साधवा असें आवाहन त्यांनी संदेशातून केले आहे.

ग्रामपंचायत माथार्जून अंतर्गत डुबली पोड येथे शुद्ध ऑरो केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : झरी तालुका आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे. त्याच पैकी आदिम जमाती कोलाम पोड एकूण अंदाजे ५९ पोडे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

माथार्जून ग्रामपंचायत मध्ये एकूण ५ पोड आहेत. गारगोटी, बिहाडी पोड, दुबली पोड, चिचपोड, चिचपोड (लहान) त्यापैकी डुबलीपोड येथील लोक कित्येक वर्षापासुन विहिरीचे पाणी वापरायचे त्या मुळे किडनीच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी च्या आजाराने येथील काही एक ते दोन व्यक्ती दगावली होती.

ग्रामपंचायत २०२२ निवडणुकीमध्ये प्रचार दरम्यान डुबलीपोड येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये असणाऱ्या माजी सरपंच उपसरपंच यांना समस्या सांगून सुद्धा कोणतीही उपाययोजना केल्या नव्हत्या.

पणमात्र,आज रोजी सरपंच रवींद्र बाबुराव कायतवार यांच्या पुढाकाराने डुबली पोड येथे जल शुद्ध यंत्रणा उभारले गेले. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ३ मधील सदस्य यांनी सरपंच यांचे आभार मानले. जल शुद्ध यंत्रणेचे उद्घाटन सरपंच रवींद्र कायतवार यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळेस गावातील ग्राम पंचायत सदस्य अय्या कुमरे, जिल्हा परिषद शिक्षक विलास किनाके, शिक्षक राजू सिडाम. प्रतिनिधी योगेश मडावी, निलेश मडावी, राजकुमार कुमरे, व गावातील नागरिक उपस्थित होते.

शाळा कॉलेज शिक्षकांच्या उन्हाळ्यात सुट्ट्या रद्द!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत.

यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावे लागणार आहे. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, उन्हाळी सुट्टीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील. 

सुट्टीत करावयाची कामे:
•अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी, पडताळणी
•विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी, अद्ययावत करणे
•अपार (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) माहिती सुधारित करणे
•शाळेचे स्कूल मॅपिंग आणि भूगोलविषयक माहिती अद्ययावत करणे
•संचमान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणे
•विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग

सुट्ट्यांचे नियोजन फिसकटले

दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, यंदा सुरवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुट्टीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे. दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितांत नाराजीचा सूर उमटत आहे. 

तलाठ्याच्या गाडीची तोडफोड, पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील तलाठी कुणाल निलकंठ आडे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून, या प्रकरणी तलाठी आडे यांनी पोलिसात तक्रार नोंद करून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही खळबळजनक घटना 27 एप्रिल च्या मध्यरात्री विठ्ठलवाडीत घडली. 

सावर्ला साजातील तलाठी कुणाल आडे (35) यांची टाटा पंच कार क्र. (MH-29,BV-4662) ही विठ्ठलवाडी येथील घरासमोर उभी असतांना दगड मारुन कारचे 30,000/- रुपयाचे नुकसान केले आहे. फिर्यादी कुणाल आडे यांच्या जबानी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 329 (3), 125,324(2),3(5) BNS नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सफौ सुरेद्र टोंगे पो. स्टे. वणी करत आहे.


माकप च्या आमरण उपोषणाला प्रशासनाचा प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मेंढोली येथील पारधी समाजाचा मूलभूत हक्काचा मागण्यांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने दिनांक 28 एप्रिल पासून मेंढोली ग्रामपंचायत समोर पारधी समाजाचा दोन पुरुष व दोन महिलांकडून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाचा पहिल्याच दिवशी प्रशासनाने प्रतिसाद दिल्याने मागण्या पूर्ण होणार हे निश्चित झाले आहे. 

आमरण उपोषणाला सकाळी 11 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या उपस्थितीत कॉ. मनोज काळे व कॉ. प्रकाश घोसले यांच्या नेतृत्वात मालाबाई घोसले, राजमल घोसले, अनारशा काळे, सुनिता घोसले यांनी सुरुवात केली. यावेळेस कॉ. मोहरमपुरी यांनी उपस्थित पारधी समाजातील स्त्री पुरुष बांधवांना मार्गदर्शन केले. त्याच वेळेस मेंढोली ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक ह्यांनी उपस्थिती दर्शवून पारधी कुटुंबाची घरे नियमानुकुल करून घरकुल प्रस्ताव मंजूर करून वरिष्ठांकडे पाठविल्याचे सांगितले.

मागील एक वर्षापासून पारधी समाज आपल्या मागण्या प्रशासनाकडे रेटत होते. परंतु प्रशासनाच्या धिम्या गतीचा कार्यभारामुळे पारधी समाजाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 

पारधी समाजातील 24 परिवार गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मेंढोली येथील स्मशानभूमी जवळ गट नं 36 वर झोपड्या बांधून राहत होते. जंगलात शिकार करून जगणाऱ्या पारधी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी मेंढोली येथे शेती व्यवसाय करून आपली गुजराण करीत आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मुलांना शिक्षण देत आहेत. त्यासाठी मात्र ह्या लोकांना प्रशासनाकडून जमिनीचा हक्क, रेशन कार्ड, गाव नमुना 8 अ, घरकुलचा लाभ आदी पाहिजेत. प्राथमिक कागदपत्रे असल्याशिवाय पुढील शासकीय कागदपत्रे मिळू शकत नाहीत, परिणामी मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण प्रशासन म्हणजे प्रशासनच असते. त्यासाठी शेवटी त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वातील आमरण उपोषणाचा धसका घेत शेवटी स्थानिक ग्रामपंचायतीने तसेच तहसील प्रशासनाचे मागण्यांची पूर्तता करीत असल्याचे व त्या दिशेने प्रक्रिया सुरू असायचे सांगितले. एवढेच नाही तर प्रक्रिया पूर्णत्वाच येत असल्याचे तहसील प्रशासनाचे वतीने उपोषण मंडपी येऊन लेखी आश्वासन मंडळ अधिकारी बांगडे यांनी देऊन आमरण उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

वणीत पुन्हा चोरट्यांचा धुडगूस, 4 लाखांचे वर दागिणे लंपास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात घरफोडीच्या सतत घटना घडत असून, लक्ष्मी नगर येथे चोरट्यांनी तब्बल चार लाखांचा वर ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील लक्ष्मी नगर येथील नांदेपेरा रोड परिसरातील सदनिका बंद असताना चोरट्यांनी कडी-कोयंडाचा स्क्रू काढून घरातील 4 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सौ. सोनू रवींद्र बरडे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. 

यामध्ये महागड्या सोन्याचे गोप, अंगठ्या, जिवती, मंगळसूत्र, कानातले, बारीक रिंग, चांदीचे चाळ, चांदीचे छल्ला, चांदीचा करदोळा असे विविध दागिणे होते. ही चोरी अज्ञात चोरांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार आज दि. 28 एप्रिल ला सोमवारी 12 ते पहाटे 5 च्या सुमारास घडला. त्याआधारे वणी पोलिस तपास करत आहेत. 

वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी नगर मधील बंद सदनिका फोडून चोरट्यांनी सोन्याचे सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण 4,13,500 रु.चा ऐवज चोरून नेला. हा खळबळजनक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडला असून, पुढील तपास पो उपनि धिरज गुल्हाणे करत आहेत.

घरकुल, इतर बांधकाम रखडले, मनसेचे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी : जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अध्याप लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी तसेच इतर बांधकामे रेती अभावी रखडले असल्याकारणाने त्यांना सुद्धा रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना झरी तालुक्याच्या वतीने  तहसीलदारांना केली आहे. 

झरी तालुक्यामध्ये शासनातर्फे आर्थिक दुर्बल कुटुंब, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी घरकुल योजना मंजूर झाली असून लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे १५००० हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे, तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. 

घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, झरी तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळत नसून याच संधीचा फायदा घेवून रेती तस्कर ज्यादा दराने मोठी रक्कम आकारून रेती देत आहेत, वाढत्या महागाई मुळे घर बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत किंवा गाडी भाडे व मजुरी आकारून रेती उपलब्ध करून द्यावी तसेच ही रेती देताना घरकुल यादीतील क्रमवारीने तसेच ऑफलाईन पद्धतीने द्यावी कारण अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण ही रेती देताना ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा जेणेकरून या लाभार्थ्यांना ते सोयीचे होईल. यासह शहरातील अनेक नागरिकांनी आपलं स्वतःचा हक्काचं घर असाव यासाठी घराची बांधकाम चालू केले मात्र रेती अभावी ही कामे सुद्धा पूर्णता रखडलेली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रविण लेनगुळे, विठ्ठल बोथाडे, चेतन हेपट, नागोराव आत्राम, दिनेश दरेकर ,लोकेश डहाके, दिलीप डहाके, दादाजी कलमाळे, गजानन गौरकार, गजानन राऊत,विश्वनाथ गजलवार, कुंडलिक राऊत, कवडू ढोके, पंडित शिरसागर, गिरीधर ठमके यांच्यासह तालुक्यातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धाकांचे जोरदार प्रदर्शन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वर्धा येथे दिनांक 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान तीन दिवशीय राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धा "नृत्योत्सव-3" या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय कला मंच व सचिन डान्स अकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चिमुकल्या स्पर्धाकांनी आपल्या नृत्याचे जोरदार प्रदर्शन करत वणीची शान उंचावली आहे. 

 या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये कु. भार्गवी विरेंद्र महाजण,कु.युक्ता सहारकर, कु.क्रिष्मा चाणना,दिशा केशवाणी.कु. उर्वी प्रणित बांगडे, कु. सिया सचिन डोर्लीकर, कु.मुग्धा सचिन डोर्लीकर, चि. आरुश सुधीर पांडे,कु सिद्धी कोंडावार कु.ध्रुवीया रासेकर यांनी "नृत्योत्सव-3" या स्पर्धेमध्ये सहभाग घेवुन राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत वणीतील कु भार्गवी वीरेंद्र महाजन वय 7 वर्ष,युक्ता सहारकर,क्रीष्मा चाणना,दिशा केशवाणी या चिमुकल्यानी आपल्या कलेचे जोरदार प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावीला तर कु.उर्वी बांगडे ,कु.सिया डोर्लीकर,कु मुग्धा डोर्लीकर, कु.ध्रुवीया रासेकर,चि.आयुश पांडे ,कु.सिद्धी कोंडावार, या चिमुकल्याणी तृतीय पारितोषिके पटकावीत कलेचे जोरदार प्रदर्शन करत वणीची राष्ट्रीय पातळीवर शान उंचाविली.

नृत्य प्रशिक्षिका गुरुरत्न कु. पुजा धनवटे यांनी मोलाची कामगिरी करत चिमुकल्याना घडविल्याबद्दल तसेच बालकांना घडविण्याचा वसा घेतल्याने या प्रसंगी त्यांचा गौरव करत गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बाबत असे की, अशा नृत्य स्पर्धा दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असुन या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक भाग घेत असतात.याआधी हिच स्पर्धा छत्तीसगड येथील दुर्ग,महाराष्ट्र राज्यातील नांदेड व गोवा येथील पणजी येथे तसेच भारतातील अनेक राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सुद्धा याच स्पर्धाकांनी पारितोषिक पटकाविले होते. राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चमूंनी बाजी मारणे, हे वणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. वणीतील चमुंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विजय मिळवित पारितोषीके पटकाविल्याने सर्वच स्पर्धकांचे व नृत्य प्रशिक्षिका यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. स्पर्धकांनी या विजयाचे श्रेय त्यांचे आई वडील व नृत्यगुरु पूजा धनवटे व गुरूजनांना दिले आहे.

भाकप च्या आंदोलनापुढे जि.आर.एन.कंपनी झुकली, बेलोरा (निलजई) येथील बेरोजगारांना सात दिवसात नौकरीवर घेण्याचे आश्वासन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : बेलोरा (निलजई) परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्यासाठी शुक्रवार 25 एप्रिल पासुन कंपनीसमोर भाकपचे नेत्रुत्वात बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत कंपनीने प्रतिसाद न दिल्याने दुसरे दिवशी 26 एप्रीलला आंदोलकांनी कंपनी बंद करण्याचा ईशारा देताच कंपनी प्रशासनाने झुकते माप घेत मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली व भाकपला चर्चेचे आमंत्रण दिले.

झालेल्या बैठकीत वेकोली वणी क्षेत्राचे महाव्यवस्थापक, कंपनी व्यवस्थापन प्रतिनीधी व भाकपचे शिष्टमंडळात वणी विधानसभा क्षेत्राचे भाकप नेते काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,शिंदोला जि.प. सर्कलचे भाकप नेते काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवि गोरे, काॅ.मिलींद रामटेके हे सहभागी झाले. चर्चेमध्ये बेलोरा (निलजई) येथील स्थानिक बेरोजगारांना सात दिवसात नौकरी देण्याचे कंपनीने आश्वासन दिले. त्यानुसार तिसरे दिवशी 27 एप्रिल रविवारला भाकपने कंपनीला बेरोजगारांची यादी सोपवुन राज्य कौंसिल सदस्य काॅ.सुनिल गेडाम,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे यांचे उपस्थितीत आंदोलकांनी आंदोलनाच्या विजयाच्या घोषणा देत आंदोलनाचा समारोप करण्यात आला. 

याप्रसंगी शेकडो युवकांनी व गावकरयांनी भाकपची सभासद नोंदणी केली. यशस्वितेसाठी काॅ.मोरेश्वर कुंटलवार,रवि गोरे,मिलींद रामटेके,महेश ईंगोले,संदीप ईंगोले,सुनिल मडावी,प्रभाकर डंबारे,संतोष ईंगोले,हुसेन ईंगोले,गजाजन कोयचाडे,हनुमान भोयर,विकास कोडापे,अविनाश पचारे,अविनाश ईंगोले,प्रकाश पारशिवे,अनिल मडावी,गोसाई पारशिवे,बंडु मडावी,आनंद कोयचाडे,संताष ईंगोले,शैलेष कांबळे,ज्ञानेश्वर चौधरी,दिनेश चिट्टलवार,दिपक पारशिवे,सुरेश ईंगोले,विजु पोतराजे,शुभम टेकाम,प्रविण कामरे,शिवराम बरडे,संतोष दुर्वे,विजय डवरे,अमोल रेगुंडवार,बाबाराव पचारे,ईश्वर ईंगोले,आशिष ईंगोले,गोपाल चिटपल्लीवार,गौरव बोबडे,विनोद उईके,रवी मडावी यांचेसह शेकडो युवकांनी अथक परिश्रम घेतले.

मायलेकी बेपत्ता, पोलिसात तक्रार...


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वरोरा : बेपत्ता होण्याची अनेक घटना सध्या समोर येत आहेत. अशातच केळी येथील एक मायलेकी बेपत्ता झाल्याची बातमी आहे. या घटनेत प्रियंका संदीप किनाके(30) आणि अडीच वर्षांची मुलगी रियांशी 27 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. संतोष बापुना गेडाम रा. वडकी ता. राळेगाव, यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

प्रियंका आणि रियांशी ही 27 एप्रिल पासून सासरी किरकोळ वाद निर्माण झाल्यामुळे माहेरी जाते असं सांगून सकाळी दहा वाजता गेल्या आहेत.मात्र, त्या वडिलांकडे पोहचली नसल्याने सर्वत्र विचारपूस करून तिची बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या मायलेकी कुठे आढळून आल्यास 7057839682 या मोबाईल क्रमांकावर कळवावे व पोलिसांनाही माहिती द्यावी असे, आवाहन तक्रारकर्त्यांसह पोलिसांनी केले.

प्रिंकाचे वर्णन रंग सावळा, उंची 5 फुट, केस लांब, अंगात सलवार सुट, चेहयावर थोडे डाग व रियांशी हिचा सावळा रंग उंची 2 फूट,केस बारीक, अंगात डंगरी घातलेली. 

आता फक्त 5 दिवस उरलेत!, त्वरा करा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीः आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी संभाषणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इयत्ता 3 री ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्याथी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी हे शिबिर अत्यंत सोयीचे आहे. हे शिबिर शहरातील, जनता शाळेजवळील, गुरूनगर येथील, हनुमानमंदिर जवळ, टागोर चौकातील के.बी.सी. हाईट्स बिल्डिंग, नवीन महाराष्ट्र
बँकेच्यावर,राईजअप कॉम्प्युटर, सुरेश बदखल यांच्या घरी जैन ले-आऊट, छोरिया ले-आऊटमधील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल, आनंदनगर येथील बालविद्या मंदिर, चिखलगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे होईल.
या शिबिरात बेसिक इंग्लिश म्हणजे पायाभूत इंग्रजीवर भर देण्यात येईल. इंग्रजी बोलण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या शिकवण्यात येतील. विद्यार्थ्यांकडून बोलण्याचा सराव करून घेण्यात येईल. नोंदणी 7038204209 या मोबाईल नंबरवर 20 एप्रिल ते 1 मे दरम्यान करता येईल.या शिबिरादरम्यान प्रत्येक शिबिरार्थ्याला प्रिंटेड नोटस् देण्यात येतील. सोबतच प्रत्येक शिबिरार्थ्याला रोजच्या प्रशिक्षणाच्या ऑडिओ क्लिप्स स्मार्टफोनवर पाठवण्यात येतील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल. नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ सराव आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील. 

शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. संपूर्ण शिबिरार्थ्यांसह सिनेमा पाहिला जाईल. स्विमिंग आणि अन्य इनडोअर आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीरकण होईल. अधिक माहितीसाठी एस. पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात प्रा. सागर जाधव यांच्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. तेव्हा या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

"शोषणविरहित समाजव्यवस्थेसाठी बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद" - गीत घोष

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : राजुर विकास संघर्ष समितीच्या वतीने येथील माता रमाई सभागृहात प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली. या प्रबोधन कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष मा. गीत घोष होते तर अध्यक्षस्थानी माजी पं. स. सदस्य मा. अशोक वानखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विद्याताई डेव्हिड पेरकावार, पो. पा. वामन बलकी, मारोती पाटील बलकी, वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे, ॲड. अरविंद सिडाम हे होते. 

"भारतीय समाजव्यवस्था चातुर्वर्ण पद्धतीनुसार जन्माधिष्ठित असल्याने शूद्रांचे जीवन जगण्याचे मानवी हक्क हिरावून घेण्यात आले होते. त्यामुळे शोषण हे ह्या व्यवस्थेचा मुख्य गाभा होता. संधी नाकारलेल्या शोषित लोकांना प्रत्येक ठिकाणी समान संधी मिळाली पाहिजे, राज्याकडून मूलभूत हक्क हिरावून घेतल्या जाऊ नये, ह्यासाठीच बाबासाहेबांनी राज्य समाजवादाची मांडणी करून उत्पादनाची साधने कारखाने, शेती, जड उद्योग, विमा, शिक्षण व आरोग्य हे सर्व राज्याचा म्हणजेच जनतेच्या मालकीची असावीत, असा मूलभूत गाभा असलेल्या पायावर उभे असलेले संविधान अपेक्षित होते." असे प्रतिपादन प्रबोधन कार्यशाळेचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य समाजवाद" ह्याची मांडणी करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून गीत घोष यांनी केले.

राज्य आणि समाजवाद ह्याचा परस्पर खुलासेवार मांडणी करताना घोष पुढे म्हणाले की, "राज्य ही संकल्पना मुळात ही राज्य करण्यासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही विचाराचा सत्ताधारी राज्यात कार्यरत झाला तरीही त्यांच्याकडून देशातील नागरिकांसोबत कसा व्यवहार केल्या जाईल हे सांगता येत नाही, म्हणून बाबासाहेबांनी राज्य समाजवाद ही मांडणी करून संविधानाचा पायाच मुळात समाजवादी असावा असे सांगितले. सत्तेवर कोणत्याही विचाराचे लोक असले तरीही त्यांना समाजवादी व्यवस्था बदलविता येणार नाही अशी व्यवस्था बाबासाहेबांना करायची होती. परंतु तत्कालीन संविधानसभेतील सदस्यांना हे मान्य नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी संविधान अर्पण करताना इशारा दिला की, आज आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याशिवाय वंचित जनता ह्याला इजा पोहोचवतील. आज आपल्या देशात सामाजिक विषमता, धर्मांधता वाढून एक दुसऱ्याचा शत्रू झाला आहे. प्रचंड खाजगीकरणामुळे आर्थिक विषमता वाढली आहे. उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांच्या हातात एकवटली असून ७० टक्के संसाधनावर कब्जा केला आहे. शिक्षण, आरोग्य व रोजगार हे देशाचा विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत मात्र त्याला खाजगी क्षेत्रावर सोपवून देशातील नागरिकांना ह्यापासून वंचित ठेवण्याचे कार्य केल्या जात आहे. त्याच बरोबर सांप्रदायिकतेचा वापर करून लोकशाहीलाच धोक्यात आणल्या जात आहे. यावर एकच उपाय असून बाबासाहेबांनी सांगितलेला राज्य समाजवाद आणावा लागेल त्यासाठी जनतेनी चळवळ उभारली पाहिजे," असे आवाहन केले.

यावेळेस या कार्यक्रमात पहलगाम येथील अतिरेक्यांकडून मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचसोबत MPSC परीक्षेत पास झालेल्या येथील प्रशिक अजय कांबळे ह्याचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे व आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रबोधन कार्यशाळेची प्रस्तावना कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी केली तर सूत्र संचालन राष्ट्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश लिपटे सर यांनी केले.

प्रबोधन कार्यशाळेला प्रामुख्याने नंदकिशोर लोहकरे, राहुल कुंभारे, जयंत कोयरे, विजय तोताडे, विनायक येसंबरे, सुनील सातपुते, सुनीता कुंभारे, अर्चना कडुकर, नंदकिशोर मुन, कैलास पाईकराव, अमर्त्य मोहरमपुरी, पीयूष कांबळे, सौरभ पाईकराव, सौरभ मजगवळी, वैभव मजगवळी, नाना लोहकरे, आदी व अनेक गावकरी उपस्थित होते.

२८ पासून मेंढोली येथे माकपचे आमरण उपोषण


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या मेंढोली गावातील स्मशानभूमी शेजारी झोपड्या बांधून गेल्या २० वर्षापासून पारधी समाजाचे लोक वस्ती करून राहत आहेत. येथे राहणाऱ्या पारधी समाजाला अजूनही नागरी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने येथील पारधी समाज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात दि. २८ एप्रिल पासून मेंढोली येथे आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहेत.

वणी तालुक्यातील मौजा मेंढोली येथील गावठाण खरवडी गट नं. ३६ मध्ये अर्जदार प्रकाश घोसले व त्यांचे समवेत २३ पारधी कुटुंबे झोपड्या बांधून राहत आहेत. ह्या २४ पारधी कुटुंबांनी त्यांची घरे नियमानुकुल करून गाव नमुना ८- अ देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा, प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड देण्यात यावे, रेशनकार्ड अती महत्वाचे कागदपत्र असल्याने पारधी समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र व अन्य शालेय दाखल्यासाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे. ह्या मागण्या संदर्भात ह्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे निवेदने, अर्ज, देऊन सातत्याने पाठपुरावा केला असतानाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण त्याच वेळेस गावात नियमबाह्य पद्धतीने भोगवटदार २ च्या जागेवर नमुना ८ अ देण्यात आल्याचा पुरावा असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार निवासी प्रयोजनार्थ उपलब्ध जागेवर जागा देण्यात यावे अशी तरतूद असताना मेंढोली ग्रामपंचायत पारधी समाजाला जागा देण्यास का टाळाटाळ करीत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. आदिवासी मंत्री अशोक उईके यांना निवेदन देऊन ताबडतोब मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा दिनांक २८ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे सांगितले असून मेंढोली येथील पारधी कुटुंबांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात ह्या आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहे. जोपर्यंत पारधी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार प्रकाश घोसले, मालाबाई घोसले, विशाल घोसले, अनिशा घोसले, शुभम घोसले, विठ्ठल घोसले, राजमल घोसले आदी व अन्य लोकांनी केले आहे.

खेळण्यातून घालवा मुलांचे नैराश्य...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : डॉक्टरांच्या मते जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच खेळण्यातून मुलांचे नैराश्य घालवा असे आरोग्य तज्ञ सांगतात.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार संशोधनानुसार किशोरवयीन मुले रोज काही वेळ हलका व्यायाम करतात त्यांना पुढे आयुष्यात त्याचा फायदा होतो. जी मुले १२ ते १६ या वयात आठवड्याला कमीत कमी तीन दिवस हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करतात त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण फार कमी असते, असे एका अभ्यासात दिसून आले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. डॉक्टरांच्या मते बसून राहण्यापेक्षा काहीतरी शारीरिक हालचाली जी मुले करतात त्यांना पुढे आयुष्यात त्यांचा फायदा होतो. सांगण्यानुसार किशोरवयीन डॉक्टरांच्या काही मुलांचा करण्यात आलेल्या अभ्यासानुसार

जी मुले १२ ते १६ या वयात आठवड्यातून हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करीत असतात त्यांच्यात नैराश्य कमी दिसून आले आहेत. डॉक्टरांच्या मते यात फार मोठ्या व्यायामाची आवश्यकता नसते तर साध्या शारीरिक हालचाली गरजेच्या असतात लक्ष न लागणे नूर बदलणे यासारख्या गोष्टी शारीरिक हालचाली करणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये कमी दिसून येतात जर बारा ते सोळा या वयातील मुले नेहमीपेक्षा एक तास जास्त एकाच ठिकाणी बसून राहत असेल तर त्यांच्यात नैराश्य वाढण्याचे प्रमाण जास्त असते. 

१२ ते १६ या सर्व वयोगटातील मुलांनी जर जास्त काळ बसून काढला तर त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण अधिक दिसून येते डॉक्टरांच्या मते किशोरवयीन काळात एकाच ठिकाणी बसून राहण्याच्या सवयीने तारुण्यात पदार्पण करताना निराशाचा त्रास होऊ शकतो म्हणूनच किशोरवयीन मुलांनी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून न राहता हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करून खेळण्यात अधिक वेळ घालवला तर खेळातून नैराश्य घालवता येते,असे आरोग्य तज्ञ सांगतात.

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, "कही खुशी कही गम"

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि.24 एप्रिल रोजी मारेगाव येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या उपस्थितीत तहसीलदार उत्तम निलावाड यांनी जाहीर केली. 2025 ते 2030 अशा पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार आहे. आरक्षण सोडतीमुळे 'काही ठिकाणी खुशी, तर काही ठिकाणी गम' दिसून येत आहे. यातील सुमारे 50 ग्रामपंचायती वर महिला राज येणार असल्याने अनेकांचे आचार विचारात बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. 

यामध्ये अनुसुचीत जाती, जमात, व ईतर मागास वर्गीयाचा प्रवर्ग, तथा सर्वसाधारण गटातील महीलांचा समावेश आहे. 2025 ते 2030 या कालावधीत पार पडणाऱ्या निवडणुका मध्ये 56 ग्रामपंचायतीचा समावेश असुन सर्वांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नियमावली तयार करुन आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या जाहीर झालेल्या आरक्षणात अनेकांना धक्का बसला असुन अनेकांना खुशी झाली तर काहींना दुखवटा आहे.

वनोजा अनुसुचीत जात, आकापुर अनुसुचीत जमाती, करणवाडी अनुसुचीत जमाती, टाकळखेडा अनुसुचीत जमाती महिला, गौराळा, अनुसुचीत जमाती महिला, कोलगाव, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग, चिंचमंडळ नागरिकांचा मागासवर्गीयांचा प्रवर्ग, मजरा ना.मा.प्र., कोथुर्ला ना.मा.प्र.,खैरगाव बुट्टी ना.मा.प्र. महीला, टाकळी ना.मा.प्र. महिला, सावंगी सर्वसाधारण, सिंधी सर्वसाधारण, वेगाव सर्वसाधारण, शिवणी धोबे सर्वसाधारण, हिवरा सर्वसाधारण, नवरगाव सर्वसाधारण, केगाव सर्वसाधारण, देवाळा सर्वसाधारण, ईंदिरा ग्राम सर्वसाधारण, गाडेगाव सर्वसाधारण महिला चोपण सर्वसिधारण महिला, दांडगाव सर्वसाधारण महिला, बोरी बू सर्वसाधारण महिला, आपटी सर्वसाधारण महिला, कोसारा सर्वसाधारण महिला, हिवरी सर्वसाधारण महीला, मार्डी सर्वसाधारण महिला, किन्हाळा सर्वसाधारण महिला, कुंभा सर्वसाधारण महिला, मांगरुळ सर्वसाधारण महिला, पिसगाव अनुसुचीत जमाती, घोगुलदरा अनुसुचीत जमाती, बोरी खु. अनुसुचीत जमाती, शिवनाळा अनुसुचीत जमाती, वरुड अनुसुचीत जमाती, गोधणी अनुसुचीत जमाती, अर्जुनी अनुसुचीत जमाती, डोल डोंगरगाव अनुसुचीत जमाती, हटवांजरी अनुसुचीत जमाती, घोडदरा अनुसुचीत जमाती, बुरांडा (ख.) अनुसुचीत जमाती, नरसाळा अनुसुचीत जमाती महिला, पहापळ अनुसुचीत जमाती महिला, चिंचाळा अनुसुचीत जमाती महिला, बोटोणी अनुसुचीत जमाती महिला, सगणापुर अनुसुचीत जमाती महिला, वागदरा अनुसुचीत जमाती महिला, जळका अनुसुचीत जमाती महिला, मच्छिंद्रा अनुसुचीत जमाती महिला, कान्हाळगाव अनुसुचीत जमाती महिला, सराटी अनुसुचीत जमाती महिला, खंडणी अनुसुचीत जमाती महिला, म्हैसदोडका अनुसुचीत जमाती महिलांचा समावेश आहे. 

मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, उपस्थित होते.

काठीने मारहाण, गुन्हा दाखल...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जागेच्या पुनर्वसन बाबत विचारणा केली म्हणून एका इसमाला शिवागिळ करून दुसऱ्याच्या हातात असलेल्या काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी तालुक्यातील पिपंरी (कोलार) येथे सकाळी घडली. दिलीप नानाजी लोढे (वय ५५, रा. पिंपरी, कोलार) यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी एका इसमाविरुद्ध कलम 118 (1), 352,351(2)(3) BNS नुसार गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉनस्टेबल गजानन हेडगीर हे करत आहे.

दोघींना फूस लावून पळविले,नातेवाईकांचे मारेगाव पोलिसात तक्रार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : "माझं बाळ" म्हणणाऱ्या आई वडिलांना सोडून मुलं रफू चक्कर होतांनाचे चित्र सर्वत्र असतांना मारेगाव तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना नातेवाईकांनी फूस लावून पळवून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल केल्याने 'त्या' दोघी नेमक्या कुठं आणि कुणासोबत आहे याबाबत पोलीस प्रशासन कसून चौकशी करीत आहे.

मारेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुली एक भल्या पहाटे तर, दुसरी प्रांतःविधीला जाण्याच्या बहाण्याने बेपत्ता झाल्या. गंणगोतांनी सर्वत्र नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, त्या मुलींचा शोध लागला नाही. हतबल झालेल्या आईवडिलांना व नातेवाईकांनी पोलिसात धाव घेत फूस लावून पळवून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल केली.

परिणामी, या शालेय विद्यार्थिनी नेमक्या कुठं गेल्या असतील याचा शोध सुरु असतांना या सामाजिक दृठ्या संवेदनशील घटनेला नेमकी कशाची किनार आहे.हे त्या मुलींचा शोध लागल्या नंतरच स्पष्ट होईल. तूर्तास या गंभीर घटनेने नातेवाईकांत चिंतेचे सावट आहे.

राजुर येथे प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : भारतातील जातीवाद व धर्मांधवादाने देशातील संतांना आणि महापुरुषांना जातीमध्ये व धर्मामध्ये विभागून टाकण्याचे महापाप केले आहे. परिणामी संत व महापुरुषांच्या जयंत्या ह्या त्यांचे विचार अंगिकारून कृती करण्याऐवजी निव्वळ धूमधडाक्यात डीजे लावून नाचगाणे करून आम्ही त्यांना किती डोक्यावर घेतले आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापुरुषांचे विचार जनमानसात रुजण्याऐवजी व्यवस्था पुरोगामी न होता प्रतिगामित्वाकडे वळत आहे. व्यक्ती तर्कशील, विवेकवादी होण्यापेक्षा अंधभक्त बनत चालला आहे. 
       
शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला हे सर्व आज भयंकर परिस्थितीत आपल्या प्रश्नांना घेऊन जगत आहेत. असे असताना मात्र आपल्या देशातील जनता महापुरुषांच्या योग्य प्रबोधनाअभावी एकजूट होऊन आपल्या मानवी हक्काचा मूलभूत अधिकारासाठी संघर्ष करताना दिसत नाही. हाच धागा पकडून येथील राजूर विकास संघर्ष समितीने संत व महापुरुषांनी दिलेले विचार, त्यांनी विचारासोबत केलेली कृती ह्याचे प्रबोधन करण्याचा निर्धार केला आहे. सध्याचा घडीला उद्भवणारे प्रश्न ह्यांना जोडून काय केल्याने देशाचा विकास योग्य दिशेने होईल हा सुद्धा ह्या प्रबोधन कार्यशाळेचा उद्देश आहे. त्याकरिता सातत्याने ह्या प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन केल्या जाणार असून वेगवेगळ्या विषयातील पारंगत बुद्धिजीवींना पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. 

दिनांक २६ एप्रिल २०२५ रोज शनिवारला सायंकाळी ६ वाजता राजूर येथील महिला मंडळ हॉल येथे "डॉ. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद" ह्या विषयावर अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष मा. गीत घोष यांचे मार्गदर्शन होणार आहे. 

या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी पंस सदस्य मा. अशोक वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मा. विद्याताई डेव्हिड पेरकावार, माजी सरपंच मा. प्रणिता मो. असलम, पो. पा. वामन बल्की, महादेव तेडेवार, दीक्षाभूमी बुद्धविहारचे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम, मारोती पाटील बल्की, अनिल डवरे,दिनेश बलकी उपस्थित राहणार आहे.

या प्रबोधन कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटे गुरुजी, जयंत कोयरे, राहुल कुंभारे, अमित करमणकर, नंदकिशोर लोहकरे, बंडू ठमके, विजय तोताडे व अन्य सदस्यांनी केले आहे.

भाजपचा आठ दिवसाचा अल्टीमेटम!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : सध्या कडक उन्हाळा सुरु असल्यामुळे विज पुरवठा अखंडीत सुरु ठेवुन मारेगांव तालुक्यात १३२ के. वी. विद्युत उपकेंद्राचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनी कार्यालय मारेगांव यांना करण्यात आली.

मारेगांव तालुक्यात अनेक दिवसापासुन विजेचा खेळखंडोबा चालू आहे. दिवसातुन ५० ते ६० वेळा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक विद्युत बद्दल संपर्क साधून विचारपूस केली असता कर्मचारी फोन उचलण्यास तयार राहात नाही. तसेच वणीवरून लाईन गेली, पांढरकवढ्या वरून लाईन गेली असे उडवाउडवीचे उत्तर देतात. असा आरोप नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला. 

मागील २ वर्षापासुन १३२ केवी उपकेंद्र मंजुर होऊन सुध्दा मारेगाव स्तरावरून स्तरावरून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नसल्यामुळे जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. 

येत्या ८ दिवसात मारेगांव तालुक्यातील विज पुरवठा अखंडीत सुरु ठेवण्यात यावी व १३२ केवी विद्युत उपकेंद्राचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, जर हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

यावेळी अध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व मारेगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

मानवी हक्क सुरक्षा परिषदेने केला पहलगाम घटनेचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या आंतकवादी हल्ल्याचा मानवी हक सुरक्षा परिषदेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविला यावेळी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरीकांच्या आत्म्याला शांती लाभो याकरिता मेनबत्ती लाउन श्रध्दांजली वाहिली.

२८ पर्यटकांचा जागीच मृत्यु झाला. समामन सुन्न करणाऱ्या या घटनेचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेने तिव्र स्वरुपात निशेध व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.विजय नगराळे होते तर कार्यक्रमाचे संचालन वामनराव कुचनकार यांनी केले. 

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, वामनराव कुचनकार, डॉ विजय नगराळे, अमोल कुमरे, श्रीकांत हनुमंते, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सौ सुमित्राताई गोडे, सौ. प्रेमिला चौधरी, सौ सुनिता काळे, पुष्पाताई कुळसंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

वणी मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 4 लाखांच्या वरील दागिण्यावर हात साफ...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत चिखलगाव परिसरात चोरट्यांनी डॉक्टर च्या घरात चोरी करत सोन्या चांदीचे दागिने, व रोख रक्कम चोरून नेले. 17 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोढाले ले आउट, चिखलगाव येथे ही घटना घडली. हेमंत पुरुषोत्तम देठे (वय 37, रा. बोढाले ले आउट, चिखलगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरट्यांनी चिखलगाव परिसरातील बोढाले ले-आऊट येथे एका घरातून सोन्याचे दोन मंगळसुत्र 20 ग्रॅम किमंत अंदाजे 1,60000/-रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी 5 ग्रॅम असे एकुण 10 ग्रॅम 80000/-रुपये, लहान मुलीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी 2 ग्रॅम एकुण 4 ग्रॅम 32000/-रुपये, सोन्याचा गोप ग्रॅम किंमत अंदाजे 32000/-रुपये, चांदीचे चाळ 6 नग किमंत अंदाजे 10000/-रुपये व नगदी 135000/-रुपये, असा एकुण 4,49000/-रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. कलम 331(4), 305(a) बि एन एस नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तूर्तास प्रभार असलेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे, यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध येथील शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने वणी शिव तिर्थावर करण्यात आला. 

या वेळी वणी शहर व तालुका शिवसेना शिंदे गटाचे मनिष सुरावार, किशोर नांदेकर, सुनील डोंगरे, प्रेम ढवळे, संजू तोमस्कर, सुमीत केशवाणी, मनोज नवले, नोमेश्वर पाणघाटे, अमृत पुरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार झाला. त्यात 27 पर्यटक मृत्यू मुखी पडले. या घटनेची देशभरात संताप व्यक्त होत आहे व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वणी येथेही त्या घटनेचा निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शांती लाभण्याकरिता श्रद्धांजली वाहिली व तेथील जखमीना बरे होण्याची प्रार्थना सुद्धा करण्यात आली.


युवासेना (उबाठा) च्या वतीने वणीत पहलगाम हल्ल्याचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध युवासेनाचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात येथील शिवतीर्थावर करण्यात आला. 

यावेळी सबिर शेख, कुंदन पेंदोर, मनोज वाकटी, गौरव पांडे, मिलिंद बावणे, आशुतोष नागभिडकर, विनोद दुमणे, धनराज येसेकर, आकाश तमिलवार, संदीप बावणे, शुभम नागपुरे, मयूर खांडरे, राजू चिंचोलकर, सचिन कळमनकर, आकाश पेंदोर, अनिकेत बदकल, अभिषेक गुंडावार, बादल येसेकर, आर्या राऊत, संघर्ष शेंडे, बबन केळकर, यासह मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दहशतवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत पाकिस्तानी ध्वज जाळून निषेध केला. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यमान सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या अपयशाचा निषेधही केला. 

देशाच्या सीमा सुरक्षित असल्याची बढाई मारणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 

कानडा येथे "ग्रामजयंती" महोत्सव पर्वाला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानडा ग्रामपंचायत सरपंचा सौ सुषमा रूपेश ढोके यांच्या सुबक संकल्पनेतून ग्रामजयंती पर्व दि.२४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार आहे. 
जानावे ग्राम हेची मंदिर|
ग्रामातील जन सर्वेश्र्वर||
पूजा हिच सेवा समग्र|
हाची विचार निवेदावा||
                 -ग्रामगीता

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म दिवस "ग्रामजयंती" म्हणून देशभरात साजरी करण्यात येते. या सात दिवशीय पर्वामधे ग्रामस्वच्छता, हागणदारी मुक्त गाव, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, सांडपाणी व्यवस्थापन व शेती विषयक मार्गदर्शन इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. 

महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून तो गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. ग्रामगीतेतील ४१ अध्याय ग्रामीण भागातील जनतेशी निगडित आहे. ग्रंथामधील अध्याय ११: ग्राम रक्षण, अध्याय १२: ग्रामशूध्दी, अध्याय १३: ग्रामनिर्माण कला व अध्याय १४: ग्राम आरोग्य अशा अनेक विषयांवर ग्रामगीतेमध्ये मानवाला कळेल अशा सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.

गाव हा विश्वाचा नकाशा |
गावावरून देशाची परीक्षा||
गावची भंगता अवदशा | 
येईल देशा ||
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपचा सौ सुषमा रूपेश ढोके, ऊदघाटक सुनिलभाऊ देऊळकर तालूका सेवाधिकारी, प्रमूख उपस्थित किसनभाऊ मत्ते भजन प्रमुख मारेगाव तालुका तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डाहूले, माजी सरपंच प्रमोदजी धोबे, माजी सरपंच बंडू भाऊ ढोके, खरेदी विक्री संचालक अरूण आस्कर, रूपेश ढोके, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक व कर्मचारी व गावातील असंख्य नागरिक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी केले, प्रास्ताविक सुरज येवले, आभार रूपेश ढोके यांनी मानले.

तहसीलदार निलावाड याचं मारेगाव तालुक्यातील नागरिकांना आवाहन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मारेगाव तालुक्यातील पर्यटक अडकले असतील अशा व्यक्तींच्या नातेवाईकांना मारेगाव तहसीलदार यांनी मोठं आवाहन केले आहे. 

सदरील घटनेत तालुक्यातील पर्यटक तिथे अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत करता येईल. या साठी संपर्क साधावा असें तहसीलदार उत्तम निलावाड,मारेगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. 

त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की,श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथे घडलेल्या घटनेमुळे मारेगांव तालुक्यातील त्याठिकाणी पर्यटक अडकलेले असतील, त्यांचे नातेवाईकानी त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक आणि सध्या जिथे आहेत तेथील पत्ता मला उपलब्ध करून द्यावा,जेणेकरून मला (तहसीलदार मारेगाव) त्यांची माहिती मा. जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांचे मार्फत शासनास, जम्मू आणि श्रीनगर प्रशासनास विहित वेळेत कळविता येईल. 
 

शिवसेनेचा पहलगाम येथील आतंकी हल्याचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा निषेध येथील शिवसेना-युवासेना (शिंदे गट) यांच्या वतीने मार्डी चौकात करण्यात आला. 

दरम्यान, त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरिता श्रध्दांजली वाहिली. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथिल वैसरन येथे दोन दहशतवादी लष्करी गणवेशात तेथील पर्यटकांवर गोळीबार केला.त्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले व 15 च्या वर पर्यटक जखमी झाले. या घटनेची निंदा देशभरात होत असताना मारेगाव येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शांती लाभण्या करिता व जखमी पर्यटकांची प्रकृती लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होवो, याकरिता शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन परमेश्वरास प्रार्थना केली व आतंकी हल्याचा तीव्र निषेध केला.

या वेळी मारेगाव तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, विजूभाऊ मेश्राम, धनराज भट, उमेश उलमाले, धर्मा जाधव, राजू खडसे, राजेंद्र ठक, भीमरावभाऊ मेश्राम, प्रवीण गमे, मनोहर मोहुर्ले, महादेव लोणारे, गणपत वाढई, किशोरभाऊ शेंडे, महेश ढुमणे, संतोष नागोसे, संदीप शिरामे, नितीन कापसे, प्रशांत भंडारी, अमोल मत्ते तसेच युवासेनेचे शंकर नागोसे, तेजस कापसे, बाळू चावके, कार्तिक नेहारे, वेदांत सिडाना, तन्मय सरोदे, गोलू कापसे, अक्षय कोयचाडे, मनोज नेहारे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

भालेवाडीत पाण्याची भीषण समस्या...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील भालेवाडी येथे जलवाहिणीचे ऐशी तैशी होत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेली ग्रामपंचायत व प्रशासनाच्या तकलादु धोरणाच्या परिपाक नागरिकांच्या घशाला कोरड निर्माण करीत आहे. किंबहुना येथील पाण्याची समस्या बिकट बनली असून ग्रामपंचायतीच्या बेताल भूमिकेने येथील पाणी पेटत असून नागरिक या मूलभूत प्रश्नांवर आंदोलनाच्या तयारीत आहे. 

भालेवाडी 500 लोकवस्तीचे कोलाम गोंड आदिवासी जमातीचे गाव मूलभूत गरजे पासून कोसो दूर असलेल्या गावात समस्यांचा डोंगर आवासून उभा आहे. येथे जुन्या जलकुंभाची पूर्वी निर्मिती करण्यात आली, मात्र जलवाहिणीचे काम तोडक्या पद्धतीने करण्यात आल्याने पाणी समस्यांनी तोंड वर काढले आहे. मागील अनेक महिन्यापासून जवळपास 50 घरांना पाणी समस्यांचा फटका बसत आहे. ऐने उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करीत येथील बहुतांश नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. मात्र ग्रामपंचायतीचे येथे सपशेल दुर्लक्ष होत असून तोंडी सूचना करूनही मूग गिळूण बसून आहे. नव्याने जलकुंभाची निर्मितीचे नियोजन अतिशय संथ गतीने होत असतांना पाण्याचा फटका बसण्याचे कारण हे जलकुंभ ठरत आहे. एकूणच पाण्याच्या भीषण कृत्रिम टंचाईने जलकुंभ बांधकाम येथे वांझोटे ठरत आहे. 

गावातील अर्ध्या लोकांना पाणी मुबलक मिळत असतांना अकार्यक्षम ग्रामपंचायत सचिव, सरपंच, कर्मचारी व इतर सदस्यांच्या हेकेखोर प्रवृत्तीने पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तूर्तास रखरखत्या उन्हात येथील पाणी पेटले असून नागरिकांच्या घशाला कोरड निर्माण झाली आहे. ही गंभीर समस्या तत्काळ निकालात काढून नागरिकांचा घसा ओला करावा,अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

महागाव : महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील वरोडी येथे एका 42 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अविनाश अनंता अडकीने रा. वरोडी असे गळफास घेतलेल्या मृतक तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक हा स्वतः कडील एक हेक्टरावर आपल्या कुटुंबाचा कसाबसा गाडा हाकलत होता. दिनांक 22 एप्रिल ला दुपारच्या सुमारास अविनाश ने घरात गळफास लावून आपली जिवन यात्रा संपवली, हि बाब घरच्या मंडळींना कळल्यावर एकच आतंक झाला. काय झाल,हे कोणालाच कळेना सदर बाब महागाव पोलिस स्टेशन ला कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेत अविनाश चा मॄतदेह आपल्या ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. 

गेल्या तीन वर्षांपासून सतत ची नापीकी व शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने तो नेहमीच चिंताग्रस्त राहायचा. अशातच अविनाश ने खाजगी कर्ज व बँकेच्या कर्जाचे ओझ्यामुळे आत्महत्या सारखें टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा गावात असून अविनाश याच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. पुढील तपास महागाव पोलिस करीत आहेत.

जन सुरक्षा विधेयक रद्द करा, युवक काँग्रेसचे निवेदन

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

मारेगाव : जन सुरक्षा विधेयक रद्द करावे, अशी मागणी भारतीय युवक काँग्रेसने तहसीलदार यांचे मार्फत सरकारकडे आज दि. 22 एप्रिल ला निवेदनातून केली आहे. 

या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व वैचारिक तसेच तात्त्विक विरोध करण्याच्या अधिकारावर बंधने येतील. अधिकारांचा गैरवापर होईल.या मुळे विधेयकामुळे नागरी हक्क, लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होतील म्हणून हे विधेयक रद्द करण्याची मागणी भारतीय युवक काँग्रेस चे सय्यद समीर यांचे नेतृत्वात केली आहे. 

निवेदनावर शहर अध्यक्ष सय्यद समीर, उपाध्यक्ष शकील अहेमद,सौ छाया किनाके,आनंदराव मसराम, मनोज भोपरे, राजेश घुमे, नंदेश्वर आसूटकर, घनश्याम गजभिये, अंकुश माफूर,अशोक सुडीत, स्वप्नील वांढरे, प्रतीक वांढरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

साहेब... परीक्षेचे दिवस आहे... आणि तुमची सतत "बत्ती गुल", काही तरी विचार करा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : वीज वितरण कंपनीची अनियमित वीज पुरवठा, वारंवार बत्तीगुल, तसेच ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हे आता तालुक्यात सार्वजनिक स्तरावर चर्चा आणि तीव्र नाराजीचा विषय बनला आहे.

मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील इलेक्ट्रिक काही हवा, पाणी किंवा काही कारण नसतानाही दररोज बत्ती गुल होत आहे. ऐन विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवस आहे. आणि वीज वितरण विभागाकडून अघोषित लोडशेडींग सुरु आहे. परिणामी ग्रामीण मुलांच्या शिक्षणात मोठा कमालीचा व्यत्यय निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. दिवसा तर लाईट येरजाऱ्या मारतातच,परंतु रात्री सुद्धा तासंतास "बत्ती गुल" असते. लोकांची इलेट्रिक, इलेक्ट्रॉनिक साधनं वाकुल्या दाखवत आहे. तर कधी अचानक अति विद्युत दाबमुळे घरगुती उपकरण बिघडत आहे. याचा भ्रूदंड नागरिकांनाच सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील डिजिटल शिक्षणाचा सावळा गोंधळ उडाला आहे. शेतकरी त्रस्त झाला आहे. एक्स्ट्रा क्लास ओस पडत आहे. या सर्व बाबीकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी मात्र, का बघ्याची भूमिका घेत हेच कळायला मार्ग नाही. जन प्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे असा प्रश्न देखील आपसूकच उपस्थित होत आहे. 

वीज वितरण कंपन्यांकडून वारंवार वीज खंडित केल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याचा परिणाम उद्योग, व्यवसाय आणि सामान्य जीवन यांवर होतो. त्यामुळे मारेगाव तालुक्यात सर्व सामान्यांचा 'कोणी वाली आहे कीं नाही' असा तीव्र नाराजीचा सुरु उमटत असून सध्या शैक्षणिक तरी काळात बत्ती गुल राहूच नये अशी मागणी जोर धरत आहे. 

नत्थुजी खानझोडे अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे वडील श्री नत्थूजी बापूराव खानझोडे यांचे दि.19 एप्रिल रोजी दुपारी 4.00 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते.

वणी तालुक्यातील राजूर (कॉलरी) वार्ड नं 3 मधील सर्वांच्या परिचयातील मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते.

शनिवारी त्यांचं दुःखद निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. 20 एप्रिल ला सकाळी 12 वाजता राजूर (कॉलरी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्व. नत्थू जी खानझोडे यांचे पाठीमागे 3 मुलं, स्नुषा, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथील स्थानिक बेरोजगारांना नौकरी द्या - भाकप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : निलजई बेलोरा परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्याबाबत दि.28/3/25 रोजी निवेदन देऊन कळविले व तशी चर्चा संबधित अधिकरयासोबत केली होती. परंतु कंपनीने अजूनपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही. कंपनी राजकीय दबावाखाली किंवा ओळखी पाळखीच्या युवकांना रोजगार देतात व ज्या युवकांना रोजगाराची गरज असतांना त्याची ओळख किंवा राजकीय जवळीक नसेल तर त्याला नौकरीत समावून घेत नाही. अशा युकावर उपासमारीची वेळ येत आहे.

डब्लू. सि. एल.ने परिसरातील शेतींचे अधिग्रहण केल्यामुळे व शेतमजुरी हा व्यवसाय गेल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला कामेसुद्धा राहीली नाही,दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे स्थानिक गरजू युवकांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे. याची जाणीव भाकपने कंपनीस अनेक वेळा करून दिली. परंतु कपनीने कोणतेही म्हणणे ऐकूण घेण्यास तयार नाही. म्हूणन परिसरातील सर्व बेरोजगार युवक भारतीय काम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात दि. 25/4/2025 ला सकाळी 11वाजेपासून कंपनीच्या कार्यालयासमोर "बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदन सर्व बेरोजगार युवक व शेतमजुरातर्फे भाकपचे काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवींद्रभाऊ गोरे, काॅ.दीपक, काॅ.पंढरीभाऊ मोहितकर, काॅ.दिनेशभाऊ शीटलवार, काॅ.मिलिंद रामटेके, राज्य कौंसिलर काॅ.सुनिल यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी,पोलिस स्टेशन शिरपुर व संबधित कंपनी व्यवस्थापनास दिले.

राजूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : ग्रामपंचायत राजूरद्वारे चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला एक मानाचे यश लाभले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासिकेचा विद्यार्थी प्रशिक अजय कांबळे याची यशस्वी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे, राजूर येथीलच शिरीष वसंता मेंढे यांची देखील MPSC परीक्षेत निवड झाली असून, त्यांनी स्वतंत्ररीत्या अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

या यशाचे औचित्य साधून दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र, राजूर कॉलरी येथे प्रशिक कांबळे याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत राजूरच्या सरपंच सौ. विद्याताई डेव्हिड पेरकावार, माजी पंचायत समिती सदस्य अशोकभाऊ वानखेडे, डेव्हिडभाऊ पेरकावार, कॉ.ॲड. कुमारभाऊ मोहरमपुरी, अनिलभाऊ डवरे, रतन दारुंडे,यांचे समवेत अभ्यासिकेतील विद्यार्थी स्नेहल वाळके, बिल्डर वावरे, सतीश भुसारी,अमृत मोहरमपुरी, पीयूष कांबळे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

प्रशिक कांबळे याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिरीष मेंढे हे बाहेर असल्यामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना सरपंच सौ. विद्याताई पेरकावार यांनी अभ्यासिकेच्या कामगिरीचे कौतुक करताना प्रशिक कांबळे याचे अभिनंदन केले. तसेच अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांना अशीच यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभ्यासिकेला अधिक पुस्तके पुरवण्याचे आश्वासन दिले.

अनुसूचित जाती जमातीच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी बाबत मंत्रालयात स्वंतत्र बैठकीचे आयोजन करा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

नागपूर : बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राज्य अनुसूचित जाती -जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची प्रत्यक्ष भेट घेवुन मागणी केली. 

राज्यातील अनुसूचित जाती जमाती आदिम जातीच्या भूमिहीन बेघर कुटुंबांनी महसुल व वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण केलेले असुन सदर अतिक्रमण जमीन त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचे साधन बनलेले असताना शेतीच्या अतिक्रमण जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न प्रशासकीय होत असताना त्याबाबत मुंबई मंत्रालयात एक स्वतंत्र बैठक आयोजीत कऱण्यात यावी. अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी नागपूर येथे जावून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या कडे केली. धर्मपाल मेश्राम यांच्याशी चर्चा करत असताना राज्यात विवीध जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेमार्फत अनुसूचित जाती-जमाती आदिम जमातीच्या समूहावर बेशुमार अन्याय होत आहे. 

यवतमाळ जिल्यात आदिम जमाती पैकी कोलाम समूहाच्या कब्जात असलेल्या महसुल व वन जमिनीवर शेतीचे अतिक्रमण आहे सदर जमिनी वन विभागाकडून निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरु असताना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी सुद्धा कोलाम समाजाची प्रशासकीय बैठक आयोजित करण्याची मागणी केली तसेच वाशिम जिल्ह्यात सुद्धा बिगर सातबारा शेतकरी संघटने च्यावतीने जिल्हा महसूल प्रशासनाकडे सुरु असताना जिल्हा महसूल प्रशासन अक्षम्य प्रमाणत दुर्लक्ष करीत असल्यामुळे तात्काळ मुंबई मंत्रालयात स्वंतत्र बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी राज्य अनुसूचित जमाती -जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या कडे केली. 

यावेळी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे युवा नेते रमेश मडावी उपस्थितीत होते. भाई जगदिश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते उपस्थितीत होते.


‘आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज दंड लावण्याचे निर्देश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये 'आपले सरकार' पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज ₹1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण 1027 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यापैकी 527 सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित 138 सेवा 31 मे 2025 पर्यंत आणि राहिलेल्या 306 सेवा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘महाआयटी’ला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे. तसेच, नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही, मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.

सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल-टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला, जेणेकरून आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल. बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन आणि अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रम यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात, पीएम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. त्यात वाड्यापाड्यांमध्ये पायाभूत सुविधा, पक्की घरे, मोबाईल मेडिकल युनिट्सचे जिओटॅगिंग, बहुउद्देशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

त्याचबरोबर, नाशिक, नंदुरबार, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी नागरिकांच्या मालमत्ताधिकारांचे प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (PM DA-JGUA) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार 32 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून कार्यवाही केली जावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

शासकीय वैद्यकीय शिक्षणविषयक धोरणाचा भाग म्हणून, राज्यातील 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेऊन, अंबरनाथ, वर्धा व पालघर येथे महाविद्यालयांसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भविष्यातील विस्तारासाठी किमान 20 एकर क्षेत्र राखीव ठेवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

यावेळी मंत्री डॉ. अशोक ऊईके, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आत्महत्येची धग...एकाच दिवशी वणी तालुक्यात दोन वेगवेगळ्या आत्महत्या

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

संभा बापुराव निकोडे (55) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आज दि.18 एप्रिल ला सकाळी घरी कोणीच नसल्याने त्यांनी आपली ईहलोकाची यात्रा केली. सदर घटनेची माहिती वणी पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.


वणी तालुक्यात आत्महत्याची धग...

दुसरी आत्महत्येची घटना तालुक्यातील शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पुरड (पुनवट) येथील एका तरुणीने मृत्यू ला कवटाळल्याची घटना उघडकीस आली आहे.पायल बालाजी उरकुटे (25),असे मृतक तरुणीचे नाव आहे. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल ला दुपारच्या सुमारास पायल चे आईवडील शेतात गेले असता तिने घराच्या आडोश्याला दुपट्टा बांधून आपल्या जीवनाचा दी एन्ड केला.हि बाब घरच्या मंडळींना कळल्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. सदर बाब शिरपूर पोलिस स्टेशन ला कळविण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेत पायल चा मॄतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मात्र, मृतक पायल हिने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत. 

वणी तालुक्यात सतत आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून संपूर्ण तालुका प्रभावित होताना दिसत आहे. दिवसेंदिवस आत्महत्यासारख्या घटना घडत असताना याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालून जनजागृती अभियान राबविण्याची गरज आहे.

वाळू तस्करीला चाप..."हायवा" जप्त.. महसूल विभागाचा कारवाईचा रेशो कायम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी तहसीलदार सातत्याने वाळू तस्करांच्या धडाकेबाज कारवाईचा रेशो कायम ठेवत 15 एप्रिल ला अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक वाळू भरून जात असतांना वणी महसूल पथकाने जप्तीची कारवाई केली.

तालुक्यातील वर्धा नदी वाळू घाटातून विना परवाना वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. वणी तहसीलदार यांनी ऍक्शन मोड वर चा रेशो कायम ठेवत आजतागायत अनेक वाळू चोरट्या तस्करांचे कंबरडे मोडण्याचा धडाका लावला आहे.

तस्कर हे दंड व कारवाईला न जुमानता वाळूची तस्करी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लोकेशन घेत मध्यरात्रीचा डाव साधत आहे. मात्र,तस्करांच्या चोरट्या वाहतुकीला वणी महसूल विभाग करड्या नजरेने बघत हमखास लगाम लावत कारवाईचा बडगा उगारत आहे. आजवर लाखो रुपयांची चोरटी वाळू पकडण्यात नियोजन पद्धतीने तहसीलदार धुळधर यांना यश आल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रांगणात वाळू तस्करांचे विविध वाहने जप्तीत असून यातून मोठ्या प्रमाणात दंड शासनाला प्राप्त होणार आहे.

कारवाईचे सातत्य असतांना वाळू तस्करांच्या मुजोऱ्या मात्र, जप्ती अन दंडास पात्र ठरत आहे. तहसीलदार यांच्या सुनियोजित नियोजनाचा ट्रॅक्टर धारकांनी तालुक्यात कमालीचा धसका घेतला आहे तर हायवा ट्रक धारक यांच्या मुजोऱ्या अंगलट येत आहे. यामुळे आता ते चांगलेच बुचकाळ्यात पडले आहे.

दरम्यान, ही 15 एप्रिल रोजी अवैध वाहतूक करणारा हायवा क्र. (एम एच 40, वाय 8991) या ट्रक वाहनावर कारवाई तहसीलदार निखिल धुरधर, यांनी पार पाडली. यापुढे हे अधिकारी घाट पालथे घालत व कारवाईसाठी वणी अधिकारी व प्रशासन वणी पथकाच्या दिमतीला असणार असल्याने वाळू तस्करांना हा पुन्हा गर्भीत इशारा आर्थिक कंबरडे मोडण्यास पुरेसा ठरणार आहे एवढे मात्र निश्चित.