चिल्ली ईजारा येथे वन कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याना वृक्षसंवर्धनाची माहिती


नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : झाड लावणे काळाची गरज आहे. झाडांपासुन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन फुले फळे मिळतात पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्ष हा महत्वाचा घटक आहे प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावलं पाहीजे,असा संदेश वन कर्मचाऱ्याकडून देण्यात आला.

यावेळी वाघ,चित्ता व इतर प्राण्यांबद्दल माहिती देण्यात आली. वन्यजिव प्राण्यापासुन स्वताचे संरंक्षण कसे करावे ह्या बाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली.

या प्रसंगी वाय.बि.गायकवाड (वनरक्षक दगडथर बिट), आय.टी.फोफसे (वनरक्षक चिल्ली बिट), कुमारी ए.डि.मोतेवार (वनरक्षक काळी बिट), गणेश जाधव व उच्च प्राथमिक मराठी शाळा चिल्ली ईजारा शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.