राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना मागणी


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील मौजा एकोना डब्ल्यूसीएल (WCL) मुळे वर्धा नदीचे पात्र अरूंद झाले. त्यामुळे वर्धा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हातील मारेगांव, वणी तालुक्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व जमिनीसुध्दा खरवडून गेल्या व एकोना डब्ल्यूसीएल (WCL) माईनींग चे मोठ्या
 प्रमाणात कोळश्याचे ट्रक व ट्रेलर मारेगांव, वणी तालुक्यातून दिवसातून किमान ७०० ते ८०० ट्रक जात असतात. तरी ह्या सर्व बाबी लक्षात घेता आदरणीय साहेब आपल्या माध्यमातून एकोना डब्ल्यूसीएल (WCL) नी मारेगांव, वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००/- रूपये हेक्टरी जाहीर करावे.

वर्धा नदी लगतील गावाचे पुन:र्वसन करावे. मारेगांव तालुक्यातील सावंगी (संगम) या गावाचे दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त यांचे पुन:र्वसन विदर्भ पाटबंधारे विभागाने करावे व मारेगांव तालुक्यातील शिवणी, मुकटा, दांडगांव, आपटी, व वणी तालुक्यातील कोना, झोला, मनगांव, भुरकी, रांगना, कवडशी व सावंगी सदर गावाचे जुलै आगस्ट मध्ये झालेल्या महापुरामुळे संपूर्ण गावांना महापुराचा वेढा पडला होता.

त्यामुळे सदर गावांचे पुन:र्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांनी विरोधी पक्ष नेते मा. ना. अजित दादा पवार महाराष्ट्र विधानसभा यांना निवेदनातून केली आहे.
यावेळी युवक काँग्रेस चे सचिन पचारे सह अतुल पचारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.