कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : जिल्हा चंद्रपूर, वरोरा तालुका येथील एकोना कोल माईन्स मधील कोळसा खदान सुरू झाल्यापासून वरोरा मार्ग चंद्रपूर व वणी जात होता. परंतु वरोरा शहरातील जनतेच्या व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे वरोरा प्रशासनाने वरोरा जनतेच्या हितासाठी वरोरा शहरातून जड वाहुकीस प्रतिबंध केल्यामुळे अंदाजे मागील ८ ते१० महिन्यापासून कोळशाची वाहतूक एकोना, वानोजा, माढेळी मार्गे यवतमाळ जिल्ह्यातील कोसार,खैरी,मार्डी,नांदेपेरा,मजरा,वांजारी,वणी मार्गे-चंद्रपूर, घुगुस, पुनवट कोलवासरी वणी येथे होत आहे.
एकोना, वनोजा, माढेळी हा राज्य महामार्ग ३१७ असला तरी रोड अरुंद व कमी वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे येथील नागरिकानी आंदोलन केले. व स्थानिक खासदार यानी हस्तक्षेप करुन वरोरा प्रशासनावर दबाव निर्माण करून एकोना, वनोजा, माढेळी हा मार्ग जड वाहतूकीस बंद असा आदेश मा. उपविभागीय अधिकारी वरोरा यानी दि.२४-०६-२०२२ रोजी काढला त्यानंतर दि ११-०७-२०२२ पर्यंत कोळसा वाहतूक पूर्णता बंद होती पर्यायाने खदान मधला कोळसा पर्यायी मार्ग नसल्यामुळे कोळसा वाहतूक बंद होती. याचा फायदा घेत कोलमाईन्स प्रशासनानी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे अपील दाखल केली. मा. जिल्हाधिकारी यांनी वीज निर्मितीसाठी कोळसा आवश्यक असल्याचे कारण दाखवत एकोना, वनोजा, माढेळी हा राज्य महामार्ग असला तरी अरुंद व जड वाळतूकीस योग्य नसल्यामुळे वाहतूकीस शर्ती व अटीवर पुन्हा वाहतूकीस परवानगी दि. ११-०७-२०२२ तारखेपासून दिली. त्यामुळे फक्त २५ टन कोळसा प्रति वाहन याप्रमाणे वाहतूक एकोना खदानमधून वनोजा, माढेळी, कोसरा, खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी, वरुन पूनवट कोलवासरी घुगुस व चंद्रपूर येथे सुरु आहे.
वरोरा प्रशासनाने वरोरा शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी व शहरातील रोडची काळजी घेण्यासाठी यवमाळ जिल्हातील खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी मार्गाचा वापर केल्यामुळे या मार्गावर ८ ते ९ आपघात झाले. त्यात ३ व्यक्ती मरण पावले व ४ ते ५ वक्ती गंभीर जखमी झाले व वणी ते नांदेपेरा हा रस्ता अरुंद असून ८ टन वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे येथील परिसरातील जनता ४ ते ५ महिन्यापासून संघर्ष करित आहे. त्यामुळे सार्वजनिक बाधकाम विभाग यांनी आदेश काढून सदर मार्गावरुन अवजड वाहने नेण्यास मनाई आहे" असा बोर्ड नांदेपेरा बायपास वणी, वांजरी, मजरा व नांदेपेरा येथे लावला आहे. तरी मुजोर ट्रक मालक नियम मोडत वाहतूक करित आहे. या संदर्भात दि. २६/०९/२०२२ ला मा.आमदार, तहसिलदार, बाधकाम विभाग व ठाणेदार यांच्या सोबत मिटिंग मधील चर्चा नुसार वाहतूक रोखेन व पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी सक्षम अधिकारी यांचे आदेश आवश्यक असल्याचे सागुन हा आदेश काढण्यासाठी ६/१०/२०२२ पर्यंत प्रशासनी वेळ मागितल्यामुळे दि. २७/९/२०२२ ला होणारे आंदोलन ६/१०/२०२२ पर्यंत स्थगित करण्यात आले.
वरोरा प्रशासनानी आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे यवतमाळ जिल्हातील ३ व्यक्तीचा नाहक जीव गमावला आहे. आपल्या नागरिकाच्या सुरक्षेसाठी वणी प्रशासन योग्य व लवकर निर्णय घेतील का? व लोकप्रतिनिधी यांची दखल घेतील का? या कडे जनतेचे लक्ष लागून आहे. नाहीतर ०६/१०/२०२२ नंतर या रोडवर सुरू अवैध जड वाहतूक जनता स्वता: रोखेल व यांची जबाबदारी संबंधित अधिकारी व लोक प्रतिनिधीची राहील, अशा इशार कॉ.अनिल घाटे व सहकाऱ्यांनी दिला आहे.