सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : पोलीस भरतीत एनसीसी आरक्षणावरून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी 23 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी (sdo) यांना निवेदन दिले. पोलीस भरतीत एनसीसी (ncc) च्या विद्यार्थ्यांना पाच टक्के जास्त गुण मिळण्याबाबत या विरुद्ध विद्यार्थ्यांनी निवेदनातून मागणी केली.
अनेक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एनसीसी (ncc) घेता येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी इतर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा सरासर अन्याय होतो यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के मार्क न वाढवून देता त्यांना स्वतंत्र आरक्षण कोटा द्यावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय याची गृह खात्याने दखल घ्यावी या संदर्भात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय वणी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पोलीस भरती करणारे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.