राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना मागणी


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील मौजा एकोना डब्ल्यूसीएल (WCL) मुळे वर्धा नदीचे पात्र अरूंद झाले. त्यामुळे वर्धा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हातील मारेगांव, वणी तालुक्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व जमिनीसुध्दा खरवडून गेल्या व एकोना डब्ल्यूसीएल (WCL) माईनींग चे मोठ्या
 प्रमाणात कोळश्याचे ट्रक व ट्रेलर मारेगांव, वणी तालुक्यातून दिवसातून किमान ७०० ते ८०० ट्रक जात असतात. तरी ह्या सर्व बाबी लक्षात घेता आदरणीय साहेब आपल्या माध्यमातून एकोना डब्ल्यूसीएल (WCL) नी मारेगांव, वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००/- रूपये हेक्टरी जाहीर करावे.

वर्धा नदी लगतील गावाचे पुन:र्वसन करावे. मारेगांव तालुक्यातील सावंगी (संगम) या गावाचे दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त यांचे पुन:र्वसन विदर्भ पाटबंधारे विभागाने करावे व मारेगांव तालुक्यातील शिवणी, मुकटा, दांडगांव, आपटी, व वणी तालुक्यातील कोना, झोला, मनगांव, भुरकी, रांगना, कवडशी व सावंगी सदर गावाचे जुलै आगस्ट मध्ये झालेल्या महापुरामुळे संपूर्ण गावांना महापुराचा वेढा पडला होता.

त्यामुळे सदर गावांचे पुन:र्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांनी विरोधी पक्ष नेते मा. ना. अजित दादा पवार महाराष्ट्र विधानसभा यांना निवेदनातून केली आहे.
यावेळी युवक काँग्रेस चे सचिन पचारे सह अतुल पचारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लाठी येथील विवाहित तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मौजा लाठी ता वणी येथील रहिवासी अजय प्रभाकर खोके वय (अंदाजे 38) यांनी काल दि 12 सप्टेंबर 22 रोजी  रात्री स्वतःच्या राहत्या घरी मौजा लाठी येथे गळफास लावून त्यांचा मृत्यू झाल्याची बाब त्यांच्या कुटूंबियांच्या आज सकाळी लक्षात आली. घराशेजारी राहत असलेल्या त्यांच्या भावांनी व वडिलांनी पोलिस स्टेशन शिरपूर ला घटनेबाबत कळविले, मृतकाच्या नामे शेतजमीन नाही. मृतकाच्या पाठीमागे पत्नी, मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
त्याच्या आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून सदर मृतकाची पत्नी व मुले हे दोन ते तीन वर्षांपासून माहेरी राहत होते.

संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबविली जाणार

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी जामणी : संपूर्ण राज्यात दिनांक १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबवीण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने झरी जामणी तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी सर्व आरोग्य कर्मचारी यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतले. सर्व विभागाचा समन्वय घेऊन सदर मोहीम हि राबविली जाणार आहे. त्याच अनुषंगाने गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची सभा घेण्यात आली. तालुक्यात एकून तीन प्रा.आ. केंद्र असून त्यामध्ये कार्यरत सर्व आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी यांचा सक्रीय सहभाग घेऊन गावात प्रभातफेरी दवंडी देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोचाराखाली आणणे क्षयरोगाचे निदाना अभावी अद्यापही वंचित असनाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोचाराखाली आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्वचेवर फिक्कट लालसर न खाजणारा बधीर चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयाचे केस विरळ होणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे हे कुष्ठरोगाचे लक्षणे आहेत. तसेच दोन आठवड्यापेक्ष्या जास्त काळ खोकला, दोन आठवड्यापेक्ष्या जास्त ताप, वजनात लक्ष्यणीय घट हे क्षयरोगाचे लक्षणे आहेत. कुष्टरोग व क्षयरोग हा आजार औषधोपचाराने बरा होणारा आजार आहे. कुष्टरोग व क्षयरोग या रोगाचा औषधोपचार सर्व सरकारी दवखान्यात मोफत दिल्या जातात. अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य पथकांना व्यवस्थित माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी केले आहे.

युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी पोलिस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोडी, अवैध धंदे , मारामारी, लुटमार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांचा गुन्हेगारी क्षेत्रावर वचक राहिला नाही. गुन्हेगारीला आळा बसावा किंवा गुन्हेगारी नियंत्रणात रहावी याकरिता ठाणेदार कोणतीही ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. परिणामी शहराची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्फत पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

 निवेदनात असेही म्हटले आहे की, वणी ठाणेदाराची पोलिस स्टेशनला उपस्थिती फार कमी असते. ते नेहमी सुट्यांवरच दिसतात. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त उरलेली नाही. पीएसआय (PSI) देखील पोलिस स्टेशनला उपस्थित नसतात. तक्रारकर्त्यांनाच त्रास देण्याचे काम पोलिस स्टेशनला होतांना दिसत आहे. तर गुन्हेगारांना वाचविण्याची धडपड पोलिसांकडूनच होतांना दिसत आहे. शहर व ग्रामीण भागांतील संशयास्पद झालेल्या मृत्यूचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले नसुन, घटना गांभीर्याने घेतल्या जात नाही. पोलिस स्टेशनमध्ये मांडवली बादशाह तयार झाले आहेत. प्रकरणं दडपण्याचे काम सध्या वणी पोलिस स्टेशनला सुरु आहे. जमादारह मस्तमवाल झाले असून अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात ते अपयशी ठरत आहेत. अपघात करणाऱ्या वाहन चालकाला अटक न करता त्याच्या जागी दुसरा वाहन चालक उभा केला जात आहे. असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहे. तालुक्यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं अक्षरशः जाळं पसरलं आहे. ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोकांचा जास्तीत जास्त भरणा आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये दिसून येतात. परप्रांतीय लोकांचं वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष ठाणेदार याठिकाणी असणं गरजेचं आहे.

चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दुचाकी चोरी तर रोजचीच बाब झाली आहे. नागरिकांच्या मेहनतीच्या कमाईवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. चोरट्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भुरटे चोर आता जीवाला घोर झाले असतांना पोलिस मात्र सगळं काही "ओक्के" असल्याचे सांगत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून महिला मुलींची छेड काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. अल्पवयीन मुलींचे शारीरिक शोषण होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. बेपत्ता मुला मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळलेल्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

इतकेच नाही तर शहर व ग्रामीण भागात अवैध धंदेही फोफावले आहेत. आतातर शहरात मटका जुगार अड्डेही सुरु झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीही जोमात सुरु आहे. सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी विक्रीही जोरदार सुरु आहे. पोलिस जुगार अड्यांवर धाड तर टाकतात पण सेटिंग मोठ्या प्रमाणात करतात. बड्या जुगाऱ्यांची नावं उजागर केली जात नाही. जुगाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून त्यांची नावं आरोपींमधून वगळली जातात. एका मोठ्या जुगारावरील धाड तर पूर्णपणे मॅनेज करण्यात आली. पोलिसांची शहरात फक्त वसुली मोहीम सुरु असुन गुन्हेगारांसोबत सलगी वाढली आहे. एकूणच ठाणेदारांच्या उदासीनतेमुळे वणीची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी अजिंक्य शेंडे यांनी निवेदनातून केली आहे.

व्यसनधीनता, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा चालीरीती व्यसनमुक्त होऊन, समाजाने वैज्ञानिक विचाराची कास धरावी-शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागाव : तालुक्यातील वागद (इजारा) येथील भक्ताच्या नवसाला पावणारा जागृत गणपती बाप्पा ची या परिसरात ख्याती आहे. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या स्थापन झालेल्या सेवादास गणेश मंडळाच्या वतीने काल दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे व संत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारांची पेरणी करून प्रबोधनाचे सिंचन करणारे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे लाडके शिष्य समाज प्रबोधनकार पंकज पाल महाराज यांचा दणदणीत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पंकज पाल महाराज यांचा गावाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार हे शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या हस्ते झाले 
व त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गावातील उमेश भाऊ जाधव, नाईक, प्रल्हाद राठोड तुकाराम राठोड, या गावातील भारतीय सैन्य दलात देश सेवेसाठी असलेला खुशाल राठोड यांचा सपत्नीक आई-वडिलांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन पंकज पाल महाराज यांनी त्यांचे सत्कार केले.
या कार्यक्रमात श्री पंकज पाल महाराज यांनी आपल्या अमोघ वकृतवाणी समाजप्रबोधनातून समाजाला व्यसनधीनता ही समाजाला लागलेली कीड असून याचा वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. अन्यथा समाजाला याची किंमत मोजावी लागेल अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांना फाटा देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा फुले, शाहू, आंबेडकर, वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांचा आत्मसात करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, समाजाने शिक्षणाची कास धरावी शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन असून जगण्याचा मार्ग हा शिक्षण दाखवून जीवनाला समृद्ध करण्याची ताकद ठेवतो असे प्रबोधन त्यांनी आपल्या समाजप्रबोधनातून या गावकऱ्यांना केले. या कार्यक्रमाला काळी दौलत खान परिसरातील गावाच्या भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठी गर्दी करून हजारोंच्या उपस्थितीत भरगच्च हा कार्यक्रम झाला.

यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन मोठ्या हर्ष व उत्साहात भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील पदाधिकारी आकाश राठोड, श्याम चव्हाण, विकी जाधव, जयपाल राठोड, गजानन राठोड, विक्रम आडे, करण चव्हाण, तुषार राठोड, आकाश पवार, रोशन जाधव, मिलिंद पवार, अमोल चव्हाण, अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले, सूत्रसंचालन जीवन राठोड यांनी केले.