व्यसनधीनता, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा चालीरीती व्यसनमुक्त होऊन, समाजाने वैज्ञानिक विचाराची कास धरावी-शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागाव : तालुक्यातील वागद (इजारा) येथील भक्ताच्या नवसाला पावणारा जागृत गणपती बाप्पा ची या परिसरात ख्याती आहे. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या स्थापन झालेल्या सेवादास गणेश मंडळाच्या वतीने काल दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे व संत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारांची पेरणी करून प्रबोधनाचे सिंचन करणारे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे लाडके शिष्य समाज प्रबोधनकार पंकज पाल महाराज यांचा दणदणीत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पंकज पाल महाराज यांचा गावाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार हे शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या हस्ते झाले 
व त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गावातील उमेश भाऊ जाधव, नाईक, प्रल्हाद राठोड तुकाराम राठोड, या गावातील भारतीय सैन्य दलात देश सेवेसाठी असलेला खुशाल राठोड यांचा सपत्नीक आई-वडिलांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन पंकज पाल महाराज यांनी त्यांचे सत्कार केले.
या कार्यक्रमात श्री पंकज पाल महाराज यांनी आपल्या अमोघ वकृतवाणी समाजप्रबोधनातून समाजाला व्यसनधीनता ही समाजाला लागलेली कीड असून याचा वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. अन्यथा समाजाला याची किंमत मोजावी लागेल अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांना फाटा देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा फुले, शाहू, आंबेडकर, वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांचा आत्मसात करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, समाजाने शिक्षणाची कास धरावी शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन असून जगण्याचा मार्ग हा शिक्षण दाखवून जीवनाला समृद्ध करण्याची ताकद ठेवतो असे प्रबोधन त्यांनी आपल्या समाजप्रबोधनातून या गावकऱ्यांना केले. या कार्यक्रमाला काळी दौलत खान परिसरातील गावाच्या भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठी गर्दी करून हजारोंच्या उपस्थितीत भरगच्च हा कार्यक्रम झाला.

यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन मोठ्या हर्ष व उत्साहात भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील पदाधिकारी आकाश राठोड, श्याम चव्हाण, विकी जाधव, जयपाल राठोड, गजानन राठोड, विक्रम आडे, करण चव्हाण, तुषार राठोड, आकाश पवार, रोशन जाधव, मिलिंद पवार, अमोल चव्हाण, अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले, सूत्रसंचालन जीवन राठोड यांनी केले.