...तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती,मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती निमित्त मेंढोली येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान सकाळी गावकऱ्यांनी 11 वाजता बाबासाहेबांचा जयजयकार करीत रॅली काढली,त्यानंतर सभा घेण्यात आली.

सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमार मोहरमपुरी व अ‍ॅड. दिलीप परचाके होते तर अध्यक्षस्थानी नारायण गोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच विनायकराव ढवस, नगराळे साहेब, मनोज काळे, हेमंत ऐकरे, नंदकिशोर बोबडे हे उपस्थित होते.

भारतीय संविधान तयार करण्याचे काम घटना समितीला सोपविण्याचे निश्चित झाल्यानंतर अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडारेशनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासंदर्भात एक प्रस्ताव/निवेदन सादर केले होते ह्या निवेदनात मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकचे अधिकार, अस्पृश्यांच्या संरक्षणाविषयी तरतुदी ह्या नमूद होत्या. अनुच्छेद दोन, भाग दोन, खंड चार मध्ये आर्थिक शोषणा विरुद्ध संरक्षण मध्ये राज्य समाजवादाची मांडणी केली व संविधानामध्ये ती संविधानाचा मुळ पाया असली पाहिजे व त्याला येणाऱ्या कोणत्याही शासकाला त्यामध्ये फेरबादल करण्याचा अधिकार नसेल ज्यामुळे कोणत्याही शेतकरी व कामगाराचे कधीही शोषण होणार नाही. परंतु प्रत्यक्षात संविधान लिहीत असताना संविधान सभेने त्यांची ही मांडणी स्वीकारली नसल्याने बाबासाहेबांनी संविधान अर्पण करताना इशारा दिला कि, राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्या न दिल्याने पुढील काळात पीडित जनता मोठ्या श्रमाने निर्माण केलेली संसदीय लोकशाही उधळून लावतील. आज बाबासाहेबांचा राज्य समाजवाद अस्तित्वात न आल्याने आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असून भूखमरीत देशाचा क्रमांक 142 व्या स्थानी आहे. सुशिक्षित बेरोजगारांची टक्केवारी 83 टक्के आहे. देशाची व्यवस्था बरबादीचा उंबरठ्यावर असून ह्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षात परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे चित्र समोर दिसते आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असताना बाबासाहेबांचा ईशारऱ्याकडे लक्ष देऊन पुढील वाटचाल करावी लागेल, असे या कार्यक्रमात कुमार मोहरमपुरी व अ‍ॅड. दिलीप परचाके यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सुर काढला. 

भीमजयंती निमित्ताने झालेल्या सभेचे संचालन सुधाकर तुराणकर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजक जयप्रकाश तेलंग, एकनाथ नालमवार, बुद्धिजम तेलंग, ऋषीं कुळमेथे, संजय वालकोंडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते.

विज तारांच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोरज येथे विजेचा धक्क्याने एका शेतकऱ्याचा बैल ठार झाला. ही घटना आज सकाळी 6.30 वाजता घडली.

पेंदोर यांच्या शेतातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू असलेले एक पोल मागील 6/7 दिवसापासून झुकले होते,याची तक्रार सुद्धा दिल्याची माहिती आहे.मात्र तो नादुरुस्तीमुळे तो पहिला व दुसरा सुद्धा पोलचे लोड वाढल्यामुळे पोल जमिनीवर पडला. मात्र त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता तात्काळ दुरुस्त करा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत होती. परिणामी आज सकाळी निळकंठ सूर्यभान जिवतोडे (60) याच्या मालकीचा बैल शेतातून जात असताना त्या पडलेल्या पोल च्या जिवंत विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने बैल जागीच तडफडत ठार झाला. 

या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून घटनेची माहिती पोलिस स्टेशन, उपअभियंता मारेगाव व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. 

किन्हाळा जि. प. प्रा. शाळेला संगणक संच भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल्स इंडीया लि.कडुन किन्हाळा येथील जि.प. प्राथ. शाळेला संगणक संच भेट देण्यात आले. 

मारेगाव तालुक्यातील किन्हाळा जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थींना डिजिटल युगामधे आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सफेक्स केमिकल्स तर्फे सी एस आर ऍक्टिव्हिटीस (CSR activities) अंतर्गत शाळेला संघनक संच भेट देण्यात आले. सफेक्स ही कंपनी शेतकऱ्या बरोबर त्यांच्या मुलाचे हित जोपासण्याचे काम करित असते. 

या कार्यक्रमात सदगुरु कृपा कृषी केंद्रचे संचालक अभय भाऊ जुमळे, शा.स.अ.भास्कर कपाळकर, सरपंच शुभम भोयर व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सफेक्स केमिकल्स चे एरिया मॉनेजर दिनेश राठोड व प्रतिनिधी शुभम कंघन व जि प प्रा शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

काँग्रेस मेनीफेस्टोमध्ये जुनी पेन्शन योजना कुठे?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याचा ना युतीच्या विचाराधीन आहे,ना आघाडीच्या घोषणेत आहे. कर्मचाऱ्यांना 'पेन्शन' मिळेल की नाही. कर्मचारी वर्गात उदासीनता असून काँग्रेस च्या मेनीफेस्टोमध्ये तरी "जुनी पेन्शन योजना" हवी होती असे चर्चील्या जात आहे. 

निवडणूक काळात मोठं मोठी आश्वासने द्यायची, मग सत्ता आली गेली की दिलेली आश्वासने विसरून जायचे हेच आजवर चाललंय. मग सरकार कोणाचेही असो, असे बोलल्या जात आहे. 

मागील वर्षी पेन्शन मिळावी म्हणून विधान भावनावर मोर्चा, आंदोलन, धरणे व निवेदने केली गेली. या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मोठी आशा आहे. मात्र, काँग्रेसने जाहिर केलेल्या मेनीफेस्टोमध्ये चक्क जुनी पेन्शन योजनाच नसल्याने शासकीय कर्मचारी वर्गात चलबिचल आहे. 


जुनी पेन्शन योजना काय आहे? 
जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला एक विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून दिली जायची. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के होती. उदाहरणार्थ, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन १० हजार रुपये असेल, तर त्याला थेट पाच हजार रुपये पेन्शन मिळायचे.

लोकंही घेताहेत "रिल्स" ची मजा...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोणत्याही निवडणुका म्हटलं की उमेदवार, मतदार, प्रचार असे त्रिकुट असते,हे वेगळं सांगायची गरज नसून सर्वांना ठाऊकच आहे. निवडणुकांचा बिगुल वाजला की, मौसमी वाऱ्या सारखे प्रचार वारे बेधुंद सर्वत्र सुरु होतात. 

असेच चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराचे वारे सुरु झाले आहेत. यात सभा बैठक, भेटीगाठी,कॉर्नर सभा आणि पक्षातील प्रामुख्याने नेते मंडळीच्या सभा होताना दिसत आहे. मात्र, "कही खुशी कही गम" अशी आतापर्यंत झालेल्या नेत्यांच्या सभांची चर्चा ऐकायला मिळत होती. परंतु सोशल मीडियात वेगळंच वातावरण तापले गेलं आहे. 

प्रचार म्हटलं की थेट मतदारांचा संबंध येतोय यावर न बोललेलं बरं. पारंपरिक ऐवजी डिजिटल माध्यमावर भर दिसत असला तरी मात्र, सध्या मनोरंजनात्मक 'रिल्स' सोशल प्रचारक गावोगावी जाऊन मत आणि उमेदवार जाणून घेण्यासाठी 'धडपड' सुरु आहेत. यामुळे मतदार संभ्रमात पडत असल्याचे चर्चा जोर धरत आहे. मतदार हा मतदान "गुप्त दान" करित असतो, असं तो कोणीही येइल आणि सांगून टाकतो, असं कधी होत नाही हे सर्वश्रुत आहे. सध्या अशा सोशल माध्यमातून "रिअल नाही "रिल्स" प्रचार जोमात आहे. परंतु मतदारात 'आगे की सोच' जरा वेगळीच आहे असेही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नागरिकांतून बोलल्या जात आहे. तुमचा आमचा कौल कुणाकडे वैगेरे, काहीही आता सांगता येत नाही. परंतु प्रसिद्धी,मनोरंजनाचा भाग म्हणून लोकही मजा घेत आहे. 

हा.. की तो... अशी "इंटर्टेनमेंट" करणारी आभासी यंत्रणेच्या शहरी ग्रामीण भटकंतीने ज्यांची जमेची बाजू आज सांगितलंय जातं, ती उद्याही कदाचित बदलूही शकते. तूर्तास अशा "रिल्स"चा मजा आनंद वणी विधानसभा क्षेत्रातील लोकं मोठ्या चालाखीने लुटत आहे.