मनसे नेते राजू उंबरकर कार्यकर्त्यांसह धडकले कोसारा रेती घाटावर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
         
मारेगाव : नागरिकांना स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती! या उद्देशानं राज्य सरकारनं नवीन रेती धोरण जाहीर केलं आहे. रेती पुरवठ्यासाठी सध्या तरी तालुक्याच्या ठिकाणी डेपो तयार करण्यात आले. त्याचा लाभ इतर तालुक्यातील जनतेला मिळतही असतील, पण मारेगाव तालुक्यातील डेपो याला अपवाद ठरत आहे. हजारो ब्रास रेती स्टॉक करून ठेवला असतांनाही लाभार्थ्यांना तिळमात्र रेती दिल्या जात नसल्याने तीव्र संताप जनतेतून व्यक्त होत आहे.

मारेगाव तालुक्यातील एकमेव कोसारा रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात तालुक्यालाच रेतीपुरवठा होत नसल्याने मनसेचे राजू उंबरकर आपल्या कार्यकर्त्यांसह कोसारा घाटावर धडकले हजारो ब्रास रेतीचा स्टॉक नदीकाठावर करून असल्याने ही रेती अवैधरित्या तालुक्याबाहेर जात असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. 
 

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथून वर्धा नदी वाहते. येथेच रेतीचा डेपो सुद्धा देण्यात आला. या डेपोमध्ये अवैधपणे रेतीची उचल केली जाते. आणि येथूनच रेती परस्पर बाहेर पाठवल्या जाते, परंतु तालुक्यातील जनतेला मात्र रेती मिळत नाही असा आरोप करीत मनसे नेते राजू उंबरकर यांचे नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने जेवढा स्टॉक करायची परवानगी दिली त्यापेक्षा जास्त रेतीचा स्टॉक जमा केला असल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी मनसे नेते राजूभाऊ उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका उपाध्यक्ष सुरज नागोसे, वामन चटकी, आदित्य बुचे, चांद बहादे, रुपेश ढोके, किशोर मानकर, अनंता जुमळे इत्यादी पदाधिकारी व असंख्य मनसैनिक उपस्थित होते.
मारेगाव तालुक्यात एकमेव कोसारा रेती डेपोवर हजारो ब्रास रेतीचा स्टॉक नदीकाठावर केला आहेत परंतु ऑनलाईन पद्धतीने वितरण केली जाणारी रेती केवळ 937 ब्रास ऑनलाईन केल्या गेली उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून रेती पुरवठा तालुक्याबाहेर होत असल्याने घरकुल लाभार्थी तसेच अन्य बांधकामांना रेती मिळत नसल्याने लाभार्थ्यात शासनाच्या 600 रुपये रेती ब्रास धोरणाविषयी नागरिकात कमालीची चीड निर्माण झाली आहे. 

रेती डेपो वरून ऑनलाईन नंबर लावल्यानंतर रेती वितरण केली जाते. या ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यात वा जिल्ह्याबाहेर ही रेतीपुरवठा करता येतो त्यामुळे मारेगाव तालुक्यातील नागरिकांना ऑनलाईन केल्यास रेती मिळू शकते, चौकशी नंतर या रेती डेपोवर जास्तीचा स्टॉक असल्यास कारवाई करू. मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी सांगितले.
     रेती डेपो संदर्भात जनतेच्या तक्रारी पहा ✍️

मनसेचा दणका : निराधारांना "त्या" जाचक अटीतून शासनाने केले मुक्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 30 जून पर्यंत हयात दाखल्यासोबत उत्पनाचे दाखले सादर करणे बंधनकारक करण्यात करण्यात होते. यासाठी संबंधिताकडे चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे निराधारांचा आधार मिळेल की नाही, अशी चिंता लाभार्थ्यांना लागली होती. मात्र, एका ईशाऱ्याने मनसेने ही चिंता दूर केली आहे.

आयुष्याच्या शेवटचे दिवस मोजणाऱ्या या निराधारांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी संबंधिताकडे उठबशा कराव्या लागत होत्या, उत्पन्नाचे दाखले कशासाठी? असा संतप्त सवाल तहसील कार्यालयात आलेल्या लाभार्थ्यांच्या तोंडून बाहेर पडताना दिसून येत होता, ही धिरगंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पोहचताच मारेगाव शाखेच्या वतीने निराधारांना जाचक अटीतून मुक्त करण्याची मागणी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच मागणी मान्य न झाल्यास 1 जुलै ला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या मागणीची दखल घेऊन शासनाने 50 वयोगटातील लाभार्थ्यांच्या वयाचा विचार करत 20 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे उत्पन्नाचे दाखले शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहे.
लाभार्थ्यांना हेलपाटे खावे लागत असल्यामुळे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे आधार नसलेल्या निराधारांना जाचक अटीतून मुक्त करा, अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा सज्जड दम देण्यात आल्यानंतर शासनाकडून मागणीची दखल घेण्यात आली व उत्पन्नाचे दाखले शिथिल करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या या जाचक अटीतून मुक्त झाल्याचे आनंद निराधारांनी व्यक्त करित माध्यमांची व मनसेचे आभार मानले.

ही गंभीर बाब आहे. आयुष्याच्या शेवटचे दिवस मोजणाऱ्या या निराधारांना कागदपत्रे काढण्यासाठी हातात पैसा नसतात, उसनवारीतून काढून मिळालेल्या कागदपत्राना पोहचविणासाठी मनुष्यबळ नाही राहात, त्यामुळे ही कागदपत्रे कशासाठी?... मात्र, शासनाने या जाचक अटीतून मुक्त केले त्यांना न्याय मिळाला,याचे समाधान लाभार्थ्यांना मिळालं.. बस झाले.

-संतोष रोगे
जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव 

आयता येथील आदिवासी बांधवाचा प्रतीक कुळसंगे यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये प्रवेश


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आर्णी : घाटंजी येथे आयता ता.आर्णी येथील आदिवासी बांधवांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्याला प्रेरित होऊन व श्री. हंसराज अहिर साहेब व श्री नितीन भुतडा जिल्हाध्यक्ष भाजपा,श्री प्रकाश भाऊ राठोड ता.अध्यक्ष भाजपा,यांच्या मार्गदर्शनात प्रतीकजी कुळसंगे जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी भाजप यांच्या  नेतृत्वात प्रवेश घेण्यात आला.

आयता येथील आदिवासी समाजाचे युवा नेते श्री.अभिजित मडावी,जेष्ठ नेते श्री. आत्माराम मडावी गजानन वेट्टी, शामराव पेंदोर,धीरज पेंदोर,संतोष मडावी,आकाश पेंदोर,चिंतामण कुसराम,प्रदीप मडावी,ज्ञानेश्वर कुसराम,वैभव आडे,विकास पेंदोर,दत्त मडावी, सुधाकर नैताम,खेमदेव मुजमुले, वसंत हराळ,अनिल कवडे, लक्ष्मण करे,गणपतराव मंडवकार, यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला.

 यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री राजू शुक्ला, भावेश सूचक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री स्वप्नील मंगळे, आदिवासी आघाडी विधानसभा प्रमुख,श्री अशोक राठोड जिल्हा सरचिटणीस व्ही.जे.एन.टी, नागोराव गेडाम जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी आघाडी, गोपालजी काळे सोशल मीडिया लोकसभा प्रमुख,अजय कुमरे, इत्यादि उपस्थित होते.

एकीकडे भीषण अपघातात तर, दुसरीकडे गळाफास घेऊन युवकाची आत्महत्या, मारेगाव तालुका हादरला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना तालुक्यातील नरसाळा येथील एका युवकाचा नागपूर येथे भाड्याने राहत असलेल्या खोलीत गळाफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून ही घटना आज शुक्रवार दि 23 जून रोजी उघडकीस आली.

सौरभ सुभाष मंजेकार (23) असे गळाफास घेतलेल्या युवकाचे नाव आसून तो कामाच्या शोधात नागपूरात भटकंती करायचा, अशातच एका कंपनीत कामाला लागला होता, मात्र आज त्याचा देह, गळाफास घेऊन आढळून आला.

तूर्तास युवकाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसून त्याचे पश्चात आई वडिल, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.

उद्या मनसेचे रेती डेपोवर हल्लाबोल आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. मात्र,या नवीन वाळू धोरणाचा फज्जा उडाल्याचे मारेगाव तालुक्यात चित्र असून कोसारा रेती डेपो मधून घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्याने मनसेच्या वतीने आज ता 24 रोज शनिवार सकाळी 11वाजता कोसारा रेती डेपोवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

मारेगाव पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती डेपोला मंजूरात देण्यात आली आहे.विलाल ट्रेंड्स या कपंनीला देण्यात आलेल्या या डेपोतुन 2 जुलै 2023 पासून अजूनही येथील लाभार्थ्यांना ऑनलाईन रेतीचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील घरकुल लाभार्थी रेती योजने पासून वंचीत असून घराची बांधकाम विना रेती करायची कशी या विवंचनेत असून रेती मिळावी यासाठी मनेसे च्या नेतृत्वात शनिवार ला 11 वाजता कोसारा डेपो वर धडक देऊन आपली व्यथा प्रशासनासमोर मांडणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे नेते राजू उंबरकर करणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आले आहे. आज आंदोलक सकाळी 11 वाजता ट्रॅक्टरने कोसारा डेपोवर जाऊन "आमची रेती आम्हाला द्या" अशी मागणी करणार आहे. सुरु करण्यात आलेल्या या डेपोमध्ये कोसारा घाटातून पी सी ने अवैध रेतीचा मनमानी रेतीचा उपसा करण्यात आला आहे. तसेच या रेतीची तस्करी जिल्हा बाहेर जात असताना मात्र, तालुक्यातील लाभार्थ्यांना डावल्ल्या जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, अनंता जुमळे, अतुल पचारे, माणिक पांगुळ, रामदास चौधरी, वैभव सोनटक्के, रोशन कडून, अभिजित जुमळे, आकाश नान्ने, गणेश क्षीरसागर, बबन हस्ते इत्यादीच्या सह्या आहेत