संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांचे मागील चार महिन्यांचे थकीत मानधन मिळाले नसल्याने आज जिल्ह्यातील संगणक परिचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

मागील १२ वर्षांपासून संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रामाणिकपणे आपली सर्व ऑनलाइन तथा ऑफलाइन कामे जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा नियमितपणे देत असतात. या कामाचा मोबदला मानधन स्वरूपात मिळत असून सुध्दा मानधन हे नियमित न मिळता चार ते
पाच महिने मानधनाची संगणक परिचालकांना वाट बघावी लागते.

अशाप्रकारे संगणक परिचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
संगणक परिचालक ग्रामीण पातळीवर आपले कामकाज जबाबदारीने पूर्ण करीत असून, यांच्या समस्यांकडे शासन तथा प्रशासन डोळेझाक करत आहे.

संगणक परिचालकांवर वरिष्ठ तथा सरपंच यांच्याकडून कामाचा भडीमार नेहमी होत असतो परंतु थकीत मानधनाबाबत वरिष्ठ अधिकारी व तालुका वरिष्ठ अधिकारी यांना विचारले असता, पीएफएमएस व आरटीजीएस झाले नाही, या मुद्दयावर बोलून उडवाउडवीची उत्तरे नेहमीच दिली जातात. थकीत मानधनाबाबत दीड महिन्याआधी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, मानधन थकीतच आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त रुग्णांना फळ वाटप

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर  

मारेगाव : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मारेगाव शिवसैनिकांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.


आदरणीय पक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालय मारेगांव येथे फळ वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी जितेंद्र नगराळे (नगरसेवक), अभयभाऊ चौधरी (शहर प्रमुख), सुभाष बदकी (माजी नगरसेवक), करण किंगरे (व्यापारी सेल शहर प्रमुख), सोनु चौधरी, शुभम क्षिरसागर, श्रेयस दरबेशवर, विवेकभाऊ भोयर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

अजय चा माजी आमदार राजू भाऊ तोडसाम यांचे हस्ते सत्कार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

केळापूर : तालुक्यातील अर्ली येथील अजय किसन धुर्वे हा विद्यार्थ्यांची उंच भरारी घेत हा विद्यार्थी ग्रज्युएट अटीट्यूड टेस्ट बायोटेक्नॉलॉजी (गट ब) 2022 या परीक्षेत भारतातून बारावा रँक मिळवून पास झाला आहे. या परीक्षेत त्याला 240 गुण मिळाले. गुणाची टक्केवारी 83 टक्के आहे. सदर विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिखट व हलाखीची असल्याने  त्याला पुढील शिक्षणाकरिता आर्थिक अडचण येत आहे. त्याला शास्त्रज्ञ व्हायचे आहे. असे त्याने सांगितले आहे. 
पुढे अजयला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे आहे,याकरिता केंद्र सरकारच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयातर्फे बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट कडून घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट ॲप्टीट्यूड टेस्ट फाॅर बायोटेक्नॉलॉजी (गट ब) ही परीक्षा 83 टक्के घेऊन भारतातून ऑल इंडिया रँकिंग बारावा नंबर पटकावला आहे. त्या अनुषंगाने अजय धुर्वे यांचा अर्ली या गावी आर्णी-केळापूर मतदारसंघ माजी आमदार माननीय राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते शाल श्री फळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील शिक्षणा करिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी गावकरी व मित्र परिवार उपस्थित होते. 

महापुरामुळे भोई समाज बांधवावर आली उपासमारीची वेळ

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात विस दिवस झाले पावसाने चांगलेच झोडपून काढले, त्यातच बेंबळा, अप्पर व लोअर मधून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर वर्धा नदी ओसंडून वाहत असतांना नदी काठावरील गावात शेतात पुराचे पाणी शिरून सर्वत्र हाहाकार माजवला. त्या पुरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेच आहे. त्याचप्रमाणे चिंचमंडळ येथील भोई समाज बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे,अशा आशयचे निवेदन यवतमाळ जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात लिहिले आहे की, या महापुरात भोई बांधवाचे उपजीविकेचे साधन नाव्ह, जाळे व इतर साहित्य पुराणे पूर्णतः वाहून गेले. त्यामुळे भोई समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. अंदाजे चिंचमंडळ येथील 15 ते 20 कुटुंब मासेमारी चा व्यवसाय करतात. निव्वळ कुटुंब याच मासेमारीच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात, मात्र उपजीविकेचे साधनच या पुरात वाहून गेल्याने येथील मासेमारी चा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने प्रशासनाने येथील कुटुंबाना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा व उपजीविकेचे साधन सामग्री देण्यात यावे अशी मागणी तालुका मारेगाव काँग्रेस कमिटी चे तालुका प्रमुख मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
यावेळेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलचे संचालक उपसरपंच प्रफुल विखनकर, भोई समाज तालुका अध्यक्ष अतुल पचारे, मदन शिवरकर, महादेव पचारे, भाऊराव पचारे, रोशन करडे, नरेश शिवरकर, अशोक शिवरकर व निखिल शिवरकर आदी उपस्थित होते.
त्यासोबत मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामध्ये घरातील अन्नधान्य, घरगुती वस्तूची हानी झाली असून अतिवृष्टी मुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही यावेळी मागणी करण्यात आली. 

अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

मारेगाव : सतत कोसळणाऱ्या पावसाने मारेगाव तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाचवेळी नदीपत्रात आल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले. यातून गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर ग्रस्ताना नुकसान भरपाई, हेक्टरी 50 हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना वेगळा मोबदला व कर्जाचे नव्याने पुनर्गठन व तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी आज अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
मारेगाव तालुक्यातील सध्याची पूर परिस्थिती व दुष्काळ परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाचवेळी नदीपत्रात आल्याने परिसरातील शेतामध्ये वर्धा नदीचे पाणी शिरले. हे पुराचे पाणी गावात शिरू लागल्याने नागरिकांची चांगलीच दणादाण उडाली. मागील विस दिवसापासून सतत पाऊस सुरु असल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जवळजवळ 14 गावांना पुराचा फटका बसला, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. लाखों रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत वेगळं पॅकेज जाहीर करून झालेल्या नुकसानीचा सर्वे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व मारेगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा तसेच तालुक्यातील ज्या पूर ग्रस्तांच्या जमिनी खरडून नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना पिक कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने पिक पेरणी करिता कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. 
तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना करण्यात आली आहे.
या वेळेस सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शंकर जावदे, माला रामकृष्ण गौरकार, गोवर्धन तोडासे, मारोती तुराणकर, सुजित डुकरे, सुरेश लांडे, प्रवीण बोथले, प्रवीण नाभे, विनोद आत्राम, दयानंद कुडमेथे आदी शेतकरी उपस्थित होते.