महापुरामुळे भोई समाज बांधवावर आली उपासमारीची वेळ

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात विस दिवस झाले पावसाने चांगलेच झोडपून काढले, त्यातच बेंबळा, अप्पर व लोअर मधून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर वर्धा नदी ओसंडून वाहत असतांना नदी काठावरील गावात शेतात पुराचे पाणी शिरून सर्वत्र हाहाकार माजवला. त्या पुरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेच आहे. त्याचप्रमाणे चिंचमंडळ येथील भोई समाज बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे,अशा आशयचे निवेदन यवतमाळ जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात लिहिले आहे की, या महापुरात भोई बांधवाचे उपजीविकेचे साधन नाव्ह, जाळे व इतर साहित्य पुराणे पूर्णतः वाहून गेले. त्यामुळे भोई समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. अंदाजे चिंचमंडळ येथील 15 ते 20 कुटुंब मासेमारी चा व्यवसाय करतात. निव्वळ कुटुंब याच मासेमारीच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात, मात्र उपजीविकेचे साधनच या पुरात वाहून गेल्याने येथील मासेमारी चा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने प्रशासनाने येथील कुटुंबाना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा व उपजीविकेचे साधन सामग्री देण्यात यावे अशी मागणी तालुका मारेगाव काँग्रेस कमिटी चे तालुका प्रमुख मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
यावेळेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलचे संचालक उपसरपंच प्रफुल विखनकर, भोई समाज तालुका अध्यक्ष अतुल पचारे, मदन शिवरकर, महादेव पचारे, भाऊराव पचारे, रोशन करडे, नरेश शिवरकर, अशोक शिवरकर व निखिल शिवरकर आदी उपस्थित होते.
त्यासोबत मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामध्ये घरातील अन्नधान्य, घरगुती वस्तूची हानी झाली असून अतिवृष्टी मुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही यावेळी मागणी करण्यात आली.