सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
संबंधित विभाग व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या निराधार महिलेला प्रशासनाच्या तात्काळ मदतीची अत्यंत गरज आहे. जवळपास या घटनेला 1 महिना होत आहे. परंतु महाराष्ट्र् राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तरतुदी नुसार आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षितेची जबाबदारी ही संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापन विभागाने सदर घटनांना शह देण्यासाठी आपआपल्या परीने विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय प्रतीनिधी यांची जबाबदारी पाडली पाहिजे. असा सूर सदरील घटनास्थळी झालेल्या नुकसानीकडे पाहता म्हणता येईल. अशावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर शासनाची मदत मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.
मात्र,पावसाळा तोंडावर येऊनही सुशीला जूनगरी या निराधार महिलेला शासनाची तात्काळ मदत मिळाली नाही. त्यामुळे मदतीसाठी संबंधित विभागाच्या विरोधात उपोषणाला बसण्याची वेळ आणू नये? किंबहुना उपोषण करावेच लागेल असे गंगाधर महाराज लोणसावळे यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले आहे.