मारेगाव : आज यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या श्री दर्शन भारती विद्यालयने नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले. रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या रौप्य महोत्सवी उपस्थित होते. या सोहळ्याला अध्यक्षस्थानी मा श्री अंकुशजी रामगडे (अध्यक्ष श्री द.भा.वि. गोंडबुरांडा) हे होते, उदघाटक मा श्री अनुपजी कटारिया, तर प्रमुख अतिथी मा श्री आनंदजी ठाकरे (उपाध्यक्ष श्री द.भा.वि. गोंड बुरांडा) यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विद्यालयाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रथम क्रमांक प्राप्त स्थापनेपासून ते आज रोजी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आले. दरम्यान, संस्थेतर्फे सुरज गमे यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. तसेच माजी विद्यार्थी महेंद्र पुंडलिकराव सयाम, धिरज उत्तमराव गमे, अतुल विलासराव बोन्धरे, विद्या रतन मानकर, स्वप्नील रविंद्रजी त्रिवेदी, संध्या विठ्ठलराव गेडाम, सुरेंद्र मोहनराव गेडाम, शीतल विठ्ठलराव खोके, अर्चना विठ्ठलराव नागरकर, कल्पना उत्तमराव देऊळकर, आशिष भैय्याजी राजुरकर, अक्षय सुरेशजी बोन्दरे, धनंजय मनोहरराव गेडाम, अनामिका दिनकरजी उईके, अश्विनी हनुमान पंधरे, प्राजक्ता प्रल्हादराव राजूरकर, अनिकेत अशोकराव देऊळकर, जया अरुणजी लांबट, आचल सुरेशजी दानखेडे, पूनम रमेशजी सपाट, श्रुती मनोहरराव सपाट, स्वेता संतोषराव गमे यांचाही या रौप्य महोत्सव व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळेत समावेश होता, अशी माहिती संस्थेने दिली. शनिवार दि.31-12-2022 रोजी झालेल्या कार्यक्रमात रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मारेगाव तालुक्यातील आजी माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी माजी विद्यार्थी श्री सुरज गमे (कंत्राटी यंत्रचालक) त्यांनी संस्थेचे कौतुक केले व आभार मानले. संस्थेच्या आजी माजी रौप्य महोत्सव व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळाचे आवर्जून लाभ घ्यावा, असे गमे बोलतांना म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष अंकुश पाटील यांनी रौप्य महोत्सवी वर्षात व नववर्षाभिनंदन विद्यार्थी मान्यवर तसेच उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी श्री दर्शन भारती विद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.