महागांव सिंधी मांगली शिवारातील कॅनलची त्वरित दुरुस्ती करा - अविनाश लांबट यांची मागणी

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगाव : तालुक्यातील कॅनलमुळे गाळ साचल्याने गवत वाढले, याशिवाय ठिकठिकाणी झाडे झूडप वाढीस आलेत. त्यामुळे कॅनल च्या वरून पाणी वाहून शेतात शिरल्याने  कॅनल लगत शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
याबाबत मनसेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात संबंधित विभागाला निवेदन सादर करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करित असल्याने परत आज दि.२ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करावे लागले असे अविनाश लांबट यांनी बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे होणारे नुकसान त्वरित टाळावे तसेच महागांव तलाव सिंचनासाठी दिलेल्या कॅनलची पूर्ण  तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमची आहे. 

मारेगाव तालुक्यातील कॅनलमुळे हातातील असणाऱ्यां शेतमालांचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाने या महागाव सिंधी, मांगली परिसरातील कॅनलची पाहणी करून तातडीने कॅनलची दुरुस्ती करावी, कॅनलच्या पाठसऱ्या ह्या अडगळीत असल्याने पाठसऱ्यातून पाणी पुरवठा योग्य तो होत नसल्याने पाणी सोडण्यासाठी योग्य माणसाची निवड करण्यात यावे, वरील सर्व मागण्या येत्या आठ दिवसात मार्गी लावल्या जाव्यात अन्यथा.. मनसे दणका आंदोलन उभारेल असा मनसेच्या वतीने ईशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीस आपण जबाबदार असाल असेही निवेदनात मनसे म्हटलं..

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष तथा सरपंच संघटना तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात बिजरतन मोहता, छायाताई देवाळकर लताताई डाहुले, रूपाताई थेरे, सिंधूताई मांडवकर, प्रियांका देवाळकर मारोती बलकी, लताताई नागोसे, अर्चना गाडगे, ज्योती डाहुले, मंगला डाहुले, अलका डाहुले, पार्वती डाहुले, रुपाली गाडगे, विष्णू भोयर, सुहास पिंपळशेंडे, सुधीर डाहुले, गणेश खुसपुरे, आशिष खंडाळकर, अंकुश वैद्य, यासह मनसे कार्यकर्ते व सिंधी महागाव येथील शेतकरी उपस्थित होते.