आजचे रशिभाविष्य : 23 फेब्रुवारी गुरुवार


              राशिभविष्य : 23 फेब्रुवारी गुरुवार..


मेष
मेष राशीच्या लोकांची ग्रहस्थिती सांगत आहे की, तुम्ही खूप व्यस्त असाल आणि संपूर्ण दिवस काही ना काही व्यवस्था करण्यातच जाईल. नोकरदार लोकांना कामाच्या संदर्भात खूप धावपळ करावी लागेल. काही बाबतीत ऑफिसमध्ये तुमची चौकशी होऊ शकते. दुसरीकडे, व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला असेल. तुमचा ज्यात स्वाभिमान वाढेल अशाच गोष्टी करा.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ असू शकतो. कोणत्याही योजनेत अपेक्षेप्रमाणे परिणाम न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता. तुमचा मान-प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. यावेळी तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. अन्यथा हात खूप घट्ट होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहयोगी मिळतील.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असू शकतो. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला सकाळपासून धावपळ करावी लागू शकते किंवा एखाद्या सरकारी खात्यात फेऱ्या माराव्या लागतील. काहींना पत्नीच्या तब्येतीची चिंता सतावेल. धावपळीबरोबरच फालतू खर्चही खूप होऊ शकतो. पाहुणे बरेच दिवस राहू शकतात.

• कर्क
कर्क राशीच्या लोकांचे नशीब साथ देत आहे आणि तुम्हाला कोणत्याही बाबतीत उत्तम संपत्ती मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला आर्थिक मदत मागू शकतो आणि त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक विचार करावा. तुम्ही काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी थोडे पैसे खर्च करू शकता. दीर्घकाळापासून रखडलेले कोणतेही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस भाग्यवृद्धीचा आहे आणि सर्व कामे सहज पूर्ण होतील. तुमची शक्ती वाढेल आणि भाग्य तुम्हाला साथ देईल. कामाच्या ठिकाणी बदलासाठी कोणीतरी तुमच्याकडे येऊ शकते किंवा तुमच्या कामात काही बदल केले जाऊ शकतात. व्यवसायात जवळच्या व्यक्तीप्रती खरी निष्ठा आणि गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकू शकता आणि तुमची काही रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस यशाचा आहे. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि सर्व कामे सहज पूर्ण होतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात मौन पाळणे फायदेशीर ठरेल. वाद आणि संघर्ष टाळा आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आर्थिक बाबतीत काही विशेष फायदा होऊ शकतो.

तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस समाधानाने घालवण्याचा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. जुन्या गोष्टी विसरून नव्याने कामाला लागा आणि भूतकाळातील चुकांमधून धडा घ्या. दिवस आनंदात जाईल. जवळच्या मित्राच्या मदतीने आणि सल्ल्याने तुम्ही तुमचे वाईट काम योग्य प्रकारे करू शकाल आणि तुमचे कुटुंबीयही तुम्हाला साथ देतील.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आहे, तुम्हाला विजयाचे संकेत मिळत आहेत. तुम्हाला तुमचे सर्व व्यवहार सुधारण्याची गरज आहे. तज्ञाचा सल्ला तुमच्या उपयोगी ठरू शकतो आणि तुम्हाला मदतही करू शकतो. तुम्हाला आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागेल. तुम्हालाही याचा फायदा होईल.

• धनु :
धनु राशीच्या लोकांना भाग्य साथ देत आहे आणि त्यांना काही निर्णयात फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला कुठूनतरी अचानक फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केलात तर जास्त फायदा होईल आणि तो उपायही कायमस्वरूपी असेल.

• मकर :
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल आणि तुम्हाला जास्त काम करावे लागेल. या कारणास्तव, तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटेल. कोणत्याही चुकीचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो. काही प्रमाणात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायाच्या बाजूकडे लक्ष देणे ही तुमची प्राथमिकता असावी. दुपारपर्यंत तुम्ही तुमचा विखुरलेला व्यवसाय व्यवस्थित पूर्ण करा, तुम्हाला पुढे वेळ मिळणार नाही.

कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांचा दिवस शुभ असून तुमच्या भाग्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. जे काही काम कराल त्यात यश मिळेल. धन आणि कीर्तीमध्ये वाढ होईल. तुमच्यासाठी कुठूनतरी चांगली बातमी येऊ शकते आणि तुमचे मनोबल खूप उंचावेल. यश मिळाल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस यशाने भरलेला असेल आणि प्रत्येक बाबतीत नशीब तुमची साथ देईल. तुमची इच्छा पूर्ण होईल आणि नशीब तुमच्या सोबत असेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल आणि त्यामुळे खर्चही वाढेल. रात्रीचा काही वेळ कुटुंबासोबत घालवाल आणि मन प्रसन्न राहील.


आज मारेगावात पोलिस वेलफेअर पेट्रोलियमचा उदघाटन शुभारंभ


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 
    
मारेगाव : मारेगाव शहरातील मुख्य हायवे मार्गांवर उभारलेले यवतमाळ जिल्हा पोलिस कल्याण शाखा अंतर्गत बि.पी.सी.एल. (BPCL) कंपनीचे पेट्रोल पंप द्वारे आता वाहन धारकांना शहरातच पेट्रोल, डिझेलची सेवा मिळणार आहे. 'पोलिस वेलफेअर पेट्रोलियम'चे नव्याने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे उदघाटन आज 23 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला सकाळी 10.30 वाजता सुसंपन्न होणार आहे.

मारेगाव पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला उभारण्यात आलेल्या या पेट्रोल पंपाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न औषधी प्रशासन तथा पालकमंत्री मा.ना.संजय राठोड यांचे हस्ते होणार आहे. मा. खा.बाळू धानोरकर, मा.आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, अमरावती परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्रादेशिक प्रबंधक (BPCL) निलेश वायचल हे प्रमुख अतिथी आहे.

या उदघाटन शुभारंभाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे. 

सदरील उदघाटन शुभारंभास सर्व शहरवासियांनी उपस्थित राहावे असे, आवाहन मारेगाव पोलीस स्टेशन च्या वतीने केले आहे.

पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाने महान नृत्य गुरू हरपल्या

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

चंद्रपूर : “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनामुळे आपले जीवन शास्त्रीय नृत्याला समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नृत्य गुरुंना आपण मुकलो आहोत”, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात ते म्हणाले की, मोहिनीअट्टम आणि कथकली या नृत्य प्रकारात पारंगत असलेल्या डॉ. कनक रेळे या नृत्य गुरू म्हणूनच अधिक परिचित होत्या. आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी त्यांनी वेचले. एका तपस्विनीचे आयुष्य त्या जगल्या. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार सामान्य जनतेतही लोकप्रिय करण्यात त्यांच्या ‘नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा मोठा वाटा आहे. या संस्थांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले. भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रात त्यांनी केलेले मूलभूत संशोधन जगभर नावाजले गेले आहे. डॉ.कनक रेळे यांच्या योगदानासाठी शास्त्रीय नृत्य क्षेत्र त्यांचे कायमच ऋणी राहील ”

मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करणार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल 24/7 आणि 365 दिवस सुरु राहिल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक समितीचे अध्यक्ष असतील, तर स्वप्नील जोशी, संदीप घुगे, केतन मारु या समितीचे सदस्य असतील.

मराठी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील विविध चॅनलच्या मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार इत्यादींना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी समन्वय साधणे, त्यांना नियमितपणे सल्ला देणे आणि बिगर आर्थिक साह्य इत्यादी बाबी समितीच्या कार्यकक्षेत येतील. राज्यातील स्वातंत्र्यसेनानी, इतर महत्वाचे समाजसुधारक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती इत्यादींच्या जीवनावर आधारी चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब मालिका इत्यादी निर्मितीसाठी प्रयत्न करणे तसेच शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे काम ही नियुक्त समिती करणार आहे.

मराठी निर्मात्यांना आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बँकांकडून कमीत कमी दरात हमी मिळेल का याबाबतही अभ्यास करणे. भौतिकरित्या होणाऱ्या फिल्मबाजार पद्धतीचा अभ्यास करुन ऑनलाईन पोर्टल तयार करण्याबाबतचा आराखडा शासनास सादर करणे, तसेच आवश्यकतेप्रमाणे मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती/ संस्था यांच्याशी समन्वय करणे हे काम समिती करेल. याशिवाय पोर्टल तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विकासक यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधण्याचे काम करेल.

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : आज 22 फेब्रुवारी 2023 रोजी तहसील कार्यालय महागाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यामध्ये तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महागाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा ताबडतोब द्यावा प्रोत्साहन पर अनुदान रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी, तसेच विद्युत महामंडळाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तोडलेल्या वीज कनेक्शन मुळे शेतकऱ्यांची पिके वाढत असून वीज कापणीची कारवाई त्वरित बंद करावी, 100 टक्के अनुदानावर कुसूम योजनेअंतर्गत सौर पंप देण्याची मागणी सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच मागेल तेथे पांदन रस्ता सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली, कापूस सोयाबीन या पिकाच्या पडलेल्या भावासंदर्भात राज्य सरकारने केंद्रासोबत समन्वय साधून त्वरीत भाव वाढ करण्यात यावी यासह आनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी मनिष भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, महिला जिल्हा आध्यक्ष मेघाताई बोरूळकर, युवा जिल्हा अध्यक्ष शिवानंद राठोड, जिल्हा संघटक सचिन उबाळे, युवा तालुका अध्यक्ष प्रमोद अडकिने, दिपक हाडोळे तालुका उपाध्यक्ष, विशाल पवार जिल्हा सचिव, सचिन शेळके, गोविद देशमुख, गुणवंत देशमुख, पांडूरंग आंडगे, नंदु मस्के, निलेश खरात, संदीप जाधव, धाडवे काका, अंकुश आडे, शिरीष बोरूळकर, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.