निधी अभावी "मोदी आवास" घरकुल बांधकाम ठप्प!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी "मोदी आवास" घरकुल योजना राबविण्यात येत आहे. मात्र, त्या योजनेचा लाभ (निधी) थांबल्याने घरकुल लाभार्थीचा संसार उघड्या वर आला आहे. त्यामुळे "मोदी आवास" घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले देयके त्वरीत देण्यात यावे, अशा आशयचे निवेदन बुधवारी (ता.26) सरपंच संघटनेच्या वतीने पंचायत समिती चे गटविकास अधिकारी भिमराव व्हणखंडे, मारेगाव यांच्या मार्फत मा. हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग भारत सरकार नई दिल्ली, यांना देण्यात आले. 

सन २०२३-२४ च्या मोदी (ओ.बी.सी.) आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना जो लाभ (निधी) मिळत होता, त्या निधीला दि. २३/०५/२०२३ पासून ब्रेक लागलेला आहे. मात्र, पावसाळा सुरु झाला असून लाभार्थ्यांचे बांधकाम योजनेच्या देयकापासून ठप्प पडले आहे. निधी अभावी लाभार्थ्यांना थातुर-मातुर झोपड्या करुन आपल्या कुटुंबासह ऐन पावसाळ्यात उघड्यावर गुजरान करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे जिवन धोक्यात आले, असून ही योजना ग्रामीण भागातील लोकांना हिताची कि धोक्याची असा गंभीर प्रश्न लाभार्थ्यातून उपस्थित होत आहे.

तालुक्यातील लाभार्थ्यांची सध्याची अवस्था पाहता,आणि पावसाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन "मोदी आवास" घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले देयके तत्काळ देण्यात यावे,करीता अखिल भारतीय सरपंच परिषदचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मा. हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग भारत सरकार नई दिल्ली, यांना निवेदन दिले. 

निवेदनावर अध्यक्ष अविनाश लांबट, सुरेश लांडे, मालाताई गौरकार, राहुल आत्राम, नंदाताई मेश्राम, चंदू जवादे, प्रवीण नान्हे, श्रीकांत गौरकार, ललिता गौरकार, प्रशांत भंडारी,दिलीप आत्राम, शशिकांत तावाडे, गोवर्धन तोडासे, प्रमोद आत्राम, मारोती तुराणकर,रुपेश ढोके, गणेश लांडे, सदाशिव मेश्राम सह सर्व सरपंच उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.