सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
जगात भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे मतदान हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असून मतदान करणे केवळ हक्कच नाही तर आपले प्रथम कर्तव्य आहे. आपले व देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे.
येत्या 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याचा सर्वांना आग्रह करा, असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यासह वणी मतदार संघातील असंख्य तरुण तरुणी गावात रोजगार नसल्यामुळे ते मुंबई पुणे येथील कंपनीत काम करण्यास गेले. अनेकांनी गाव सोडून पुण्यामुंबईकडे धाव घेतली आहे. यंदाची ही निवडणूक अत्यंत महत्वाचे मानली जात आहे. मात्र, अनेक होतकरू नवयुवक केवळ मतदान करण्यासाठी येऊ शकणार नाही किंबहुना त्यांना मुंबई पुणे प्रवास भाडे, येणे-जाणे परवडणारे नसल्याने या मतदानापासून ते मुकतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पोटापाण्यासाठी शहरात गेलेली वोटर ; अखेर त्यांची अडचण तरी काय? त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का घटतील का? किंवा अशा मतदारांना काही सोय उपलब्ध करता येइल का?..असे एक ना अनेक प्रश्न असून ही बाब कोण लक्षात घेणार? असा सवाल जवाब आहे.