सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगांव : मौजे सगणापुर येथे 26 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान, एका शेतकऱ्याचा शेतातील चना अज्ञात इसमाने आग लावली. जमा करून ठेवलेली गंजी जळून खाक झाली. यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
वणी तालुक्यातील विठ्ठल झोलबाजी वैद्य या शेतकऱ्याची सगणापुर येथे 9 एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी 3 एकरात चना पिकाची लागवड केली होती व ऊर्वरीत शेतात गहु आणि कपाशी या पिकांची लागवड केली. सध्या परीसरात चना पिकाच्या कापणीला सुरूवात झाली असून चना जमा करून शेतातच ठेवला जात असतांना विठ्ठल यांनी सुद्धा आपल्या शेतातील हरबरा पिकांची कापणी करून शेतातच चना जमा करून ठेवला होता. रविवारच्या सायंकाळी सालगडी दिवसभर शेतातील काम करुन घरी गेल्यानंतर शेताकडे काही तरी जळत असल्याचे निदर्शनास येताच सालगडी व गावातील काही नागरीकांनी लगेच शेताकडे धाव घेतली असता, त्यांना शेतातली चण्याचे ढीग जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चण्याला आग लागली कशी या चर्चेला उधाण आले असून या आगीत शेतकऱ्याची कमाई जळून खाक झाली. या घटनेबाबत शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
अज्ञात इसमाकडून हरबऱ्याच्या गंजीला आग लावल्याचा कयास असून यात शेतकऱ्याचे 8 ते 10 क्विंटलचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आधीच शेत मालाला भाव नाही, कापसाच्या चोरीचे प्रमाण वाढले, शेतातील साहित्य लंपास केले जात असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असतांना आता एका शेतकऱ्याचा हरभरा जळाल्याची घटना समोर आली. यात मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर बाबीबाबत मारेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. अज्ञाताविरोधात कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.