सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकदिवसीय पक्षाची संघटनात्मक बांधणी आढावा बैठकीचे आयोजन राजीव गांधी सभागृहात कार्यकर्त्या सोबत आढावा घेतल्यानंतर विश्राम भवन येथे समविचारी पक्ष असलेला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे काही समाजबांधवांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन चंद्रपूर शहरात आगमानिमित्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यावेळी थोडक्यात संवाद साधतेसमयी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण सर्व शोषित वंचित घटक असून आपण या देशाचे समदुःखी वर्ग आहोत ज्याप्रमाणे शोषकांची एकच जात असते त्याचप्रमाणे शोषितांची एकच जात ती शोषित वंचित होय. त्यामुळे हजारो शतकाच्या शोषणाचा पाढा वाचून आम्हाला न्याय मिळणार नाही तर त्याकरिता समविचारी पक्ष संघटनेनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची गरज आहे. आपण एकत्र आल्यास पुढचे मुख्यमंत्री आपल्यातील असणार आहे. आपण मात्र लोकशाहीची ताकद ओळखण्याची गरज नितांत आहे.असे उपस्थित विश्राम भवनातील भेटी दरम्यान संवाद साधून गोंगपाच्या कार्यकर्त्याना आशेचा मार्ग दाखविला यावेळी
गोंगपा माजी जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी,गोंगपा युवा नेते गजानन पाटील जुमनाके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा पांडुरंग जाधव, डॉ प्रकाश वट्टी, डॉ कोटनाके व संतोष कुळमथे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुसे साहेब जयदीप खोब्रागडे तथा कार्यकर्ते उपस्थित होते.