कृषी दूतांनी दिला जल शुद्धीकरणाचा धडा

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२६ ऑगस्ट) : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाअंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड या महाविध्यालयाचा कृषिदूत विध्यार्थी वैभव ज्ञानेश्वर देवतळे याने तालुक्यातील मौजा वडगांव येथील लोकांना जल शुद्धीकरणाचा संदेश दिला.

पावसाळा आला की गावांतील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी मध्ये दूषित पाणी जमा होते.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायलं जातं. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ या सारखे आजार होतात.
अश्या जीवघेण्या दूषित पाण्यातील घातक विषाणू नष्ट करण्यासाठी योग्य प्रमाणात ब्लिचिंग पावडर चा वापर योग्य ठरतो. पाणी निर्जंतुकीकरण ब्लिचिंग पावडर द्वारे कसे करावे व त्याचे फायदे याबाबत वैभव देवतळे यांनी मार्गदर्शन केले. 
          
या प्रसंगी कृषी महाविद्यालय उमरखेड चे प्राचार्य एस. के. चिंताळे, प्रा. वाय. एस. वाकोडे, प्रा. आनंद राऊत व ग्रामीण कृषी कार्यक्रम अधिकारी आर . के . सपकाळ यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.