गोर-गरीब अंधारात: पूर्व सूचना न देता घराच्या कापल्या "लाईट"


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२६ ऑगस्ट) : मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जाते. शहरासह खेड्या पाड्यात आदिवासी लोकं भरपूर प्रमाणात वास्तव्यास आहेत. परंतु यामध्ये दुर्गम भागातील अनेक लोकं अशिक्षित आजही आहेत. त्यांना अजूनही फारसे लिहता वाचता येत नाहीत. याचाच फायदा घेत विज वितरण कंपनीचे अधिकारी नियमांची पायमल्ली करीत गोर-गरीब, सामान्य, आदिवासी लोकांच्या जबरीने विद्युत पुरवठा खंडित केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे घडली आहे.

आज गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी विद्युत वितरण कंपनीचे बिल वाटप केले. बिलावर दिनांक ०३/०९/२०२१ ही बिल भरण्याची अंतिम तारीख दिली आहे. विज बिल हे ०३/०९/२०२१ पर्यंत भरण्याची मुदत असतांना सुद्धा विज कंपनीकडून जाणून बुजून आज रोजी गोर गोरगरीब, आदिवासी लोकांचा पुरवठा खंडित करून त्यांचे दिवस अंधकारात टाकले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, घरादारात उजेळ नसला तर विषारी किडे, साप, विंचू यांची चावा घेण्याची दाट शक्यता असते. शिवाय कठीण काळ सुरु आहे. अशावेळी सध्याच्या परिस्थिती चा विचार न करता, किंबहुना पूर्व सूचना न देता सरसकट सहा ते सात घराची विज काटली आहे. या वरून असे दिसून येते की, बिलांवर दिलेली अंतिम तारीख ही दिखाव्या करिता विज वितरण कंपनी लिहितात की काय? असा प्रश्न उपस्थित होऊन अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केली नाहीत हे कसे नाकारता येतील.
  
याबाबत ग्राहकांना विचारणा केली असता, त्यांना लेखी कोणताही नोटीस दिलेला नाहीत. ते ग्राहक अंतिम तारखे पर्यंत बिल भरण्यास तयार असतांना सुद्धा अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैर वापर करीत गरीब आदिवासी लोकांवर केलेला अन्यायच आहेत. नियमानुसार त्यांनी लेखी नोटीस देवून त्यांना सूचित करणे गरजेचे असतांना त्यांना सूचित न करताच पुरवठा खंडित करून नियमांची पायमल्ली केलीच अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावीत असे ग्राहकांतून बोलल्या जात आहेत.
  
या पूर्वी देशात कोरोना लॉकडाऊन मुळे देशातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गोरगरिबांचे तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करण्याकरीता देशातील सर्वच राजकीय पक्षाने विविध आंदोलन केले होते. परंतु तरीही राज्याच्या शासनाला ह्या बद्दल थोडीफार सुद्धा आपुलकी वाटली नाहीत, ही या राज्याची खंत आहेत. यामुळे राज्य शासनावर गरीब जनता नाराज असल्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलल्या जात आहेत.
    
तसेच राजकीय पक्षांनी केलेले आंदोलन हे फक्त दिखावाच होता की काय? असा जनते मधून सूर येत आहेत. ज्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बिलांवर दिलेल्या अंतिम तारखे पर्यंत न थांबता, बिल दिली त्याच दिवशी गरीब लोकांचा विद्युत पुरवठा खंडित करून अन्याय केलाय त्यांचेवर शासनाने कडक कार्यवाही करावीत असे जनते मधून मागणी केली जात आहेत.