श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस वणीत अभिवादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा चौक वणी येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने किरण ताई संजय देरकर यांच्या प्रमूख उपस्तीतित मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व हारार्पण कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

सर्वप्रथम श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाला किरनताई संजय देरकर, विजय चोरडिया, दिपक कोकास,सुनील कातकडे, संभाजी वाघमारे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर, यांचे हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गरजूंना ब्ल्यंकेट तर महाप्रसादाचे वितरण.

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिननिमित्त गरजवंताला ब्ल्यांकेट वाटप नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनात तर महाप्रसादाचे वितरण व्यवस्था संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.

गाडगे बाबांच्या कार्याची उजळणी.

गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजयाताई दहेकर, विजय चोरडिया, किरणताई देरकर,सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची महती सांगितली.
 
समाजाला गाडगे बाबांच्या स्वचछता व शिक्षणाची व निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन किरणताई देरकर यांनी केले.

यावेळी गीता ताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके,बेबी ताई थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके,रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर , माधुरी फाले राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे भगवान मोहिते, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, राजु धावंजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी, महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार, डॉ जगन जुनगरी, नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर, सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले, पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर, विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे,राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके उपस्तीत होते.

स्मारक स्थळी वृक्षारोपण..

आज श्री संत गाडगेबाबा स्मारक निळापूर रोड येथे संत गाडगेबाबांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बाबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

दहाव्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेची छेड काढणारा युवक गजाआड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : नवरगाव येथे तालुका स्तरीय क्रीडा सामने बघायला गेलेल्या सगणापूर येथील तरुणाने बालिकेची हात पकडत छेड काढत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली.आशिष उर्फ गोलू रमेश धानोरकर (19) असे संशायित आरोपीचे नाव आहे.

संशायित याने तीन वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेची छेडखाणी केली होती. सदर पिडीत बालिकेसोबतही सातत्याने लगट लावत होता.मात्र, ताकीद देवून सामंजस्याने हे प्रकरणे निवळली होती. मात्र,सदर पिडीत मुलीवर गत दोन महिन्यापासून पाळत ठेवून अधूनमधून बहाण्याने तो तिला धमकीवजा टावरे मारत असे.

गुरुवारला शालेय क्रीडा सामने नवरगाव येथे असतांना पिडीत बालिका सामने बघत होती. सामना सुरु होण्यापूर्वी ती मैत्रिणी सोबत पाणी पिण्यास प्रांगणाच्या बाहेर आली तोच चक्क तिची छेड काढू लागला. माझ्याशी का बोलत नाही. एवढेच नव्हेतर कुणाला सांगितल्यास तुला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीने ती पूर्णतः घाबरली. क्रीडा सामने बघणे सोडून ती स्वगावी परतली. घरी ढसाढसा रडत असतांना भाऊ कॉलेजमधून घरी आला. आई वडील नातेवाईकांकडे गेले होते. भावाला आपबिती कथन केल्यागत थेट पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दाखल होताच संशायित आरोपी आशिष रमेश धानोरकर (वय 19) याचेवर पोस्को कलम 74,75,78,8,12 अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा 3 (1), 3 (2) नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत..महाराष्ट्र आता थांबणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नागपूर : राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजूरी दिली असून यामध्ये 2 लाख 39 हजार 117 कोटींची गुंतवणूक तर 79 हजार 720 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील 47 मोठ्या प्रकल्पात 1 लाख 23 हजार 931 कोटींची गुंतवणूक होऊन 61 हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात 38 प्रकल्पात 74 हजार 646 कोटी गुंतवणूक व 41 हजार 325 रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात 136 प्रकल्पात 1 लाख 49 हजार 493 कोटींची गुंतवणूक होऊन 1 लाख 10 हजार 588 रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छ. संभाजीनगर, जालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचिन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. आता न्यायालयाती निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडिच वर्षात 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे 25.21 लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखील येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहत देण्यात असून यामुळे देखील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मेट्रो प्रकल्प गतीमान
मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मुंबईत मेट्रो टप्पा ३ चे काम अंतिम टप्प्यात असून बीकेसी ते कुलाबा ही नवीन लाईफ लाईन होणार आहे. 17 लाख प्रवाशी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत ही लाईन खुली होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांकडून वीज बील घेणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात कनेक्शन देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2030 साली राज्यात 52 टक्के उर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदर विकासाचे केंद्र
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पालघर येथे ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर करण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं असून वाढवण बंदरामुळे अनेक फायदे होणार. राज्याच्या देशाच्या विकासात वाढवण बंदरचे मोठे योगदान राहणार असून यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे आय टी पार्क
नाशिक येथे आय टी पार्क विकसित करण्यात असून या कामासाठी वास्तू विषारदाची नेमणूक झाली आहे. लवकरच येथे अद्ययावतआयटी पार्क निर्माण केला जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेने मोठ्या आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून राज्याला विकासात प्रथम क्रमाकांवर कायम ठेवूया.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना सरकारच्या पुढील वाटचालीबाबत मनोदय अशा ओळीतून आपली भूमिकाच मांडली...

या ओळी पुढीलप्रमाणे...

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही...

पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही...

असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही...

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. आंबेडकरांचा अपमान, आक्रमक विरोधकांचा बुधवारी संसदेत हंगामा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : काँग्रेस पक्षासाठी आंबेडकराचे नाव घेणे 'फॅशन' बनले आहे. जर त्यांनी इतक्या वेळा आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना 7 जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत केले. असे वक्तव्य करून अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत आक्रमक विरोधकांनी बुधवारी संसदेत हंगामा करत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
संविधानाला ७५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन दिवसीय चर्चा झाली. या चर्चेचा समारोप करताना मंगळवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत काही विधाने केली. 'आता ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... इतक्या वेळा नाव जर देवाचे घेतले असते तर त्यांना सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता,' असे वादग्रस्त वक्तव्य अमित शाह यांनी केले. अमित शाह हे वक्तव्य करत असताना काँग्रेस सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतले.
बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष या मुद्द्यावर आक्रमक झाला. विरोधी पक्षांनी बुधवारी या मुद्यावर चर्चेसाठी नोटीस दिली आणि अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दोन्ही सभागृहात चर्चेची परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली. 

तहसीलदारांची कारवाई;अवैध वाहतूक करणारा वाळूचा ट्रक पकडला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : अवैध वाळू वाहतूक करत असलेला ट्रक महसूल विभागाच्या पथकाने आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास सावंगी शिवारातून पकडला आहे. सदरहू कारवाईने वाळू माफियांना चाप बसवला आहे. 

उपविभागीय अधिकारी, वणी यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/12/2024, गुरुवार रोजी सकाळी ठिक 8.30 वाजताचे दरम्यान मौजे सावंगी शिवारातून अंदाजे 13 ब्रास अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असतांना मोठा ट्रक क्र. (एम एच 40,सी टी 0776) हे वाहन स्वतः तहसीलदार यांनी पकडून तहसील कार्यालय मारेगांव येथे जमा करण्यात आलेला आहे. 

त्यावेळी स्वतः तहसीलदार उत्तम निलावाड मारेगांव, तलाठी वानखेडे, शिंगणे, गुणवंत, कुडमेथे, विकास मडावी, कोतवाल दिलीप पचारे इत्यादी उपस्थित होते. या धडक कारवाई ने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.