भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!


प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या राष्ट्राची चैतन्यशीलता साजरी करूया आणि आपल्याला अभिमानास्पद भारतीय बनवणाऱ्या मूल्यांची प्रशंसा करूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन हा काही निव्वळ दिवस नाही तर त्यामध्ये भारतीय संस्कृती मूल्य दडली आहेत आणि याचे संपूर्ण सार सर्वांनीच जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या घरातील सदस्यांना ही संस्कृती मूल्य जपण्याची आठवण करून द्या.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
आज आपण स्वातंत्र्याच्या देणगीबद्दल कृतज्ञ होऊ या आणि आपल्या प्रिय देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा प्रयत्न करूया. समानता आणि अभिमान जपताना आपली सर्वांची प्रगती होऊ दे याच विचाराने आपण चालायला हवे. जेणेकरून प्रगतीकडे वाटचाल होईल.
प्रजासत्ताक दिनाच्या पुनःश्च शुभेच्छा....

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...
सर्वांसाठी समृद्ध, न्याय्य आणि सर्वसमावेशक असे भविष्य घडवण्यासाठी स्वातंत्र्याचा आत्मा आपल्याला प्रेरणा देईल.

प्रजासत्ताक दिनी तुम्हाला सर्वांना नक्कीच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण येऊन त्यातून पुढे जगण्याची प्रेरणा मिळावी हीच इच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
आपल्या महान राष्ट्राच्या सामर्थ्याचे, धैर्याचे आणि एकतेचे प्रतीक असलेला ध्वज नेहमी उंच फडकत राहू दे!!

आणखी एका ट्रॅक्टर वर महसूल विभागाचा छापा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल

मारेगाव : तालुक्यातील नाले, नदी च्या लगत असलेल्या परिसरातुन अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने महसूल विभागाकडून रेती तस्करांचे मनःसुबे हाणून पडण्यासाठी कंबर कसली असून भालेवाडी फाट्यावरील प्रकरण ताजे असताना काल आणखी वनोजा देवी परिसरात मध्यरात्री एक ट्रॅक्टर महसूल पथकाच्या गळाला लागला आहे. 
मारेगाव तालुक्यात हर्रास नसताना दररोज मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून, शासनाचा लाखों रुपयाचा महसूल रेती तस्करांच्या घशात जात आहे. या रेती चोरट्यावर तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम मागील काही दिवसापासून सुरु असून संबंधित विभाग ऍक्शन मोडवर आले असता,काल मध्यरात्री एका ट्रॅक्टरवर धडक कार्यवाही केली असल्याचे माहिती आहे.
दि.२६ जानेवारी रोज शुक्रवारच्या मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान,डोल डोंगरगाव (वनोजा देवी परिसरातून) येथून एक अवैध रेती भरलेले चोरीचे ट्रॅक्टर पकडून महसूल विभागाने कार्यवाही केली. कडक्याच्या थंडीत ट्रॅक्टर चा पंचनामा करून रेती भरलेले ट्रॅक्टर दंडात्मक कारवाई साठी तहसील कार्यालयात जमा केले. 
परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभागाने कंबर कसली असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार निलावाड, मंडल अधिकारी घुगाने, तलाठी एस सी कुळमेथे, व विवेस सोयाम हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. महसूल विभागाच्या रात्रीच्या गस्तीने रेती तस्करांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. 

शिवपुराण कथे निमित्ताने मारेगाव ते वणी महामार्ग बंद न करण्याची राजूर, निंबाला, भांदेवाडा व कळमना वासियांची मागणी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : दि. २७ जानेवारी ते २ फेब्रु. दरम्यान परसोडा येथे भव्य शिवपुराण कथा होत आहे. त्या अनुषंगाने ७ दिवसाच्या प्रवचनाला लाखो भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्या साठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुवयवस्थेचा भाग म्हणून मारेगाव ते वणी हा महामार्ग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी, गृहविभागाने काढला आहे.
ह्यामुळे राजूर, निंबाला, भांदेवाडा, बोदाड, झरपट, सोमनाला व कळमना ह्या गावांना त्रास होणार आहे ह्या करीता संबंधित गावांचा रहिवासियांकडून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वणीला आलेले एडी. एस पी जगताप साहेब ह्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. ह्या वेळेस जगताप साहेबांनी सर्वतोपरी पोलीस विभाग सहकार्य करेल मार्ग संबंधित बाधित गावांना मोकळा करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

वणी ते मारेगाव हा महामार्ग बंद करण्यात आल्याने कोणतीही वाहने नेता येणार नसल्याने  १) शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेता येणार नाही. २) वणी व लाल पुलिया परिसरात तसेच अन्य ठिकाणी रोज मजुरीवर जाणाऱ्या मजुरांना कामावर जाता येणार नाही. ३) ऑटो ने वणीला शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जाता येणार नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ४) वाहतूक बंद झाल्याने चुना उत्पादन ठप्प होणार परिणामी चुना उद्योगातील शेकडो कामगार रोजमजुरी पासून वंचित होणार. ५) गावात किराणा व अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होईल व येथील किराणा व अन्य व्यवसाय बंद राहतील व त्यामुळे येथील नागरिक आवश्यक वस्तूंपासून वंचित होतील. ६) कोळसा खाण व अन्य कामावर येणारे कामगार वाहतूक अभावी येऊ शकतं नसल्याने कोळसा व अन्य उत्पादनावर परिणाम होणार आहे, ह्या महत्त्वाचा मुद्दा व प्रश्न निवेदनात तथा एडी. एस.पी. जगताप साहेब यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात आली. ह्या वर जगताप साहेबांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 
ह्या प्रसंगी राजूर, भांदेवाडा, निंबाळा ग्रामपंचायत व राजूर बचाव संघर्ष समितीने निवेदन सादर करून रस्ता सुरू ठेवण्याची मागणी केली. यावेळेस राजूर सरपंच विद्या पेरकावार, मोहम्मद असलम , कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, साजिद खान,अनिल डवरे, प्रदीप बांदुरकर, सुशील आडकिने, प्रवीण पाटील, श्रीनिवास अलवलवार, महेंद्र श्रीवास्तव, भांदेवाडा उपसरपंच प्रेमा धानोरकर, निंबाला सरपंच सुनीता मनोज ढेंगले, कळमना सरपंच राहुल क्षीरसागर, झरपट येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप माटे प्रामुख्याने उपस्थित होते.