अचानक आवाज झाला आणि वीज कोसळली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरासह तालुक्यातील विविध भागात आज पावसाने हजेरी जोरदार लावली. आणि याचवेळी वणी शहरातील एका पेट्रोल पंपा जवळ वीज कोसळली. यावेळी ग्राहक आणि येथील कर्मचारी उपस्थित होते. सुदैवाने जीवितहानी टळली.
आज दुपारीपासून मोठा पाऊस पडला, साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक आवाज झाला आणि थोड्याच वेळात शहरातील मुख्य मार्गांवरील अगदी तहसील, न्यायालय समोरील पेट्रोल पंपाच्या जवळच लागून असलेल्या झाडावर वीज पडली. दरम्यान, मोठा आवाज झाल्याने पेट्रोल पंपा वरील ग्राहक कामगार घाबरून गेले. 
भारत पेट्रोलियम पंपा वर ग्राहक व काम करणारे कर्मचारी आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे निवांत जमले होते, पाऊस सुरु असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडता सुद्धा येत नव्हते, अचानक येथील पेट्रोल पंपाच्या संरक्षण भिंतीला लागूनच असलेल्या झाडावर वीज कोसळली. पेट्रोल पंप च्या लगत असलेले जनरेटरने पेट घेतल्यामुळे सर्व घाबरून गेले व काही काळ तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान,प्रत्यक्षदर्शी वीज झाडावर पडल्याचे खुणावून सांगत होते.यात पेट्रोल पंप चालकाचे मोठे नुकसान झाले,सुदैवाने जीवितहानी टळली.


शेतकऱ्यांना फसवणूकची तक्रार करण्यासाठी कृषी विभागातर्फे व्हाट्सॲप क्रमांक जारी..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पावसाळा असल्यामुळे शेतकऱ्यांची पीक लागवड करण्याची लगबग सुरु आहे. काही ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेती कामांना वेग आला आहे. अशातच शेतकऱ्यांची बियाणे, कीटकनाशके, खतांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. याच फसवणुकीच्या पार्शवभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक जारी केला आहे. शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचणी आल्यास व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार आहे. 
तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी विभागाने कार्यान्वित केलेला अधिकृत व्हाट्सॲप नंबर 9822446655 हा आहे. शेतकऱ्यांनी या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
याशिवाय शेतकरी मित्र 8446117500, 8446221750 किंवा 8446331759 या मोबाईल नंबरवर देखील संपर्क साधू शकता. 

याशिवाय कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती हवी असल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे. शेतकऱ्यांची तक्रार निवारण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून निवारण कक्ष देखील सुरु केला आहे. हा कक्ष 24 X7 कार्यरत असणार आहे. 
तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.


मणिपूर मध्ये दोन बगिनींची निर्वस्त्र करून धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशी द्या - शिवसेना


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
            
मारेगाव : मणिपूर मध्ये दोन बघिंनीची निर्वस्त्र करून रस्त्यांवर घुमविणाऱ्या समाज कंटकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज (ता.25 जुलै) रोजी येथील मार्डी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे त्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करून मणिपूर व केंद्र सरकार विरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. आपल्या घरातही आई-बहिनी आहे याची झुंडीला अजिबातही जाणीव नसते. त्यामुळे झुंडीतील समाजकंटक ही कोणाच्याही अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू शकते. कोणालाही रस्त्यावर उघडे करून जाहीरपणे त्याच्या शरीराशी चाळे करू शकते. आमच्या अवतीभवती वावरणाऱ्या आमच्याच भगिनीला सर्वासमक्ष नागडे करून रस्त्यावर फिरवताना समाजकंटकाला कशाचीही भीती राहिली नाही. देशात कायदे जिवंत आहे की नाही हे दृश्य जनता बघत आहे.
मणिपूरमध्ये दोन भगिनींची रस्त्यावर निर्वस्त्र करून झुंडीने काढलेली धिंड देशाला तालिबानी संस्कृतीकडे नेणारी आहे. अडीच महिन्यापासून मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार सुरू आहे. शेकडो लोकांचे मृत्यू झाले आहे. हजारो लोक बेघर आहे. लहान मुलामुलींचे अतोनात हाल सुरू आहे. असे असताना या देशाचे प्रधानमंत्री एक शब्द सुद्धा बोलत नाही. युरोपियन संसदेमध्ये मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा होते. परंतु देशाच्या संसदेमध्ये मात्र चर्चा करण्यास मनाई असते. त्यामुळे भारत सध्या कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे हे सांगण्याची गरज नाही. जमाव जेव्हा एखाद्या महिलेला रस्त्यावर निर्वस्त्र करतो आणि जाहीरपणे त्या महिलांची धिंड काढतो तेव्हा आमचा समाज कोणत्या विषाणूंनी भरलेला आहे हे लक्षात येते. आपल्या देशात कोणावरही संशय व्यक्त करून त्याच्या घरावर हल्ला करू शकते. असे निर्लज वर्तणूक करणाऱ्यावर कडक कायदे कारवाई फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच अशा प्रकारच्या कृत्याला आळा बसेल अन्यथा अशा प्रकारचे मुकदर्षकपणे पाहत रह्ययचे.
या मनोविकारी समाजकंटकाला स्वतःचे आचार विचार काही नसतात राक्षशी प्रवृत्तीचा बनला असते. हा समूह, क्रूर असते, निष्ठुर असते, निर्लज्ज असते आणि निगरगट्टही असते. या स्फोटक समुहाला मन,माया,ममता अजिबात नसते. हा घटक समूह फक्त आपल्या मालकाचा जयजयकार, उदोउदो करीत असते. या सरकारला निवडून देऊन जनतेला पश्चाताप होऊन राहिला. हे घातक, भयानक, धर्मांध विषाणू जर आमच्या घरात येऊ द्यायचे नसतील तर आम्हाला प्रत्येकाने या घटनेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक जागृत नागरिकाने अशा घृणास्पद कृत्याविषयी न घाबरता बोलले पाहिजे.तरच आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो असे आम्हाला अभिमानाने सांगता येईल.अन्यथा आम्ही सुद्धा त्या समूहाचा एक भाग आहोत आणि आमच्याही भावना,वेदना,संवेदना मरण पावलेल्या आहेत या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटा तर्फे मार्डी चौकात मणिपूर सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात नारे निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देऊन नराधमांना फाशी ची देण्याची मागणी केली. 
उपस्थित तालुका प्रमुख संजयभाऊ आवारी, सुनीलभाऊ गेडाम संघटक, नगरसेवक जितेंद्रभाऊ नगराळे, डॉ मनिष मस्की, युवासेना प्रमुख मयूर ठाकरे, राजूभाऊ मोरे, संजयभाऊ जिवने, सोमेश्वरभाऊ गेडेकार, विजयभाऊ अवताडे, पंकज नेहारे, मालाताई बदकी, नगरसेविका, दुमदेव बेलेकर, सुरेश पारखी, प्रसाद चौधरी, मुकुंदा निवल, संचालक कृ.बा.स.जीवन काळे, ब्रम्हदेव जुनगरी, मनोज वादाफळे, वर्षाताई किंगरे नगरसेविका, बळीराम भाऊ आदीं सह 
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मणिपुरमध्ये अत्याचार घडवून आणणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : मणिपुर येथे आदिवासी स्त्रियांवर बलात्कार करून नग्न धिंड काढण्यात आली व त्यांच्या अब्रुची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगून देशाची मान शरमेने खाली झुकवण्यात आली. देशाला या कलंकित करणाऱ्या घटनेविरुद्ध वणी येथील आदिवासी सामाजिक एकता संघटनेने मा.उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा.महामहिम राष्ट्रपती तसेच मा.ना.केंद्रीय कायदामंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना एक निवेदन देण्यात आले. मणिपुरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर व त्यांवर सामुहिक बलत्कार करून त्यांचा खून करणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित अटक करुन त्यांना फाशिची शिक्षा करण्यात यावी अशी जोरदार मागणी करून तीव्र शब्दात निषेध केला आहे.
मा. उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देतांना आदिवासी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा.रमेशजी मडावी, मा.गीत घोष, मा.रामदासजी गेडाम, मा. उत्तमरावजी गेडाम, मा.पुष्पाताईआत्राम, धनराज मेश्राम, भाऊराव आत्राम, श्रीकृष्ण मडावी, गजानन बदखल, अंकीत देठे, स्वप्नील मंदे, ऋषी चांदेकर, सतीश गेडाम, सौ.रीना जुमनाके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आता पोलीसही कंत्राटी; पोलीस दलात तीन हजार पदे भरण्याचा निर्णय..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे.मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.
पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गरज का?
राज्य सरकारने २१ जानेवारी
२०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे.