लाखापूर आकापूर रस्त्याची झाली चाळण,प्रशासनाचे दुर्लक्ष,ग्रामस्थांतून नाराजी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

मारेगाव : तालुक्यातील अनेक खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था वाईट झाली आहे. अशातच वनोजा देवी वरून लाखापूर-आकापूर कडे जाणारा रस्ता जास्तच खराब झाला आहे. 

तालुक्यातील लाखापूर रस्ता पूर्णतः उखडला असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्या उखडल्याने खड्ड्यांचा लांबून त्यांचा अंदाज येत नसून वाहन धारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांची गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखापूर आकापूर रस्त्याच्या  दुरावस्थेमुळे या मार्गांवर प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे बोलले जात आहे.

गेली अनेक वर्षापासून लाखापूर ते आकापूर हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता बहुतांश उखडलेला असून, या रस्त्यावर चार चाकी वाहन नाचत चालली असल्याचा भास होतो. शिवाय प्रवाशांच्या कंबर दुखण्यात तथा मणक्याच्या आजाराचे प्रमाण वाढण्याची ओरड असून त्यात रात्रीच्या वेळी कोणता खड्डा चुकवू अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. 

उद्या मारेगावात स्त्री शक्ती समाधान शिबीर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तहसील कार्यालय तथा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विध्यमाने शहरातील बदकी भवन मध्ये 26 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलाच्या हक्काचे सरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडता येणार आहे. शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या अडचणी कशा प्रकारे सोडविल्या जातात याबाबतचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच समाजातील पीडित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.

शासकीय स्तरावरून कोण, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ कसा घेता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्गदर्शनासाठी जिल्हा स्तरावरून वनस्टॉप सेंटर, चाईल्ड लाईन, विधी सेवा प्राधिकरण, बाल सरक्षण कक्षाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, कृषि विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशु संवर्धन विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महिला बचत गट, महावितरण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच इतर विभागातील अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे.

26 मे रोजी दुपारी 1 वाजता होणाऱ्या शिबिराचा तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मारेगाव तथा तहसीलदार मारेगाव यांनी केले आहे.

आमदार बोदकूरवार यांचा करिष्मा कायम: वणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अ‍ॅड. विनायक ऐकरे तर उपसभापती विजय गारघाटे यांची निवड


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीकरिता 24 मे रोजी सभेचे आयोजन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये सभा घेण्यात येणार असल्याची नोटीस प्राधिकृत अधिकारी यांनी काढल्यानंतर यावेळी सभापती व उपसभापती पदी कुणाची निवड केली जाते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले होते.

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ला धुळ चाखीत भाजप समर्थित पॅनल बहुमताने म्हणजेच 18 पैकी 14 उमेदवार निवडणूक आले किंबहुना संपूर्ण एक हाती विजय मिळवला असे चित्र पाहायला मिळाले. यंदा भाजप समर्थित पॅनलने बाजार समिती मध्ये बहुमताने एंट्री करून सहकार क्षेत्रात आपली ताकत दाखवली. त्यामुळे वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार बीजेपी कडे आल्याने बाजार समितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा विरोधही विरोधकांकडून केला जावू शकत नाही. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी सक्षम उमेदवारांची निवड विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी नियोजन पूर्वक परफेक्ट संचालकांची निवड करून त्यांना या शेतकऱ्यांचा बहुमान समजल्या जाणाऱ्या पदावर कुशल नेतृत्वाना विराजमान केले.

आज बुधवार 24 मे रोजी बाजार समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदी अ‍ॅड. विनायक एकरे तर उपसभापती पद भाजपाचे विजय गारघाटे यांना अविरोध बहाल करण्यात आले आहे.

मात्र, महाविकास आघाडीने, तन मनाने या वेळी आपली ताकत खर्ची लावून सुद्धा बहुमताने उमेदवार निवडून आणता आले नसल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या उमेदवारांना इथून पुढे आपली वाटचाल सुरु झाली असून आगामी निवडणुकीत बीजेपी आपलाच विजय खेचून आणणार असा आशावाद यावेळी विजयी समर्थकांनी व्यक्त केला आहे. 

संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धा आश्रमाला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत व रुद्धांना फळांचे वाटप

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : संजय रामचंद्र खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी तसेच संचालक वसंत जिनिंग वणी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी या वृद्धाश्रमात जाऊन कुटुंबासहीत वृद्ध महिला व पुरुषांना फळ वाटप करून त्यांना सांत्वना व आधार दिला. त्या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत म्हणून रुपये दहा हजार (10000) ची आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्यक्ष त्यावेळेस त्यांना पैसे देऊन महिला व पुरुष वृद्धांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास भाऊ नांदेकर हे उपस्थित होते व तसेच त्यांचे संचालक सुद्धा उपस्थित होते. वयाच्या उत्तरार्धात जो आधार मिळतो असा आधार देऊन संजय खाडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत केली. यापूर्वीसुद्धा अनेक विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी अग्रेसर ठिकाणी आर्थिक व सामाजिक सुद्धा मदत केली. विविध क्षेत्रात गरीब गरजू लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत व सहकार्य केले यानंतर सुद्धा वृद्धाश्रमाला मदत करत राहू असे त्यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले.

या कार्याची सर्व लोकात संजय भाऊ खाडे यांचे कौतुक होत आहे. कारण सर्व क्षेत्रात विविध सामाजिक कार्यात त्याचा नेहमी हातभार लागत असतो, त्यामुळे कौतुकाचे उद्गार काढून त्यांच्या कार्याची प्रशंसा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास भाऊ नांदेकर त्यांनी सुद्धा संजय भाऊ खाडे यांचे आभार मानले.

तालुक्यात दोन अवैध कोल डेपो जोमात, प्रशासन कुंभकर्ण झोपेत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : तालुक्यात दोन ठिकाणी अवैध कोळशाचा चोर बाजार राजरोसपणे सुरु असून निडरपणे तस्कराकडून हा व्यवसाय जोमात आहे. हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही की 'कोयले के दलाली में इनके भी हात काले' तो नही ना अशी अर्थपूर्ण शंका निर्माण होणे सहाजिक आहे. ह्या संदर्भात नानाविध पोर्टल आणि मिडिया मध्ये बातम्या प्रकाशित होऊनही प्रशासनाला जाग येत नाही हा संशोधनाचा विषय. शासकीय अशी खुलेआम तस्करी करून शासनाच्या महसूल ला चुना लावून काही अधिकारी स्वतःचा गल्ला भरत असल्याची परिसरात रंगतांना दिसत आहे. 

कोसारा डेपो. कोसारा घाट तसा वाळू तस्करीसाठी कुपरिचित आहेच. कोसारा गावाजवळच वरोरा मार्गे येणाऱ्या कोलवाहू ट्रकमधून कोळसा चोरून किंवा कमी दरात विकत घेऊन काही मातब्बर मंडळी गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करत आहे. सोबतच परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे व सामान्य जनतेला श्वसन संस्थेशी संबंधित आजाराच्या खाईत ढकलत आहे. एवढी हिंम्मत करतांना नक्कीच प्रशासनाचं पाठबळ आहे, अन्यथा ही हिम्मत सहजसोपी नाही. ह्या समस्येच्या मुळापर्यंत जावून कारवाई होईल का? की मुळापर्यंत जाण्याची इच्छाच नाही, यावर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश येईल का ह्या आशेने सामान्याच्या नजरा खिळलेल्या आहे.

बोटोणी कोलडेपो, अगदी वणी यवतमाळ राज्य मार्गावर बोटोणी गावानजिक दर्शनी जागेवर एकमेव ढाब्या जवळ कोळशाचा अवैध डेपो वसंवला असून मोठया प्रमाणात असा तस्करी केली जात आहे. याचा नाहक त्रास ढाब्यावर जेवण प्रवाशांना होत आहे. कोळशाची भुकटी मिसळून अन्न बाधित होत असून डेपोमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का कोळशाची असा सवाल उत्पन्न झाला आहे. या डेपोत वणी, एकोणा क्षेत्रातील ट्रक कोळशाची चोरी करून खुल्या बाजारात विक्री करिता आणले जातात. किंबहुना येथून चोरीच्या कोळशाची हेरफेर केली जाते.

या चोर बाजारात दर दिवशी ५० ते ६० टन कोळशाचा अवैध व्यापार होत असताना आता पर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. परिणामी हा अवैध कोळसा मोकळ्या जागेवर उतरत असल्याने कोळशाचा धूर जेवणासाठी आलेल्या ग्राहकांच्या भोजनातून जात असल्याची तकार ग्राहकांकडून होत आहे. ह्या अवैध चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल बाजारावर 
कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.