सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२८ सप्टें.) : दि. २७ सप्टेंबर ला झुंझारपूर येथील आदिवासी महिला व बालकांना इंडीया फुड बैंकिंग नेटवर्क व अन्नक्षेत्र फाउंडेशनच्या वतीने नॅशनल हायवे 44. येथील लागून असलेल झुंझारपुर गावात राशन किट्स तसेच मुलांना शक्तीवर्धक Cadburies 5 star bournvita,Oreo Biscuits,Chocobix, Hershey’s calcium protin shakes, Natural Juices चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक जॉनसन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी केळापूर सुरेश कव्हळे तहसीलदार, प्रमुख उपस्थिती अरुणाताई पुरोहित सामाजिक कार्यकर्त्या नागपूर, सामाजिक कार्यकर्ते दयानंद सोयाम, सुनील चिंतावार ग्रामसेवक गट ग्रामपंचायत झूंझारपुर, अरुण कुलकर्णी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दत्ताजी फडणिस सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्राहक प्रहार संघटनेचे अभय निकोडे, यशवंत काळे, मार्गदर्शक दामोधर बाजोरीया कार्यक्रमाचे आयोजन व जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नागोराव भनारकर व अरुण करलुके, राहुल गेडाम, आकाश वहिले, अजय शिवरकर, विनय उस्केवार, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अरुणा पुरोहित यांनी केले व आभार प्रदर्शन प्रदिप भनारकर यांनी मानले.
आदिवासी विध्यार्थी शिष्यवृत्ती रोखीने वाटप करण्याची मागणी
सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२८ सप्टें.) : पंचायत समिती झरी (जा) अंतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा, माथार्जुन येथील आदिवासी विध्यार्थी शिष्यवृत्ती रक्कम सन- २०१९-२० रोखीने वाटप करण्याची मागणी मा.शिक्षण सभापती व मा.शिक्षणधिकारी (प्राथ), जि.प.यवतमाळ यांचे कडे आदिवासी विध्याथ्याचे पालक आणि आदिवासी समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिल जावळकर आणि श्री.मिथुन राजूरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माथार्जुन यांनी केली आहे.
माथार्जुन हे पेसा अंतर्गत येणारे दुर्गम क्षेत्रातील गाव असून येथील विद्यार्थ्याचे पाटणबोरी व झरी येथील बँकेत खाते आहे. सदर ठिकाणी ये-जा करण्यास महामंडळाची बस उपलब्ध नाही. काही विद्यार्थ्याचे बँक खाते व्यवहार न झाल्याने बंद पडले आहे. कोविड परिस्थितीत विद्यार्थी व पालकांना बँकेत जाणे धोक्याचे असून पालकांचा किमान दोन ते तीन दिवस रोजगार बुडणार आहे. यापूर्वी दोन वर्षा अगोदर कोविडचे संकट नसतांना शिष्यवृत्ती रक्कम रोखीने वाटप करण्यात आली होती.
आदर्श शाळा निर्माणामधील कार्यात समाज सहभाग निधी वर्ग १ ते ४ प्रति विध्यार्थी १००/- रु. आणि वर्ग ५ ते ७ प्रती विध्यार्थी १५०/- रुपये देण्याचे पालकांनी कबूल केले आहे. तरी पेसा अंतर्गत येणाऱ्या दुर्गम क्षेत्रातील आदिवासी पालकांच्या आणि लोकप्रतिनिधी च्या मागणीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांना दिलासा देणारी आनंदाची बातमी
सह्याद्री न्यूज | सुनील शिरपुरे
झरी, (२८ सप्टें.) : सध्या अनेक विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे परीक्षार्थी संभ्रमात पडत असल्याचं चित्र सर्वश्रूतच आहे. याच संभ्रमातून आरोग्य विभागाची परीक्षा ही सुध्दा चर्चेचा विषय ठरला आहे. आरोग्य विभागाच्या गट-क व ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ व २६ सप्टेंबरला ठरलेली परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळेही परीक्षार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षासंदर्भात आज महत्त्वपूर्ण माहिती दिली. या परीक्षा रद्द करण्यात आल्या नव्हत्या तर पुढे ढकलण्यात आल्या. आता या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची आनंदाची बातमी त्यांनी दिली. त्यानुसार आता गट-क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट-ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय काल सोमवार रोजी आरोग्य विभाव व नासाच्या अधिका-यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोणताही धोका न पत्करता या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शंभर टक्के शाळा उपलब्ध होणारच. या अनुषंगाने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. ९ दिवस आधीच सर्व परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र मिळतील याचीही खात्री केल्या जाईल असं त्यानी म्हटले आहे.
तसेच कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणा-यांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या असल्याचं त्यांनी आपल्या वक्तव्यातून म्हटले आहेत. कुणालाही काही चुकीचा प्रकार होत असल्याचं आढळून आल्यास, त्यांनी तात्काळ थेट पोलिसांना संबंधिताबद्दल कळवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आवाहन केले आहे. परीक्षा अत्यंत पारदर्शक व्हायला हव्यात, त्यात कुठेही गडबड व्हायला नको? याची पुरेपुर काळजी घेतल्या जाईल. असंही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
मनसेतून बाहेर पडलेल्या प्रदिप बांदुरकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रवेश
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२८ सप्टें.) : गावातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला धारेवर धरणरे तसेच नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता स्वता पुढाकार घेऊन वेळ पडल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणारे लोकनेते प्रदिप बांदुरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. भरताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशासह तालुक्यात सेवा सप्ताह राबविण्यात आला. या सेवा सप्ताहाच्या समारोपीय समारंभात वणी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रदिप बांदुरकर यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. माजी खासदार हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थतीत स्थानिक कल्याण मंडपम येथे सेवा सप्ताहाचा समरोपीय समारंभ पार पडला. प्रदिप बांदुरकर यांच्या भाजप प्रवेशाने राजकारणात मोठा बदल घडून येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राजूर इजारा येथिल रहिवासी असलेले प्रदिप बांदुरकर हे आधी बराच काळ मनसेचे राजूर विभाग प्रमुख राहिले. त्यांनी काही दिवसांआधी मनसेला रामराम ठोकत आता भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. सेवा सप्ताहाच्या कल्याण मंडपम येथे झालेल्या समरोपीय समारंभात माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, रवी रेभे उपस्थीत होते. या सर्वांच्या समक्ष प्रदिप बांदुरकरसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केला.गावातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला धारेवर धरणरे तसेच नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता स्वता पुढाकार घेऊन वेळ पडल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणारे लोकनेते प्रदिप बांदुरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. भरताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशासह तालुक्यात सेवा सप्ताह राबविण्यात आला. या सेवा सप्ताहाच्या समारोपीय समारंभात वणी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रदिप बांदुरकर यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. माजी खासदार हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थतीत स्थानिक कल्याण मंडपम येथे सेवा सप्ताहाचा समरोपीय समारंभ पार पडला. प्रदिप बांदुरकर यांच्या भाजप प्रवेशाने राजुरच्या राजकारणात मोठा बदल घडून येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राजूर इजारा येथिल रहिवासी असलेले प्रदिप बांदुरकर हे आधी बराच काळ मनसेचे राजूर विभाग प्रमुख राहिले आहे. त्यांनी काही दिवसांआधी मनसेला रामराम ठोकत आता भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. सेवा सप्ताहाच्या कल्याण मंडपम येथे झालेल्या समरोपीय समारंभात माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, रवी रेभे उपस्थीत होते. या सर्वांच्या समक्ष प्रदिप बांदुरकरसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केला.
किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ "राजूर" येथे पाळण्यात आला कडकडीत बंद, वणीत मात्र अत्यल्प प्रतिसाद
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२८ सप्टें.) : केंद्र सरकारने नव्याने अमलात आणलेले तिन कृषी कायदे पूर्णतः शेतकरी विरोधी असून हे काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीला घेऊन दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नऊ महिने पूर्ण झाले. सलग नऊ महिने केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे हे कृषी कायदे जोपर्यंत केंद्र सरकार रद्द करणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सरकार विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. नऊ महिने शेतकरी हे तीन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीला घेऊन दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करित आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची सरकारने साधी दखलही घेतली नाही. शेतकऱ्यांशी या विधेयकांबाबत चर्चा करण्याची तयारीही सरकारने दाखविली नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला केंद्रातील सर्व विरोधी पक्षांनी नेहमी पाठिंबा दर्शविला आहे. केंद्र सरकारविरुद्ध सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला नऊ महिने पूर्ण झाल्याने २७ सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली. किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारलेल्या भारत बंदला सर्वच विरोधी पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. या भारत बंदच्या अनुषंगाने वणी बंदचाही नारा देण्यात आला. सर्वच विरोधी पक्षांनी वणी बंदला समर्थन देत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. पण वणीत बंदला प्रतिसादच मिळाला नाही. सर्वच विरोधी पक्ष व संघटनांनी बंदला समर्थन दिले. पण बंद यशस्वी करण्याकरिता नेते मंडळी व कार्यकर्ते रस्त्यावर आलेच नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. संयुक्त किसान मोर्चाच्या दिमतीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षच राहिला. अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसले नाही. केंद्र सरकारच्या जनहित विरोधी धोरणांच्या विरोधात सुरु असलेल्या या लढ्यात जनतेचाही पुरेसा सहभाग दिसून आला नाही. बहुतांश विरोधी पक्षांनी बंदला पाठिंबा दर्शविला असला तरी पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची उदासीनता दिसून आली. आंदोलकांनी शहरात मोर्चा काढून व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आव्हान केले. पण व्यापाऱ्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. मोर्चा शहराच्या मुख्य मार्गाने निघून तहसील कार्यालयाजवळ पोहचला. आंदोलकांनी एसडीओंना निवेदन दिल्यानंतर मोर्चाही सांगता झाली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. विरोधी पक्ष व संघटनांच्या नेते मंडळींनी बंद यशस्वी करण्याकरिता जराही रस दाखविला नाही. किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या वणी बंदला विरोधी पक्ष नेत्यांचा पाठिंबाच न मिळाल्याने वणीत बंद यशस्वी होऊ शकला नाही. राजकीय पक्षांच्या हवा पाहून दिवा लावण्याच्या राजकारणामुळे लोकहितासाठीच्या एकजुटीला खिंडार पडतांना दिसत आहे. राजूरवासियांनी मात्र एकजुटीचे दर्शन घडवीत राजूर येथे कडकडीत बंद पाळला. केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांविरुद्ध सुरु असलेल्या लढ्याला नागरिकांच्या सहभागाची गरज आहे. केंद्र सरकारच्या नव्या तिन कृषी कायद्यांमुळे शेतकरी तर गुलाम होणारच आहे. पण नागरिकांनाही पोटभर अन्न मिळणे कठीण होणार आहे. भांडवलदारांचं राज आणू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या या धोरणांविरुद्ध मागील नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या सलग नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन कायदे रद्द करणे तर सोडाच शेतकऱ्यांशी साधी चर्चा करायलाही केंद्र सरकार तयार नाही. उलट केंद्रात सहकार कायदा आणून शेतकऱ्यांना शेतीपासून व सरकारी बाजारपेठेपासून वंचित ठेवण्याचा केंद्र सरकार डाव आखत आहे. केंद्र सरकारच्या या जनहित विरोधी धोरणांविरुद्ध शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोनाला समर्थन देण्याकरिता संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राजूर या गावात पूर्ण प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला. संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात राजूर येथे बंद यशस्वी करण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.
Subscribe to:
Posts (Atom)