सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्क माफ करा - सम्यक विद्यार्थी आंदोलन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
बल्लारपूर, (ता.२५) : देशात कोरोना महामारी मुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसान झाले,विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारी मुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार हरपले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक शुल्क कसे भरायचे हाच प्रश्न पडला आहे ? यामुळे विद्यार्थी खूप चिंतेत असून, पालक वर्गात परीक्षा शुल्काबाबत प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्क तात्काळ माफ करण्यात यावे व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्वरित परत करण्यात यावे यासाठी माननीय राजूभाऊ झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज दि.२५ जूनला सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर तर्फे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कुलसचिव मा.अनिलजी चिताडे सर यांच्याशी परीक्षा शुल्काबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले लवकरच याबाबत विद्यार्थी हितकारक निर्णय होणार असे विद्यापीठ प्रशासनामार्फत कळविण्यात आले.

निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर चे सिद्धांत पुणेकर, स्वप्निल सोनटक्के, फारुक शेख, गुंजन वानखेडे, रुपेश चंदनखेडे, सचिन ठीपे, प्रणय मडावी, रोशन ढेंगळे, चेतन गेडाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा जिल्हा चा वायगाव "गोंड" च्या नावबदल निर्णयाला विरोध "राष्ट्रीय एकता च्या नावाखाली पहिला घाव या देशाच्या मुळवंशी गोंड समुदाय वर"- चंद्रशेखर मडावी (जिल्हाध्यक्ष.गों.ग.पा.)


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वर्धा, (ता.२५) : महाराष्ट्र सरकारने ज्या गावांच्या,वस्त्यांच्या,रस्त्यांच्या नावाची ओळख जाती च्या आधारे आहे अश्या नावांना राष्ट्रीय एकता च्या दृष्टीने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.त्या बाबत शासन निर्णय काढला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) या गावापासून होणार असल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली होती आणि त्याकरिता तात्काळ एक समिती गठीत करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळाल्याने गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा द्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांच्या नेतृत्वात या शासन निर्णयानुसार गोंड या समूहवाचक नावाचा नाव बदलविण्याच्या शासन निर्णयाचा विरोध जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन च्या स्वरूपात केला.महाराष्ट्र शासनाने गोंड हे जातीवाचक नाव नसून समूहवाचक नाव आहे याचा अभ्यास करावा या देशाचा मुळवंशी म्हणून गोंड नावाला मान्यता आहे.गोंड जर जातिवाचक नाव असते तर "गोंडवाना एक्स्प्रेस, गोंडवाना युनिव्हर्सिटी" सारखी नावं राष्ट्रीय स्तरावर मान्य झाली असती का..? असा प्रश्न सुद्धा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने निवेदनात विचारण्यात आला,सरकार आदिवासींची मूळ ओळख नष्ट करण्याचा मागे लागली असून गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा-वर्धा च्या वतीने या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला.
गोंड नावाने ओळख असलेल्या गावांच्या रस्त्यांच्या,वस्त्यांच्या नाव बदलविल्याने राष्ट्रीय एकता निर्माण होत असेल तर आडनाव चा उल्लेख असलेल्या गावांची सुद्धा नावे बदलविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन त्यावर सर्वप्रथम अंमलबजावणी केली पाहिजे असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना चंद्रशेखर मडावी यांनी चर्चेदरम्यान सुचवले.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शासनाने आदिवासींच्या सहनशीलता चा अंत बघू नये.शासनाने ईतर कोणाची नाव बदलवायची असल्यास खुशाल बदलवावी परंतु गोंड नाव असलेल्या किंवा आदिवासींची ओळख असलेल्या ईतर कोणत्याही नावाची बदल केल्यास जिल्हाभर "गोंडवाना गणतंत्र पार्टी" उग्र स्वरूप धारण करेल,असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या द्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी दिला. यावेळी गों.ग.पा. चे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष दमडुजी मडावी, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मसराम, सेलू तालुकाध्यक्ष अजित इरपाते, आदिवासी विकास परिषद युवाध्यक्ष सचिन नराते, रोशन चिकराम, शत्रुघ्न सडमाके, अमोल सडमाके, गजानन सडमाके, मंगेश मसराम, मनोज सिडाम, प्रवीण सराटे ईत्यादी उपस्थित होते.

गोंगपाचे मा. राष्ट्रपती महामहिमला निवेदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नागपूर, (ता.२५) : संपूर्ण विश्वामध्ये वैशिक कोविड-१९ कोरोना महामारी मुळे भयानक संक्रमाची भिषण व्यक्ती प्रभावित झाला असून राज्यामध्ये लोकांना रोजी-रोजगार सहित भयानक समस्या निर्माण झाल्या आहे.
देशामध्ये पेट्रोल, डिझेल भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे अनेक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. याचे परिणाम शेतकरी- शेतमजूर तृतीय व चतुर्थ कर्मचारी व्यापारी संपुर्ण व्यवसाय प्रभावित झाला आहे. ज्यामुळे लोकांचे वावरीक जीवन अस्तव्यस्त झाले आहे. कमरतोड महागाई भरसाठ वाढ झाल्यामुळे देशात आर्थिकस्थितीचे संकट निर्माण झाले आहे. म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या मागणी आहे की शेतकरी- शेतमजूर मजदूर तृतियव्ही चतुर्थ वर्ग यांना तात्काळ आथिर्क सहाय्यता राशी मिळायला पाहिजे पेट्रोल, डिझेल मध्ये सामान्य लोकाला 50% अनुदान राशी नागरिकांच्या खात्या मध्ये डी. बि. टी. च्या माध्यमातून जमा व्हायला पाहिजे.

वरील मागण्याचा शासनाने गंभीर विचार करून महागाईवर तोडगा कडून समस्येतून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथा शासनाच्या धोरणा विरोधात पूर्ण महाराष्ट्र गोंडवाना गणतंत्र पार्टी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी.

दि.24 जून 2021 ला मा.जिल्हाधिकारी साहेब नागपुर तर्फे मा.रामनाथजी कोवींद राष्ट्रपती आणि मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशात वाढलेली कमरतोड महागाई आणि महाराष्ट्र राज्यातील वाढलेल्या अनेक समस्यबाबत गोंगपाच्या पदाधिका~यांनी व अनेक कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.

यावेळी हरिशजी उईके(प्रदेश अध्यक्ष), राजेश इरपाते (प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष), प्रतिमा मडावी (प्रदेश अधक्ष म.प्रकोष्ट), महेश बमनोटे(प्रदेश कोषाध्यक्ष), विठ्ठल उईके (प्रदेश संपर्क प्रमुख), एड.आशिश उईके(प्रदेश प्रवक्ता), धनराज मडावी (जिल्हाध्यक्ष नागपुर), गंगा टेकाम (जिल्हाध्यक्ष नागपुर.म.प्रकोष्ट), शिवकुमार उईके (जिल्हा महासचिव.नाग.), सतीश नाईक(नाग.शहर अध्यक्ष यु.मो.), सौरभ मसराम (जिल्हा सचिव यु.मो.) तसेच रेखाताई वडमे, दिनेश सिडाम, अंकुश करनाके, पदमाकर मरसकोल्ह, रोहीत वडमे, निकेश जनबंधु.इ.पदाधिकारी उपस्थित होते.

सुगंधित तंबाखाची तस्करी करणाऱ्या आणखी दोन तस्करांना डीबी पथकाने केली अटक

                              (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२५) : वणी शहर व तालुक्यात मादक पदार्थांची सऱ्हास विक्री व तस्करी सुरु असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाल्याने डीबी पथकाने मादक पदार्थ विकणाऱ्या व पुरविणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरु केली आहे.

 सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अनाधिकृतपणे साठा करून त्याची शहरात अवैध विक्री करणाऱ्यांवर डीबी पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. तलबी वस्तूंच्या विक्री व तस्करीतून अमाप पैसा मिळत असल्याने प्रत्येक स्तरातील व्यक्ती या अवैध व्यवसायाशी जुडतांना दिसत आहे. झटपट मालदार होण्याच्या मोहाने अनेकांनी या अवैध धंद्यात उड्या घेतल्या आहे. दारू तस्करीला पर्याय म्हणून आता सुगंधित तंबाखाची तस्करी करण्याकडे कल वाढला आहे. दुचाकीने थोडाफार सुगंधित तंबाखाचा साठा आणून तो शहरातील पान सेंटर धारकांना चढ्या किमतीने विकल्या जात असल्याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकीवर पिशव्या व बोऱ्यांमध्ये भरून सुगंधित तंबाखाची वाहतूक करणाऱ्यांवर सहसा कुणाचा संशय जात नसल्याने त्यांचे चांगलेच फावत होते. पण त्यांची ही शक्कल पोलिसांच्या चांगलीच लक्षात आली आहे. काल २४ जूनला अवैध विक्री करिता सुगंधित तंबाखाचा साठा घेऊन जाणाऱ्या आणखी दोघा जणांना डीबी पथकाने अटक केली आहे. वणी यवतमाळ रोडवरील निंबाळा गावाजवळ दुचाकीने सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या या दोन तस्करांना अटक करण्यात आली. 

डीबी पथकाने सध्या मादक पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम हाती घेतले आहे. सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री व तस्करी करणाऱ्यांच्या मागावर सध्या डीबी पथक आहे. शहर व परिसरात गस्त घालून सुगंधित तंबाखाची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांची पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

शहरात गस्त घालत असतांना डीबी पथकाला वणी यवतमाळ रोडने सुगंधित तंबाखाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. डीबी पथकाने यवतमाळ रोडवर गस्त घातली असता मोपेड दुचाकीने दोन इसम पांढऱ्या रंगाच्या बोरीत सामान घेऊन येतांना दिसले. पोलिसांना या दोघांवर संशय आल्याने पोलिसांनी दुचाकी थांबवून त्यांची चौकशी केली. तसेच बोरीतील सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखाचे ४० डब्बे आढळले.

पोलिसांनी सुगंधित तंबाखाची तस्करी करणाऱ्या कमर अली दौलत अली (३८) रा. आंबेडकर वार्ड मारेगाव व विक्रांत भास्करराव सुत्रावे (४८) रा. रंगारीपुरा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून सुगंधित तंबाखाचे २०० ग्राम वजनाचे ४० डब्बे किंमत २९ हजार ४३५ रुपये व दुचाकी किंमत ५० हजार रुपये असा एकूण ७९ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील एक जण शहरातील बुक स्टाल व्यावसायिक आहे.

 कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असल्याने वह्या, पुस्तके व अन्य शालेयउपयोगी वस्तूंची विक्रीच ठप्प झाली आहे. त्यामुळे स्टेशनरी व्यवसायिकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांची अवैध धांड्यांकडे पाऊले वळू लागली आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व भादंवि च्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनिल खंडागळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली.

मारेगाव रोडवर वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले अन..झाला अपघात

सह्याद्री न्यूज | विवेक आवारी
मारेगाव, (ता.२५) : मांगरूळ वरून मारेगावकडे जाताना कार चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी काळे यांच्या शेतात घुसली. ज्यामध्ये गाडी चालक मालक जखमी झाला. ही घटना आज रोजी 4:45 वाजताच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार विपुल दिगंबर राजगडकर (२५) रा. मांगरूळ वाहन क्र. Mh12 FZ 1536 महिंद्रा झायलो ही गाडी घेऊन निघाला असतांना मारेगाव रोड वरील इंडियन पेट्रोल पंप जवळ त्याचे गाडी वरून नियंत्रण सुटले आणि काळे यांच्या शेतात गाडी सह घुसला. यावेळी गाडीची समोरची बाजू चपकली असून त्याला किरकोळ मार लागल्याचे समजते. सुर्दैवाने जीवित हानी झाली नसून दरम्यान, त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.