सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : भाजप काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार झाला आणि 10 वर्षानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेवर परतला आणि लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवले. त्यानंतर मागील काळात केंद्र सरकारकडून महागाई, बेरोजगारी, ईडी, सीबीआय कारवाया आणि महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून विशेष करून शिवसेना, राष्ट्रवादी फोडून राज्यात सत्ता मिळवली असे राजकीय विश्लेषक सांगतात. महाराष्ट्रात काय चाललंय हे उघड्या डोळ्यांनी इथल्या मराठी माणसांनी बघितलं. दिवसामागून दिवस गेले आणि पाहता पाहता लोकसभा निवडणूक लागली. त्याअगोदर महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव, सुशिक्षित बेरोजगारांना नौकऱ्या, योजनेत बदल अशा विविध समस्या आणि त्यातील परिणाम गोर गरीब जनतेने सोसले. शेतकरी त्रस्त,शेतमालाला भाव मागत आहे, पण मिळत नाही. विद्यार्थ्यांना नौकरी मिळत नाही, खाजगीकरण थांबण्याचे नाव घेत नाही, महागाई तर कित्येकांचे कंबरडे मोडत आहे. पेपर फुटी ने डोकं वर काढलं, महिलावर होणारे अत्याचार आणि सरकार च्या योजना खास करून मोफत वाळू योजना ही घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही.कित्येकांचा संसार उघड्यावर आला आहे. धावपळीत जिवन जगत असताना अनेक ठिकाणी लक्ष द्यावे लागल्यामुळे होणारी मनाची, बुद्धीची, विचारांची, आणि कृतींची संभ्रमित अशी अवस्था. अशी त्रेधा तिरपीट उडाल्यामुळे सामान्य माणसाला एकही काम लक्षपूर्वक आणि धड करणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे आता लोक मोदी सरकारला कंटाळलेले दिसून येत आहे. मोदींची क्रेज ओसरली आणि ती म्हणजे पूर्व विदर्भातून परिणाम दिसून येणार अशी चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. चंद्रपूर येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेत चक्क उमेदवारांनेच बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारे घृणास्पद जाहीर बोलून आपली वोट बँक किंबहुना मतदार संघ नाराज झाल्याचे बोलल्या जात आहे. आता ते बोलण्यामागचे कारण प्रत्येक सभेमधून नेते मंडळी सांगत फिरत आहेत. मात्र तो शब्द आणि बोलणं जनतेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याने मतदारांचा कौल आघाडी कडे वळता होत असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे. यासाठी सर्व घटक पक्ष, मित्र पक्ष एकत्र येत लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्यागत आघाडी च्या उमेदवाराचा प्रचार प्रचंड कमालीचा दिसून येत आहे. ताई येणार असं जरी म्हटलं तर विरोधी पक्षातील कार्यकर्ता म्हणतोय आमच्या नेता दुर्लक्ष करत असल्याने आम्ही टेन्शन घेत नाही, मात्र ही एक प्रकारची गहरी चाल असू शकते. हे समजून घेतलं पाहिजे असेही काही राजकीय जाणकार सांगतात. सोशल माध्यमावर वातावरण एकदम तापल्याचे दिसून येत आहे. मतदानाला तीन दिवस आहे. 19 एप्रिल ला सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. वरिष्ठ वेळोवेळी कार्यक्रम तपासत आहे. असेच आता पुढाऱ्यांनी मतदार तपासला पाहिजेत, कोणकोणाच्या पथ्यावर आहे. ह्याकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. ही निवडणूक नुसतीच निवडणूक नसून मोठी लढाई आहे. आणि या लढाईत ताईंना जनतेशी "मेनीफेस्टो" घेऊन संवाद साधत भाऊंचे पानिपत करायचं आहे. मात्र, हे दिसते वाटते तेवढे सोपं नाही. ही निवडणूक मोठी आटीतटी ची होणार, असे बोलल्या जात आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन भाऊंचे मतदार फिक्स आहे. ते फुटणार नाही, पण ताईंचे मतदार तीन तिघाडा आणि काम बिघाडा, हे ट्रिपल इंजिन कधी गंडतील सांगता येत नाही. नुसतं वातावरण आहे म्हणून गाफिल राहून चालता येणार नाही.यंदा कर्तव्य आहे म्हणून,समजून मतदान पारड्यात पाडून घ्यायचे आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी हा मतदार संघ फार मोठा आहे, यात अनेकांचे राजकीय वलय आहे. त्यापुढे नवख्यांचे काय चालणार असे चर्चील्या जात आहे. परंतु आपला समाज म्हणून संख्याबळ मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच इतरी समाज, जनता पाठीशी असल्याचे समर्थन देत आहे. हे इतपत ठिक असले तरी मतदार मत दान करणं आणि तो आपल्यालाच मतदान करतो का?हे आतातरी सांगणं किंवा गणित जुळवणं अवघड आहे. उद्यापासून रात्र वैऱ्याची आहे. आणि असं म्हटलं जात की रात्रीस खेळ चाले... त्यामुळे या निवडणुकीत भाऊ की ताई,कोण बाजी मारणार? हे येणारा काळ सांगेल...