सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : कोणताही आधार नसतांना सदर वृत्तपत्राने खोटे वृत्त प्रकाशित करून समाजात हेतूपूरस्पर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर या वृत्तपत्राच्या संपादक यांचे विरुद्ध कोणतीही कारवाई न केल्यास. याविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा मारेगाव काँग्रेस तालुका कमेटी च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
चौथ्या स्तंभाला पत्रकारिता, वृत्तपत्र आणि बातम्या म्हणतात. चौथा स्तंभ म्हणजे प्रेस आणि वृत्त माध्यमे, दोन्ही शब्दांच्या वकिलीसाठी स्पष्ट क्षमता आणि राजकीय मुद्दे तयार करण्याच्या अंतर्निहित क्षमतेत. राजकीय व्यवस्थेचा भाग म्हणून ते अधिकृतपणे ओळखले जात नसले तरी, त्याचा महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष सामाजिक प्रभाव आहे. मात्र काही जन क्षेत्रात स्वतःची झोळी भरण्यासाठी या प्रभावाचा आधार घेताहेत त्यामुळे माध्यम बदनाम होत आहे असा सुरु अनेकात आहे. कोणाच्याही सांगिवांगी वरून, व आधार नसतांना बातम्या छापण्याचा सपाटा हल्ली दिसून येत आहे. त्यामुळे काही पक्षाचे नेते, पुढारी यांच्यात अस्वस्थता असल्याचे वातावरण आहे. मागील शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली. या दरम्यान स्थानिक पत्रकारांच्या नावाने आलेला मलिंदा तीन महाठकांनी किंबहुना पदाधिकाऱ्यांनी हडप केला असे खळबळजनक वृत्त 22 एप्रिल 2024 रोजी वर्ध्याहून प्रकाशित करून तीन लोकांची नावासहित बदनामी केली असा, आरोप मारेगाव तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने करण्यात आला आहे, या तथ्यहीन बातमी व संपादकच्या विरोधात तहसीलदार व ठाणेदार यांच्या मार्फत जिल्हा वरिष्ठाकडे तक्रार करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून निधी घेऊन तो निधी पत्रकारांना दिले नसल्याचे खळबळजनक वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मारेगाव तालुका काँग्रेस सेवादल, तालुका अध्यक्ष, व शहर अध्यक्षांनी सदर बदनामीकारक वृत्त प्रकाशित केले असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली असून, निवेदनातून चौकशी ची मागणी करून संबंधितावर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा ईशारा सुद्धा देण्यात आला आहे.
काल (ता.25) रोजी दिलेल्या निवेदनावर माजी म. बा.कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, सोसायटी अध्यक्ष मार्डी वसंत आसुटकर, शहर अध्यक्ष कॉ कमेटी शंकर मडावी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद समिर, पलास बोढे,माजी सभापती शकुंतलाताई वैद्य,आकाश भेले, विलास वासाडे, अरविंद वखनोर, रविंद्र पोटे,रॉयल सय्यद,विजय रोगे, सुधाकर धांडे,यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.