सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव तालुका शांतता प्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या तालुक्यात गेल्या काही काळापासून शांत वातावरण गढूळ कसं करता येइल किंबहुना हे चुगलीखोर आपल्या चौफेर घिरट्या घालण्याची शक्यता आहे. 'सद रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिद वाक्याप्रमाणे अंमलाबजावणीची अपेक्षा शांतता प्रिय जनतेची आहे.
आर्थिक,तथा राजकीय फायदा लाटण्यासाठी चमचेगीर नव्या ठाणेदाराशी मैत्रीचा हातपुढे करतात. हा त्याचा पूर्व इतिहास असून हातमिळवणी नंतर ते शिकार शोध सुरु करतात. त्यामुळे चरित्र्यवान व्यक्तीही या चमचेगिरीला बळी पडत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. वर्चस्वाच्या लढाईने तालुक्याचे वातावरण गरम आहे. वचपे काढण्यासाठी ते आपल्याशी संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता असून प्रस्थापित झालेल्या संबंधाचा त्यांचे कडून दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सच्चाई कृतिम संकटात सापडेल अशी भीती सामान्यात आहे.
तालुक्यात विविध राजकीय पक्ष अस्तित्वात असून वर्चस्वाच्या लढाईत कृत्रिम गुन्हे नोंदी साठी काही जण माहीर आहेत. यासाठी आपला वापर कसा करून घ्यायचा ते यामध्ये प्रशिक्षित आहेत. त्यामुळे ठोस निर्णय घेताना चमचेगिरांपासून सावधगिरी बाळगण्याचे आपल्या समोरील आव्हान आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सामान्य माणूस आपल्यामार्फत निपक्ष,निर्भय सुरक्षा मिळेल अशा मदतीच्या रास्त अपेक्षा बाळगून आहेत.
भयमुक्त व शांततामय वातावरणासाठी चमचेगीरांच्या कटकारवाईवर बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून, हे आव्हान आपण कसे पेलणार याकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहे.