चंद्रपूर लोकसभा निवडणूक: छानणी नंतर 15 उमेदवार रिंगणात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार 27 मार्च च्या दिवसापर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशन पत्रांची एकुण संख्या 48 झाली आहे. आज दि.28 मार्च रोजी अर्जाच्या छानणी नंतर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

वैध उमेदवारी अर्जांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस धानोरकर प्रतिभा सुरेश, भारतीय जनता पक्ष मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद, बहुजन समाज पार्टी रामटेके राजेंद्र हरिश्चंद्र, जनसेवा गोंडवाना पार्टी सयाम अवचित श्यामराव, जय विदर्भ पक्षाचे राठोड अशोक राणाजी, गोंडवाना गणतंत्र पक्ष शेडमाके नामदेव माणिकराव, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी घोनमोडे पूर्णिमा दिलीप, वंचित बहुजन आघाडी बेले राजेश वारलुजी, अखिल भारतीय मानवता पक्ष राऊत वनिता जितेंद्र, सन्मान राजकीय पक्ष लसंते विकास उत्तमराव, भीमसेना कसालवार विद्यासागर कालिदास, पीपल्स पार्टी ऑफ भारत (लोकशाही) बर्के सेवकदास कवडू, अपक्ष उराडे दिवाकर हरि, अपक्ष दहिवले मिलींद प्रल्हाद, अपक्ष गावंडे संजय निलकंठ हे उमेदवार रिंगणात आहेत.

लोकशाही महोत्सवाची पहिल्या टप्प्याने सुरुवात केली आहे. काल 27 मार्चला उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला विविध उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली असून 30 मार्च पर्यंत उमेदवारांना आपले नामांकन अर्ज वापस घेता येणार आहेत, त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.