सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॅा.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्रिमहोदयांनी स्टेज, मंडप, बैठक व्यवस्था, सुरक्षा, स्क्रीन, साऊंड आदींची पाहणी केली. त्यानंतर येथेच सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. जी कामे शिल्लक असतील ती आज सायंकाळपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंडपात उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, महिलांकरीता फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
प्रत्येक गावातून बसमध्ये कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांसाठी बसमध्येच खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी तसेच त्यांच्यासोबत समन्वयक असावे. महिलांची प्रवासादरम्यान गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. महिलांना सुरक्षित कार्यक्रमस्थळी आणण्यासोबतच त्यांचा परतीचा प्रवास देखील सुरक्षितपणे होईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
याच अनुषंगाने मच्छिन्द्रा येथील महिलांची बस यवतमाळकरिता रवाना झाली असून यात एकूण 52 महिला, समन्वयक दर्शना कुमरे, ग्रामसेवक तिरपुडे, ग्राम.चपराशी दिनेश जुमनाके यांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीला 65 बसेस काल रात्रीच पोहचल्या. आज सकाळी बुधवारी हाऊसफुल होऊन त्या सुद्धा रवाना झाल्या. यवतमाळ येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयोजित कार्यक्रमाला विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यातून लाखों महिलांची उपस्थिती असणार आहे, असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सांगितले. तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी माजी नेते मंडळी मोठ्या संख्येने येणार आहे.