साधक बाधक चर्चानंतर अखेर काँग्रेसचे "आमरण उपोषण" मागे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : शहरातील पोलीस वेलफेयर असोसिएशनचे भारत पेट्रोलियम समोर MSEB विभागाकडून तालुक्यात सुरु असलेली अघोषित लोडशेडींग व शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीज पुरवठा देण्यात यावा, यासह इतर मागण्या घेऊन मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने दि.23 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले. 

माजी सभापती नरेंद्र पा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, युवक ता. अध्यक्ष आकाश बदकी व काँग्रेस समर्थक अंकुश माफूर यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकरी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. दसऱ्या आपल्या साठी अतिशय महत्वाचा सण. या महत्वाच्या सणाला बाजूला ठेऊन जनतेच्या हितासाठी वीज वितरण कंपनी च्या मनमानी कारभार विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते. अनेक राजकीय, सामाजिक तथा गावागावात पुढारी,नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते महिला संघटना, पुरुष मंडळींनी उपोषण मंडपी भेट देऊन आपली समस्या मांडून या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. हे आमरण उपोषण काँग्रेसचे जरी असले तरी ते शेतकरी व जनतेच्या हितासाठी आणि शासन प्रशासनाला जागे करण्यासाठीचा हा एकमेव उद्देश होता आणि म्हणून या आमरण उपोषणाला अखेर सर्वांच्या सहकार्याने घवघवीत यश आले. असे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. अधिकाधिक मागण्या जवळपास महावितरण अधिकाऱ्यांनी मान्य करण्याचे आश्वासन नरेन्द्र कटारे कार्यकारी अभियंता, पाटील साहेब उपअभियंता, खंगार मुख्य अभियंता यांनी दिले. 

महावितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना तीन दिवसाचा अल्टीमेटम दिल्यानंतर सोमवार (ता.23) पासून बसलेल्या आमरण उपोषणास आज बुधवार ला सायंकाळी 6.15 वाजता उपोषणकर्ते ता. अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरी शंकर खुराणा, नगरसेवक आकाश बदकी, अंकुश माफूर यांना जूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र पा ठाकरे, वसंत जिंनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, यांनी आमरण उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करून मारेगाव तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे या उपोषणास दिलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद व आभार मानले. त्यामुळे या उपोषणाचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठया प्रमाणात फायदा निश्चित होणार आहे असे एकंदरीत चित्र दिसून आले.

यावेळी जयकुमार आबड, घनश्याम पावडे, डॉ महेंद्र लोढा, कुंभा सरपंच अरविंद ठाकरे, यु. कॉ.शहराध्यक्ष समीर सय्यद, महिला ता.अध्यक्ष मायाताई गाडगे, सरपंच तुळशीराम कुमरे, सरपंच रविराज चंदनखेडे, प्रफुल विखणकर, सरपंच रामचंद्र जवादे, ट्रायबल सेल अध्यक्ष समिर कुळमेथे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष आकाश भेले, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शाहरुख शेख, जनहित कल्याण उपाध्यक्ष रॉयल सय्यद, आदी सह सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर वर्गाचा अलोट जनसमुदाय उपोषण मंडपी पाहायला मिळाला.

उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे 

1) लोड शेडींग पूर्णतः बंद करण्यात यावी. 2) शेतकऱ्यांच्या सिंचना करिता 24 तास विज उपलब्ध करून देण्यात यावी. 3) मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तय्यार करण्यात यावे. 4) ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी. 5) 33 के. वि. चे नवीन वनोजा (देवी), कुभां, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे. 6) मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीची विद्युत तयार करण्यात यावे. 7) शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे. 8) बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी. 9) ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे. 10) शेतकऱ्यांचे नवीन A. G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी.

वीज वितरण कंपनी कडून दिलेले आश्वासन 

एकुण दहा मागण्यांसाठी तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. आज त्या दहाही मागण्या मान्य झाल्या आहेत. काँग्रेस चे मोठे यश मानले जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे निश्चित बोलल्या जात असताना 24 तास विज पुरवठा करण्यात यावा ही प्रमुख मागणी होती. त्यामध्ये 6 तास विज पुरवठा देण्यात येईल त्यात 5 तास दिवसा आणि 3 तास सायंकाळी अशी 8 तास साठी विजपुरवठा करण्यात येणार.
132 केव्ही चा प्रस्ताव वरीष्ठाकडे मंजुरी साठी पाठविण्यात येणार. मुद्दा क्रमांक चार नविन विद्युत केंद्रास मान्यता देण्यात येईल. व, दोन सोलर प्लॅन मंजूर. याप्रमाणे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.