सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महाराष्ट्रामध्ये जवळपास १.२० कोटी मुलनिवासी जनता असून राजा रावण हे मुलनिवासी लोकांचे आराध्य दैवत आहे. म्हणून भारतीय संविधान न्याय स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या मौलिक तत्वाचा अंगिकार प्रत्येक भारतीय करतो.
विश्वास,श्रध्दा व उपासनेचे स्वातंत्र्य मिळाले आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये राजा रावणास अनन्य साधारण महत्व आहे.
भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून येथे प्रत्येक धर्माप्रती समानतेची वागणूक असतांना सुध्दा या देशातील करोडे गोंडी धर्मीय समूहातील लोकांच्या आदर्शाचे प्रतिक असलेले महात्मा राजा रावण यांची जाहीर विटंबना केली जाते. संविधानातील कलम २५ असे म्हणतो की, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असे नमूद असतांना देशातील निवडक काही समुदायाकडून वाईट प्रथा दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात महोत्सव समजून साजरी केली जाते. हे आता थांबवावं आणि कोणत्याही धर्माच्या महात्म्याचा अनादर न करता आदरपूर्वक स्वीकार करावा अशी गोंगपा ची मागणी आहे.
महात्मा राजा रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही तर ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते.
यापूर्वी रावण दहन विरोधात नागपुर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. म्हणूनच रावण यांच्या प्रतीकात्मक दहण करणाऱ्यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९५ (अ), २९८ तसेच मुंबई पोलीस अधिनियम नुसार १३१, १३५ प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल होते.
निवेदन देताना तुळशीराम मडावी ता. अध्यक्ष,
ज्ञानेश्वर येडमे, भाविक कोयचाडे, रुपेश दडांजे, मोरेश्वर गेडाम, मुन्ना सिडाम, अमर खैरे, राजेन्द्र उईके, नामदेव तोड़ासे, विजेंद्र मडावी, प्रा. शैलेश आत्राम, किशोर सुरपाम, श्री. एस. एम. सोयाम, मयूर मसराम, पुंडलिक गेडाम, व्हि. के. मेश्राम, पि राम सिडाम, विशाल परचाके, आदींची उपस्थिती होती.