मारेगाव : गट ग्रामपंचायत केगांव (बोदाड) येथील सरपंचा ग्रामसेवक यांचा मनमानी, कामचुकार व भ्रष्ट कारभार आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचीही याकडे कानाडोळा करत असतील तर ग्रामपंचायत कार्यालयालायाचा उपयोगच काय? या संतापातूनच चक्क सरपंचा, ग्रामसेवक विरोधात बिगर 7/12 शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विलास पवार यांच्या नेतृत्वात बोदाड येथील गावाकऱ्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदनातून तक्रार सादर केली आहे.
सन 2023 शबरी योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेले असून तालुक्यातील केगांव बोदाड येथील गट ग्रामपंचायत पदाधिकारी शासनाच्या घरकुलाचा लाभ हितसाधू लोकांना देण्याच्या तयारीत आहे,असे निवेदनात नमूद आहे. मात्र, हा अन्याय योजनेत मुख्य बसणाऱ्या गरजवंत व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांवर होणार आहे, त्यामुळे इतरांना हा लाभ देण्याचं घाट न घालता या योजनेत बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनातून गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. याबाबत संबंधिताकडे तक्रार करुनही दखल न घेतल्यास नाईलाजाने आंदोलनात्मक भूमिकेचा अवलंब करावा लागेल असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. या दरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास पंचायत समितीची जबाबदारी असेल असे बिगर 7/12 शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले आहे.
यावेळी निवेदन देताना अशोक चोपणे, निर्गुण काळे, जिल्हाध्यक्ष विलास पवार, मयूर पवार, किर्तीका पवार, जगन पवार, मनोज काळे, विनोद भोसले, अब्रूचन पवार, संजय येरमे, वंचित तालुका उपाध्यक्ष संजय जिवने आदी उपस्थित होते.
या योजनेचा लाभ इतरांना देण्याचा प्रश्नच नाही, घरकुलाचे 350 टार्गेट दिले आहे. त्यात ज्यांना घरकुल नाही, त्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणीही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही.-पद्माकर मडावीगटविकास अधिकारी पं. स., मारेगाव