सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालूक्यात हे अभियान राबविण्यात येत असून तालूक्यात एकून 106 गावापैकी जवळपास 82 गावामधे जनजागृती करून प्रत्येक गावामधे ग्रामगीता भेट दिली आहे. हे अभियान सुरळीत पार पडण्याकरिता तालूक्यातील गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सेवक अथक परिश्रम घेऊन अभियान यशस्वी करत आहेत.
महिन्यातील दर रविवारला हे अभियान राबविले जाते. त्यामुळे आज दि 26 मार्च रोजी खेकडवाई, जळका, घोगूलदरा, श्रीरामपूर, टाकळी, कूंभा येथे राबविण्यात आले.