उमानदीघाट (रत्नापूर) येथे भव्य धम्म मेळावा थाटात संपन्न


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : जागतिक महिला मुक्ती दिन व आठवा वर्धापन दिन कार्यक्रम "धम्म भूमी विकास समिती", रत्नापुर, नाचनभट्टी, शिवणी, नउमानदीघाट येथे "भव्य धम्म मेळावा"आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या चंद्रपुर (पुर्व) जिल्हा शाखेचे अध्यक्ष डाॅ.राजपाल खोब्रागडे यांनी भुषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, तसेच राष्ट्रीय सचिव व धम्मयान मासिकाचे सह संपादक बी.एम कांबळे मुबंई यांनीही मार्गदर्शन केले जगदीश गवईस उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज भारतातील तमाम महिला सुशिक्षित झाल्या, सर्व दृष्टीने संपन्न झाल्याचे दिसते, त्यामध्ये परम पूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या त्यागाचे प्रतिबिंब पहायला मिळते. त्यांनी अत्यंत कष्टाने भारतीय संविधान निर्माण करून भारतातील तमाम जातीयवादी, वर्णव्यवस्थेला तडा दिला व सर्व मानवांची या गुलामगिरीतुन मुक्तता केली. परंतु आज येथील जातीयवादी सरकारमुळे, चुकीच्या धोरणांमुळे राज्य घटनेलाच मोठा धोका निर्माण झाला आहे.आपण सर्वच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून या भारतीय राज्य घटनेला संरक्षण देवून ती आबाधित ठेवण्याची फार मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी संस्थेचे विदर्भ प्रदेशचे प्रमुख भीमराव फुसे, संघटक आनंदराव सायरे, नागपूर जिल्हा सरचिटणीस विलास उंदिरवाडे, महिला विभाग प्रमुख विजयाताई रामटेके यांनी देखिल समायोचित मार्गदर्शन केले.धम्मभूमि सेवा समितीचे अध्यक्ष मेश्राम यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन सभेचे अध्यक्ष डाॅ राजपाल खोब्रागडे यांनी पार पाडले. सरणतय होवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.याच ठिकाणी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमामध्ये सर्व छोट्या मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला.